क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर बीसीसीआय स्वतःच्या कर्तबगारीवर आणि मेहनत घेऊन इथवर ( आर्थीक सुबत्ततेच्या शिखरावर ) पोहोचलीच आहे व इतकी सारी आर्थीक मदत इतर देशांच्या क्रिकेट बोर्ड्सची करते आहे ( जेणेकरुन या पृथीतलावर क्रिकेट हा खेळ जिवंत राहिला आहे - no pun intended) तर या योगदानाच्या बदल्यात मी तर म्हणतो आयसीसीने दर एका वर्ल्डकप नंतर पुढचा वर्ल्डकप थेट भारताला देऊन टाकायला काय हरकत आहे??? म्हणजे जर खात्रीशीर वर्ल्डकप येणारच असेल तर आधीच सेलिब्रेशनची तयारी चांगल्यारीतींने करता येईल आणि अनायासेच इतर देशांच्या बोर्ड्सनाही  बीसीसीआयच्या ऋणांतून उतराई होता येईल....खेळ तर काय आपण ऑलिंपिक मधेही खेळतोच, ते चालुद्यात....डंके की चोट पे सेलिब्रेशन करायला मिळणे महत्वाचे....पण साला या जगात खाल्ल्या घराचे वासे मोजणारेच फार.....असो.( माझा बॉसही मी उलटून बोललो की याच आविर्भावात बोलतो, त्याचेही खरेच आहे म्हणा, जर त्याने नोकरी देऊन मला आर्थीक सुबत्ता दिली नसती तर मी भुकेकंगालच राहिलो नसतो का? ) 
Benjamin_Franklin.jpg

>>> आधी बघून मग तोंड उचकटावं...

खरं आहे. अनुमोदन.

ते सोडून सोडा हो...मास्टर्स लीग मधे ५२ वर्षाचा तेंडल्या अजून कसा खेळतोय ते बघा. सेमी आहे आज ऑस्सीज बरोबर. २५ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ३९ केलेत आतापर्यंत.

फा वि द डी
आपल्याला मिळालेलं यश हे बीसीसीआय च्या पोझिशन मुळे आहे अन् सांघिक कामगिरी मुळे नाही हा सूर डोक्यात जातो
आपल्याला वर्ल्डकप देऊन टाकावे म्हणताना तुम्हालाही हाच सूर लावावासा वाटतोय असं समजावं का???

RIP अबिद अली. एक चपळ फिल्डर आणि बर्यापैकी ऑलराऊंडर असं ऐकलं/वाचलंय. भाऊ, तुम्ही अबिद अलीचा खेळ पाहिलाय का?

They have taken enough efforts to reach where they are today... >> +१ . रॉबर्ट्स ला सवय आहे भारतीय संघ नि बिसीसीआय वर मधे मधे दुगाण्या झाडायची . ८३ चा त्रास अजून होत असेल Happy

वर्ल्ड कप मधे आपण सर्वात जास्त प्रवास केला होता तरीही सगळे सामने (फायनल वगळता) जिंकलेच होते. भारतीय सोडून जगातले सगळे खेळाडू इतर टी २० टूर्‍नामेंट खेळतात त्यांना सर्वत्र पिचेस ची सवय होते जशी आपल्याला मिळत नाही हा मुद्दाही आहेच. तेंव्हा (इती मिचेल स्टार्क)

*भाऊ, तुम्ही अबिद अलीचा खेळ पाहिलाय का?* हो .
पण खूप नाही. तेंव्हा टिव्ही नव्हता व सामनेही आता सारखे सतत होत नसत. पण रेडीओवर कॉमेन्ट्री खूपच चांगली असायची. बरीच वर्ष भारताचा Mr Reliable होता तो. मध्यम गती गोलंदाज, चांगला उपयुक्त फलंदाज व अप्रतिम क्षेत्ररक्षक ! आत्ताच कुणीतरी मला इंग्लंडमधील सामन्याचा व्हिडिओ पाठवलं आहे , ज्यात इंग्लंड 41 -४ , चारही विकेट अबिड अली ( अगदी पोरगेल्या गावसकरने स्लीपमध्ये घेतलेले 2 झेल ). आजच हर्षा भोगलेने त्याच्या हैदराबादच्या ह्या बालपणीच्या हीरोला छान श्रद्धांजली वाहिली आहे !!!
R I P !!!

