होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन मूर्खपणे:
१) नवरा बायकोत वाद झालेला असताना, त्यांना संसारसुख नाही, शाप नडला वगैरे बडबड लग्गेच सुरू करणे. कमाल आहे कमाल. एक भांडण झालं की लगेच संसार मोडतात का? काय संवाद तरी!

२) मोठी आई परत एकदा खुद्द इंदू कडून वृत्तांत ऐकण्याऐवजी बेबीने जे इंदूकडून ऐकलं जे तिने बंद दाराआडून त्रोटक ऐकलं त्यावर विसंबतात. इंदू घरातच होती ना? तिला थेट का नाही विचारलं? हे यांचं व्हेरिफिकेशन!

पूनम, अनुमोदन. काल ती बडबड सुरु झाल्यावर आम्ही टीव्हीच बंद करून टाकला.
आता फक्त महाभारत(स्टार प्लसवरचे :फिदी:) पहायचे असे ठरवले आहे. Happy

पूनम.. अगदी खूप अनुमोदन!
इतर बाया येड्या आहेतच, पण रोहिणी हट्टंगडीचं कॅरॅक्टर इतकं बॅलन्स्ड धडाडीचं वगैरे दाखवलं आहे पण ती ही लगेच संसार मोडला वगैरे सुरु ! एकंडरीत येडेपणा चालला आहे..

आणी तिला सोन्याच्या जरीची साडी आणि आईने मागितलेला अजुन एक चंद्रहार याविषयीही काही माहित नाहीये. याशिवाय आईने लग्नात दागिन्यांच्या केलेल्या भरमसाठ दागिन्यांच्या बिलाबद्दलही जान्हवीला काही माहित नाहीये. मामाकडे गोखल्यांच्या घरात जाऊन आल्यानंतर एवढा महागडा मोबाईल कुठुन आला हेही तिला माहित नाहीये. श्रीने अचानक उत्पन्न केलेल्या चंद्रहाराविषयी काही माहित नाहीये. बाबांच्या ऑपरेशन साठी बँकेतून घेतलेले कर्ज हे कर्जच नाही हे तिला माहित नाहीये. इतके ख्यातनाम डॉक्टर तिच्या बॉसच्या नाही तर श्रीच्या सांगण्यावरून ऑपरेशन स्वस्तात करणार आहेत हे तिला माहित नाहीये. आपला चंद्रहार आपल्याच मामाने चोरला होता आणि तो आता आपल्या भावाकडे आहे हे तिला माहित नाहीये. एकदंर जान्हवीला बरेच काहीच माहित नाहीये. आणी एक एक गोष्ट जसजशी उघड होत जाईल तसतसे जान्हवीच्या स्वाभिमान एपिसोडचा रिपीट टेलिकास्ट होईल हे नक्की.>>>पियु परी१+++
याशिवाय दर महिना खर्चासाठी ती तिच्या आईला ४ ह. देत होति त्याचे १लाख ९८ ह. असे काहीतरि होतात(हे तिच्या बाबांनी तिच्या आईला जावयाकडुन ५० ह.आणल्यानंतर झालेल्या वादात वीचारलेले असते.त्याचा हीशोब आईला कुणीच का विचारत नाही.?) लग्नात आईच्या अगांवर एवढे भरमसाठ दागिने कसे आले हाही बाप लेकीनां अजुन प्रश्न पड्लेला नाहीये

पूनम, एक्झॅक्टली!!
तृटी काढाव्यात तर अश्या..

नाहीतर लोकांना का ही ही खटकतं. ते इथे लिहून हशे मिळवण्याची चढाओढ निर्माण होते.
मग जे खरोखर मालिकेचा आनंद लुटत आहेत त्यांनाही ते सुख मिळू दिलं जात नाही. एवढं लिहून मी माझी दोन वाक्य संपवते, जय मालिका!

नाहीतर लोकांना का ही ही खटकतं. ते इथे लिहून हशे मिळवण्याची चढाओढ निर्माण होते.
मग जे खरोखर मालिकेचा आनंद लुटत आहेत त्यांनाही ते सुख मिळू दिलं जात नाही. एवढं लिहून मी माझी दोन वाक्य संपवते, जय मालिका!
>>
हे उ गा च च होतं!
असो!

रिया, उगी उगी बाळा.
त्याचं काये ना पूनम हिची बळचची मैत्रीण, वैनुडी ना !!
तू माझी लाल म्हण मी तुझी लाल म्हणते असं डीले त्यांचं Proud
आता ते मला कसं माहीत हे मात्र विचारु नको हां Wink

नाहीतर लोकांना का ही ही खटकतं. ते इथे लिहून हशे मिळवण्याची चढाओढ निर्माण होते. >> आम्ही या मालिका यासाठीच पाहतो का तर इथे लिहायला मिळावं म्हणूनच.. पुढे?

