मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं पण दोन्ही बाजूंनी पटापटा ब्रेकिंग न्यूज दिल्या जातायत आणि नुसता गोंधळ चालला आहे. जुन्या पॉलिसीज रिवाइव्ह करणे, नविन पॉलिसीज करणे ह्याबद्दल अर्धा शब्द उच्चारला गेला तरी त्यावरुन धोपटाधोपटी चालू आहे. नक्की काय आहे, कोण काय बोललं ते कळायला थोडातरी काळ (२-३ दिवस तरी) जायला हवा ना? तेवढा धीरच नाहिये. चुळचुळ मुंगळे लागलेत नुसते. एखादा निर्णय (निर्णयातला अगदी बाळ टप्पा सुद्धा) काय परिणाम करतोय ते कळायला वेळ तर जाऊ दे. कुठल्याच सरकारचे निर्णय १००% बरोबर असूच शकत नाहीत. पण नक्की कश्याचं काय होतंय ते पण न बघता धोबीघाट उघडला आहे. करंट अफेअर्स सुद्धा धड पुर्णपणे माहित करुन घेतली जात नाहियेत आणि इथे अर्धवटपणे छापली जाऊन नुसता धुरळा. करंट नीट पास होण्याऐवजी शॉर्ट सर्किट्स होतायत.

<<नागपूर दि. १३, जून २०१३ : (आमच्या वार्ताहराकडून) मायबोलीवर अचानक बदललेल्या वातावरणाची नागपूर येथे उच्चस्तरीय बैठकीमधे दखल घेण्यात आलेली आहे.>> Lol
माबो रॉक्स Wink

<>

एकदम मस्त नंदिनी. मनापासून धन्यवाद. तुमच्याकडून खरंच हीच अपेक्षा आहे Happy

<<ब्राझिल ट्रीपचा खर्च ते सहा मंत्री उचलणार आहेत. एन डी टी व्ही.>>

ही बुद्धी विरोधकांनी आणि जागरूक नागरिकांनी गोंधळ केल्यावर आली आहे.
http://www.hindustantimes.com/india-news/after-furore-goa-mlas-and-minis...
काल ट्वीटरवर #BjpFifaMasti ट्रेण्ड होत होतं Happy

<<मला काय झालंय याची चर्चा नंतर करायची नसून करंट अफेअर्सवर करायची आहे.>> +१

एकदम मस्त नंदिनी. मनापासून धन्यवाद. तुमच्याकडून खरंच हीच अपेक्षा आहे >>> अहो, तुम्हालापण यायचंय सोबत. (नेमकं तेच वाक्य वाचायला विसरलात की काय?) नाहीतर म्हणाला, आम्ही आकडे फेक केले. तुम्ही येणार असलात तर प्रोजेक्ट होइल ना?

येताय ना?

ज्या बेसवर मतं मागितली तोच खोटा आहे असं दिसून आल्यावर राजीनामाच द्यायचा. कसला वेळ आणि कसलं काय ?

भाजप विरोधात असते तर लाल गाडीतून का आलात म्हणून पहिल्याच दिवशी सरकारचा राजीनामा मागून मोकळेही झाले असते.

<<अहो, तुम्हालापण यायचंय सोबत. (नेमकं तेच वाक्य वाचायला विसरलात की काय?) नाहीतर म्हणाला, आम्ही आकडे फेक केले. तुम्ही येणार असलात तर प्रोजेक्ट होइल ना?>>

अरे, अजून तुम्ही तिरकस मोडमध्येच आहात होय?
नाही, मी नाही येऊ शकणार. मी सध्या भारतात नाही. शिवाय मी पत्रकार नाही.
प्रत्येक गोष्ट पडताळून पहायला सामान्य नागरिकाने जावं असं थोडीच आहे? सध्याच्या मिडियावर नसला तरी तुमच्यावर विश्वास आहे. या जाऊन.

