नाही रे,
थोडा असा अर्थ अपेक्षित आहे: "जीवनाने आशा-निराशा, हार्-जीत काहीही दिलं तरी मी तितक्याच निर्मयपणे पाहिलं. काहीही झालं तरी जीवनावर प्रेम करत गेलो. त्याची साथ करत गेलो. प्रत्येक काळजी/चिंता/संकटे/अडचणी यांना 'चल गेलास उडत' असा attitude देत आलो."
आता बघ बरं. तुझ्या चारोळ्या जमल्यात का? मला फारशा नाही पटल्या.
मोजली नाहीत मी वर्ष पण ४ झाली
मोजली नाहीत मी वर्ष पण ४ झाली असावित बहुतेक.
म्हनुणंच इतकं चांगले
म्हनुणंच इतकं चांगले लिहितोस...
मलाही चंद्र्शेखर गो. आवडत असल्याने त्यांचा खुप प्रभाव आहे माझ्या चारोळ्यांवर...
असं म्हणतात... प्रेमाला
असं म्हणतात...
प्रेमाला मर्यादा नसतात...
मग 'तुझ्यावर मी इतकं प्रेम करतो'
असं लोकं का म्हणतात?
हे.. छान चारोळि आहे अविनाश
हे.. छान चारोळि आहे अविनाश ..आणि तु हिन्दित पण लिहि.. कलेसाठी विशेष संकेतस्थळांची आवश्यकता नाही.. बस आमच्यासारखे रसिक महत्वाचे
धन्यवाद रेश्माजी... बरोबर आहे
धन्यवाद रेश्माजी...
बरोबर आहे तुमचं बोलणं...
पाऊस बघून चारोळ्यांचा मलाही
पाऊस बघून चारोळ्यांचा
मलाही भिजावंसं वाटलं...
शब्दांचे रेनकोट पांघरताना..
माझं थेंबांशी मात्र फाटलं...!
फाटक्या थेंबाला कुठे रे
फाटक्या थेंबाला कुठे रे अस्तित्व
या गर्दितल्या पावसात,
जपलस त्याला ओंजळीत तर,
उपयोग होईल विरहाच्या ग्रिष्मात..
आपलं त्याच्याशीच
आपलं त्याच्याशीच जमायचं,
गर्दीत नाही मन रमायचं...
फाटका असला तरी...,
ओंजळीत तेवढंच मावायचं..!
गर्दीतल्या गावाची सफर खरच
गर्दीतल्या गावाची सफर
खरच नकोशी होते रे आता,
खूप काही शिकूनही,
त्याच त्या गाढवलाथा !
नकोसं वाटतं आता लोकांमध्ये
नकोसं वाटतं आता
लोकांमध्ये मिसळणं...
मनाने तिथे नसुनही
असल्यासारखं दाखवणं...
छान
छान
गर्दीत असतानाही एकटं राहायचं
गर्दीत असतानाही
एकटं राहायचं ... थेंबासारखं !
ओंजळीत येतानाच
ओघळून जायचं... थेंबासारखं !
फाटका थेंब
फाटका थेंब होण्यापेक्षा
पानावरचं दव होऊन बघ
भ्याड असशील तर बस सावरून
हिंमत असेल तर ओघळून बघ
थेंब थेंब साठवला आठवणींच्या
थेंब थेंब साठवला
आठवणींच्या पावसातला
डोळ्यात महापुर दाटला
मन रितं करताना
निंबुडे ... हा तर
निंबुडे ... हा तर आप्पारप्पीचा एक दणका दिलास गं सॉलीड सही चारोळी.
चिमूरे... सहीच तुला
चिमूरे... सहीच तुला उत्तर..
आज बांध फुटला पापण्यांचा,
अन अश्रूंचा पुर अनावर झाला,
वाहण्यासाठी काहीच उरलं नाही तेव्हा,
चल रे आता तु सुद्धा एक थेंब रडून म्हणाला...
पावसाचे थेंब नेहमीच मला चिंब
पावसाचे थेंब नेहमीच मला
चिंब भिजवून जातात...
तुझ्या माझ्या आठवणींच्या रानाचा
वणवा पेटवून जातात...
