आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुंबई. भिंग नाही आले Happy

हो. नटराजन हाय स्कोरिंग सामन्यात सुद्धा कन्सिस्टंटली चांगली टाकत आहे. बुमराहच्या जोडीला वेगवान गोलंदाज आयपीएल फॉर्मवर निवडायला हवे होते. >> हो कदाचित त्याचा फिटनेस हा प्रॉब्लेम असू शकेल म्हणून नसेल.

आमच्या क्रिकेट ग्रुप वर धमाल चालू आहे..
दरवेळी चेन्नई विरुद्ध मुंबई असते..
यावेळी चेन्नई समर्थक मुंबई हरतना बघून आनंद करावा की आणखी काही या संभ्रमात आहेत Proud

खेळाची आवड, खेळण्यातली खुन्नस खूपवेळा पाहिलीय. पण एखाद्या खेळाडूविषयी ‘खुनशीपणा’ क्वचितच पाहिलाय. खेळातल्या खिलाडूवृत्तीशीच प्रतारणा आहे ही. खेळाच्या चाहत्याचं लक्षण नाही.

हा संघर्ष मुंबई मॅनेजमेंट विरुद्ध रोहित शर्मा असा आहे.

आज क्रिकेट प्रेमी एका फ्रेंचाइजी विरुद्ध एका खेळाडूपाठी उभे राहिले आहेत.

MI vs KKR at Wankhede -

2008 - won
2009 - lost
2010 - lost
2011 - lost
2012 - lost
**Rohit Sharma took over captaincy**
2013 - won
2014 - won
2015 -won
2016 - won
2017 -won
2018 - won
2019 - won
2023 - won
**God Rohit Sharma is no more captain**
2024 - Lost*

Captaincy matters!!

हार्दिक आणि टिळक वर्मा चा सुद्धा लाफडा झाला का?

याची सुरुवात मला माहीत आहे.

दिल्लीचे २५८ चेस करताना मुंबई १० धावांनी हरली. मॅच नंतर हार्दिक पांड्या म्हणाला की लेफ्ट हॅण्ड बॅटर टिळक वर्माने अक्षर पटेल वर आणखी अटॅक करायला पाहिजे होता. त्याच्याकडे गेम अवेअरनेसचा अभाव आहे. यावरून नंतर त्यांच्यात वाद झालेला.
जे साहजिकच आहे. कारण टिळक वर्माने ३२ बॉल ६३ मारले होते. आणि अक्षरला २ च ओवर दिल्या ज्यात २४ धावा आल्या होत्या. याउपर अपेक्षा असतील तरी प्रेझेंटेशन मध्ये असे आपल्या एखाद्या प्लेअरला पराभवाला जबाबदार ठरवत टार्गेट करणे चूकच. संदर्भासाठी cricbuzz app वर त्या सामन्याची कॉमेन्ट्री चेक करू शकता.

पण यानंतर पुढच्या सामन्यात सुद्धा दोघात काही बाचाबाची झाली अशी न्यूज आहे जे रोहित शर्माला मध्यस्थी करावी लागली आणि प्रकरण अंबानी पर्यंत गेले.. याचे फार डिटेल मला माहीत नाहीत.

असो,
पण हे सगळे बघून नक्की काय मिळवले मुंबई मॅनेजमेंट हा प्रश्न पडतोच.. बिजनेस माईंड, दूरदृष्टी, भविष्याचा विचार, ब्रँड व्हॅल्यू, ट्रॉफी जिंकणे.. सगळ्याच आघाड्यांवर हा निर्णय फेल गेला आहे. हल्ली कंपनी आपले उच्चपदस्थ अधिकारी निवडताना आय क्यू सोबत ई क्यू सुद्धा बघतात. तरी एवढ्या मोठ्या समूहाने असा चुकीचा निर्णय कसा घेतला याचे आश्चर्य वाटते.

दिल बहलाने कें लिए ख़याल अच्छा हैं ग़ालिब। >> Lol .. पण एकदम परफेक्ट शब्द वापरलास तू ‘खुनशीपणा’ !

नावडतीचे मीठ अळणी Happy

बाई दवे
मुंबई बाहेरच गेली की अजून काही चमत्कार झाल्यास चान्स आहे त्यांना?