विडिओ मधे पाहिले जे पूर्वी टीव्ही वर बघायला मिळत नसे.
हेल्मेट न घातलेले फलंदाज, यष्टिरक्षक, पायचित झाल्यावर लगेच परत जाणारे फलंदाज - कुठेहि रिव्यू नाही!

आपल्याला वर्ल्डकप देऊन टाकावे म्हणताना तुम्हालाही हाच सूर लावावासा वाटतोय असं समजावं का???>>> हे विधान ज्यांना आपण इतर बोर्डांवर आर्थिक जी मेहरबानी केली आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी किंवा कोणत्याही तक्रारीदाखल आपल्या विरुद्ध ब्र ही काढू नये ( BTW निव्वळ क्रिकेट या खेळातील सर्वोत्तम यशासाठीही भारताच्या सध्याच्या संघाला खेळा व्यतिरीक्त इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही ईतकी गुणवत्ता आपल्याकडे आहे असं माझ ठाम मत आहे) असं‌ वाटतंय त्या मानसिकतेच्या लोकांच्या मागणीला मम म्हणून काही अधिकचे घालून पुढे चालावं इतकाच प्रयत्न होता. सध्या बीसीसीआयचे क्रिकेट खेळाव्यतिरिक्त इतर जे खेळ चालले आहेत त्यामुळे भविष्यात जागतीक स्तरावर क्रिकेटच आक्रसत जाणार आहे...असो जोवर आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहोत तोवर आपल्याला क्रिकेट जगात सर्वत्र आक्रसले तरी त्याच्या व्ह्यूअरशिप बद्दल काळजी करायचे बीसीसीआयला काहीच कारण नाही....आपल्या याच अवढव्य व्ह्यूअर्स आणि प्रचंड आर्थिक रसदेच्या जोरावर कदाचित उद्याच्या भारतात बीसीसीआय देशांतर्गत वर्ल्डकप घ्यायलाही समर्थ असेल....आनंद आहे Happy

धत तेरि, "आपल्याला वर्ल्डकप देऊन टाकावे" वाचून मला वर्ल्ड कप होस्ट करायला देऊन टाकावे म्हणताय असे वाटले होते. Happy

त्यांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी
>>
त्यांच्या मागण्या न्याय्य ??? कुणी ठरवलं हे?
जेंव्हा पूर्वी बीसीसीआयाच्या मागण्यांवर हेच लोक दुर्लक्ष करायचे, तेंव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म??

सध्या बीसीसीआयचे क्रिकेट खेळाव्यतिरिक्त इतर जे खेळ चालले आहेत त्यामुळे भविष्यात जागतीक स्तरावर क्रिकेटच आक्रसत जाणार आहे
>>
प्लीज हायलाईट 'खेळाव्यतिरिक्त इतर जे खेळ'
अफगाणिस्तान ला लखनौ / कानपूर मधे कायमस्वरूपी प्रॅक्टिस फॅसिलिटी उपलब्ध करणं, विंडीज ला आर्थिक / ब्रॉडकास्टिंग मदत पुरवणे, अनेक बोर्डांना देशी कंपन्यांमधून स्पॉन्सरशिप पुरवणे ई. ई. ??
अन् यातलं काय हे लोक 2010 पूर्वी आपल्यासोबत करायचे??

२००८ पूर्वी नक्की कोणत्या न्याय्य मागण्या BCCI ने ICC कडे केल्या होत्या आणि ICC ने त्या मान्य केल्या नव्हत्या? असे कोणते अन्याय ICC ने BCCI वर केले होते? एखाद्या जुन्या आर्टिकल ची लिंक असेल ती दिली तरी चालेल.