पुरात सगळेच अश्रु वाहुन
पुरात सगळेच अश्रु वाहुन गेले
एकटाच तो मग त्यांच्यामागुन निघाला
तिथल्या आठवणी बरोबर होत्याच
आठवण म्हणुन स्वतःचे अश्रुच मागे ठेवुन गेला
एकदा सरणावर
एकदा सरणावर निजल्यावर,
अश्रूंना काहीच मोल नसते,
डोळे मिटलेले असतात कायमचे,
तरी पापण्यांवर गुलाबजल हसत असते..
मरण्याची ती बात
मरण्याची ती बात कशाला
जगण्याच्या या रम्य दिनी
सदाफुलीसम फुलत रहा अन्
जगा आनंदे प्रतिक्षणी
हसत हसत जगण्याचे
हसत हसत जगण्याचे स्वप्न,
नकोशे झालेय गं आता,
पोट फुटून विस्कटल नशिब,
तरी किती हलवून मी हा भाता...
बाप्रे, किती ही निराशा मैं
बाप्रे, किती ही निराशा
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया....
याचं मराठी चारोळीत रुपांतर कर नं, सुकी
उंची गाठायची
उंची गाठायची म्हणून,
एवरेस्टचं वरदान मागू नये,
विषारी असतो साप म्हणोनी,
त्याच्या विषाचा डंक आपल्या तोंडून देवू नये..
फक्त जगायचंय म्हणून
फक्त जगायचंय म्हणून मी,
आयुष्याचा घेतला मी आधार,
अर्थ नव्हताच कशाला इथे,
म्हणून कायमचाच पत्करला होता अंधार ...
फक्त सुखं हवं होतं
फक्त सुखं हवं होतं म्हणून,
जिंदगीला रखेल केलं होतं,
त्या प्रत्येक अडचणीला मी,
फक्त वळचणीला बांधल होतं...
निंबुडे दोन प्रयत्न आहे बघ कसे आहे ते ?
भव्यदिव्य स्वप्नं बघावीत ते
भव्यदिव्य स्वप्नं बघावीत
ते पुर्ण करण्यासाठीच
अगदीच नकोशी झाली तर
पटकन झोपेतुन जागं व्हावं
आणि परत झोपी जावं
नवी स्वप्नं बघण्यासाठी
नाही रे, थोडा असा अर्थ
नाही रे,
थोडा असा अर्थ अपेक्षित आहे: "जीवनाने आशा-निराशा, हार्-जीत काहीही दिलं तरी मी तितक्याच निर्मयपणे पाहिलं. काहीही झालं तरी जीवनावर प्रेम करत गेलो. त्याची साथ करत गेलो. प्रत्येक काळजी/चिंता/संकटे/अडचणी यांना 'चल गेलास उडत' असा attitude देत आलो."
आता बघ बरं. तुझ्या चारोळ्या जमल्यात का? मला फारशा नाही पटल्या.
मी स्वत: ट्राय करून पाहिलं. मला नाही जमतै!
चिमूरी.. चार ओळी फक्त.. जावे
चिमूरी.. चार ओळी फक्त..
जावे स्वप्नांच्याहो गावा,
परतीच्या त्या तिकीटाने,
मैलाचा हो दगड ठरवावा,
आपल्याच त्या कर्मजिद्दीने...
अनेक आले अडथळे स्वप्नं पूरी
अनेक आले अडथळे स्वप्नं पूरी करताना
पदरी कधी यश तर कधी आलं अपयश
यशापयशाची पर्वा होतीच कोणाला
जगण्यावर प्रेम करण्याशिवाय फुरसद होतीच कशाला
जाळत असेल रोज जिंदगी, म्हणूनी
जाळत असेल रोज जिंदगी,
म्हणूनी मी कधीच थांबलो नाही,
असेल रोज एक आघात नवा,
म्हणून मी काही उन्मळून पडलो नाही..
आयुष्य म्हणजे सुंगध
जितका मोकळा तितका दरवळेल,
साठवायचा प्रयत्न केला तर,
अक्षरशः गुदमरून कळवळेल..
Pages