मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

बापरे किती तो गोंधळ चाललाय इथे रांगोळ्या पुसणारया मुलीबद्दल .रीयाचं सगळे पोस्ट वाचुन एवढ्च वाटतय की खरच तीला त्याचा जो त्रास होतोय तो खरा काळजी वाटणारा आहे . कुठल्याही प्रकारे हर्ट करणे चुकीचेच आहे .मग ते तीच्या गाडीच्या बाबतीत असो किंवा शारिरिक( मनीच्या )बाबतीत .त्या मुलीचे पालक जर उद्दाम असतील तर चांगल्या भाषेत त्यांना सांगितले तरी काही उपयोग नाही.यावर शुटिंगचा उपाय आधीच सांगितला आहे .पण तो केवळ पुरावा म्हणुनच वापरता येईल.पण त्याचा त्या मुलीचे वय लक्षात घेता फारसा उपयोग होणार नाही.

माझ्या मते उपाय -सोसाईटीतील जेष्ठ व जरा वचक (यात तुमचे पालकही येतात) (याचा खरच उपयोग होतो)असणारया अश्या ५,७ लोकांना एकत्र करुन त्यांना तुमचा त्रास शांतपणे व्यवस्थित सांगा .ते तुम्हाला जास्त चांगली मद्त करु शकतात .सोसायटीत जर रहायचे असेल तर उद्दाम पालकांना पर्यायाने त्या मुलीला ही मात्रा लागु पड्ण्याची शक्यता जास्त आहे. हल्ली लहान मुलांविषयीचे कायदे कडक आहेत त्यामुळे त्या मुलीला स्वतः मारणे तुम्हालाच बुमरँग होउ शकते .त्यामुळे तुमचाच मनस्ताप वाढेल असं काही करु नका तुमची बाजु सेफ ठेवा .तरी इतर नुकसान करणारी मुलं व ती मुलगी तसेच प्रकार करत राहीली तर पोलीसांची मद्त हाही शेवटचा उपाय असेल .तो करा. त्याची वेळ न येवो ही सदिच्छा.

रांगोळीच्या बाबतीत तिकडे मी तुम्हाला अर्धाउपाय सागितलाच आहे .पण माझं मते या बाबतीत कितीही वाईट वाटले तरी लोकं सिरियसली घेणार नाहीत. कारण मी या अनुभवातुन गेलेय, पुर्वी माझी रांगोळी मुद्दाम किंवा चुकुन पुसली जायची तेव्हा राग व वाईटही वाटायचे.पण आता नाही .फक्त रांगोळी काढुन झाली की लगेच २ फोटो घेते .त्या नंतर ती जर १५ मिनिटांनी जरी पुसली गेली तरी काही वाटत नाही.आतातर पुसलीही जात नाही बिल्डिंगमधे १ डजनभर मुलं असुन आणि जरी विस्कटली तरी त्या दिवसापुरती दुरुस्थही करता येते . Happy .

ऋन्मेऽऽष - लहान मुलांना मारण्याचा विचार मनात आणणे आणि प्रत्यक्ष मारणे यात फरक आहे.जो तुम्हाला नक्की समजलाय.रीयाविषयी ही शंका घेउ नका ती जर का संवेदनशील नसत्या तर या इथे त्यांनी मद्त मागितली असती का?. तुम्ही ज्या लहान मुलांची बाजु इथे घ्यायचा प्रयत्न करताय ती ही नव्हेत.
माझ्या लहानपणी कुणाचीही तक्रार आली घरी तर चुक नसतानाही आई मलाच बदडायची .असेच जवळपास सर्वांची कथा असायची त्यामुळे सर्वजण भांडलो तरी घरी सांगायचो नाही. Happy .

.

नक्की कुणाच्या कानशिलात वाजवायची याबद्दल इथे एक छोटं कन्फ्युजन आहे, असं दिसतंय.

मुलं त्रास देतात. तो त्रास मुद्दाम दिलेला असतोच असं नाही. त्यांनी तो त्रास परत देऊ नये, म्हणून मुलांना सांगून क्षणभर / तात्पुरता फरक पडतो. नेहेमीसाठी सुधारणा करायची तर मुलांच्या आईवडिलांनी मुलांना "सरळ वळण" लावणं अपेक्षित आहे.

हे झालं नाही, तर 'मुलांच्या कानाखाली काढाविशी वाटते' ती फक्त 'वाटते'. अ‍ॅक्चुअल राग त्या पालकांवर असतो. मुलांवर नाही.

