अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.
सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.
'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !
सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!
काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)
रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html
धन्यवाद दक्षिणा.... तैमुरचा
धन्यवाद दक्षिणा....
तैमुरचा थेट संबंध नसला तरिही त्या मुलिच्या मृत्यूचा तो उपयोग करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, >>>>>> अरे पण तिच्यासाठी डॉक्टर तोच आणतो ना धावत पळत....इतकी माणुसकी दाखवु शकत नाही ती ?


.
सहज पाहणी करायला आलेला असू शकतो. >>>>>>>>> मी नंतर च्या दोन सिन्स बद्दल बोलतोय...त्यासाठी तो पोलीस स्टेशन मधे आलेला...
अजुन एक........इतके कपडे कसे बदलु शकते करिना....
.
१ .धक्कातंत्राचा अतिशय उत्तम वापर.
२. चित्रपट पाहताना आपण प्रसंगानुरूप प्रत्येक पात्रावर 'संशय' घ्यायला लागतो.
४. एकही संवाद वायफळ बिनबुडाचा नाही. दक्षिना यावर मी निषेध नोंदवत आहे....कारण
,
१ धक्का संपुर्ण चित्रपट्मधे एकदाच शेवटी बसतो...तो ही प्रेडिक्टेबल
२ प्रत्येक पात्रावर 'संशय' घ्यायला लागतो. >>> संशय ??? कशाबद्दल..
३ काही मोजकेच संवाद आशयाला धरुन आहेत...बाकी सगळेच "आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे"
सापेक्षता म्हणजे काय याचे
सापेक्षता म्हणजे काय याचे उत्तर हा बाफ पाहिल्यावर मिळेल .

आमिर खान ने चांगला अभिनय केलाय यात काही वाद नाही (त्यात काही नवीन ही नाही)
पण हाच चित्रपट इतर कुणाचा असता तर उदयन यांचे प्रश्न सोडा पण भुतं कधी असतात का , मेलेला माणूस संपर्क कधी करू शकतो का , उगच आपल काहीही दाखवायच या लेव्हललाच या चित्रपटाची रेवडी उडवली असती
इथले किंवा वर्तमानपत्रांतले
इथले किंवा वर्तमानपत्रांतले रिपोर्ट्स न वाचता काल 'तलाश' पाहिला.
- सस्पेन्स थ्रिलर असूनही मानवी मनाच्या, श्रध्दांच्या (माझ्या मते काहीशा अनवट) वाटा तरलपणे धुंडाळलेल्या आहेत.
- सर्व कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट
- पटकथा उत्कृष्ट
- वातावरणनिर्मिती उत्कृष्ट
- संवाद अगदी लक्षपूर्वक ऐकावे लागतात आणि त्यामुळेच सिनेमात प्रेक्षक अगदी रंगून जातात.
- आमिरखान हा इन्स्पेक्टर म्हणूनच वावरतो, आमिर खान म्हणून नाही.
- राणी मुखर्जी फारसा मेक-अप न करता गृहिणी म्हणून शोभते.
- करीना कपूर ही करीना कपूरच राहते. पण तिची भूमिका तशीच आहे. त्यामुळे no marks cut!
- नवाजुद्दीन सिद्दिकी एक नंबर ! ('कहानी' किंवा 'वासेपूर'च्या यशाचा कुठलाही परिणाम त्यानं त्याच्या या सिनेमातल्या वावरावर होऊ दिलेला नाही)
पण, कथानकाचा जो बेस आहे, मूळ गाभा आहे, तो माझ्यासारख्यांना पूर्णपणे illogical वाटतो. त्यामुळे सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर जरा निराशा हाती येते.
असं असलं, तरी सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्या प्रयोगशीलतेला सलाम!
संवाद अगदी लक्षपूर्वक ऐकावे
संवाद अगदी लक्षपूर्वक ऐकावे लागतात आणि त्यामुळेच सिनेमात प्रेक्षक अगदी रंगून जातात.
>>>>>>>>>>>
क्रेडिट गोज टू फरहान अख्तर...... आणि अनुराग कश्यप.... त्या दोघांनी लिहिलेत डायलॉग्ज.
