सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा भरकटलेला नाहीये.
१४ भक्त उन्हामुळे कसे गेले ह्या विषयी आपण बोलत होतो. सामान्य जन अंधश्रद्ध असतात. ही मानसिकता कशी तयार होतेे. ह्या विषयाला सर्व जन बगल देऊन पुढे जात होते.
मोठे मोठे शास्त्रज्ञही रॉकेट सोडण्याआधी देवळात जाऊन सागर संगीत पूजा करतात. तसेच त्यांचा पण कोणी बाबा असेल. त्याला विचारूनच सर्व होत असेल.
तर ह्यात सुधारणा कशी आणि कधी होणार ? ह्यावरून मी हे रॉकेट प्रकरण काढले.
एकूण परिस्थिती निराशाजनक आहे अस दिसते.
ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.>> हो . समारंभ संध्याकाळी केला असता तर हे टाळता आले असते. पण अंधश्रद्धेेने अजूनही बरेच प्रकार होतात ते कसे थांबवणार हा खरा प्रश्न आहे.
अगदी बालपणापासून वैैज्ञानिक दृष्टीकोन बिंबवला जायला पाहिजे पण तसे होताना दिसत नाहीये. त्याउलट आता उन्हाळी संस्का्र वर्ग चालू होतील.

भारतातल्या सरकारी व्यक्तींनी सरकारी कामात धर्म आणु नये म्हणणा-यांचे, अमेरीकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथ प्रक्रिया किंवा कॅनडाचे हेड ऑफ स्टेट यांचे धार्मीक आचरण यावर काय म्हणने आहे? कॅनडाचे हेड ऑफ स्टेत आणि चर्च ऑफ इंग्लंड यांचा काय संबंध आहे?
भारतातले आम्हाला सगळे माहिती आहे, जरा अमेरिका कॅनडा युरोप बद्दल ही सांगा की आम्हाला.

एका प्रोफाईलला "तुम्ही जे आरोप केले आहेत तसे शब्द कुणी वापरलेत ?" असे विचारले कि ते मावळते आणि दुसरे उगवते, पुन्हा तेच शब्द वापरून तेच आरोप ! Lol
शेंबूड पुसत असलेल्या लेकराला सुद्धा समजेल या पद्धतीने सांगितले आहे. जे काही म्हणायचे ते राज्यघटनेत म्हटलेले आहे. ते ही योग्य शब्दात. तुम्ही म्हणता ते शब्दच नाहीत.
तसेच भारताची राज्यघटना काय असावी हे भारत ठरवणार. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इथले कायदे, घटना पाळण्याचे आणि तिथल्या गोष्टींवर स्पष्टीकरण देण्याचे बंधन भारतियांवर कसे काय ? का म्हणून तिकडे काय होते त्याचे स्पष्टीकरण द्यायचे ? तुम्ही त्यांना जाऊन विचारा, अचूक जागी लत्ताप्रहार करतील. Lol

ईस्रोचे शास्त्रज्ञ यानाच्या यशस्वी ऊड्डाणासाठी देवळात जातात/गेले असतील असे गृहीत धरले तर भारताचे चांद्रयान का भरकटले आणि पडले असावे? >>>>>>>

मी उदय ,
उत्तराखंड च्या रणजी टीम चा कोच वासिम जाफर ने मौलावी ला ड्रेसिंग रूम मध्ये आणून खेळाडूंना धार्मिक मंत्र दिला तरीही उत्तराखंड ची टीम सतत रणजी करंडक स्पर्धेत का भरकटत असावी ?

अरे काय चाललंय.
सगळंच अतार्किक आणि अलौकिक आहे.
आपले शासन हे धर्मनिरपेक्ष असावे (secular), धर्माधिष्ठित नसावे आणि नागरिकांचे वर्तन सर्वधर्मजातीसमभावाचे असावे असे घटनेला अपेक्षित आहे.
ह्यासंबंधी थोडेसे स्पष्टीकरण preamble मध्ये 51 A कलमात दिलेले आहे. ( आम्हां भारतीय नागरिकांची कर्तव्ये) इथे अर्थात शासनाचा उल्लेख नाही. We, the people of India अशीच सुरुवात आहे.
आणखीही खुलासा करता येईल, पण इथे पुरे.

सामान्य जन अंधश्रद्ध असतात. ही मानसिकता कशी तयार होतेे....
>>>>>

नुसते बुवाबाजीच्या नादी लागणारेच अंधश्रद्ध असतात असे नाही तर ज्याला कधी पाहिले नाही त्या देवाची पूजा करणारेही असतात. कुठेतरी श्रद्धा ठेवावी ही कित्येकांची गरज असते.
एका अंगारकी संकष्टीला दादर प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाच्या गर्दीत एका दुर्घटनेतून मी सुद्धा कसाबसा वाचलो आहे. नाहीतर आज लंगडा असतो. पण त्यानंतर अक्कल आली ते आलीच.