श्री चक्क रडतोय .. बाकी आया आल्याच काय झाल रे वगैरे गुळ्गुळीत वाक्य घेवुन..
अरे श्वास घेवु द्या की त्याला.. प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही .. नवीन लग्न झालयं म्हणत या आयांच नाक खुपसतायत>>आता बाहेर येऊन रडत बसल्यावर अजून काय होणार......प्रायव्हसीसाठी खोली आहे ना.....तिथे रडायला हवे होते.

स्वप्ना_तुषार | 12 December, 2013 - 13:08

जान्हवीने तिच्या मूल्यांचे कधी कधी अवास्तव थोतांड केले आहे असे वाटते. गाडी नको, बसची सवय आहे. नौकरी करणार हे सगळं मान्य मग सकाळी आयता चहा घशाखाली उतरतो कसा हिच्या? सवय आहे ना हिला घरातलं सगळं सांभाळून ऑफिसल जायची? मग आयता डबा तरी कशाला न्यायचा ऑफिसात? त्यावेळी बसली दात विचकत थँक्यू वगैरे म्हणत . म्हणायचे ना सरळ " नका माझ्या सवयी बिघडवू . सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायची सवय आहे मला ." पण आयते गिळायला मिळाले की झाले .... ठाम राहयचे तर सगळ्याच गोष्टींवर राहा ना. ..

>> कोणी नोटिस केलं का? स्वप्नाची ही पोस्ट आज पडली आणी लगेचच आजच्या भागात जान्हवी श्रीला लग्नाआधी कसं तिचं तिला स्वयंपाक बनवुन, स्वतःचा डबा स्वतः भरून वै. न्यायची सवय होती व आता आयते घ्यायला कसे ऑकवर्ड होते इ. बोलतांना दाखवले.

अर्थात सिरियलचे एपिसोड्स इतक्या शेवटच्या क्षणी शूट होत असतील की नाही शंकाच आहे. पण आपण इथे लिहितो ते मालिकेशी रिलेटेड कोणाकडूनतरी वाचले जाते असं वाटतं मध्येमध्ये.

अजुन कोणाला असा अनुभव आला असेल (म्हणजे या मालिकेविषयी इथे लिहिलेले वाचले जाते असे वाटावे असा अनुभव) तर प्लीज शेअर करा.

पियुपरी मला नाही वाटत इथे वाचुन तो बदल झाला असेल कारण तसं असतं तर इथे बराच काही लिहीलं जातं (जे ह्या पेक्श्या क्रिटीकल असतं ) त्यात बदल झाला असता

ह्म्म.. खरंय..

पण आपण सुचवलेले सगळेच्या सगळे बदल केले तर मालिका एका दिवसात संपणार नाही का? Happy

गुरुवार दि. १२ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजच्या भागात आसू आणि हसू यांचे मिश्रण बेमालूमपणे बसविल्याचे जाणवत गेले. श्री डोळ्यात पाणी आणून गॅलरीत चिंताग्रस्त अवस्थेत उभा आहे आणि त्याच्या खांद्यावर आईआजीचा हात पडतो....तो वळून पाहतो तर केवळ आईआजीच नव्हे तर बाकीच्या त्याच्या पाचही आया तिथे उभ्या आहेत. त्याला जाणवते की या का आल्या असतील.....आजी विचारतात, "काय झाले आहे श्री ?" श्री नेहमीप्रमाणे 'अगं काही नाही..." पुढे काही बोलणार तोच जान्हवीदेखील आपल्या खोलीतून येते आणि मागे उभी राहते. तिच्या डोळ्यातही पाणी आहेच. श्री सांगतो, "डोळ्यात पाणी आले म्हणजे...." त्यावर जान्हवी म्हणते, "मी त्याला जबाबदार आहे..." आजी आणि बेबीआत्या तिच्याकडे मान वळवून बघतात...बेबी नेहमीप्रमाणे टोमणा मारतेच. पण आजी म्हणतात, "मला तुझ्याकडून ऐकायचे आहे, श्री...." यावर उत्तर म्हणून श्री आजीला "ऑफिसमध्ये कामाचे टेन्शन आले होते आणि त्या दरम्यान काही नुकसान झाले त्याविषयी मी जान्हवीला काहीतरी मोठ्याने बोलत होतो...त्यावरून वाद चालू झाला..." पण इथे इंदूबाई म्हणते, "पण मी तर ऐकले पैशाच्या देवाणघेवाणीबद्दल काहीतरी चालले होते...". श्री विचारतो, "म्हणजे तू ऐकले आहेसच ना...तोच तर आमचा विषय होता....जान्हवीच्या आईने बिले भरण्यासाठी माझ्याकडे पैसे दिले होते, ते आमच्या कामगाराकडून भरण्यासाठी....पण जान्हवीला ते पैसे घेतल्याचे आवडले नव्हते...तेच मला ती सांगत होती....". यावर आजी जास्त काही न बोलता इतरांना म्हणतात, 'किरकोळ वाद झाला असताना तुम्ही इतका का वाढवून सांगितला मला ?" यावर श्री व जान्हवी एकमेकाकडे पाहात असताना सरसूमावशी त्याना म्हणते "तुम्ही जावा तुमच्या खोलीत..." श्री ला तेवढेच हवे असते....तो आणि जान्हवी तिथून त्यांचा निरोप घेऊन जातात.

