अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.
सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.
'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !
सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!
काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html
@किरण, >>आताच पाहून
@किरण,
>>आताच पाहून आलो....<<
ही पोस्ट खूप छान. मी जे०-जे लिहिले नाही, ते-ते तुम्ही अप्रतिम व मुद्देसूद लिहिलेत.
धन्यवाद !
पौर्णिमा , नाही आवडला विशेष .
पौर्णिमा ,
नाही आवडला विशेष . करीनाचा सस्पेन्स तरीही ओके आहे. पण दुसर्या कहाणीचा शेवट चक्क अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. अगदीच इल्लॉजिकल आणि आमीर असो की अमिताभ- न पटण्यासारखा.
आमीरने काम केलं आहे, म्हणून काहीही अॅक्सेप्टेबल. आणि शारूक स्ट्रीट वर्कर ते बॉम्ब एक्स्पर्ट होतो, तेव्हा ते अॅक्सेप्ट करणारे मात्र आपण मूर्ख!! गंमत आहे!
>>> + १
ठिकठाक वाटला.. पहिला ७५ %
ठिकठाक वाटला.. पहिला ७५ % चित्रपट उत्तम आहे. शेवट मात्र अगदीच काहितरी केलाय.. एव्हडं सगळं करून हेच का शेवटी !! असं वाटलं. अमिर खान आणि करिनाची अॅक्टींग मस्त आहे एकदम. राणी मुखर्जीचीही चांगली आहे पण तिला फारच कमी वाव दिला त्यामुळे तिच्या जागी इतर कोणीही असतं तरी चाललं असतं असं वाटलं... बाकी त्यांची ती शेजारी आणि प्लँचेट (किंवा तत्सम जे काय आहे ते !)वाला पूर्ण प्लॉट बळच आहे. तो घेतला नसता तरी फार काही बिघडलं नसतं.. आमिर खान आणि राणीची मानसिक आंदोलनं तशीही दाखवता आलीच असती...
एकदा पहायला ठिक आहे.. पण आऊटस्टँडींग वगैरे नाही वाटला अजिबातच.
ऑल सेड अँड डन, शेवटी सिनेमा
ऑल सेड अँड डन, शेवटी सिनेमा पहाणेबल आहे. कथा विसविशीत आहे, कबूल. शेवट पुचपुचीत आहे, कबूल. स्टोरी माहीत आहे, तेही कबूल. पण आमीरच्या फ्रेम्स कुठे तुम्ही पाह्यल्यात? त्याच्यासाठी मस्ट्. शिवाय आणखीही काही मस्ट आहेत. रात्रीच्या मुंबईची अप्रतीम फोटोग्राफी, रेड लाइट एरियाचं उघडं वाघडं तरीही अंगावर न येणारं चित्रण, सिनेमाभर पसरून राहिलेली तरल धूसरता, चाफ्याच्या झाडाने साधलेला परिणाम, करीनाची संगमरवरी थंड अंगकांती, बुल्स आय हिट करणारी पर्फेक्ट कास्टिंग, मेकपशिवायचे राणी आणि आमीर, बॅक्ग्राउंड म्युझिक, करीनाबरोबरच्या सीनमध्ये किंचित मोहग्रस्त पण शेवटी आत्मपीडेनेच क्लांत झालेला आमीर, शेवटच्या सीनमध्ये मादकता कायम राखूनही मायेने आमीरला जवळ घेणारी राणी आणि तिच्या कुशीत धाय मोकलून रडणारा, किनारा सापडलेला आमीर...
फक्त, जिया लागे ना हे गाणं कानांना चांगलं वाटलं पण कथेत अनावश्यक वाटलं.थोडं बोअर झालं.
एकदा पहावाच.
सगळ्यांनी छान लिहिलय. तरी
सगळ्यांनी छान लिहिलय. तरी बघणारच !
बाकी त्यांची ती शेजारी आणि
बाकी त्यांची ती शेजारी आणि प्लँचेट (किंवा तत्सम जे काय आहे ते !)वाला पूर्ण प्लॉट बळच आहे. >> पराग बळंच कसा?
त्याचंही महत्व आहेच की. शेवटी आमिरला उपरती होत नाही का? आता इथे लेखनमर्यादा आहे बरं का. नाहीतर सगळे परत ओरडतील सिनेमाची स्टोरी इथेच सांगितली म्हणून.