त्यांच्या मागण्या न्याय्य ??? कुणी ठरवलं हे?>>> कसं आहे मागण्या/ तक्रारी ऐकूनच घ्यायच्या नाहीत, जर घेतल्या तरी त्यांना परस्पर केराची टोपली दाखवायची म्हणजे त्या समर्थनातले किंवा विरोधातले न्याय्य की अन्याय याच बुचकळ्यात राहून शंख करत राहू देत हा सध्या इन ट्रेंड आहे.

अन् यातलं काय हे लोक 2010 पूर्वी आपल्यासोबत करायचे??>>>> आपणही त्याच्या वरचढ एक पायरी जाऊन करावे अशी मानसिकता आज रुढ होऊन बोकाळली आहे यात मला यत्किंचितही नवल वाटत नाही....तसेही देशात कॉग्रेसच्या काळात केल्या गेलेल्या विरोधकांच्या आणि लोकशाहीच्या मुस्कटदाबीला आज भाजपा करत असलेले राजकारण हे चोख उत्तर आहे असा मानणारा वर्ग मताधिक्याने अस्तित्वात आहे हे दिसून येतेच आहे...आता त्यात लोकशाहीचा श्वास गुदमरून ती मरणासन्न झालीय तर त्याला निरुपाय आहे कारण जेव्हा कॉग्रेसने लोकशाहीचे डोळे झाकून तिला टपल्या लगावायला सुरवात केलेली तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म.

आर्थिक एकाधिकारशाही प्रस्थापित करायच्या हव्यासापोटी बीसीसीआयने इतर देशांतल्या क्रिकेट खेळाची कशी पद्धतशीर गळचेपी केली आहे यावर खूप कंटेट मिळून जाईल इंटरनेटवर... आयसीसीला खेळाच्या भविष्याशी काहीही पडलेली नाही हे आज जगजाहीर आहे. क्रिकेटचा ऑलिंपिक मधे सहभाग होण्याची मुख्य अडचण कोणाला आणि अडसर कोणता आहे? बीसीसीआय आजही गवर्नमेंट बॉडी नसून एक ट्रस्ट म्हणून का ऑपरेट करते आहे? आयसीसी आणि फिफा या दोन्ही बॉडीज मध्ये मुलभूत फरक कोणता आहे आणि तो तसाच कायम राहील याबद्दल अधिकची कळजी का घेतली गेली?? या सर्वांमागची, आज एकाधिकारशाही जमवून असलेल्या किवा त्यांच्या हातातील कळसूत्री बाहूले असलेलल्यांच्या गैरसोयींची गणिते जाणून घ्यायला आज कुणीही तयार नाही.

इथेच थांबतो. धन्यवाद.

*हा व्हिडिओ का भाऊ?* - हो. अबिदचं वैशिष्ठ्य ह्यातही दिसून येतं - विकेट घेतल्यावर उड्या नाहीत, नाच नाहीं, टाळ्या नाहीत, शांतपणे पुढच्या चेंडूसाठी ' रन अप' ची तयारी !! Means business, no nonsense !!!

(आणखी एक . अबिदची एक मुलाखत वाचनात आली. त्यात त्याने पश्चिम विभागाला मिळणाऱ्या अती महत्वाबद्दल कांहिशी नाराजी व्यक्त केली आहे. संघात मुंबई व प. विभाग मधील खेळाडूंचा भरणा खूपच असल्याने ( अर्थात, गुणवत्तेवर ) हे होत होतं व ही खंत इतर विभागातील खेळाडूंचीही होती. ही परिस्थिती बदलण्याचं श्रेय बव्हंशी बीसीसीआय ला जातं. )

Oldest/Youngest Players for India
(In each ICC Final Win)

1983 - Gavaskar/Srikkanth (WC)
2007 - Harbhajan/Rohit (T20WC)
2011 - Sachin/Kohli (WC)
2013 - Dhoni/Bhuvi (CT)
2024 - Rohit/Arshdeep (T20WC)
2025 - Rohit/Gill(CT)*

“ Oldest/Youngest Players for India” - पॉइंट काय आहे ह्या माहितीचा?