रूममध्ये दोघे कॉटवर बसलेले आहेत....दोघांचाही समज झाला आहे की आपले काहीतरी चुकले आहे. श्री पुन्हा तिची माफी मागतो, पण जान्हवीला वाईट वाटते एवढ्यासाठी की आपल्यामुळे श्री आजीशी पुन्हा खोटे बोलला. श्री तिला वचन देतो की इथून पुढे तिच्या घरातील लोकांसाठी तिला लपवून तो काही करणार नाही. जान्हवी इतकेच म्हणते, "श्री, मी आर्थिक मदत एवढ्यासाठीच नको म्हणते की त्यामुळे त्या पिंट्याला चटक लागेल, तो कधीच आपली जबाबदारी समजू शकणार नाही....आणि त्याना घरखर्चासाठी पैसे हवेच असतील तर तितके मी त्याना देवू शकेन...तुझ्याकडूनही मी घेऊ शकते....आणि आता आपल्या लक्षात एक आले आहे की आपण नवराबायको तर झालो आहोत, पण तत्पूर्वी आपण मित्र होतो हेच विसरून गेलो आहोत. मित्रांप्रमाणे आपण वर्तन का करू नये ? एक करू या. तुझ्या माझ्यात कितीही वाद झाले, मतभेद झाले तरी या चार भिंतीच्या बाहेर ते जाता कामा नये...." यावर श्री देखील हसून हो म्हणतो....मग जान्हवी लाजून त्याला 'आय लव्ह यू' म्हणते आणि त्यांच्यातील वादाचा पडदा विरून जातो.

आजी पुन्हा इंदू आणि बेबीवर त्यांच्या दरवाजाला कान लावून इतरांची बोलणी ऐकण्याच्या सवयीबद्दल कडक शब्दात हजेरी घेतात पण त्या दोघीही आम्ही काही ऐकले नाही. श्री चे आता लग्न झाले आहे आणि तो आपल्या बायकोशी बोलणार, त्यांच्यात वाद होणार...हे सारे नैसर्गिक आहे, तुम्ही तिकडे लक्ष द्यायचे नाही...असे आजी वारंवार सांगतात तरी इंदूनामक ते पात्र आपल्या बालिशपणा कायम ठेवल्याचे पाहून संताप येतो....आता ती श्री कडून इंग्लिश शिकणार आहे असे आजीला सांगते. आजी 'शिकणार असलीस तर जरूर शिक्षण घे' असाही सल्ला देतात.

रात्र झालेली आहे आणि इकडे पिंट्या लगबगीने सुन्या रस्त्यावरून चालला आहे. मागून बाईकवरून मनिष आला आहे. पिंट्याला पाहून तो विचारतो तर पिंट्या नेहमीप्रमाणे, "अरे मी इथल्या एका मित्राकडे चाललो आहे...." मनिष, 'चल मी तुला घेऊन जातो त्याच्याकडे" असे म्हणताच, 'नको, इथे तर आहे. जाईन मी दोन मिनिटात..." मनिषला काही कळत नाही, तरीही "उद्या टेंपो येणार आहे. तू तयार राहा....आपल्याला सामान भरून जायचे आहे..." असे सांगून तिथून निघून जातो.