इथल्या पोस्टी वाचून "सिनेमा
इथल्या पोस्टी वाचून "सिनेमा पहावा पण टीव्हीवर लागेल तेव्हाच" ह्या निष्कर्षाप्रत आलेय. म्हणजे पैसे फुकट जाणार नाहीत आणि घरी पिक्चर पहाताना पॅरेलल प्रोसेसिंग करता येतं म्हणून वेळही फुकट जाणार नाही. फक्त नेमकं त्यावेळी कोणी अतिमहत्त्वाची व्यक्ती वारली नाही म्हणजे मिळवलं नाहीतर नुसत्या 'आजच्या ठळक बातम्या' पहायची वेळ येईल.
स्वप्ना, कोणी अतिमहत्त्वाची
स्वप्ना, कोणी अतिमहत्त्वाची व्यक्ती गेली म्हणून मनोरंजनाचे कार्यक्रम बंद ठेवले अशी वेळ किती वेळा आलीये? आणि जरी आली, तरी एक सिनेमाच बुडेल ना.. जो तसाही वेळ आणि पैसे फुकट जाऊ नयेत म्हणून टीव्हीवरच बघायचा आहे? सॉरी टू से, असंवेदनशील प्रतिसाद!
आमीरच्या "तलाश'ने कमविले 47.1
आमीरच्या "तलाश'ने कमविले 47.1 कोटी>>> सकाळ
स्वप्ना, केबलवाल्याला टाटा
स्वप्ना, केबलवाल्याला टाटा करून टाटाचे डीटीएच घे. त्यांच्याकडे सक्तीचा शोक नसतो.
मामी, फक्त त्या पिकनिकसदृश
मामी, फक्त त्या पिकनिकसदृश सीनमधेच जीन्स आहे तिची. फॅमिली फोटोच्या दृष्यातही साडीच आहे.
>>>> एका स्कूटरवरच्या दृष्यातही तिनं साडी नेसली नाहीये. मुलगा असताना जी गुलाबी साडी नेसलीये ती एखाद्या खास कारणास्तव नेसलेली आहे असंच दिसतं कारण बाकीही एकदम तयार होऊन बसलीये. म्हणून तर जरा कन्फ्युजन.कॉम झालं माझं.
साजिरा म्हणतो तसंच असणार. तशीच पद्धत आहे ना! काय करणार!
पौर्णिमा, ह्यात असंवेदनशील
पौर्णिमा, ह्यात असंवेदनशील काय आहे? ती व्यक्ती गेली म्हणून मला दु:ख झालं नसेल तर सक्तीचा दुखवटा कशाला? हीसुध्दा एक प्रकारे व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपीच आहे ना? अशी वेळ नुकतीच माझ्यावर आली म्हणून बोलतेय. सॉरी टू से, पण ह्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही.
हो भरत, तसंच करायची वेळ आली आहे. कारण फोन केला तेव्हा 'टेक्निकल प्रॉब्लेम आहे' असं बोटचेपं उत्तर दिलं त्यांनी.
असो. ह्या चर्चेची ही जागा नव्हे. त्यामुळे ह्या मुद्द्यावरची माझी ही शेवटची पोस्ट.
राणीने साडी नेसायला नको होती
राणीने साडी नेसायला नको होती का ? ते फारच खटकले असते मात्र.
सेंसर सेंसर सेंसर...
सेंसर सेंसर सेंसर...
खूप छान मुव्ही आहे. सस्पेन्स
खूप छान मुव्ही आहे. सस्पेन्स अगदी शेवटी पर्यंत टिकवला आहे. "It's all about the ride not destination". तारे जमीं पे, ३ idiots .....सारखा नाही.....सचिन काय प्रत्येक वेळी सेन्चुरी काढतो का? सचिन तो सचिन आणि आमीर तो आमीर .....तलाश हि चांगला आहे ...काही हिंदी सिनेमे झेलतोच कि आपण .....विषय पटला नाही तरी ....हिंदी सिनेमे काहीही असतात
कधी श्रीमंत हिरोएन आणि गरीब हिरो Europe मध्ये गाणी गातात ..... हिरोने मारामारी संपवली कि पोलीस येतात ...... पण ह्यासाठी कोणी बोलत नाही .... भूत प्रेत,ज्योतिष, भविष्य मात्र पटत नाही....
