सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्णव तुम्हारा चुक्याच !!!
अर्णव ने अतिशय अक्रस्तळ भाषा वापरून मुख्यमंत्र्याचे नाव घेतले आहे यात काहीही शंका नाही .
त्याला अक्कल च मुळात नाही !
सत्ताधारी लोकाबरोबर गुडीगुडी वागून राष्ट्रीय पातळीवर एखादे अवॉर्ड घ्यावे , जमलंच तर आंतरराष्ट्रीय सुध्दा !!!
बरखा , राजदीप आणि शेखर गुप्ता मात्र ने बघा बर कसे जुळवून आणले ?
आणि हा येडा उठ सुठ सुशांत च्या केस वरून सगळ्या भारताचे लक्ष वेधून आहे .
शेवटी वैतागून राजदीप ने " सुशांत मोठा स्टार नव्हता " अस बोलून आणि प्रिंट ने " बिहारी टॉक्सिक फॅमिली " शब्द वापरून अर्णव ला भानावर आणण्याचा प्रयत्न करावा लागला !!!

>>>>> उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केल्यामुळे राजकीय खळबळ उडाली >>>>>
पार्थ पवार च्या या वक्तव्यावर इथे एक हि विरोधी मत येणार नाही या बद्दल मला पूर्ण खात्री आहे . विनाकारण बोलत नाही मी
खूप सजग आहेत इथले सुजाण नागरिक .

विरोधी पक्ष नेते ह्या नात्याने देवेंद्र जी नी रीतसर सीबीआय चोकशी ची मागणी केली असती आणि तशी मागणी का करत आहोत ह्याचे स्पष्टीकरण दिले असते तर इथे कोणीच विरोध केला नसता.
महाराष्ट्र चा प्रश्न महाराष्ट्र चे विरोधी पक्ष मांडत असतील तर विरोध का?
पण बिहार मध्ये fir दाखल करणे.
बिहार पोलिस मुंबई मध्ये तपासला येणे (बेकायदेशीर पने,त्यांचे हे कार्यक्षेत्र च नाही).
ह्या बिहारी नाटकाचा पण देवेंद्र जी नी विरोध करायला हवा होता.
पण सुशांत केस मध्ये महाराष्ट्रात न्याय मिळत नाही असे चित्र उभे करण्याला विरोध आहे.
आणि दुसऱ्या राज्यातील नेत्या नी आमची(म्हणजे महाराष्ट्र ची) लायकी काढण्याला विरोध आहे.
BJP ला bilkul विरोध नाही.

आणि बिहार इलेक्शन

सुशांत सिंह बिहारी नसता किंवा बिहार निवडणूक झाल्यावर मेला असता तर भाजपा अन फडणीसने त्याला विचारलेही नसते

रिया चे आणि सुशांत च चांगले पटत होते.

त्याच्याच कुटुंबाशी त्याचे पटत नव्हते असे पण वाचायला मिळतेय .
रिया वर दबाव आणण्यासाठी त्याचा ips मेवण्यानी Mumbai police na सांगितले होते पण ते बेकायदेशीर काम करण्यास मुंबई पोलिस नी स्पष्ट नकार दिला होता.
अशा पण बातम्या आहेत.

सी बी आय ला पण quarantine करणार ! ----मुंबई महापौर .

मुंबई मधील मुसळधार पावसामुळे झालेल्या परिस्थितीत मदत करण्यासाठी एन डी आर एफ ची टीम आलेली आहे त्यांना quarantine करण्याचे महापौर विसरल्या वाटतं !!!!

मुंबई पोलिसांबद्दल बातमी:

Mumbai Police Exonerates Journalist Arrested for 'Fake News', Says FIR Based on 'Mistaken Facts'Rahul Kulkarni, an executive editor of leading Marathi news channel ABP Majha. was arrested for a day after thousands of people had gathered outside Bandra railway station on April 14.

https://thewire.in/media/mumbai-police-exonerates-journalist-arrested-fo...