सकाळी अत्यंत खुषीच्या मूडमध्ये असलेल्या जान्हवी मॅडम ऑफिसला जायच्या तयारीत असून चक्क गाणे म्हणत आहेत. श्री देखील बाजूलाच तयार होत असून बायको आनंदी मूडमध्ये गाणे म्हणत असल्याचे पाहून तिला जवळ घेतो आणि दोघे त्याच तालात डान्सही करतात. त्या आनंदाच्या भरात जान्हवी त्याला एक विनंतीही करते, "मी माहेरी असताना सकाळी सहा वाजता उठून स्वयंपाकपाणी करत होते, डबा भरून घेत असे आणि सार्‍यांची कामे आटोपली की बॅन्केला जात होते....इथे मात्र तसे होत नाही, म्हणजे मला जेवण करायचे आहे. अशी कामे करत करत एके दिवशी मी सार्‍यांची मने जिंकून घेणार आहे. तेव्हा आठवड्यातील एक दिवस मलाही द्यायला सांग ना..." श्री ला हे ऐकून आनंद तर होतोच पण स्वयंपाकघरातील बाबीत मी कधी लक्ष घालत नाही, तरीही मी विचारतो....यावर जान्हवी म्हणते, 'नको...तू विचारू नकोस मीच विचारीन..." असा या दोघांचा लाडिक संवाद चालू असताना इंदूबाई तिथे येते आणि दोघांना पाहून हसतेही.

आता तिच्यात आणि शरयू या दोघींत इंग्रजी शिकण्यावरून मारामारी....कथानक आता अशा भागाकडे जाणार.

मामा छान अपडेट्स ! हल्ली बघायला वेळ मिळतं नाही आणि इच्छा ही होत नाही. ( इच्छा नाही म्हणुन वेळ काढतं नाही Wink )

पियु, किंवा असं असेल की इथल्या लोकांना आधीच माहीत असेल की पुढे काय होणारे आणि ते येऊन आधीच बोलत असतील Lol
Light 1 घ्या गं

पौर्णिमा | 12 December, 2013 - 13:48

दोन मूर्खपणे:<<<

Lol

भारी आवडले.

अनेकवचनही आवडले आणि मयेकरांचा प्रश्नही

आईआजींनी सूना पसंत करताना नक्की काय निकष लावले होते. म्हणजे बायका साध्या सरळ असणे वेगळे आणि बावळट असणे वेगळे.

  1. श्रीची आई - स्वतःचे काहीही मत नाही
  2. ती नंबर २ - सगळे दुसर्याचे संवाद रिपीट करते. ह्या सिरेलीचा संवादलेखक बहूदा per character पैसे charge करत असावा. म्हणून पैसे वाचावायला हीला वेगळे डायलॉग दिले नाहीत.
  3. नंबर ३ - तीला फारतर मानसिक / विसरण्याचा आजार किंवा नाटक असा Benefit of doubt देता येईल

आणि अश्या सूना निवडणार्या बाईला माणसांची पारख आहे असे कसे म्हणता येईल?

कालच्या भागात श्री आईआजीला सगळ खर खर सांगेल अस वाटल होत, पण परत भ्रमनिरास झाला...आणि दुपट्यात असल्यापासुन ओळखत असलेल्या नातवाने आपल्या डिस्टर्ब असण्याची सांगितलेल्या कारणांवर उद्योगपती आजी सहज विश्वास ठेवते हे पाहुन तर काय झाल ते सांगताच येत नाहिये.

पण आपण इथे लिहितो ते मालिकेशी रिलेटेड कोणाकडूनतरी वाचले जाते असं वाटतं मध्येमध्ये.

अजुन कोणाला असा अनुभव आला असेल (म्हणजे या मालिकेविषयी इथे लिहिलेले वाचले जाते असे वाटावे असा अनुभव) तर प्लीज शेअर करा.>> पियूपरी मी दुसर्‍या मालिकेच्या जुळून येतीच्या धाग्यावर लिहीलं होतं ते बाबाजी बाबाजी सतत म्हणणं डो़क्यात जातं तर त्याच रात्री तोच डायलॉग... मुलाच्या घरचे म्हणतात मुलीच्या वडलांचं सतत बाबाजी बाबाजी म्हणणं.... Uhoh आयत्या वेळी एडिटतात की काय हे? आणि नाही तर इतके कोइन्सी कस्काय बुआ?

बाकी चर्चा वाचतेय या धाग्यावरची.. मालिका पाहत नाही पण इथे अपडेट्स वाचत राहील्याने फारसं बिघडत नाही आणि तसंही त्या पेल्यातील वादळांमध्ये कुरबुरींच्या चक्रव्यूहातच फिरतेय मालिका... सो नॉट भव्य दिव्य अ‍ॅट ऑल...

स्वप्ना... त्या स्वाभिमान आणि दात विचकून आयता डब्बा अगदी अगदी Happy

दोन लोकांच बोलण तिसर्‍याने (अनाहुतपणे) चोरुन ऐकुन चौथ्याला सांगणे व चौथ्याने ते पाचव्याला सांगुन समस्त कुटुंबाने जगबुडी आल्यासारख त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न खुपच हास्यास्पद होता.

बाकी संथ चाललिये. ढवळा आता जरा म्हणावे देवस्थळींनी. Happy

Pages