सगळं सांगून झालंय इथं.
सगळं सांगून झालंय इथं. थोडंफार आहे शिल्लक
फक्त, जीन्स घालणारी राणी
फक्त, जीन्स घालणारी राणी मुलगा गेला म्हणून अचानक साड्या का नेसायला लागली असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधतेय.>> मी ही शोधत होते मामी.. मग तेच त्यातल्या त्यात पटणारं कारण की एरवी साड्याच नेसायची.. कधीकधी जीन्स.. पण मुलगा गेल्यावर इन्टरेस्ट गेला..
चित्रपट आवडला.. शेवटातला पाण्याचा सीन पकाऊ वाटला.. पण ओव्हरॉल चांगला आहे.
करीनाला व्यक्त न करता येण्यासारखी तगमग वगैरे जरा तरी दाखवता आली असती, पण ती फक्त सो कॉल्ड सिडक्टिव हावभाव ह्यापलिकडे फारसं काहीच करत नाही.
बाकी सगळेजण मस्त.
शाहरुखची तुलना करणार्यांसाठी (प्रामाणिक मतप्रदर्शनासाठी शाखा पंख्याची माफी!):
ह्याच स्टोरी मधे शाहरुख खान असता तर त्याच्या एन्ट्री पासून ते चित्रपट संपेपर्यंत तो फक्त शाखाच असला असता. एक इन्स्पे., हरवलेला नवरा, तुटलेला बाप - ह्यातलं काहीच दिसलं नसतं. अगदी एन्ट्रीही मारधाड करत/भव्यदिव्य झाली असती हिरोची (विरुद्ध आमिरची एन्ट्री पहा), शारुख थरथरलला असता, लई डायलॉग मारले असते तो कसा ग्रेट, त्याला करिना बद्दल आकर्षण वाटणं कसं बरोबर ह्याचं समर्थन दिलं असतं.. वगैरे वगैरे..थोडक्यात, कथा राहिली बाजूला आणि फक्त शाखाच दिसला असता चित्रपट भर.. तद्दन फिल्मी झाला असता हा अनुभव.
(हेच आमिरच्या गजिनी आणि थ्री इडियटस करताही वाटलं आणि म्हणूनच आमिर आवडत असूनही हे चित्रपट आवडले नाहीत + आमिरचा राग आला. ह्याउलट शाखा आवडत नसूनही स्वदेस, चकदे आणि (टीपी) बादशहा आवडले.)
पाहिला हा शिणुमा एकदाचा...
पाहिला हा शिणुमा एकदाचा... इथल्या एका पोस्टीने सगळा सस्पेंस फोडलाच होता फक्त सादरीकरण बघायचे राहिले होते

आमिर तर इन एनी रोल आवडतोच तसाच इथेही आवडला.... किती साधी एंट्री दिलीये त्याला...मान गये...
त्याच्या त्या एका मराठी वाक्यावरही फिदा... त्याच्या हिरव्या टीशर्ट वर, मिशीवर फिदा
तो पिक्चरभर फक्त सुरीच वाटत राहतो.... मस्त आहे एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी.
चित्रपट काही खास नाही, नाही
चित्रपट काही खास नाही, नाही बघितला तरी चालेल. माझ्या कडुन ५ पैकी ३
जानेवारीत हा पिच्चर बघण्यात
जानेवारीत हा पिच्चर बघण्यात येईल.
त्रास न घेता. 
रसप, धन्यवाद दक्षिणा थँक्स
रसप, धन्यवाद
(आणि तुला सुद्धा अनुमोदन. एका चांगल्या पोष्टीची दखल घेतल्याबद्दल
)
दक्षिणा थँक्स
प्रतिक्रिया काहिहि असोत...
प्रतिक्रिया काहिहि असोत... बघितल्या शिवाय राहवनार नाहि...
माबो चि नविन पाहुनि...
करिना प्रेक्षकांना का
करिना प्रेक्षकांना का दिसते..... ?????????

.
.कारण आपण सुध्दा हा चित्रपट पाहत असताना दु:खी, तणावग्रस्त झालेलो असतो म्हणुनच.