अवांतरः

कधीकधी असल्या कारट्यांच्या कानाखाली काढणे हा उत्तम व जस्टीफायेबल इलाज असतो. (हेमावैम)

परवा पाम बीच रोडवर एनाराय कॉम्प्लेक्सच्या पुढल्या सिग्नलपाशी गम्मत पाहिली. सुमारे ८-९वी मधील हीरो अन त्याच वयाची हिरॉइन. सिग्नलला सगळ्या गाड्या उभ्या आहेत. बाजूला पोलीसही आहेत. अशात हे हीरो अ‍ॅक्टिव्हावर रस्त्याच्या साईडपट्टीवरून भिन्नाट निघून जायच्या प्रयत्नात. आपल्याकडे लायसन्स वा गाडी चालवायची परवानगी, तसेच सिग्नलही नाही याची त्या बाळाला पूर्ण कल्पना असणारे.

ज्या स्पीडने तो आला, अन निघून जायच्या प्रयत्नात होता, ते त्याला जमलंही असतं. पण बाय चान्स त्या पोलीसमामाचं लक्ष होतं. त्यांनी आधी थोडी हूल दिली, ज्यामुळे याने ब्रेक मारला. मग व्यवस्थीत त्या हीरोची गचांडी धरली. अन दुसर्‍या हाताने गाडीचं हँडल, ब्रेकसकट. त्यामुळे गाडी थांबली. खाली पडली. हीरो-हिरॉईन सेफ होते.

नंतरची मज्जा लै भारी होती. मामांनी एक शब्दही न बोलता हीरोच्या ४-५ खाड-खाड मुस्कटात मारल्या. पोलिसाच्या हातची कानफट्ट्यात कशी बसते, ते ज्याने पाहिलं आहे त्याला समजेल कशी असते ते.

इथून पुढे काकू, मी, मानवाधिकार, पोलिस ब्रुटॅलिटी, कोवळं वय इ. 'चरचा' झाल्या. कारमधून खाली उतरून इंटर्व्हेन्शन करायचा प्लॅन काकूंनी मामांचा एकंदर अवतार बघूनच रद्द केला होता. सिग्नलही सुटलेला होता.

या चरचेत, हीरोच्या आई-बापाने, या वयात अ‍ॅक्टिव्हाची चावी हीरोच्या हातात का दिली? जर सिग्नलला गाडी थांबवायची अक्कल नाही, तर हा गाडी कशी काय चालवतो? हीरोच्या बापाची पहुंच किती मोठी, अन माझी नोकरी किती छोटी, याचा विचार व्हायोलंट होताना त्या सुमारे ४५--४७ वर्षे वयाच्या पांढरे केस झालेल्या ट्रॅफिक पोलिसाने (क्लास ३. या वयातही रस्त्यावर ड्यूटी म्हणजे नक्कीच नॉन-करप्ट. हेमावैम.) केला नसेल का? ह्या मुद्द्यांचा विचार काकूंनी केलेला नव्हता. त्यांना फक्त त्या 'कोवळ्या' पोराला पोलीसाने कानाखाली दिलेल्या फक्त दिसत होत्या.

असो. हे फारच अवांतर झालं.

मुलं व्हायोलंट/अँटीसोशल होतात, ठीकेय. त्यांना व्हायोलन्स/अँटीसोशल अ‍ॅक्शन्स करू द्या. त्यांचं काउन्सेलिंग करू या आपण.

तुम्हालाही कधीतरी व्हायोलंट होऊन अशा मुलांच्या कानाखाली काढावीशी वाटते. बिन्धास्त काढा कानाखाली. मग आपण तुमचंही काउन्सेलिंग करू. Happy

.

.

आता इथून जरा विचार पुढे नेऊया,
आपल्या मुलाने शेजारच्या ताईची रांगोळी पुसली म्हणून त्याला तिने धपाटा घातला, आणि आपला मुलगा हुंदके देत घरी आला तर आपली पहिली रिअ‍ॅक्शन काय असेल? मुलाकडून खरे खोटे करायचे? त्या धपाटे देणार्‍या ताईकडून खरे खोटे करायचे? (यात कोणीही खोटे बोलू शकतो हि शक्यता लक्षात घ्या),
त्या पुढे शेजारच्या ताई-काकूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपल्याच मुलाला दम भरायचा? का खरे खोटे काही का असेना, रांगोळी पुसली या कारणावरून आपल्या मुलाला शारीरीक इजा पोहोचवणार्‍यांशी भांडायचे. >>>>>>