शशीला जर माहीम मधे जत्रेत
शशीला जर माहीम मधे जत्रेत सर्वांदेखत गोळी झाडुन ठार मारले तर त्याचा मृत्युदेह पाण्यात कसा सापडला ? >> पाण्यात कुठे मिळतो त्याचा मृतदेह? शवविच्छेदनगृहात दाखवलाय. आणि सिनेमात सगळीकडे तो 'मेले में' मेला असाच उल्लेख आहे की.>>>>>>>>
दक्षी..... आठव करिनाचा डायलॉग " छुपके कितने दिन बैठोगे कभी तो पाणीके बाहर आओगे..." त्या नंतर च्या प्रसंगात हवालदार बोलतो...माहीम समुंदर से लाश मिली है....शायद ३ दिन पेहले मौत हो चुकी थी.." या नंतर आमिर च्या डोक्यात प्रकाश पडतो करिना अशी का बोलली ते...:)
.
पायरेटेड डिव्हीडी आणून पाहावा
पायरेटेड डिव्हीडी आणून पाहावा का हा सिनेमा?

समुंदरमे मिळालेली लाश कोणा
समुंदरमे मिळालेली लाश कोणा दुसर्या व्यक्तीची असते.... त्या संवादावरून आमिरला क्लू मिळतो आणि तो शवागारं शोधायला सांगतो.
कुठलाही सिनेमा अथवा पुस्तक
कुठलाही सिनेमा अथवा पुस्तक याचा शेवट इतरांना सांगू नये असा एक सर्वसाधारण संकेत असतो. तो तरी किमान पाळा.>>>>>> +१
दक्षिणा धन्यवाद. जे काही
दक्षिणा धन्यवाद.
जे काही लोकांनी लिहायचे बाकी ठेवले होते ते तुम्ही उदयनच्या प्रतिउत्तरात लिहुन टाकले.
२०० रु. वाचले
अस्सी नब्बे पुरे सौ..........
अस्सी नब्बे पुरे सौ..........
हा शंभरावा? सस्पेन्स थ्रिलर
हा शंभरावा?
सस्पेन्स थ्रिलर वगैरे शब्द डोक्यातून काढून टाकून पिक्चर बघितला आणि तुफान आवडला. शेवट माहीत असूनसुद्धा. आमीर छा गयेला हय. आमीर, तुस्सी ग्रेट हो!
चित्रपट नक्कीच बघणार. शेवट
चित्रपट नक्कीच बघणार. शेवट कळो वा न कळो. काहीही फरक पडत नाही. नाही तर अनेक सस्पेन्स सिनेमे, हॉरर सिनेमे परत परत बघीतले गेले नसते. दक्षी म्हणते तसं शेवटा पर्यंत चा प्रवास महत्वाचा.
मला आवडला, शेवटपर्यंत खिळवून
मला आवडला, शेवटपर्यंत खिळवून ठेवलं. आवडते कलाकार, शेवटला सीन सोडल्यास बाकी जमून आलेली भट्टी! वाह मजा आली. आमिर च्या गाडीच्या अॅक्सीडेंट च्या वेळेस तर एकदम धडधड वाढली.
छान आहे एकदा बघण्यासारखा आहे,
छान आहे एकदा बघण्यासारखा आहे, पण सस्पेन्स आधीच समजला होता
पांढरी करीना छान दिसलेय
आमिरच्या मनातली घालमेल.... मुलगा फिरायला जातो म्हणतो तो प्रसंग आठवून आपण हे टाळू शकलो असतो असा विचार करून.. घेतलेला प्रसंग सुरेख. >>>> +१००
अग्गबाई, किती ते विवरण! मला
अग्गबाई, किती ते विवरण!
मला बाई आवडला सिनेमा! बुद्धीला पटणारा नसला तरी एक वेगळा सिनेमा म्हणून चांगलाय की!
अमीर, करीना आणि नवाजुद्दिननी मस्त कामं केलैत. फक्त, जीन्स घालणारी राणी मुलगा गेला म्हणून अचानक साड्या का नेसायला लागली असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधतेय.
जीन्स घालणारी राणी मुलगा गेला
जीन्स घालणारी राणी मुलगा गेला म्हणून अचानक साड्या का नेसायला लागली असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधतेय.>>>>>>>> मामी, उत्तर सापडलं की मला पण सांग
फक्त, जीन्स घालणारी राणी
फक्त, जीन्स घालणारी राणी मुलगा गेला म्हणून अचानक साड्या का नेसायला लागली असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधतेय.
>>>>>>
जबरी......!
ती आउटिंगला जाताना घालते फक्त जीन्स मामी...... मुलगा गेला आणि नवरा रात्र रात्र बाहेर भटकू लागला... आऊटिंग्ज संपली आणि साडी नशीबी आली बघ......