शाहरुखची तुलना करणार्यांसाठी
शाहरुखची तुलना करणार्यांसाठी (प्रामाणिक मतप्रदर्शनासाठी शाखा पंख्याची माफी!):
ह्याच स्टोरी मधे शाहरुख खान असता तर त्याच्या एन्ट्री पासून ते चित्रपट संपेपर्यंत तो फक्त शाखाच असला असता. एक इन्स्पे., हरवलेला नवरा, तुटलेला बाप - ह्यातलं काहीच दिसलं नसतं. अगदी एन्ट्रीही मारधाड करत/भव्यदिव्य झाली असती हिरोची (विरुद्ध आमिरची एन्ट्री पहा), शारुख थरथरलला असता, लई डायलॉग मारले असते तो कसा ग्रेट, त्याला करिना बद्दल आकर्षण वाटणं कसं बरोबर ह्याचं समर्थन दिलं असतं.. वगैरे वगैरे..थोडक्यात, कथा राहिली बाजूला आणि फक्त शाखाच दिसला असता चित्रपट भर.. तद्दन फिल्मी झाला असता हा अनुभव
>>
अरे बाप्रे!
मला तर वाटायला लागलय शाहरूख स्वतःची व्यक्तीरेखा स्वतःच बनवतो, त्याच्या सिनेमांना डायरेक्टरच नसतो
तोच डाय्लॉग्स लिहितो
तोच डान्सच्या स्टेप बसवतो
तोच कथा ठरवतो
तोच....
तोच.....
तोच......
तोच हिरोईन पण निवडत असावा का?
असो!
एवढं सगळं स्वतःचं करायचं म्हणल्यावर थोडासा चुकणारच की तो
शाहरुख हेटर्स घ्या सांभाळून जरा त्याला...
काहीही झालं तरी स्वतः सिनेमा
काहीही झालं तरी स्वतः सिनेमा बघायच्या आधी रिव्यु वाचायचा नाही असं ठरवलं होतं. आताही वरचा लेख वा प्रतिक्रिया न वाचता मला कसा वाटला ते आधी लिहीतेय.
सुरवातीच्या गाण्यापासुनच सिनेमॉटोग्राफीने लक्ष वेधुन घेतले ते शेवटपर्यंत. मस्त. आमिरची अॅक्टिंग जबरी.. त्याचं दु:ख अगदी त्याच्या श्वासातुन, नि:श्वासातुन, डोळ्यातुन ओसंडत राहतं.. मुलाला वाचवता न आल्याने आलेली हताश मनस्थीती, गिल्ट, चिडचिड कमालीच्या परिणामकतेने जाणवते.
राणी ठिकच. करीना चांगली दिसलेय, सहज वावरलेय. तिचा तो २-३ वर्षापुर्वी हरवलेल्या मैत्रिणीबद्दल सांगणारा प्रसंग छान जमलाय. बाकी कथा चांगली आहे पण अजुन थोडा वेग पाहीजे होता.. संथ असल्यामुळे सस्पेन्स राहत नाही. तसंही आता इतके नवनवे चित्रपट बघुन आपल्यालाही पुढचा अंदाज पटकन येतो. पण हे असुनही मला सिनेमा आवडला, आमिर ऐवजी दुसरा कोणी असता तर इतकाच आवडला असता याचे उत्तर त्या माणसाच्या अॅक्टींग स्किल्सवर अवलंबुन.
सगळीच गाणी फारच सुंदर आहेत. राम संपतने मस्तच काम केलेय.
(हे विषयांतर आहे... पण ते
(हे विषयांतर आहे... पण ते असंही बरंच झालंच आहे म्हणून..)
>>मला तर वाटायला लागलय शाहरूख स्वतःची व्यक्तीरेखा स्वतःच बनवतो, त्याच्या सिनेमांना डायरेक्टरच नसतो
तोच डाय्लॉग्स लिहितो
तोच डान्सच्या स्टेप बसवतो
तोच कथा ठरवतो
तोच....
तोच.....
तोच......
तोच हिरोईन पण निवडत असावा का?<<
वेल.. प्रीसाईजली यस..!