भाजपेयींना राजीनामा मागायची इतकी सवय झालेली की विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी एक सदस्य राजीनामा द्या म्हणू लागले तेव्हां शेजारच्या खासदाराने आता आपलं सरकार आहे, गप्प बसा अस सांगितलं. हे तर काहीच नाही, एकाने तर भाजीत मीठ कमी पडलं म्हणून बायकोचा राजीनामा मागितल्याचा किस्सा पण ऐकून आहे. बायको एकदम खट होती, ती म्हणाली एकतर तुम्हा लोकांच्या याच सवयीमुळं तुम्हाला मुली मिळत नाहीत आणि तुम्ही खुशाल ब्रह्मचारी आहे म्हणून सांगता....

अरे, अजून तुम्ही तिरकस मोडमध्येच आहात होय?<< नाही. ज्या हिरीरीने तुम्ही साबरमती इतकीच घाण आहे आणि काय ते बीओडी आकडे वगैरे सांगत होता, त्यावरून तुम्हाला या गोष्टींबद्दल इतकं पॅशन आणि जिव्हाळा आहे असं वाटलं म्हणून म्हटलं, चला एक प्रोजेक्ट करून बघावा. त्यासाठी काय पत्रकारच असायला हवं असं काही नाही. भारताच्या नागरिकांना देखील फिरता येऊ शकतं.

भारतात नसलात तरी हरकत नाही, कधी परत येताय.. त्यावर ठरवलं असतं की. अजून पाच वर्षे तरी हेच सरकार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांना पण अवकाश आहे. व्यवस्थित रिपोर्ट केला की २०१९ साठी त्याचा उपयोग होऊ शकेल. मी एकटीनेच केले तर तुम्ही म्हणणर मी मोदीभक्त आहे, आकडे खोटे फेकले. तुम्हीच प्रत्यक्ष आलात म्हणजे कसं, दूध का दूध पानी का पानी, पोल्युशन का पोल्युशन!!!

साबरमती राजस्थानात उगम पावते आणि ३७० किमीचा प्रवास करून अरबी समुद्रात जाते. ३७० किमी म्हणजे काय जास्त नाही. लोक नर्मदा परिक्रमा करतात ती तर याहून जास्त मोठी. अगदे रोज १० किमीचा प्रवास म्हटला तरी ३० दिवस लागतील. दहा बारा दिवस जास्त धरा. वाटेत फोटो व्हीडीओ शिवाय तुम्ही काय ते बीओडी वगओरे म्हणत होता ते सग़ळं चेक करता येईल. नदीकाठच्य लोकांची संस्कृती बघता येईल.

माझ्या पोस्ट्स जर वाचत असाल तर समजेल की मी हे असले तिरकस टोमणे वगैरे मारत नाही... अजूनही विचारते. येताय का? आर्थिक प्रश्न नाही, बजेट टूरच करायची आहे. तरी कमी पडले तर मायबोलीवरच स्पॉन्सरर शोधू. तुमचा डु आयडी गुप्त ठेवायचा असेल तर तोही ठेवला जाईल. येताय का?

काही जण म्हणताय, जय मोदी जय मोदी
काही जण जय (राहुल सोनिया) गांधी गांधी
आता अजुन एक अ‍ॅण्गल मिळालाय चर्चेत.
जय अरविन्दो

Happy

सिरियसली आय मिस जुना व्ही & सी बीबी.

"पहले साईट पे चलो : खास नमोंसाठी हा एक नवा ठ्रेंड. फोरममधल्या चर्चेतही आता प्रत्यक्ष जाऊन पाहणे.
हा रुल इतर ठिकाणीही लागू करायचा म्हटला तर न्यायालयांना निकाल देणं अशक्य होऊन बसेल. पसापेचो (वाटतो कि नाही गुजराथी शब्द ?)

