चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, त्या शॉट नंतर तो व शशी कपूर वेगवेगळ्या रस्त्याने कामावर निघून जातात तो ही मस्त आहे ना?>>
अगदी अगदी व ते पाहून अयाइ ग त्या आइचे काय होत असेल दोन मुलांच्यात अशी बायकी प्रतिक्रीया पण उत्स्फूर्त पणे. !

त्या आइचे काय होत असेल
>>

काही नाही... ती आई लै पार्शल दाखवली आहे...
मोठा मुलगा कष्ट करून घर चालवतोय तरी ती त्याचा कायम अनुल्लेख करते आणि धाकट्याची सगळी कोड कौतुकं पुरवते...

>>मोठा मुलगा कष्ट करून घर चालवतोय तरी ती त्याचा कायम अनुल्लेख करते आणि धाकट्याची सगळी कोड कौतुकं पुरवते...<< Lol खरय.

>>पण एके काळी असेच ड्बे लोक नेत असत. परवा मला तसला ड्बा भेट्ला तर मी आनंदाने आणला व घरी शेअर करायचा प्रयत्न केला ( आइ वेडी आहे असे लूक आजकाल जास्त मिळतात मला!)

अगदी अगदी. मी सुद्धा असला स्टील्चा डबा अगदी माझ्या महाविद्यालयीन दिवसापर्यन्त बरोबर नेत असे Happy

चित्रपटाचे परिक्षण हा धागा असल्यामुळे अजून एका चित्रपटाचे परिक्षण. हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिला. हलका फुलका सिनेमा आहे, एकदा बघण्यासाठी ठीक आहे परंतू माझ्या मते तो ऑस्करच्या लायकीचा नक्कीच नव्हता. चलतचित्रासाठी केलेला संघर्ष खरच संघर्षाप्रमाणे दाखवला असता तर अजून बरा झाला असता. सर्व भावनांचे योग्य मिश्रण असते तर कदाचित योग्य ठरला असता ऑस्करसाठी, पण केलेला संघर्ष विनोदी पद्धतीने दाखवलाय तिथे थोडफार फसलंय (माझ्या मते Happy )

यूपी मधे जाऊन का नाही शूट करता येत यांना किंवा गेला बाजार यूपी मधलं गाव कसं दिसतं याचा थोडासातरी रिसर्च करून मग त्याला जवळच्या लोकेशन्स निवडायला काय जातं यांचं? इतका काही बजेट मधे नाही फरक पडत. तसंही शेमारूने पैसे घातलेत तेव्हा यूपी मधे जाऊन शूट करण्याइतकं बजेट नाही हे अशक्य आहे.
>> नीधपा, का ग आमच्या वाईच्या लोकांच्या पोटावर असा पाय आणतेस! Wink
गंगाजल, मृत्यूदंड, स्वदेस, ओंकारा ह्या आणि इतर बर्‍याच चित्रपटांचं शूटिंग वाईलाच झालं आहे.
तुम्हाला ह्या चित्रपटांमध्येही हा फरक जाणवला का? (प्रामाणिक शंका - कारण जर नसेल तर ईश्किया वाल्यांची चूक!)
(मी इश्किया पाहिला नाहिये)

नानबा मला जाणवला होता एक फरक स्वदेस मध्ये. हिरोईनचे घर म्हणजे एक वाडा आहे आणि तो आपल्या मराठी पध्दतीचा वाटतो Happy

नानबा,
मला स्वदेस मधे हा फरक जाणवला होता. माझा मैत्रिणीबरोबर वाद पण झाला होता. गाव म्हणून वाई दाखवायचं होतं तर उत्तर भारतातले न दाखवता सातारा बाजूचे दाखवायचे म्हणून. कथेत काहीही फरक पडला नसता. शाहरूख मराठी वाटला नसता म्हणून किंवा मराठी गाव दाखवला असता तर चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग मर्यादित राहिल असे वाटले म्हणून उत्तर भारतातले गाव दाखवले कि काय कोण जाणे. ती दाईपण डोक्यात गेली होती माझ्या. पूर्ण चित्रपटभर मराठीपणा लखलखितपणे जाणवत राहतो.
बाकिचे चित्रपट मी पाहिले नाहित.

हा हा हा.. नवरा फुल्ल येडा झालेला हा पिक्चर बघताना, कारण मी त्याला सारखे ओळखीचे लोक दाखवत होते. शेवटी एका सीन मध्ये २-४ बैल येतात तर तो स्वतःच म्हणाला, "ते बघ शिवद्यांचे बैल" (आमचे फॅमिली फ्रेंडस - शिवदे, बैल नव्हे! Wink )

स्ट्राईकर पाहीला , जबरदस्त सिनेमा आहे . सिद्धार्थने काम खुपच मस्त केलयं. मी अजुन एकदा बघेन Happy