फक्त शा.खा.च नाही सगळेच आघाडीचे अभिनेते हे करतात. अगदी स्वतः लिहित/ डायरेक्ट/ निवडत नसले तरी स्वतःच्या मनापप्रमाणे करून/ करवून घेतात. 'इन्फ्ल्युएन्स' करतात. अगदी पब्लिसिटीतील पोस्टर्स वर कोण किती दिसणार, ट्रेलर्स मधून कोण किती दिसणार... ह्यावर ते कन्ट्रोल ठेवतात. को-स्टार्सचे रोल्स कमी करणे... सीन्स कापणे तर सर्रास !! पण हे आजचेच नाही... पूर्वापार चालत आलेले आहे.
अरे बाप्रे! मला तर वाटायला
अरे बाप्रे!
मला तर वाटायला लागलय शाहरूख स्वतःची व्यक्तीरेखा स्वतःच बनवतो, त्याच्या सिनेमांना डायरेक्टरच नसतो
तोच डाय्लॉग्स लिहितो
तोच डान्सच्या स्टेप बसवतो
तोच कथा ठरवतो
तोच....
तोच.....
तोच......
तोच हिरोईन पण निवडत असावा का?>> हो. म्हणूनच चलते चलते मधून अॅश बाहेर काढली गेली. फराह खानच्या तीस मार खानमधे अक्षय कुमारला घेतल्यावर शाहरूखची आणि तिची मैत्री संपुष्टात आली (अशी बातमी आहे. हॅपी न्यु एयरमधे दोघं काम करत आहेत) यशराजने एक था टायगरसाठी सलमानला घेतल्यावर शाहरूखने अतिगोंधळ घातला होता. मात्र, कबीर खानने "सलमानच" म्हणून अडून बसला होता. सलमानशी भांडण झाल्यवर जब तक है जान्साठी "कतरीना"च हवी हा त्याचा हट्ट होता. कथा तर तोच ठरवत असतो म्हणून तर सतत त्याच इमेजमधे दिसत राहतो.
अर्थात हा प्रकार फक्त आणि फक्त शाहरूख करतो असे नाही. सर्वच स्टार करतात. सलमान खानच्या नविन बिझनेस अजेंड्यानुसार तो सिनेमाचे मानधन घेणार नाही, फक्त निर्मात्याला प्रॉफिटमधला ठराविक हिस्सा देणार. बाकीचा पैसा त्याचा.
अंदाज अपना अपनाच्या सेटवरचे किस्से वाचलेत तर आमिर सलमान (तेव्हाची दुष्मनी; आता दोस्त आहेत) आणि करिष्मा कपूरचे किस्से वाह्चता येतील.
जुन्या नटांमधे दिलीप कुमार अशा नखर्यांसाठी अतिप्रसिद्ध होता.
अरे वा मग चांगलीच भिती आहे की
अरे वा मग चांगलीच भिती आहे की त्याची इंडस्ट्रीत
त्याच्या नुसार सगळं चेंज होतं म्हणल्यावर
एवढा दरारा अमीरचा का बरे नसावा?
का तो खुप रिअल अॅक्टर आहे आणि असलं काही करण्यात त्याला इंटरेस्ट नसतो?
असच असेल नाही?
शाहरूख काय.. काही अर्थ आहे का त्यात?
काही स्ट्रगल वैगेरे केलय होय त्याने कधी? बिलकूल नाही
जन्मल्यापासून किंग खान म्हणूनच तर जन्मला तो
आणि लगेच डिमांड टाकत स्वतःच्या मनानुसार सिनेमा बनवून घ्यायला लागला...
नाही का?
रिया, परीक्षणातील हे वाक्य
रिया,
परीक्षणातील हे वाक्य वाचले नाहीत का? -
"सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच !"
तसेच प्रतिसादातील हे वाक्य -
"फक्त शा.खा.च नाही सगळेच आघाडीचे अभिनेते हे करतात."
करीना ग्लॅमरस दिसते... भडक
करीना ग्लॅमरस दिसते... भडक दिसत नाही. खरं तर तिच्या व्यक्तिरेखेप्रमाणे तीने भडक दिसायला हवे होते. असो. मला चित्रपट पाहताना सारखे असे वाटत होते की करीनाच्या जागी विद्या असायला हवी होती. तिने हा रोल खुप चांगला केला असता. करीनाइतकी ग्लॅमरस दिसली नसती. .... तिने कदाचित ग्लॅमरस कपडे घातले नसते. ... साडि नेसली असती.... करीना सारखं लाडे लाडे बोलली नसती...पण तीला रोझी म्हणून बघायला आवडलं असतं.
Pages