बहुधा मुंबई मॅनेजमेंटने असा बाळबोध विचार केला असेल की एकदा जिंकायला लागलो की सारे काही ठीक होईल. पण क्रिकेट प्रेमींसाठी खेळाचे स्पिरीट आधी असते हे ते विसरले.
मुंबईने ठीक ठाक परफॉर्मन्स केला असता तरी आपल्या लाडक्या भारतीय कर्णधाराला जशी वागणूक मिळाली त्याने दुखावलेल्या जनतेने त्यांना माफ केले नसते.

ऋन्मेऽऽष सर
ऑपरेशन मुंबई सुरु झाले आहे. क्वालिफाय होणार कि नाही? Is the question. आता तीन चार टीमची लावून द्यायची. दरवर्षीचा खेळ सुरु झाला आहे. चीपकके रहो. क्रिकेट is the gem of glorious uncertainty. The game is not over till the last ad is screened!

स्काय नि पांड्याचे फॉर्‍म मधे येणे सुखावह आहे वर्ल्ड कपच्या दॄष्टीने. पांड्या फूल बॉलिंङ करायला लागला तर दुबे नि पांड्या दोघेही खेळू शकतील नि तीन स्पिनर्स पण जेणे करून आठ पर्यंत बॅटींग येईल.

“ स्काय नि पांड्याचे फॉर्‍म मधे येणे सुखावह आहे वर्ल्ड कपच्या दॄष्टीने.” + १

होपफुली सुर्याचं लंगडणं फक्त क्रँप्सपुरतं मर्यादित असेल.

वरचा मुद्दा स्पष्ट करतो - रोहित ने चार फिरकी बॉलर्स असणे जरुर्री आहे असे म्हटलय. ह्याचाच अर्थ त्याला तीन तरी खेळवायला आवडतील असे मी धरतो. म्हणजे सातव्या क्रमांकावर आपली बॅटींग आटोपणार. ह्याला एकच पर्याय म्हणजे पांड्या नि दुबे ह्यांनी मिळून एक फास्ट बॉलर चे काम करणे. म्हणजे तीन स्पिनर्स खेळूनही आठ पर्यंत बॅटींग असेल. फिरकी बॉलर्स ला बॅकप म्हणून पण त्यातला एखादा वापरला जाऊ शकतो. जैस्वाल ला बॉलिंग द्यायला लागली तर स्ट्रीमींग/ टी व्ही बंद करून बसायचे त्या दिवशी Wink

“ ह्याला एकच पर्याय म्हणजे पांड्या नि दुबे ह्यांनी मिळून एक फास्ट बॉलर चे काम करणे.” - मला वाटतं पंड्या प्रायमरिली तिसरा सीमर असेल. दोन फास्ट बॉलर्स (बुमराह + १), ३ स्पिनर्स (जडेजा, कुलदीप, +१), पंड्या आणि बाकी शर्मा, जैस्वाल, कोहली, सूर्या, पंत असा लाईन-अप असेल.

बरोबर पण त्यात बॅटिंग सात वर संपते म्हणून वरचा पर्याय म्हणत होतो. अर्थात १००% प्रॉपर बॉलर नसणे ही मोठी उणीव आहे ह्याची कल्पना आहे. पण आपण ही "दिल बहलाने कें लिए ख़याल अच्छा हैं ग़ालिब।" असे म्हणू शकतो Wink

“ पण आपण ही "दिल बहलाने कें लिए ख़याल अच्छा हैं ग़ालिब।" असे म्हणू शकतो” - गालिबला सगळ्यात जास्त उचक्या क्रिकेटच्या धाग्यावरून लागतील असं कुणालाही वाटलं नसेल. Happy

बरेच लोक आयपीएल बघून रोहितच्या फॉर्म बद्दल चिंता व्यक्त करत आहेत...
पण तो नेहमीच आयपीएल कॅज्युअल घेतो.. आणि देशासाठी स्वताला राखून ठेवतो. त्यामुळे मला तरी हे काही चिंतेचे कारण वाटत नाहीये.

आयपीएलमध्ये त्याचा फोकस कप्तानीवर असतो. तो ट्रॉफी जिंकवून द्यायचे काम करतो. जसे आता धोनी इतका म्हातारा झाला आहे, 19 ओवर नंतर फलंदाजीला येतो. तरीही त्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. टीम मधील व्हॅल्यू सुद्धा आणि ब्रँड व्हॅल्यू सुद्धा... हेच शर्मा बाबत सुद्धा लागू होते.

Pages