<<ज्या हिरीरीने तुम्ही साबरमती इतकीच घाण आहे आणि काय ते बीओडी आकडे वगैरे सांगत होता, त्यावरून तुम्हाला या गोष्टींबद्दल इतकं पॅशन आणि जिव्हाळा आहे असं वाटलं म्हणून म्हटलं, चला एक प्रोजेक्ट करून बघावा.>>

हे आणि पुढची सगळीच पोस्ट अतिशय पर्सनल आणि त्रागा करणारी आहे.

आकडे मनाचे नाहीत. सगळे रेफरन्सेस दिलेले आहेत. अरे पण हो, तुमचा आकडेवारीवर विश्वास नाही ना.
असं प्रत्येक नदीचं प्रदूषण सामान्य नागरिक कन्फर्म करायला लागले तर मग पत्रकारांची आणि लोकप्रतिनिधींची गरजच काय? त्यांना लोकसभेत बसून अश्लील व्हिडिओज बघण्यासाठी पगार द्यायचा का?

<<आर्थिक प्रश्न नाही, बजेट टूरच करायची आहे. तरी कमी पडले तर मायबोलीवरच स्पॉन्सरर शोधू>>

काळजी नसावी. मी राहते तिथपर्यंत अजून लुच्चे दिन पोहोचलेले नाहीत. तुमच्या स्पॉन्सररचं मात्र तुम्हीच बघा.
आणि हो, तुमचं चालू द्या "साबरमती कितनी सुंदर" चं गायन. थेट व्यत्यय नाही आणणार तुमच्या गायनात.
माझ्या तुम्हाला उद्देशून नसलेल्या पोस्टमुळे जर रसभंग झाला तर मात्र नाईलाज आहे.

<<आता अजुन एक अ‍ॅण्गल मिळालाय चर्चेत. जय अरविन्दो >>
अरेव्वा, मी पहिलीच आहे तर जय अरविन्दोवाली. माबोवर की फक्त ह्या धाग्यावरच ? आपची समर्थक आहे म्हटलं की "डोक्यावर पडलीये वाटतं" असा भाव येतो लोकांच्या वागण्या-बोलण्यात Wink

असो. वैयक्तिक पुराण पुरे झालं. पहारेगिरी चालू करू या.

साबरमती वाह्ती आणि स्वच्छ राखण्यासाठी नर्मदा धरणाचे पाणी तिच्यात वळवले आहे असे ऐकले आहे. हे खरे असेल तर केवळ सुशोभितीकरणासाठी पाणी असे वापरणे योग्य आहे काय? >> अजिब्बात नाही हीरा.

>>>>

हीरा, हे जोडणी काळाची गरज होती, अन्यथा पाणी शेतीला सोडा, प्यायला ही मिळणे अवघड झाले असते.

मिर्ची,

अहो लिंक द्या, पण त्या आधी माहिती ही करून घ्या की !

नर्मदेचे पाणी साबरमती मध्ये आज सोडले जात आहे का? २००२ साली ही कालवा जोडणी झाली आहे. असे व्हावे (नदीजोडणी) ह्यासाठी २००२ च्या आधी अनेक वर्षे लिटिगेशन मध्ये हा प्रकल्प अडकला होता. हा प्रकल्प झाला नसता तर सौराष्ट्रात लोक पाण्यावाचून मेले असते ही फॅक्ट आहे. साबरमती शो करण्यासाठी हा प्रकल्प केला गेला हे म्हणणे येथील लोकांना शोभनारे तर नाहीच नाही.

साबरमतीचा फ्लो नाहीसा होत होता आणि पाण्याच्या भिषण प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे हे सर्व लिटिगेशन झाले होते. असो इथे काय, अहमदाबाद स्वच्छ दिसण्यासाठी मोदी ने पाणी सोडले, हे लिहिले की झाले.

नेट वर शोधा माहिती मिळेल.

आणि हो हे लिटिगेशन्स आणि आंदोलन (नदी जोडा म्हणणारे) मोदी सत्तेत येण्याआधीपासून होते बरं !! जस्ट माहिती !

विक्रमसिंह जाऊद्या ! कच्छ कसे होते आणि काय आहे हे कुणाला माहिती करून घेण्याची गरज इथे नाही.

