फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज खुप कमी प्रमाणात फटाके वाजले. कदाचित आज मराठी मंडळी दिवाळि साजरी करत असावेत म्हणुन असेल. परवा समजेल

आम्ही लहानपणी फटाके पेटविलेत म्हणून आता आमच्या मुलांनी फटाके पेटवावे हा आग्रह पटत नाही. >>>> किंवा लहानपणी त्यांच्या नशिबाने मिळताहेत ( लहानपणी परवडत नव्हते म्हणून उडवता आले नाही आता सुबत्ता आलीये) तर का नाही द्यायचे हेही पटत नाही.

माझे आता वय 50 आहे.माझे पूर्ण बालपण खेड्यात गेले आहे .अगदी दहावी पर्यंत
आम्ही पण फटाके वाजवत असू
पण त्या काळी एक अलिखित नियम होता.
आणि तोच नियम पाळला जायचं
सकाळी लवकर उठून म्हणजे 5 ते 6 च्या दरम्यान उठत असू .
त्या नंतर अंघोळ करून नवीन कपडे घालून मग फटाके उठवले जात.
फटाक्यांच्या माळा कोणी लावायचे नाही.
एक एक फटका वाजवला जाई.
फुलबजे,चक्र,टिकल्या हे सर्व फटाके असतं.
आणि रस्त्यावर फटाके वाजवले जात.
किंवा स्वतःच्या अंगणात.
सकाळी 8 वाजयच्या आत फटाके वाजवणे बंद.
आणि रात्री 9 च्या आत.
कोणाला काही त्रास होत नव्हता.
सर्व वेळ पाळत कोणताही ही नियम नव्हता तरी.
खूप मोठ्या आवाज चे फटाके नसतं.

खूप छान वाटायचे.

तेव्हा जास्त महाग फटाके नव्हते.आता जसे फुळबाजे लहान होत चालले आहे, बाकी सर्व च फटाके लहान होत चालले आहेत आणि किंमत वाढत आहे
फुलबाज्या ना तांब्याची तार असायची.
आता तांबे परवडणार पण नाही

फुलबाज्या ना तांब्याची तार असायची.
आता तांबे परवडणार पण नाही
Submitted by Hemant 33 on 24 October, 2022 - 12:44

परवडण्याचे जाऊ द्या, पण तांब्याच्या तारेचा हातात धरलेला भाग गरम नाही व्हायचा??? कारण तांबे हे उष्णतेचे सुवाहक (good conductor of heat) आहे ना!!

तेव्हा एका एका घरात चार चार मुल असायची आता एकच असते.
पूर्ण आळी मध्ये खूप मुल असायची.
कसे भरल्या सारखे वाटायचे गाव.
आता फक्त च गर्दी आहे पाय ठेवायला जागा नाही.
आणि जिव्हाळा,आपुलकी प्रेम कोणाला कोणाविषयी च वाटत नाही.
म्हणून लहानसहान गोष्टी चा त्रास लोकांना व्यायला लागला आहे
कोणी आजारी असेल,गाई ची कोणी धार काढत असेल तेव्हा त्या ठिकाणी फटाके कोणी वाजवत नसतं.
आम्हाला लहान असून पण त्याची जाणीव असे .
स्वतः बरोबर दुसऱ्याचा पण विचार करण्याची तेव्हा रीत आणि सवय होती.
आता ती रीत पण नाही आणि सवय पण.नाही

त्या मुळे सनाना विद्रूप रूप येत आहे.

फुलबाज्या ना तांब्याची तार असायची
लोखंडाची तार असायची, तिच्यावर तांबूस रंगाचे आवरण असायचे. लोखंड मोरचुदाच्या पाण्यात बुडवले की त्यावर त्यांब्याचा थर जमा होतो. शाळेत असताना हे प्रयोग केले आहेत.

तेव्हा एका एका घरात चार चार मुल असायची आता एकच असते.
पूर्ण आळी मध्ये खूप मुल असायची. >>>>>>>>>>>>>>>
आता एकुलत्या एका मुलासाठी दोन तीन हजारांचे फटाके घेत असावेत .
आमची एकत्र कुटुंब पद्धती होती , त्यामुळे पाचजण चुलत भावंडा साठी एकत्र फटाके घेतले तरी प्रत्येकाच्या वाट्याला टिकल्यांचा बॉक्स , कावळा छाप फटका पॅकेट , लवंगी बॉक्स आणि फुलबाज्या पॅकेट असे प्रत्येकी एक पॅकेट रेशनिंग करून मिळत असे .