रोहीत शर्मा एकमेव youngest आणि Oldest दोन्ही वेळा आहे.
टोटल 3 वेळा आहे.
दोन वेळा चमकदार खेळी आहे.
दोन वेळा कर्णधार म्हणून आहे.

आता पॉइंट म्हणाल तर youngest प्लेयर टू स्कोर सेंचुरी, oldest प्लेअर to play in worldcup or टेस्ट क्रिकेट etc.. वगैरे.. असे youngest oldest रेकॉर्ड तुम्ही क्रिकेट या खेळात कधीच ऐकले नाहीत याचे मला आश्चर्य वाटते Happy

ESPN Cricinfo
क्रिकेटची एक नावाजलेली साईट आहे.
इथे सुद्धा असे ऑफिशियल रेकॉर्ड आहेत बघा.
कारण बरेच लोकांना यात असतो इंटरेस्ट. यात काय पॉइंट असतो वगैरे लोड न घेता जगणारी लोकं बरीच आहेत जगात Happy

Screenshot_2025-03-14-19-29-33-82_6cae51a54e107e8e62c21f59af9b60c8.jpg

*कारण बरेच लोकांना यात असतो इंटरेस्ट.* - पण असे लोक खरंच येतात ह्या धाग्यावर ? असो !
जे जो वांच्छिल, तें तो लाहों प्राणिजात I I

हो, नक्कीच. मुकवाचक बरेच आहेत मायबोलीला. मी स्वतः सुद्धा मायबोलीच्याच कित्येक धाग्यावर मूकवाचक म्हणून असतो. जे जे आवडीचे ते शांतपणे वेचावे Happy

बाकी धागा क्रिकेटचा आहे आणि रेकॉर्ड सुद्धा क्रिकेटचे आहेत. अवांतर असे यात काहीच नाही.
मलाच वैताग आला आहे आता प्रत्येक पोस्टचा किस पडताना बघून. जसे बाबर आझमचा एखादा रेकॉर्ड शेअर करायचे पाप केले आहे..

*मलाच वैताग आला आहे आता प्रत्येक पोस्टचा किस पडताना बघून. * - कांहीं जणांना , मी धरून, रेकॉर्डसच्या जात्यात क्रिकेटचा भुसा पडताना बघून येतो, तसाच का ? Wink

मलाच वैताग आला आहे आता प्रत्येक पोस्टचा किस पडताना बघून. >> जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे !

२००८ पूर्वी नक्की कोणत्या न्याय्य मागण्या BCCI ने ICC कडे केल्या होत्या आणि ICC ने त्या मान्य केल्या नव्हत्या? >> मला वाटते अँडी ८३ मधे झालेला प्रकार नि ८७-९५ कप संबंधी डूंगरपूरकर एपिसोड बद्दल बोलत असावा.

मलाच वैताग आला आहे आता प्रत्येक पोस्टचा किस पडताना बघून. >> आम्हाला पण प्रचंड बोअर होते, सतत रोहित चेच असलेले, नसलेले सगळे रेकॉर्ड वाचून, जर तुम्हालाही वैताग आला असेल तर बंद केले तर चांगलेच होईल

त्यात त्याने पश्चिम विभागाला मिळणाऱ्या अती महत्वाबद्दल कांहिशी नाराजी व्यक्त केली आहे. संघात मुंबई व प. विभाग मधील खेळाडूंचा भरणा खूपच असल्याने ( अर्थात, गुणवत्तेवर ) हे होत होतं व ही खंत इतर विभागातील खेळाडूंचीही होती. ही परिस्थिती बदलण्याचं श्रेय बव्हंशी बीसीसीआय ला जातं. ) >> मुंबई रणजी संघाचा दबदबा नि जिंकण्याची फ्रीक्वेन्सी बघून त्यात फारसे काही चुकीचे होते का ? कपिल कप्तान असताना मुंबई दणकून जिंकत असतानाही मुंबईचे खेळाडू सिलेक्ट होत नसत असे वाचलेले आठवते. (महाराष्ट्राची पण तक्रार नेहमी असायची) सध्या बॅलन्स्ड वाटते खरे.