बाकी पुण्यापेक्षा अहमदाबादमधील इन्फ्रा खूप चांगले आहे.

केदार.. तू सध्या बर्‍याचदा अहमदाबादला जातोयस तर तुला सहज शक्य असेल तर तू साबरमतीतून ३-४ ठिकाणाहून सँपल्स आणून BOD आणि तत्सम टेस्टस करून घेउ शकशील काय? जो काही खर्च येइल तो मी देइन. (उदय यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक सँपल साठी साधारण ५००-६०० रू खर्च होइल)

मी देशात नाहिये आणि असतो तरी अहमदाबादला जाणं होत नाही म्हणून तुला विचारतोय. माझंही समाधान होइल आणि बाकिच्यांचे पण Happy

सध्या बर्‍याचदा अहमदाबादला जातोयस तर तुला सहज शक्य असेल तर >>

मनिष मी आधी लिहिले आहे की मी ६ किमी पाहिली आहे. ( मिर्ची ६०० मिटर नाही !!) आणि मी शहरात जातो, तेथील पाणी खूप स्वच्छ आहे कारण मी एकही फुल सुद्धा पाहिले नाही पाण्यात. त्यामुळे तो उदेश साध्य होणार नाही.

पण .. ते पाणी नर्मदेतून मोदीने सोडले (शहर चांगले दाखवायला) असे वर लिहिले गेले आहे. त्यामुळे तेच सत्य आहे असे मानावे लागेल !

एक गंमत अशी आहे की,

नर्मदेत पोल्यूशन नाही असे वरही मिर्ची ह्यांनी मांडले गेले आहे (मला जो भूगोल माहिती आहे त्यावरून नर्मदा गुजराथ मधल्या मोठ्या इंडस्ट्रीयल एरिया अंकलेश्वर / भरूच मधून नर्मदा जाते) म्हणजे गुजरात मध्ये मोदीने नर्मदेत प्रदूषण होऊ दिले नाही असे म्हणायचे आहे का मिर्चींना? ते कळत नाही!

अहमदाबादला जाणं होतंय म्हणून ठीक आहे. पण आंतरजालावरच्या चर्चेसाठी अमूक इकडे जाऊ, सँपल घेऊ अशा प्रकारचे आवाहन आणि आव्हान करणे, देणे हे हास्यास्पद आहे असं कुणालाच वाटत नाहीये का ?
या आधी इतक्या चर्चा झाल्या असतील मायबोलीवर... अशा प्रकारचं उदाहरण कुणी देऊ शकेल का ?
अगदी राहुल गांधींसारख्या एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षाला लोक कुठलातरी हवाला देऊन विदूषक म्हणू शकतात तेव्हां तुमचे काही डाउटस असतील तर राहुल गांधींना भेटून या, प्रत्यक्षच विचारा असं कुणी म्हटल्याचं तरी उदाहरण आहे का ?
कुणीतरी कुठलंही एक उदाहरण द्यावं प्लीज. अगदी मनमोहनसिंगं यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या अर्थतज्ञ असलेल्या नेत्याबद्दल मुक्तपणे मुक्ताफळे उधळली गेलेली आहेत ती काय सकाळ संध्याकाळ पीएम स्वतः रिपोर्ट करत होते म्हणून का ?
कुणीतरी सीएसडीएस ने पेप्सी कोला आणि कोका कोलाबद्दल केलेल्या दाव्याबद्दल बरंच काही बोललं होतं. तेव्हां इथल्या मार्केटमधल्या कोकचे सँपल्स घेतले होते की सीएसडीएसच्या दिल्ली ऑफीस मधे जाऊन आले होते ?

ज्यांना सँपल्स घ्यायची आहेत त्यांनी इथे न लिहीता, इथे दिलेल्या लिंक्समधील माहीती चुकीची आहे हे सिद्ध केले तरी बस. मग अन्य टेस्ट्स उपलब्ध असतील तर पहावे किंवा मग स्वतःच तज्ञांच्या उपस्थितीत सँपल्स घेऊन मान्यताप्राप्त लॅबमधे पृथःकरण करून निकाल जाहीर केले तरी चालण्यासारखे आहे की !