त्यानिमित्ताने राणीच्या "हे राम" "युवा" या चित्रपटातल्या तिच्या लुक्सची आठवण झाली.... छानच दिसलीये ती.
मामी, फक्त त्या पिकनिकसदृश
मामी, फक्त त्या पिकनिकसदृश सीनमधेच जीन्स आहे तिची. फॅमिली फोटोच्या दृष्यातही साडीच आहे.
मला सिनेमा आवडला. सर्वांचे
मला सिनेमा आवडला. सर्वांचे काम पण.वेशावस्तीत कथा फिरत रहाते.पण कुठेही बटबटीतपणा.जाणवत नाही.अवघडल्यासारखे वाटत नाही.ज्यांनी शामलनने डायरेक्ट केलेला आणी पॉप्युलर असलेला ब्रुस विलिसचा The sixth sense पाहिला असेल त्यांना शेवट पाहून विचित्र वाटणार नाही.ज्यांनी हा सिनेमा The sixth sense पाहिला नाही त्यांनी जरुर पहावा.
अचानक साड्या का नेसायला लागली
अचानक साड्या का नेसायला लागली असेल >> तशी पद्धत आहे.
फक्त, जीन्स घालणारी राणी
फक्त, जीन्स घालणारी राणी मुलगा गेला म्हणून अचानक साड्या का नेसायला लागली असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधतेय. >>>>>> चला माझ्या प्रश्नांमधे अजुन एकाची भर पडली
ज्यांनी शामलनने डायरेक्ट
ज्यांनी शामलनने डायरेक्ट केलेला आणी पॉप्युलर असलेला ब्रुस विलिसचा The sixth sense पाहिला असेल त्यांना शेवट पाहून विचित्र वाटणार नाही.ज्यांनी हा सिनेमा The sixth sense पाहिला नाही त्यांनी जरुर पहावा. >>
समईजी, मला वाटत नाही The sixth sense न पाहिलेले इथे फारसे कुणी असतील .
पण त्याची तुलना इथे कशी करता येईल ? त्याचा विषय आणी फोकस च paranormal activity होता . आणी त्यामुळे त्याचा शेवट आवडतो .
.
.
उदय तुझ्या प्रश्नांना उत्तरं
उदय तुझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा कंटाळा आला,म्हणून तुझा अणुल्लेख
जाऊ देत आता काही नाही पाहात
जाऊ देत आता काही नाही पाहात थेटरात जाऊन सगळच कळलय तर
तस पण ते ते सिन्स पहाताना मला माबोवरच्या कमेंट्सच आठवत रहातील
टिव्हीवर येईलच महिनाभरात
टिव्हीवर येईल.............२५
टिव्हीवर येईल.............२५ डिसेंबर अथवा १ जानेवारीला सेटमॅक्स नाहीतर झी वर
पण, कथानकाचा जो बेस आहे, मूळ
पण, कथानकाचा जो बेस आहे, मूळ गाभा आहे, तो माझ्यासारख्यांना पूर्णपणे illogical वाटतो. त्यामुळे सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर जरा निराशा हाती येते.>>>
अनुमोदन.
Crime Petrol सारख्या मालीका बघून कळते की पोलिस गुन्हेगार शोधण्यासाठी मोबाईल फोनचा बराच वापर करतात. इथे मात्र तसा प्रयत्नही केलेला दाखवला नाही.
नाही आवडला विशेष . करीनाचा
नाही आवडला विशेष . करीनाचा सस्पेन्स तरीही ओके आहे. पण दुसर्या कहाणीचा शेवट चक्क अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. अगदीच इल्लॉजिकल आणि आमीर असो की अमिताभ- न पटण्यासारखा.
आमीरने काम केलं आहे, म्हणून काहीही अॅक्सेप्टेबल. आणि शारूक स्ट्रीट वर्कर ते बॉम्ब एक्स्पर्ट होतो, तेव्हा ते अॅक्सेप्ट करणारे मात्र आपण मूर्ख!! गंमत आहे!
सगळे दुष्ट आहात. मी थोडा,
सगळे दुष्ट आहात. मी थोडा, मीपण थोडा म्हणत आख्खा सिनेमा सांगितलात. आता बघतांना काय मजा येणारे? निदान एखादा आठवडा तरी धीर धरायचा लोक्स.
जाऊदे यापुढे फक्त रीव्ह्यु वाचायचा. प्रतिक्रिया वाचायच्या नाहीत.
१२०
१२०
Pages