*त्यात फारसे काही चुकीचे होते का ?* - रणजी बद्दल नाही, तर राष्ट्रीय संघात प्रभावी कामगिरी केलेल्या इतर विभागातील खेळाडूंना योग्य श्रेय दिलं जातं नसावं. जिंकून आलेल्या संघाचा मुंबईत सत्कार करताना अबिद अली व इतरांना बोलावलंही नव्हतं , असं कांहीं तरी झालं होतं.
अर्थात, ज्या विभागाचा निवडसमितीवर पगडा असे, त्या विभागाला झुकतं माप मिळायचं, ही वस्तुस्थिती होतीच. कदाचित,, लाला अमरनाथ निवडसमितीचे अध्यक्ष नसते, तर बेदी ऐवजी शिवलकर मैदान गाजवून गेले असते !

राष्ट्रीय संघात प्रभावी कामगिरी केलेल्या इतर विभागातील खेळाडूंना योग्य श्रेय दिलं जातं नसावं. >> आलं लक्षात. "ज्या विभागाचा निवडसमितीवर पगडा असे, त्या विभागाला झुकतं माप मिळायचं" ह्यामूळेच नंतर पाच झोनसाठी वेगवेगळे असे स्वरुप आले ना. त्यातही तू मला सपोर्ट कर , मी तुला करतो वगैरे गटबाजी होतच असणार म्हणा.

बेदी ऐवजी शिवलकर मैदान गाजवून गेले असते >> हे दोघे एकत्र म्हणाजे एकमेकांच्या विरुद्ध खेळाले का कधी ? अशा सामन्यांमधली तुलना बघायला मजा येईल. गोयल नि शिवलकर ह्यांच्या बॉलिंग शैलीमधे फरक होता असे वाचलेले . बेदी आक्रमक बॉलिंग मुळे वेगळा होता कि अजून काही हे माहित नाही. पण सतत विकेट्स काढायच्या प्रयत्नांमधे फ्लाईट, क्रीज ह्यांचा मस्त उपयोग करत असे वाचलेले आहे नि थोडेफार बघितलेले आहे. शिवलकर त्याच धर्ती चे असतील तर एस्टॅलिब्श्ड प्लेयरला हटावणे कठीनच गेले असणार.

परवा कुणितरी म्हंटले होते की भारत प्रत्येक प्रकारच्या सामन्यात (कसोटी, एक दिवसीय, २०-२०) एक संपूर्णपणे वेगळी टीम खेळवू शकेल.
आणी जिंकू पण शकेल!

असमीजी, बेदी एक अप्रतिम, जागतिक दर्जाचा गोलंदाज होता, हे निर्विवाद. कांहीं जाणकारांच्या मते तो शिवलकरपेक्षा खूप सरसही होता. ( म्हणून मी वर कदाचित ठळक अक्षरात म्हटलयं ). पण बेदीला योग्य वेळी जसं जागतिक पातळीवर खेळायला मिळालं तसं शिवलकरला मिळालं असतं , तर तोही त्या पातळीवर अनुभवसंपन्न व प्रभावी ठरला असता इतकी प्रतिभा नक्कीच त्याने सिद्ध केली होती. बेदीला तसूभरही कमी न लेखता किंवा दोष तर अजिबात न देता, शिवलकरचं दुर्दैव फक्त मी अधोरेखित करतो आहे !!

Pages