जेंव्हा तुम्ही सुज्ञ व सुजाण पालक असता व आपल्या मुलावर संस्कार केलेले असता व असा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे तेंव्हा त्या धपाटा घालणाऱ्या ताईला तुम्ही जाब विचारू शकता. ( तुमच्या मुलाने रांगोळी मोडली आहे किंवा नाही - काहीही असुदे) त्यानंतर तुम्ही मुलाला एकांतात विचारू शकता. १) तो होय म्हणाला - त्याला कारणासहित समजावून सांगा कि त्याने केले ते चूक आहे व त्याने संबंधित व्यक्तीची माफी मागितली पाहिजे व असे पुन्हा होता कामा नये. २) तो नाही म्हणाला व तो खरे बोलतोय असे तुम्हाला वाटत असेल तर - त्याच्यावर विश्वास ठेवा व तो खोटे बोलत असण्याची शक्यता आहे हे सुद्धा गृहीत धरा. त्याला समजावून सांगा कि असे करणे चुकीचे आहे. (जरी त्याने केले नसले तरी त्याला समजावण्याची हि एक संधी आहे असे समजून.) पण हि दुसरी बाब
पुन्हा पुन्हा घडत असेल व जर इतर लोक त्याला रंगे हाथ पकडले आहे असे सांगत असतील तर वेगळा विचार करण्याची गरज आहे.

पण, येथे तक्रार कर्त्यांचा मुद्दा थोडा वेगळा आहे- त्यांचा रोष मुलांच्या अधेमध्ये घडणार्या खोड्यांवर नसून त्यांच्या पालकांच्या तक्रार कर्त्यांच्या वर दाखविलेल्या अविश्वासावर व खोड्या पुन्हा पुन्हा घडन्यावर आहे.

.

मला आपले बरोबर आहे असे समजून दुसर्‍याच्या लहान मुलावर हात उगारणे वा मारणे बरोबर वाटत नाहीये. आपण त्या मुलाएवढे नाही आहोत. त्यामुळे आपण मारणे अयोग्य आहे.
आपल्या मुलाला बरोबरचे कुणी त्रास देत असेल तर उलटे वळून प्रतिकारासाठी किंवा त्रास थांबवण्यासाठी त्याने मारणे योग्य आहे हे शिकवणे अगदी योग्य पण आपल्या मुलाला कुणी त्रास देतंय म्हणून आपण त्या मुलाला मारणे चूकच आहे.

दुसर्‍या मुलाची कृती आपल्याला आवडत नाही म्हणून शिक्षेस पात्र आहे असे आपण मारण्याचे समर्थनही न पटण्यासारखे (हे रियाच्या उदाहरणाबद्दल नाही.एकुणात म्हणते आहे.)

रांगोळी पुसणे हे चुकीचे असले तरी त्याच्या विरूद्ध काही करायचे तर रांगोळीचा कचरा त्या मुलीच्या दारात टाकणे वगैरे मला जास्त योग्य वाटते.

अद्दल घडवणे महत्वाचे, (त्यामुळे स्वतःला) अद्दल घडल्याचे कारण काय हे सांगणे ही नंतरची बाब आहे.
<<
अं... बरोबर.

कारण समजतं. आपल्याला कोणताही त्रास झाला, तर आपल्या मनात आपोआप त्याची कारणमीमांसा केली जाते. त्या प्रसंगानंतर तो मुलगा पुन्हा असले उद्योग करू धजावणार नाही असे मला वाटते. जर त्याने तसेच परत केले, तर तो निर्ढावलेला गुन्हेगार आहे, असे म्हणायला वाव आहे.

अद्दल घडवणे, किंबहुना अमुक प्रकारे वागल्यास 'अन्प्लीझंट एक्स्पिरियन्स' येतो हा अनुभव येणे, हेच 'शिक्षा' या कन्सेप्टपाठीचे लॉजिक आहे. बाळ ज्यांच्याकडे रोल मॉडेल, वा ऑथॉरिटी फिगर म्हणून पहाते, त्या आई-वडिलांनीच अगदी बाळपणापासून चुकीच्या गोष्टी वाढू दिल्या नाहीत, तर इतरांना त्या बाळांच्या कानाखाली काढावीशी वाटण्याचा प्रसंगच उद्भवत नाही.. आई/बाबा डोळे वटारतील, इतपत जाणीव त्यांच्या खोड्यांना आळा घालायला पुरेशी असते.