वांद्रे स्टेशन गर्दी प्रकरण : एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निर्दोष, पोलिसांचा कोर्टात अहवाल
लॉकडाऊन काळात वांद्रे रेल्वे स्थानकावरील गर्दी प्रकरणात एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांची अटक चूक झाल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.
सदर गुन्ह्याचे 'वस्तुस्थितीची चूक' या सदराखाली 'क' वर्गीकरण होण्याची देखील विनंती पोलिसांनी कोर्टाकडे केली आहे.
https://marathi.abplive.com/news/mumbai/bandra-station-crowd-case-abp-ma...

ह्या धाग्याचा प्रवास सहानुभूती कडून राजकीय आखाड्यात झाला असं वाटतंय. राजकारण हा विषय मराठी माणसाचा चघळण्याचा विषय आहे. आपापली किंमत माहिती असूनही राजकीय पक्ष, आणि व्यक्तींच्या चूकांबद्दल बोलण्यात आणि सल्ले देण्यात मराठी लोकांचा हात कुणी धरू शकत नाही.

चार चार गर्लफ्रेन्ड असणारा गुणी अभिनेता

दीड-दोन महिने होत आले. एक चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत टी. व्ही.चा पडदा आणि वृत्तपत्रांचे रकाने भरण्यात यशस्वी झालाय. एकीशी प्रेम, दुसरीशी लफडं, आणि तिसरीशी बिझनेस. चौथी लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहून त्याचं अकौंट झिरो करते.म्हणे गुणी कलावंत.हत्या की आत्महत्या यावर दोन महिने चर्वित-चर्वण चाललंय.
कुणाचाही जीव जाणं वाईटच. त्या सुशांतच्या आत्महत्येचं की कथित हत्येचं मी समर्थन करणार नाही. कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. पण सव्वाशे कोटींच्या देशात एक सुशांतच आत्महत्या करतो काय? 33000 शेतकर्‍यांनी शेता-बांधावरच्या झाडांना लटकवून आपला जीवन प्रवास संपवला.त्यांची मुलं-बाळं उघड्यावर पडली.किती जणांनी मेणबत्ती मोर्चे काढले?किती जणांनी शासनाला जाब विचारला?किती निर्माते उपाशी झोपले?
विधवा पत्नी,अनाथ मुलं असहाय्य आई-वडील असा परिवार उघड्यावर पडला. चार्‍यावाचून ती मुकी जनावरे तडफडून मेली. बँक अधिकारी कर्जाच्या वसुलीसाठी दहाव्यालाच हजर. अशावेळी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाने न्याय मागायचा कुणाकडे? सुशांत सिंह राजपूतकडे तर कोट्यावधी रुपये होते. त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे अनेक जणींनी त्याला लुटलं. इथं शेतकर्‍याला निसर्ग आणि शासन व्यवस्था लुटते.त्याच्यासाठी कधी तरी अश्रू ढाळणार की नाही?मी ‘नाम’ संस्थेच्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंच अभिनंदन करतो.त्यांनी हजारो विधवांना रोखीने-चेकने अर्थसाह्य करून त्यांच्या जीवनात थोडा आनंद पेरण्याचा प्रयत्न केला.सुशांत सिंग राजपूत कोट्यावधी रुपये कमावून प्रेम-लफडी करून मानसिक दिवाळखोरीत जात आत्महत्या करत असेल तर त्याला एक न्याय व शेतकर्‍याला दुसरा न्याय हे कसं काय? म्हणजे, पडद्यावर नाचणारा, प्रेम- लफडी करून ‘पेज थ्री’ पार्ट्या झोडपणारा ‘माणूस’?, दररोज १२-१४ तास काबाडकष्ट करून तुटलेल्या - फुटलेल्या घरात राहून आपल्या पत्नी-मुलांबाळांचं संगोपन करू पाहणारा ‘कचरा’? कुणीही यावे डस्टबिन मध्ये टाकावे?या समाजव्यवस्थेची चीड येते.सध्या कोरोनाचा महाभयंकर काळ सुरू आहे.या चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर संपूर्ण भारताला दोन वेळचं जेवू कोण घालतोय? शेतकरी! तो राबतोय म्हणून आपण खातोय! तो घरात बसला असता तर आपलाही ‘सुशांत’ झाला असता. त्याच्या पदरात काय पडतंय? १०रु. किलो टोमॅटो, ५रु. कि. कांदे, १०रु. कि. बटाटे, २रु. मेथीची जुडी, २रु. कोथिंबीर जुडी,
१८रु. लि. दूध. चार टेम्पो शेतकर्‍याचा माल विकून जेवढा पैसा येईल, तेवढ्या पैशात ‘सुशांत’ रोज सकाळी नाश्ता करायचा. आणि आपल्या मैत्रीणींनाही खावू घालायचा. नाश्ता, जेवण जेव्हा संपलं तेव्हा त्यांनी टांग वर केली आणि यानेही आपला बिस्तरा गुंडाळला. टी. व्ही. मिडीया, वृत्तपत्र मिडीयाने आपली नजर थोडी शेतकर्‍यांच्या शेताबांधाकडे वळवावी. विदारक चित्र आहे. कदाचित एखादा पत्रकारसुद्धा आत्महत्या करेल.
परखड आहे पण वास्तव आहे....
#वट्सअप_साभार