त्यामुळे फटाक्यांचे हे अल्प धन प्लॅनिंग करून करून वाजवले तरी पुरत नसे .
मग प्रत्येक दिवशी सकाळी गाव भर चक्कर मारून इतरांचे न वाजलेले फटाके गोळा करण्याची मोहीम चालू करायचो !
मग ते न वाजलेले फटाके गोळा करून त्यातील दारू काढायची , एका कागदावर टाकून तो पेटवन्यात समाधान मानायचो .

पुरोगामी अगदी बरोबर आहे.
पण कोणी पैसेवाला आहे म्हणून प्रमाण च्या बाहेर पण फटाके नसतं.
एक लिमिट होते स्वयं घोषित.
माझ्या कडे खूप फटाके आहेत आणि माझ्या मित्राकडे कमी.आहेत.
त्याचे संपले की त्याला आपल्यात सामावून थोडे तरी घेतले जात असे.
मित्र मंडळी पाहिजेत एकटा कोणी फटाके वाजवत बसायचे नाही.
एकच वयाची अनेक मुल मिसळत म्हणून मानसिक आरोग्य पण ठीक असे.
आता सर्वात मोठी हीच समस्या आहे.
समवयस्क मित्र मंडळी मुलांना नाहीत.
एक च मुल ते पण कोणाच्या घरी जायचे नाही ही अघोषित संचार बंदी.
त्या मुळे एकटे पना आणि त्या मधुंन नैराश्य.
ही साखळी आहे.
पण त्या नैराश्य चा दिसणारा परिणाम म्हणजे.
कमी सहन शक्ती,आणि विकृत वृत्ती.
सणांचे आता जे स्वरूप आले आहे त्याला पण ही मानसिकता जबाबदार आहे.

जगात जे काही प्रदूषण आहे.
वायू,पाणी,आवाज, सर्व प्रकारचे प्रदूषण .
ह्याला फटाके अतिशय कमी प्रमाणात जबाबदार आहेत.
अगदी 0.000001% असे किती तरी झीरो लावावे लागतील
त्या मुळे प्रदूषण होते म्हणून फटाके वाजवू नका हे सांगणारे एक तर ढोंगी आहेत किंवा स्वतःची बुद्धी वापरण्यास सक्षम नाहीत.किंवा कट्टर धार्मिक आहेत..

दिवाळीच्या चार दिवसांत जे प्रदूषण असतं त्यात फटाक्यांचं प्रमाण किती असतं?
इथेही ज्या भागात फटाके उडवले जातात, त्या भागाचा विचार करू. नाहीतर चार दिवसांतलं जगभरातलं प्रदूषण मोजाल.

तुम्ही दिवाळीत लावता ते आणि एकूण तेवढेच फटाके वर्षभर रोज पुरवून उडवलेत तर तुमचा मुद्दा कदाचित बरोबर.

मोटारीने प्रदूषण होतं तेव्हा माणूस किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्याने काहीतरी value addition होतं.
कारखान्यात वस्तू़ची निर्मिती होते.
फटाके उडवल्याने असं काय साधलं जातं?

बरं, प्रदूषण होतं म्हणून फटाक्यांवर निर्बंध नकोत हे जरी मान्य केले तरीही खालची बातमी वाचल्यावर हा उपद्रव आपल्या सारख्या देशातील शहरे किती काळ सहन करू शकतील असे वाटते?

https://www.loksatta.com/pune/firecrackers-caused-fires-at-6-places-in-p...

भरत.
नक्की आक्षेप काय आहे.
प्रदूषण,आवाज, की अजून काहीं

मोटारीने प्रदूषण होतं तेव्हा माणूस किंवा वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्याने काहीतरी value addition होतं.
>>>>

दर विकेंडला मुंबईपुण्याहून मोटारींचा ताफा लोणावळ्याला सुट्टी एंजॉय करायला निघतो. धूर सोडत, हॉर्न वाजवत, ट्राफिक जाम करत.. त्याने काय वॅल्यू ॲडीशन होते?

हे आपले असेच. पण अशी लाखो उदाहरणे देता येतील.

सांगायचा मुद्दा हा की फटाक्यांना विरोध करताना कोणी ईतर प्रदूषणांकडे बोट दाखवले तर प्लीज त्यांचे असे समर्थन करू नका.
मानवाने त्याच्या वैयक्तिक अन स्वार्थी प्रगतीच्या आणि भौतिक सुखाच्या हव्यासापोटी पृथ्वीची पार वाट लाऊन टाकली आहे हे मान्य करायला हरकत नाही.