'घरा'च्या परिघाबाहेर पाय ठेवणार्‍यांना: आईच्या आचळापासून दूर जाणार्‍या पाडसांना, सामाजिक उतरंडीत कसे वागावे याची शिस्त कळपातले इतर प्रौढ, 'शारीरिक इजे'च्याच माध्यमातून लावतात, हे निसर्गात घडणारे वास्तव आपण पाहत नाही काय?

पुढारलेल्या देशांतील उदाहरणांवरून मुलांच्या चुकीच्या वागणूकीची चुणुक दिसल्यावर तिथल्या (कळपातील इतर) प्रौढांनी मुलांच्या पालकांना 'अद्दल घडेल' अशी वागणूक दिलेली दिसते.

जेणेकरून मुलांच्या वागण्यात सकारात्मक दुरुस्ती करण्यास त्यांना (मुलांचे आई-वडील) भाग पाडले जाते आहे. यासाठी 'कळपातले' इतर प्रौढ, या बाळाच्या पालकांना शिंगे दाखवत आहेत, अन दिसणार्‍या शिंगांचा अर्थ त्या पालकांना उमजतो आहे.

हे इतके झाल्यानंतर, मग, बाळांचं काउन्सेलिंग, मारहाण न करणं, इतकेच नव्हे तर त्यांना इन्सल्टिंग देखिल न बोलणं, त्यांचं बाळपण जपणं, इ. भारी व उदात्त संकल्पना आधी विचारात अन मऽग नंतर आचरणात येतात.

.

.

सिनी,
माझ्या लहानपणी कुणाचीही तक्रार आली घरी तर चुक नसतानाही आई मलाच बदडायची .असेच जवळपास सर्वांची कथा असायची त्यामुळे सर्वजण भांडलो तरी घरी सांगायचो नाही.

नीधप,
रांगोळी पुसणे हे चुकीचे असले तरी त्याच्या विरूद्ध काही करायचे तर रांगोळीचा कचरा त्या मुलीच्या दारात टाकणे वगैरे मला जास्त योग्य वाटते.

>>>>>>>

येस्स सिनी, माझी आईही मला हेच सांगायची की कोणी दारात भांडायला नाही आले पाहिजे. थोडक्यात कोणाची कळ काढू नये हा धाक असायचा.

यापाठोपाठ नीधप यांची पोस्ट मुद्दाम कोट केलीय. कारण पहिली गोष्ट म्हणजे हा एक चांगला उपाय आहे. रिया यांनी जरूर वापरावा. (आणि या लेव्हलच्या इतर केसमध्ये ओवरऑल विचारही असाच, याच प्रकारे मार्ग शोधण्याचा व्हावा)

दुसरे म्हणजे यातून त्या मुलीच्या मुजोर पालकांना त्रास होईल जे संयुक्तिक राहील. असा त्रास त्यांना झाला तर ते देखील आपल्या मुलांना असेच सुनावतील की यापुढे कोणी दारात तक्रार घेऊन नाही आला पाहिजे. आणि त्यापुढे मग त्यांच्यावर आपसूक त्यांच्या पालकांचाच धाक राहील.

मोठ्यांची भाषा बघितल्यावर असे वाटते की आपल्यावर झालेले संस्कार अधिक उदारमतवादी आहेत, अधिक माणुसकीयुक्त आहेत, तसे ह्यांचे नाही आहेत. <<
नक्कीच पण तुम्ही आम्ही कळती सवरती माणसे आहोत. ते लहान मूल (कितीही चुकीचे वागणारे असले तरी) कळते सवरते नाही. त्या मुलावर चांगले संस्कार नाहीत हा त्याचा दोष नाही. त्यामुळे तो जे करतोय/ करतेय त्याची शिक्षा ही संस्कार व्हावेत, चूक कळावी, चूक सुधारावी म्हणून असायला हवी. आपल्या रागाचा वा हतबलतेचा आविष्कार म्हणून नाही.

आपल्या लहानांवर चुकीचे संस्कार करणार्‍या मोठ्यांच्या बाबतीत अर्थातच असे नाही. त्यांना योग्य तो धडा शिकवला जायलाच हवा.

माफ करा पण मला मूल असतं आणि ते चुकीचं वागलं म्हणून बाहेरच्या कुणी त्याला मारले असते तर मुलाचं चुकीचं वागणं मी खपवून घेतलं नसतंच पण बाहेरच्या कुणी त्याला मारहाण करणं हे ही मी खपवून घेतलं नसतं. घेऊही नये.