" मुंबई पोलीस केस चा तपास करायला सक्षम आहेत " असे मुंबईतील संपादकांनी ( जगातील एकमेव संपादक जे ट्रम्प ला सुध्दा मार्गदर्शन करू शकतील ) अजित दादांच्या सुपुत्रा ला ठणकावून सांगितले पाहिजे होते , पण का कोणास ठावूक संपादकांची
पार्थ बद्दल दातखिळी बसली आहे !
त्याच प्रमाणे भीमा कोरेगाव केस मध्ये थोरल्या पवार साहेबांचा मात्र महाराष्ट्र पोलिसावर विश्वास नव्हता ! आणि आता या दोन्ही आत्महत्या केस मध्ये प्रचंड विश्वास .
किती हा विरोधाभास !!!!!!

अजुन एक राणे मंडळी पण आघाडी सरकार वर तुटून पडली आहे , दिशा सलियन च्या केस मध्ये सरळ सरळ ज्युनियर चे नाव घेत आहेत पण त्यांना चॅलेंज करणारा सेने मध्ये शिल्लक नाही हे पण दिसून आले !!!!!
ज्युनिअर चे नाव जर फडणवीस ने घेतले असते तर सगळी सेना फडणवीस वर तुटून पडली असती पण राणे म्हणजे आग्या मोहळ !
त्या पिता पुत्राच्या नादी लागण्या अगोदर राष्ट्रवादी आणि सेना वाले दहा दहा वेळा विचार करत आहेत असं वाटते !
आणि समस्त काँग्रेसी पुढारी मस्त पैकी दुरून तमाशा चा आनंद घेत आहेत !
वर दात विचकवून म्हणत असतील " घ्या अजुन घ्या महत्वाची खाती तुमच्याकडे "
Happy

वृत्तपत्र मिडीयाने आपली नजर थोडी शेतकर्‍यांच्या शेताबांधाकडे वळवावी >>>>>
पूर्णपणे सहमत !

नवरोबांची सत्ता गेली या दु:खात आहेत बिचाऱ्या, ज्यांच्या मुळे गेलीय त्यांनी अडचणीत आलेलं पहायचं असेल त्यांना.

कंगना ताई आता आयुष्मन खुराणावर घसरल्या आहेत,
तो इंडस्ट्री बाहेरचा असल्याने प्रस्थापितांची चाटुगिरी करतो. (तो रियाच्या बाजूने काहीतरी बोललेला).

बिहार पोलिस मुंबई मध्ये येवून तपास करू शकत नाहीत जो गुन्हा मुंबई मध्ये घडला आहे.
मूर्ख महा मूर्ख मीडिया ल काडीची आक्कल नाही.
असे वर्तत्न मीडिया नी चीन,कोरिया,किंवा बाकी देशात केले असते तर मालक सहित रिपोर्टर ला तोफे नी उडवला असतं.
भारत हे संघ राज्य आहे त्याचे नियम पाळा नाहीतर भारताचा पाकिस्तान होण्यास बिलकुल वेळ लागणार नाही.
फक्त अशिक्षित उत्तरेची राज्य आणि महाराष्ट्र म्हणजे. भारत नाही .
बाकी राज्य तील लोक,सरकार ह्यांच्या वर ह्या मूर्ख हिंदी मीडिया च परिणाम होत आहे.
ती सुद्धा संघ राज्याचे कायदे पाळायला नकार देतील.
फालतू राजकीय फायद्या साठी bjp ni स्वतः ची लायकी कमी करून घेवू नये.