भरत चा प्रतिसाद आयसोलेशन मध्ये सहज चिरफाड करण्यासारखा आहे. ते करणे सोपे ही आहे. त्याच्या मागची भावना समजुन घ्यायची का चिरफाड करुन एक पॉईंट पदरी जमा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न!

चीरफाड कुठे केलीय.
उलट सावध केलेय.
जेव्हा तुम्हाला वादात कोणी म्हणते जाओ पहले ऊस आदमी की साईन लेके आओ तेव्हा त्या ऊस आदमीचे समर्थन करायला पळायचे नसते Happy

आता हाच मुद्दा घ्या
---

इथेही ज्या भागात फटाके उडवले जातात, त्या भागाचा विचार करू. नाहीतर चार दिवसांतलं जगभरातलं प्रदूषण मोजाल.

------

काही ठराविक भागात गाड्यांच्या हॉर्नचा आवाज एवढा असतो की रोडसाईडला राहणारी माणसे बहिरी होतात. डोक्याचे विकार होतात.
घरासमोरून जाणाऱ्या ऊड्डाणपूलाला विरोध याचसाठी केला जातो.

आणि हो.. त्या रस्त्यावरच्या गाड्यांमधून लोकं ऑफिसला जात आहेत की गर्लफ्रेंडला घेऊन मरीन ड्राईव्हला फिरायला जात आहेत. त्याने रस्त्याशेजारी राहणाऱ्या लोकांच्या त्रासात फरक काही पडत नाही.

मुंबईबाहेरची लोकं मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीला हसतात. सहानुभुती देत नाहीत. ती गर्दी देखील महाराष्ट्राच्या विकासात वॅल्यू ॲडीशनच करत असते.

आमच्या भागात काल रात्री एक वाजून गेल्यावर फटाक्यांचे आवाज येत होते. सुख एवढंच की ते दुरून येत होते.
आमच्या व शेजारच्या सोसायट्यांत कोणीही शाळकरी मुलं फटाके उडवताना दिसली नाहीत.
एक जोडपं आपल्या केजीत जाणाऱ्या मुलांचं फटाक्यांप्रती initiation करत होतं. मुलाने रस न दाखवल्याने प्रयत्न फ्लॉप गेला.
१८ ते ३० वयोगटातल्या ८-१० मावस चुलत भावंडांचा एक ग्रूप आमच्या समोरच आवाजाचे व शोभेचे फटाके उडवत होते. ते मात्र दहा वाजता थांबले. माझ्या लहानपणी full concentration ने फटाके उडवले जात. एक झाला की लगेच दुसरा. यांचं अर्ध लक्ष फोनमध्ये असल्याने फटाके कमी फुटले.

इथे अमेरिकेत घरे लाकडाची असतात व या दिवसात पानगळ होऊन जिकडे तिकडे पाला पाचोळा असतो. त्यामुळे आमच्या सोसायटीने ई मेल पाठवून फटाके उडवू नयेत असे निक्षून संगितले होते. तरीही काही जण उडवत आहेत. आमच्य राज्यात पाच एक वर्षापूर्वी बंदीच होती, आता फक्त छोटे फटाके, झाड, फुलबाज्या वगैरेना परवानगी आहे. अन्य राज्यात कदाचित मोठे फटाके आलाऊड असावेत.

माझा सँपल सेट लहानच आहे पण मला असे वाटते की भारतात नव्या पिढीला फटाक्याचे फार अप्रूप राहिले नसावे. मोठी माणसेच 'आमच्या लहानपणी मनसोक्त उडवता आली नाहीत, निदान मुलांना मिळावेत असा विचार करत असावेत'.

जे फटाक्यांना विरोध करतात त्यांनी आधी आपल्या भागात उड्डाणपूल झाला तेव्हा त्याचा लोकांना त्रास होईल म्हणुन केलेल्या विरोधाचे पुरावे घेऊन यावेत. म्हणजे आम्हाला दुसरा मुद्दा मांडता येईल.

फटाक्याला विरोध म्हणजे दिवाळीला विरोध, दिवाळीला विरोथ म्हणजे हिंदूंना विरोध, हिंदूंना विरोध म्हणजे मुस्लिम धार्जिणॆ प्रवृत्ती, मुस्लिम धार्जिणे म्हणजे राष्ट्रद्रोही अशा तर्कटांच काय करायचं? वर एकेठिकाणी लिहिलय की सनातन वाल्यांचा दिवाळीतील फटाक्यांना विरोध आहे कारण त्यांच्या मते दिवाळी हा दिपोत्सव आहे व फटाके वाजवणे हे धर्मसंमत नाही. अंनिसने फटाक्यांना विरोध केला आहे म्हणून मुद्दामून आम्ही फटाके वाजवणार ही भूमिका काहींची धाग्यात दिसते.