आव्हान देणे हा बालिशपणा आहे हे माझं मत.

आणि मी शहरात जातो, तेथील पाणी खूप स्वच्छ आहे कारण मी एकही फुल सुद्धा पाहिले नाही पाण्यात. त्यामुळे तो उदेश साध्य होणार नाही >> केदार, नुसता पाण्यात घाण दिसत नाही याचा अर्थ पाणी शुध्द/स्वच्छ आहे असं नाही. वर जी चर्चा झालिये आकडेवारीबद्दल त्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. पाण्यात फुलाची पाकळी पण नाही तर मग साबरमतीचा तळ पण दिसतो का पाण्यातून? एवढं नितळ आहे का पाणी? (माझी अपेक्षा नाहिये). म्हणून जर BOD वगैरे लिमिटस मधे असेल तर ते पाणी स्वच्छ म्हणता येइल. म्हणून तुला विचारतोय. ते जर कळालं तर मोदीना गंगा कशी करायची आहे ते पण कळेल.

पाण्यात फुलाची पाकळी पण नाही तर मग साबरमतीचा तळ पण दिसतो का पाण्यातून? एवढं नितळ आहे का पाणी? >>

अरे मनिष, तळ फक्त नगीना लेकचा दिसायचा. तो ही आता दिसत नाही. Happy तळ दिसला म्हणजे स्वच्छ पाणी असे नसते. कोणत्या नदीचा तळ दिसतो कम्पेअर करायला?

मला तरी ही चर्चाच ओढून ताणून केलेली दिसते. ज्यात फॅक्टस बदलून सांगितल्या गेल्या. (ते नर्मदेचे पाणी सुशोभीकरणासाठी आणले वगैरे) आणि तरी मोदीच सगळे बदलात असे इथे म्हणले गेले. Proud

हे आणि पुढची सगळीच पोस्ट अतिशय पर्सनल आणि त्रागा करणारी आहे.
काळजी नसावी. मी राहते तिथपर्यंत अजून लुच्चे दिन पोहोचलेले नाहीत. तुमच्या स्पॉन्सररचं मात्र तुम्हीच बघा.
आणि हो, तुमचं चालू द्या "साबरमती कितनी सुंदर" चं गायन. थेट व्यत्यय नाही आणणार तुमच्या गायनात.
माझ्या तुम्हाला उद्देशून नसलेल्या पोस्टमुळे जर रसभंग झाला तर मात्र नाईलाज आहे.<<<

काय त्रागा केलेला आहे? तुमच्याच जुळ्या बहिणीने आणि धागाकर्तीने मांडलेली कल्पना आहे, आणि मला तरी ती संकल्पना आवडलेली आहे. तुम्हालादेखील आवडली आणी तुम्हीच म्हणालात की ११ किमीचा दिवाणखाना बघायचा नाही, म्हटलं, चलो डन. पूर्ण उगमापासून संगमापर्यंत नदी बघून येऊ. मीच एकटी गेले तर मला म्हणाल आकडेवारी खोटी आहे, (तसंही मला त्या केमिकल मधलं फारसं समजत नाही हे मी आधीच कबूल केलंय) साबरमती किती घाण अथवा किती सुंदर याचं मी काहीही गायन वादन नर्तन केलेले नाही. कारण मी नदीच पाहिलेली नाही!!!! हे कबूल करायला लाज वाटत नाही.

तुम्ही मात्र ज्या हिरीरीने आकडे वारी देताय ते पाहून वाटलं तुम्हाला यात नदीमधल्या प्रदूषणामधे फार रस असावा, पण तुमचा रस मोदींना बडबडण्यात जास्त आहे, ते आता समजून येत चालले आहे. अभ्यास वाढवा. नेटवरच्या लिंकांचा नव्हे, तर लोकांचा!!!