.

>>>बाळ ज्यांच्याकडे रोल मॉडेल, वा ऑथॉरिटी फिगर म्हणून पहाते, त्या आई-वडिलांनीच अगदी बाळपणापासून चुकीच्या गोष्टी वाढू दिल्या नाहीत, तर इतरांना त्या बाळांच्या कानाखाली काढावीशी वाटण्याचा प्रसंगच उद्भवत नाही.. आई/बाबा डोळे वटारतील, इतपत जाणीव त्यांच्या खोड्यांना आळा घालायला पुरेशी असते.<<<
उत्तम
प्लस वन ...

जगभरात कुठलाही कायदा घ्या त्यामधे अल्पवयीन गुन्हेगारांचे गुन्हे काहीही असले तरी त्यासंदर्भाने असलेली शिक्षा ही अल्पवयीन असल्याने आपण काय करतोय हे त्या गुन्हेगाराला कळत नसते त्यामुळे त्याला सुधारण्याची संधी असावी या तत्वावर आधारीत असते. आणि तिथे खरोखरीचे गुन्हे असतात.
रांगोळी पुसणे हा गुन्हा नाहीये.

माफ करा पण मला मूल असतं आणि ते चुकीचं वागलं म्हणून बाहेरच्या कुणी त्याला मारले असते तर मुलाचं चुकीचं वागणं मी खपवून घेतलं नसतंच पण बाहेरच्या कुणी त्याला मारहाण करणं हे ही मी खपवून घेतलं नसतं. घेऊही नये.>>>>

भरपूर मोदक. दुसर्‍याच्या(च काय आपल्याही) मुलांना मारणे हे कम्प्लिट चुकीचे आहे हे भारतिय मेन्टालिटीत बसतच नाही. जर तुम्ही त्या मुलांना मारणं बरोबर असेल (कारण कितीही बरोबर वाटूदे) तर त्या मुलांनी तुम्हाला असे त्रास देणं ह्यात काय चुकीचे आहे मग? मुलांना 'दुसर्‍यांना त्रास देऊ नये" हे शिकवायचे असेल तर आपण त्यांना फटकावणं टोटली काऊंटर-प्रॉडक्टीव्ह आहे.

नक्कीच पण तुम्ही आम्ही कळती सवरती माणसे आहोत. ते लहान मूल (कितीही चुकीचे वागणारे असले तरी) कळते सवरते नाही. त्या मुलावर चांगले संस्कार नाहीत हा त्याचा दोष नाही. त्यामुळे तो जे करतोय/ करतेय त्याची शिक्षा ही संस्कार व्हावेत, चूक कळावी, चूक सुधारावी म्हणून असायला हवी. आपल्या रागाचा वा हतबलतेचा आविष्कार म्हणून नाही.

आपल्या लहानांवर चुकीचे संस्कार करणार्‍या मोठ्यांच्या बाबतीत अर्थातच असे नाही. त्यांना योग्य तो धडा शिकवला जायलाच हवा.

माफ करा पण मला मूल असतं आणि ते चुकीचं वागलं म्हणून बाहेरच्या कुणी त्याला मारले असते तर मुलाचं चुकीचं वागणं मी खपवून घेतलं नसतंच पण बाहेरच्या कुणी त्याला मारहाण करणं हे ही मी खपवून घेतलं नसतं. घेऊही नये.
>>>

नीधप तुमच्या वरच्या पुर्ण पोस्टला प्लस एक हजार एक !

,

.

पण मग आपल्याला लहानपणी कोणाचाही धाक का असायचा, कोणीही थप्पड मारली किंवा नुसता तसा आविर्भाव केला तरी आपल्याला हे का कळायचे की आपण असे असे काहीही करणे चुकीचे आहे? <<
कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला योग्य गोष्टी शिकवल्या. त्या मुलाच्या आईवडिलांनी नाही शिकवल्या तर त्या आईवडिलांना समाजाने, यंत्रणेने त्या शिकवायला भाग पाडलेच पाहिजे त्याबद्दल वाद नाहीये.