गंगाजल, मृत्यूदंड, स्वदेस, ओंकारा ह्या आणि इतर बर्‍याच चित्रपटांचं शूटिंग वाईलाच झालं आहे.
तुम्हाला ह्या चित्रपटांमध्येही हा फरक जाणवला का?<<
हो सगळीकडेच लख्खपणे जाणवत राह्यला. अगदी अंजली म्हणाली तसा लख्खपणे जाणवत राह्यला. आणि चिडचिड होत राह्यली.
मृत्यूदंडमधे निदान काही क्षण मला ते विसरायला भाग पाडलं संवाद आणि अभिनयाने.
ओंकारा मधे बरंच डोकं वापरून मराठीपण कमी दिसेल याचा प्रयत्न केला गेलाय. निदान कलरटोन मधे तरी.
स्वदेसमधे हिरो मराठी असता तर काय प्रॉब्लेम झाला असता हे कळले नाही. कारण नावं सोडली तर सगळं मराठीच दिसत होतं. पण हिंदी फिल्म है वो मराठी सब्जेक्ट नही चलेगा असं आम्ही अनेक ठिकाणाहून ऐकलंय तसंच काहीसं आशुतोषच्या डोक्यात घोळलं असावं.

हे कलरटोनचं जरा स्पष्ट कर ना नीधप. म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र किंवा इतर प्रदेशांमधे असणारा फरक पडद्यावर या 'कलरटोन'मधून कळतो म्हणजे नक्की काय होतं? तिथे लिहिलस तरी चालेल. तुझ्या सवडीने.

पन म्या म्हनतु, ओरिसातल्या किंवा तामिळनाडातल्या माणसास्नी काय कळतय ह्यो महाराष्ट्र हाय का बिहार त्ये. ? आपुन म्हाराष्ट्रातले आसल्यानी आपल्या टक्कुर्‍यात येतय हे समदं. बाकी राज्यातल्या लोकाना काय 'अंधारात सगळी मांजरं काळी' Proud

एक गंमत, मी महाराष्ट्र सोडुन इतर भाग फारसा पाहिलाच नसल्याने मला चित्रपटात युपी म्हणुन महाराष्ट्र दाखवला तरी काही फरक कळत नाही.

आतापर्यंत दोन चित्रपटात मला 'ही जागा वेगळी आहे, आपल्या रोजच्या पाहण्यातली नाहीय' हे पाहताक्षणीच जाणवले. पहिला चित्रपट 'नदिया के पार'. ह्यातली घरे, आसपासचा परिसर माझ्या ओळखीतला अजिबात नव्हता आणि मला तो पाहताक्षणीच आवडला. विशेषतः ती पिवळ्या मातीची घरे. (हा चित्रपट बरेचदा पाहिलाय तरी अजुनही सर्फिंग करताना कुठे आढळला तर मी तिथेच तो संपेपर्यंत थांबते, पुढे सरकतच नाही Happy )

दुस-या चित्रपटाचे नाव आठवत नाहीये, त्यात मयुरी कांगो (ही कोणाला आठवतही नसेल, जुगल हंसराज बरोबर 'घर से निकलते ही......' ह्या गाण्यावाल्या चित्रपटात होती) आणि बहुतेक बॉबी देवल होते, चित्रिकरण काश्मिरमधले किंवा तिथलेच कुठलेतरी होते. कारण पाहताच जाणवले ते स्वच्छ वातावरण. मुंबईत आणि आजुबाजुला हवेत एक प्रकारचा करडेपणा भरलेला आहे आणि तो पडद्यावरही मला दिसतो.

हीना चित्रपटाच्या वेळी काश्मीरमध्ये खूप अशान्तता होती म्हणून त्याचे काश्मीरमधले शूटिइं रणधीरने ऑस्ट्रीयात केले होते. ते अगदीच बेमालूम होते....

>> 'कलरटोन'मधून कळतो म्हणजे नक्की काय होतं? तिथे लिहिलस तरी चालेल.
>> रात्रीपर्यंत तिथे लिहिते.
तिथे कुठे? आम्हालापण कळुदे!
नीधप, असे साइटवरचे टिपिकल फोटो मिळाले तर लगेच कळेल का?

मोठा मुलगा कष्ट करून घर चालवतोय तरी ती त्याचा कायम अनुल्लेख करते आणि धाकट्याची सगळी कोड कौतुकं पुरवते...>>>> Happy

श्री, तो तर असणारच होता. करण जोहर, शाहरुख खान, काजोल यांच्या कंपूतील ठराविक मंडळी असली की पिक्चर थिएटरला जाऊन तर सोडाच पण घरी वगैरे आणून बघायचे कष्टही घ्यायचे नाहीत.

http://www.nypost.com/p/entertainment/movies/khan_make_it_succeed_qqO11x...

शिल्पा जमखिन्डिकर यांनी एन वाय पोस्ट मध्ये रिव्यू लिहून खानाची कत्तल केली आहे.

रीडिफ वर वाचकांनी फार साले काढ्ली आहेत सिनेमाची.