कंगना चे काहीही चालू आहे
जगातला प्रत्येक माणूस तिच्या विधानावर फॉर किंवा अपॉझिट स्टॅन्ड घ्यायलाच पाहिजे असा नियम आहे का?
स्टॅन्ड घेण्याबद्दल सर्वांचा कॉन्फिडन्स, आर्थिक परिस्थिती, अनुभव, हितसंबंध एकसारखे असतात का?

ती पण लेडी सुशांत आहे

ह्याने 3 गर्ल फ्रेंड केल्या
तिने 3 बॉय फ्रेंड केले , सगळे मेरीड

https://wikibio.in/kangana-ranaut/

भाजपावाले पत्रकार तिला तिच्या ह्या जीवनाबद्दल , मित्राबद्दल हळुवार प्रश्न विचारतात , जणू काय कालिदासाने लिहिलेले प्रेमकाव्य

आणि नेहरूने मात्र म्हणे लफडी केली , असे सांगतात

बिसी आपण कोणताही विषय राजकीय प्रतलावर ओढून नेण्यात माहिर आहात बघा. कौशल्य वादातीत आहे तुमचं.

कंगना वर चार शब्द लिहावेत, बोलावेत एवढी ती महान अक्टर नाही.
तनुश्री ची बहिण आहे.
दोघी एकजात महा मूर्ख

रस्त्यात नागडे झालात तर तुम्हाला पण सर्व घाबरतील.
कसली खमकी नागडी होण्याची लाज नाही बघणार लाजेल.

जिया खानवेळी कंगना, अर्णब कुठे होते, जियाची आई एकटी लढत होती. तिला न्याय मिळावा म्हणून, बाकी कोणी किती प्रयत्न केले.

सुशांतच्या प्रकरणात जर काही काळं बेरं असेल तर त्याला न्याय मिळायला हवा हे नक्की वाटतं. पण मला जियावेळी पण वाटलेलं की तिला न्याय मिळायला हवा. मिळाला नाही.

आता या निमित्याने जिया, जिया करत असतील तर ते बेगडी वाटतं मला.

अन्जू मला वाटते जिया खानने घटस्फोट घेतल्यानंतर आत्महत्या केली होती. कदाचित तसं नसेल. पण सुशांत सिंग याच्या आत्महत्येभोवती इतके कंगोरे आहेत की अनेक लोक तिकडे आकर्षित झाले आहेत.

जियावेळी पण गुढ वाटलेलं, जरी आत्महत्या केली असेल तरी कारणीभुत कोणीतरी नाहीतर खून.

मला दोघे आवडायचे जिया आणि सुशांत. पण यावेळी राहून राहून मला तिची आठवण येते. अर्थात कोणी सामान्य माणसाने आत्महत्या केली, किंवा त्याचा खून झाला तरी मला वाईट वाटतं, त्यांच्याबाबतीही न्याय मिळावा असंच वाटतं.

रस्त्यात नागडे झालात तर तुम्हाला पण सर्व घाबरतील.
कसली खमकी नागडी होण्याची लाज नाही बघणार लाजेल.

Submitted by Hemant 33 on 10 August, >> नाना तिच्याबरोबर वाईट वागलाच नसेल हे कशावरून? नानाची तथाकथित आक्रमकता या प्रकरणापासून झपाट्याने कमी झाली आहे हे दिसलं आहे.

समाज मध्यम चा वापर करून काहीच माहीत नसताना ज्या प्रसिद्ध व्यक्ती आत्मविश्वासाने चुकीची माहिती देतात खरे तर अशा लोकांमुळेच न्याय मिळण्याची शक्यता दुरावते.
काय सांगावं हा नवीन उद्योग असेल आरोपी पैसे देत असतील केस चा तपास चुकीच्या दिशेने वळवण्यासाठी काही ठराविक लोकांना.
आकडतंडव करण्यासाठी.
कारण नेहमी काही ठराविक लोकच
हे उद्योग नियमाने करतात.

Pages