मला माहीत नाही, पण मी कदाचित हे नक्कीच खपवून घेतलं असतं! द लास्ट थिंग आय वॉन्ट इज आय अ‍ॅम नोन अ‍ॅज अ न्यूसन्स, आय मायसेल्फ ऑर द वन आय हॅव क्रिएटेड, अ‍ॅज लाँग अ‍ॅज आय कॅन! <<<
माझ्या मुलाला बाहेरच्या व्यक्तीने मारहाण करणे खपवून घेता येणे मला कल्पनेतही अशक्य आहे. त्याबद्दल मला न्यूसन्स म्हणा नाहीतर काहीही.
ते वाक्य नीट वाचलेत तर लक्षात येईल की मुलाची चूक पाठीशी घालण्याचे समर्थन नाहीये. मुलाने चूक केली तर त्याला शिक्षा देणे, समजावणे, वळण लावणे ही माझीच जबाबदारी असेल. जगाची नाही.
मुलाने केलेल्या चुकीबद्दल, ज्याला त्रास झालाय त्याची क्षमा मागणे, परत अशी चूक होऊ नये हे बघणे हे जसे माझे कर्तव्य आहे तसेच याला मारलं तरी याची आई काही म्हणत नाही असा मेसेज जाऊ न देणे हे ही मी बघायला हवे.
एक चूक केल्याने मूल गुन्हेगार होत नाही. पण बाहेरच्या व्यक्तीने मारणे हे ओके आहे असं जाणवून दिल्यास पुढे त्याने न केलेल्या चुकीला पण कुणी शिक्षा देऊ शकतं. ते होता कामा नये.

१७ वर्षाच्या मुलाने रेप करणे या संदर्भात अल्पवयीन ची सूट मिळणे योग्य नाही हे माझे मत आजही आहे. प्रत्येक गुन्हा एकाच पद्धतीने बघता येत नाही हे तुम्हालाही माहित असेलच.

रांगोळी पुसणे आणि रेप याची तुलनाही होऊ शकत नाही.

रांगोळी काढणे हा गुन्हा आहे असले विनोदी दावे मी केलेले नाहीत.

.

हो आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला कुणीतरी आपल्या मुलाची चूक आहे असं सांगून मुलाला मारहाण केली तरी ते खरं असेलच असंही नाही.
त्यामुळेच माझ्या मुलाने चुका केल्या तर तुम्ही माझ्याकडे या परस्पर मुलाला मारहाण करू नका हे सांगणे मला जास्त योग्य वाटते.

चिडलेल्या मोठ्या व्यक्तीने जोरदार कानाखाली मारली ७-८ वर्षे वयाच्या मुलाच्या/मुलीच्या आणि कुठे वर्मी लागून मुलाचे जन्माचे नुकसान झाले म्हणजे? कोण जबाबदार?
रांगोळी पुसली, दारात थुंकली यासाठी कानाचा पडदा कायमचा फाटला, हात मोडला, डोळा दुखावला वगैरे गोष्टी होणे योग्य आहेत का?

नीधप, बस्के --> +१ मारणं नक्कीच खपवून घेणार नाही, पण इतर अंगाला हात न लावता केलेल्या शिक्षा (टाईम आउट, सुपरवायझर च्या खोलीत बसणे इ.) वर आक्षेप घेणार नाही. या केस मध्ये बोलणे/ रांगोळी काढायला प्रवृत्त करणे. केरसुणी हातात देवून केर भरायला लावणे इ. रादर समोरच्याने नाही केली तर मी २ वर्षे आणि वरील माझ्या पाल्याकडून करून घेईन.
आपलं मुलाच घरी वागणं आणि इतर मुलांत वागणं टोटली वेगळं असू शकतं. मी माझ्या मुलाला एकदा मित्राकडे गेलो असताना त्याच्या मुलाला ढकलताना बघितलं आणि दुसऱ्याच दिवशी डे-केयर मधून ढकलल्याची तक्रार आली. आम्ही त्याला लाजरा/ पार्क मध्ये इतरांबरोबर शेयर करताना कायम बघितलेलं. ढकलण्याचा प्रसंग पहिला नसता तर विश्वास ठेवणं कठीण गेलं असतं. वय-वर्षे २. आवाज शांत ठेवून समजावलं, अजून तरी ती तक्रार परत आली नाहीये.
परवा, भिंतीचा रंग खरवडत होता, टीचरनी करू नको सांगितलं ऐकलं नाही, हेड टीचरच्या रूम मध्ये बसला, sorry परत नाही करणार सांगितलं. घरी आम्ही तेच परत १-२ वेळा समजावलं. ग्रुप मध्ये न ऐकणार मुलगा असतो, त्याच्या सारखं वागावंसं वाटतं/ न ऐकण्याची एक गम्मत असतेच. ती चांगली नाही एव्हढंच समजावत राहायचं.

.

Pages