चला, आता साबरमतीला येत नाही आहात तर किमान "शेतीमधल्या नुकसानीपायी कर्जबाजारी होऊन शेतकर्‍यांनी केलेल्या आत्महत्यांचा" (गुजरातमधील) कुठे सर्वसमावेशक रिपोर्ट आहे का? त्याच्याबद्दल तरी काही लिहिता येईल का??

मला वाटतं इशरत जहांची हत्या नसून एण्काउंटर होतं, दंगलप्रकरणात कुणीही सामील नव्हतं असे रिपोर्ट्स ठेवलेल्या एखाद्या खणात ती (आत्महत्याविषयक) फाईल असावी....

जाता जाता एक शंका..

इशरतची हत्या नसून एण्कांउंटरच होतं असं लिहीणा-यातले किती जण घटनास्थळी उपस्थित होते ?
गेलाबाजार इशरतला ओळखत होते ? किमान हॅडलीला भेटून खातरजमा करून आले होते....
किंवा सर्वसमावेशक रिपोर्ट घेऊन आले होते ?

की लिंका आणि बातम्या हाच सोर्स होता ?

<< नर्मदेत पोल्यूशन नाही असे वरही मिर्ची ह्यांनी मांडले गेले आहे (मला जो भूगोल माहिती आहे त्यावरून नर्मदा गुजराथ मधल्या मोठ्या इंडस्ट्रीयल एरिया अंकलेश्वर / भरूच मधून नर्मदा जाते) म्हणजे गुजरात मध्ये मोदीने नर्मदेत प्रदूषण होऊ दिले नाही असे म्हणायचे आहे का मिर्चींना? ते कळत नाही!>>

मिर्ची मांडत आहेत, मिर्चींना म्हणायचं आहे...केदार, एक छोटंसं करेक्शन. मी आधीही सांगितलं आहे की मी ह्या क्षेत्रातील नाही. मी कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. जे काही म्हणत आहेत ते रिपोर्ट्स आणि ते रिपोर्टस बनवणारे तज्ञ म्हणत आहेत. मी फक्त इथे रिपोर्टस मांडत आहे.

<<नर्मदेचे पाणी साबरमती मध्ये आज सोडले जात आहे का? २००२ साली ही कालवा जोडणी झाली आहे. असे व्हावे (नदीजोडणी) ह्यासाठी २००२ च्या आधी अनेक वर्षे लिटिगेशन मध्ये हा प्रकल्प अडकला होता. हा प्रकल्प झाला नसता तर सौराष्ट्रात लोक पाण्यावाचून मेले असते ही फॅक्ट आहे. साबरमती शो करण्यासाठी हा प्रकल्प केला गेला हे म्हणणे येथील लोकांना शोभनारे तर नाहीच नाही.>>

हे मांडणार्‍या रिपोर्टसच्या लिन्क्स मिळतील का?

<<तुम्ही मात्र ज्या हिरीरीने आकडे वारी देताय ते पाहून वाटलं तुम्हाला यात नदीमधल्या प्रदूषणामधे फार रस असावा, पण तुमचा रस मोदींना बडबडण्यात जास्त आहे, ते आता समजून येत चालले आहे. अभ्यास वाढवा. नेटवरच्या लिंकांचा नव्हे, तर लोकांचा!!! >>

लोकांचा अभ्यास कसा करतात? त्यांची चिकनीचुपडी भाषणे ऐकून का?
उत्तर नाही दिलंत तरी चालेल. वैयक्तिक भांडणं करण्यात मला रस नाही. मांडलेला मुद्दा खोडून काढण्यासाठी काही असेल तर दाखवा. जरूर पाहीन.

किमान हॅडलीला भेटून खातरजमा करून आले होते>>>> आन्तर्राष्ट्रीय गुन्हेगाराला भेटणे आणी त्याचा बाईट घेणे एवढे सोपे असते?:अओ:

.

Pages