जे हाय डेंसिटी हौसिंगला विरोध करत आहेत, त्यांनी आधी समान नागरी कायद्याला सपोर्ट केला आहे का ह्याचा पुरावा घेऊन या.

मी फटाके उडवत नाही, पण सनातन संस्थेने विरोध केला आहे बघून मला माझी भूमिका चुकीची वाटायला लागली आहे.

हरचंद पालव,
पण सनातन संस्थेने विरोध केला आहे बघून मला माझी भूमिका चुकीची वाटायला लागली आहे.>>>> हे पण उलटे टोक.

<<उड्डाणपूल झाला नाही त्यामुळे विरोध नाही जमला>>
असं थोडीच सांगायचं असतं. आम्ही कडाडून विरोध केला आणि उड्डाणपूल होऊच दिला नाही असं सांगावं. आणि उड्डाणपूल नसलेल्या भागाचा फोटो पोस्ट करावा.

(तुम्ही कॅनडात राहता म्हणुन तुम्ही भारताच्या दिवाळीचा विरोध करू शकत नाही हे कार्ड आहे बरं, आम्ही बाही खाली लपवून ठेवलेलं. तुम्ही खरे खुरे पर्यावरण जपण्यास हातभार लावणारे आहात असे तुम्ही केलेल्या विरोधांच्या पुराव्या वरून सिद्ध झालं की आम्ही ते कार्ड काढु.)

Oh those anti-Indiains!
------
गेल्या वर्षीचे आहे हे, आता लक्षात आले.
एक WA ग्रुप मध्ये "आम्ही केव्हाच फटाके बंद केले" अशा बऱ्याच प्रतिक्रिया येउ लागल्या तेव्हा काल एकाने हे तिथे डकवले.

माझा सँपल सेट लहानच आहे पण मला असे वाटते की भारतात नव्या पिढीला फटाक्याचे फार अप्रूप राहिले नसावे. मोठी माणसेच 'आमच्या लहानपणी मनसोक्त उडवता आली नाहीत, निदान मुलांना मिळावेत असा विचार करत असावेत'.
>>>>

माझा सॅंपलसेटही लहान आहे. पण आमच्या बिल्डींगमधील एकूण एक मुलांनी फटाके ऊडवले. फटाके ऊडवायला कधी जायचे याबद्दल सोसायटीतील पोरांची दिवसभर फोनाफोनी चालू होती.

रात्री मी पोरांना घेऊन नाक्यावर चॉकलेट-आईस्क्रीमचा राऊंड मारायला गेलेलो तेव्हा रस्त्यातील प्रत्येक सोसायटीत हेच चित्र दिसत होते. किंबहुना त्याचमुळे मी जास्त फिरणे टाळले.

रात्री दिड दोन वाजताही दुरून नॉनस्टॉप फटाक्यांचे आवाज येत होते. बायकोत आणि माझ्यात चर्चाही झाली यावरून. यावेळेला कोण महाभाग ईतके फटाके वाजवत असतात हा प्रश्न तिला पडला. अर्थात ते नक्कीच छोट्यांचे नाही तर मोठ्यांचे काम असणार.

गेल्यावर्षी ईथे ईतके फटाके फुटले नव्हते. (ईथे म्हणजे कोपरखैरणे- नवी मुंबई) यावेळी लोकांमध्ये जास्त उत्साह दिसतोय मला. ईथे कुठल्या शाळांमध्येही फटाके फोडू नका वगैरे आवाहन करण्यात आले नाही.

माझ्यामते प्रत्येक भागातील चित्र वेगळे आणि दोन टोकाची असतील.
कुठे एकमेकांचे बघून फटाके फोडले जात असतील, तर कुठे कोणी उडवत नाही हे बघून टाळले जात असतील.

पण मुलांमध्ये फटाक्याची क्रेझ नाही हे विधान धाडसी आहे. जे फटाके आमच्यावेळी मोठ्या मुलांनाही परवडायचे नाही वा जी व्हरायटी तेव्हा नव्हतीच ते आकाशात जाऊन फुटणारे फटाके या पिढीतील लहान मुलांच्या नशिबी मला काल दिसले.

Pages