विंडिजचा भारत दौरा - २०११

Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56

नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !

तर काय होणार.

१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?

तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.

(मला वाटतं आपण जिंकू)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

dravid pan gelaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

सचिन बाद झाला तो बॉल थोडासा थांबून आलेला होता आणि झेल पण चांगला घेतला... आणि द्रवीड मॅच जिंकून देईल असे वाटत असतानच बाद झाला...

धोनी अत्यंत घाबरट कप्तान आहे...जेव्हा तो खेळायला आला तेव्हापासूनच धावगती अतिशय संथ होत होत खाली गेली...आता खालच्या खेळाडूंवर दडपण टाकून तो बाद झालाय..निदान शेवटपर्यंत टिकायचं तरी होतं त्याने.

39 runs 90 balll madhe...kohali....kase hoil re

सहजपणे जिंकणे शक्य असतांना....पराभव कसा खेचून आणायचा हे कुणीही भारताकडून शिकावे. Wink

वनडे मेन्टॅलिटीने अजूनही का खेळत नाहीत ते कळत नाही, पण मला वाटते आपण जिंकू. अर्थात आस्किंग रनरेट (टेस्ट मध्ये Happy ) वाढ्त चाललाय.

हो. पण मेन्टॅलिटी ही शॉटस बाबतीत म्हणत आहे मी. गेल्या ३० ओव्हर्स बॉल आला की तो पुढे लवून उजवीकडे वळविने वा प्लेड करने ह्यातच घातल्या आहे. किलर इन्स्टिंक्ट जे आपण बॉलींग मध्ये दाखविले ते सेहवाग गेल्यावर बॅटींग मध्ये दिसत नाही, आता तर शेवटचा बॅटसमनही गेला. सर्व काही इशांत व अश्विनवर अवलंबून आहे. धोणी फार स्लो खेळला. त्याने असा विचार केला की आता विकेट टिकवून ठेवू व शेवटच्या १०-१२ ओव्हर्स मध्ये मारू (त्याची नेहमीची स्टॅटेजी - जो वनडे मोड मी म्हणतोय तो) पण नेमके तसे झाले नाही.

माला अझ्झा कॅप्टन असतानाची एक टेस्ट आठवते, अगदी असेच झाले, पण त्याने पटापट खेळून मॅच जिंकली.

18 ball madhe 12 runs....
over vadhtil naa?

रिडिक्युलस वरुण आणि अश्विन. दोघांना पळायला काय झाले होते? वरूण शेवटी तरी बरोबर पळाला, अश्विन पाहात बसला. खरे म्हणजे वि लॉस्ट इट!!

कारण आपल्याला ते आउट करू शकले नाही आणि दिवसाच्या सर्व ओव्हर्स टाकून झाल्या होत्या.

धोनी मॅच मध्ये (बॅटींग करताना) नव्हताच. कम्पोझ वाटत नव्हता. त्याच्या बॅक ऑफ माईन्ड कदाचित मॅच वाचवायचे पण चालू होते त्यामुळे तो आणि विराट खेळताना सगळेच थंड झाले होते. निड टू लर्न. असे आजपर्यंत तीन वेळेस (गेल्या काही टेस्ट मध्ये) झाले. हारलो असतो तरी चालले असते पण शेवटच्या ४० ओव्हर्स मध्ये फारच विचित्र खेळलो असे मला वाटते. हारण्यातही ग्रेस असावा. ही शुअर शॉट मॅच जिंकलेली असताना सोडून दिली.

चेस करणार्‍या टीम चा ऑलआउट झाला तरच टाय धरतात. २-३ वर्षांपूर्वी अशीच एक ड्रॉ झाली होती.

केदार - तुझा फोन लागत नाहीये आत्ता.

bhikaripana.......haraamkhor......jinkaleli match ghalvli.....

bakiche desh haaraleli match jinkataat....aapan jinkaleli match haarato....

aata dhoni bolel 5 vya divashi pitch kharab hoti ...kheltaa yet nahi....

ran@#$%chya 2 runs kartaa aalya naahit...?

अहो उदय कशाला टेंशन घेताय खेळ म्हटल की चालायचच हे. अजून एकदिवसीय सामने आहेत की, थोडा राग तिकडेही काढायला ठेवा.

जरा वे. इंडीजच्या तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाचंही कौतुक करूंया ना ! इतकी जबरदस्त फलंदाजी असलेल्या भारतीय संघाला सहजसाध्य विजय संपादन करण्यापासून रोखणं याचं श्रेय द्यायलाच हवं त्याना !!!

भाउ नमस्कार, अनुमोदन. तुमच्या आधी मास्तुरेंनी व्यंगचित्र टाकले. पण तुम्ही पण एक टाका, आम्ही तुलना करणार नाही, दोन्ही चा आनंद घेऊ!!

बाकी सचिनने आता ऑस्ट्रेलियात पाँटिंगच्या होम पिचवरच शतक करावे! Eat your heart out, पाँट्या, बेमट्या!

आश्विन आख्खी सिरीज मस्तच खेळला पण शेवटच्या चेंडूवर त्याने थोडी हुशारी दाखवायला हवी होती.... वरुण ज्या तडफेने पळला तशीच चपळाई आश्विनकडून अपेक्षित होती, कदाचित त्यामुळे विचलित होउन विंडिजकडून ओव्हरथ्रो वगैरे झाला असता!
बाकी मधल्या फेजमध्ये आपण फारच डिफेन्सिव्ह खेळलो नाहीतर मॅच कधीच संपली असती Happy

पण आजच्या सामन्यातली चुरस वनडेच्या तोंडात मारेल अशी होती... स्टेडियमवर गेलेल्यांचे पैसे वसूल!

मांजरेकर म्हणाला की आजच्या सामन्यानंतर सगळ्यात खुष कोणी असेल तर ते म्हणजे क्युरेटर सुधीर नाईक!

Pages