आपले शासन हे धर्मनिरपेक्ष असावे (secular), धर्माधिष्ठित नसावे आणि नागरिकांचे वर्तन सर्वधर्मजातीसमभावाचे असावे असे घटनेला अपेक्षित आहे.
ह्यासंबंधी थोडेसे स्पष्टीकरण preamble मध्ये 51 A कलमात दिलेले आहे.
नवीन Submitted by हीरा on 22 April, 2023 - 09:19
>>
मग धर्माप्रमाणे वेगळे कायदे असणे यात बसते का? धर्माप्रमाणे काही वस्तु बाळगणे, युनिफोर्ममधे सुट हे धर्मनिरपेक्ष घटनेला अपेक्षीत आहे का?

इस्रो शास्त्रज्ञ न चे वर्तन आणि अंधश्रद्धा ह्याचा काडी च संबंध नाही.
त्यांनी त्यांचे कर्तव्य स्वतः पूर्ण केले आहे.
मंदिरात गेल्या मुळे ते अंधश्रद्ध बाळगणारे आहेत असे नाही.
यश येण्यासाठी किती योग्य प्रयत्न केले तरी दोन सेकंद ची अयोग्य वेळ ,अयोग्य स्थिती जुळून आली तर अपयश नक्की येते.
मग किती ही काळजी घ्या.
ह्याला च भाग्य म्हणतात.
त्या साठी प्रार्थना करणे हेच आपल्या हातात असते.
स्पेस,X वाल्यांनी पूर्ण काळजी घेतली होती.
कल्पना चावला ज्या यानात होती त्याची तांत्रिक काळजी पूर्ण घेतलेली होती.
तरी अपघात झालाच

हे आधी माहिती होत तर मग या धाग्यावर इस्त्रो चे अधिकारी व त्यांच्या वयक्तीक श्रद्धांवर हिणकस टिप्पणी का करण्यात आली? ती दुस-या धाग्यावर करायची ना?

हे आधी माहिती होत तर मग या धाग्यावर इस्त्रो चे अधिकारी व त्यांच्या वयक्तीक श्रद्धांवर हिणकस टिप्पणी का करण्यात आली? ती दुस-या धाग्यावर करायची ना? >>> ते माझे नातेवाईक , मित्र किंवा संप्रदायाचे लोक नाहीत. त्यांचाही तुमच्या सारखा याच धाग्यावर अजूनही विषय चालू ठेवायचा हट्ट आहे का ? तुम्हाला तुमची स्वतंत्र बुद्धी असेलच ना ? कि ते काय करतात याच्यावर तुमचे ठरते ? आणि त्याचे ओझे तिसर्यावर का ?
ते सोन हजार फूट दरीत उडी मारणार असतील तर तुम्हीही मारणार का ? आणि तुम्ही दोघेही उड्या मारणार म्हणून इतरांनी माराव्यात असे तुम्ही म्हणणार आहात का ?
इथून पुढे तुम्हाला उत्तर देणार नाही.

एका चॅनलवर स्वारींचे कौतुक सांगतांना त्यांच्या अंधश्रध्दा निर्मुलन कार्याचा ही उल्लेख होता.

Submitted by वीरु on 22 April, 2023 - 01:29

खरच?

आचार्य त्यांना फार सिरियसली घेऊ नका, माहिती नसलेल्या विषयात तोंड खुपसून मताची पिंक टाकण्यात मास्टरी आहे त्यांची

टोटल इग्नोर मारा

इथं जगन्नाथ देवाचा विषय निघाला आहे तर त्यांना स्ट्रेथोस्कोप ने तपासण्या करण्याऱ्या आणि देवाला ताप आला आहे असे निदान करणाऱ्या डॉक्टर ची पदवी परत घ्यायला हवी होती
ते तसे काही झालं नाही

ISRO successfully places 2 Singapore satellites into orbit,
आज ईद होती तरीदेखील आपले रॉकेट उडाले. पॉवर ऑफ पूजा

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी स्वतः:च्या खर्चाने देवदर्शनाला जावे.
पण रॉकेटच्या प्रतिकृती, यज्ञ, देवदर्शन हे सरकारी खर्चाने होत असते.
देशातल्या बहुसंख्य प्रयोगशाळा नवरात्रात नवमीला काम करत नाहीत. ही अधिकृत सुट्टी नसते.

हेच !
शास्त्रज्ञांनी सकाळी घरी दोन तास पूजा करून मग कामाला जावे, आल्यावरही घरी दोन तास पूजा करावी. काहीच आक्षेप नाही.
लॉन्च पूर्वी एखाद्या फकिराला बोलवून त्याच्याकडचा धूप रॉकेट वर सोडला तर? एखाद्या पाद्री ला बोलवून मंतरलेले पाणी शिंपडले तर ?

राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदीराच्या उद्घाटनाला जाणार होते तेव्हा नेहेरुंनी त्यांना दिलेले उत्तर अगदी छान आहे.

खर्चा बाबतीत सहमत. तरी नशीब लाँच यशस्वी झालं नाहीतर दोष द्यायला मंदिर भेटच कारणीभूत ठरली असती.

Pages