चॅनलवाल्यानी हा पिक्चर चालवून दाखवायचा नैतिक जिम्मा उचललाय बहुतेक , स्टार न्युजवर तर शाहरूखची मोठे पोस्टर्स लावूनच बातम्या देताहेत. Happy

अगदी अगदी नंदिनी. सगळ्या चॅनल्सवर शाहरूख कसा खरा हिरो आहे, आख्खं जग सिनेमा बघायला कसं व्याकुळ झालय आणि सेनेनं कसा अन्याय चालवला आहे हे दरक्षणी दाखवायची नुसती चढाओढ चाललीय. NDTV तर इंटरनेटवरचे त्याला सपोर्ट करणारेच सगळे मेसेजेस दाखवलेत. कुणीच त्याच्या स्टेटमेंटच्या विरोधात काहीच लिहिलं नाहीये नेटवर असं वाटावं इतकं चाल्लय ते.
सगळं बॉलीवुड त्याच्या पाठीशी आहे म्हणे. असणारच! उद्या उठुन त्यांच्यावर अशी वेळ आली तर त्यांनापण हवाच ना सपोर्ट!
मला एक कळत नाही ह्याला एवढा कैवार होता पाकिस्तानी खेळाडुंचा तर त्याच्या टीमनी बिडींग करायची होती त्यांच्यासाठी. स्वस्तात मिळाले असते. कुणीच घेत नव्हतं त्यांना. कुणी त्याला का नाही विचारत हे? ते राहिलं बाजुला आणि उगाच काहीतरी आरडाओरडी करत बसलेत.
सेनेचं १००% बरोबर आहे असं मला मुळीच वाटत नाही. कुणाचं तरी काहीतरी वाक्य उचलायचं आणि गदारोळ करायचा. काही गरज आहे का? तो काय काय बोलतो ते इतकं महत्वाचं आहे का खरच? आपणच नको त्या गोष्टींना अति महत्व कशाला द्यायचं?

मला एक कळत नाही ह्याला एवढा कैवार होता पाकिस्तानी खेळाडुंचा तर त्याच्या टीमनी बिडींग करायची होती त्यांच्यासाठी. स्वस्तात मिळाले असते.<<<< पैसे नव्हते शिल्लक त्याच्याकडे. पहिल्या आयपीएलला शोएब अख्तर वगैरे घेऊन फसलाय तो मूर्ख!!!! टीम तर त्याची काय खेळते हे सर्वानीच पाहिलय. याना त्या निमित्ताने प्रसिद्धी मिळवायला उत्सुक आहे तो.

सध्याची ब्रेकिंग न्युजः गोरी खान खुद पहुन्ची फिल्म देखने के लिये..

श्री, तो तर असणारच होता. करण जोहर, शाहरुख खान, काजोल यांच्या कंपूतील ठराविक मंडळी असली की पिक्चर थिएटरला जाऊन तर सोडाच पण घरी वगैरे आणून बघायचे कष्टही घ्यायचे नाहीत

मीही असले कष्ट घेत नाही........ मी त्या कंपुचा पाहिलेला शेवटचा चित्रपट खुच खुच होता है.. Happy ..... तोही घरात शारुख फॅन होती म्हणुन पाहावा लागला, आता वय वाढल्यावर घरातल्या टिनेजरनेही आपला चॉइस बदलला त्यामुळे मला शारुखपासुन मुक्ती मिळाली.. Happy

बाकी टीवीवरच्य बातम्या पाहिल्या की वाटते माय नेम हा थेट मदर इंडीया नंतर आलेला क्लास्सिक आहे, मधले सगळे चित्रपट म्हणजे माती आहे ह्याच्या पुढे... शारुखने ट्विटरवर काय काय तारे तोडलेत... (आता ट्विटरचे खरे खोटे काय ते देव जाणे)

आज पुण्याची बातमी पाहिल्यावर वाटले, अजुन काढा माय नेम.. आणि दाखवा बिचा-यांना काय त्रास होतोय ते... मग त्या त्रासाने भडकुन दिली एखाद्याने एखादी बेकरी स्फोटात उडवुन आणि मेली काही माणसे तर त्यात त्याचा काय दोष, दोष आमचा ज्यांनी त्यांना त्रास दिला....

पुढेमागे मी एखादा चित्रपट काढला तर प्रसिद्धीसाठी उगाच पैसा घालण्यापेक्षा मझ्या चित्रपटाविरुद्ध आंदोलन करायची सुपारी एखद्या संघटनेला देइन.

जेव्हा असे काहीतरी मुर्खासारखे दाखवले जाते, तेव्हा खूप राग येतो.
<< प्राची दिल पे मत ले यार... एक लक्षात ठेव पोलीस भरती आणि हिन्दी चित्रपट (किंवा कुठलाही चित्रपट काही हॉलिवुड चित्रपटही सामिल आहेत यात) या दोन गोश्टींसाठी डोकं वापरायचं नसतं किंबहुना डोकं बाजूला ठेऊनच या गोष्टी करायच्या असतात..

Pages