युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेत असताना मी एकटा रहात असे. दूध बर्‍याच वेळा नासायचे. साखर, केशर , वेलदोडा घालून आटवून एकदम मस्त पदार्थ तयार होतो. Happy त्याच नाव माहित नाही.

न तापवल्यामुळे नासलंय का ? >>हो जरा उशीर झाला तापवायला, Sad त्यामुळे स्वतः चा राग येतोय तो वेगळाच. (७२ रू लिटर सरदार डेअरीचंं दुध घेतलं आज, मी कधी कधी च घेते ेरवी गोकुळ घेते. जाउ दे)

शाळेत असताना मी एकटा रहात असे. दूध बर्‍याच वेळा नासायचे. साखर, केशर , वेलदोडा घालून आटवून एकदम मस्त पदार्थ तयार होतो. Happy त्याच नाव माहित नाही.>>>>ह्याला नासकवणी म्हणतो आम्ही, ते मस्त च लागतं. पण ह्या पनीरचे अजून काही तरी वेगळं करावं असं वाटतंय थोडं गिल्ट कमी व्हायला.

नासलेल्या दुधाचे अनेक प्रकार करते मी, गुळ किंवा साखर आणि एव्हरेस्ट मिल्क मसाला घालून आटवते. पनीर भुर्जी, पनीर ढोकळा करते. अर्थात नुकत्याच आपल्यासमोर तापवत ठेवल्यावर नासलेल्या दुधाचे करते.

पण काहीजण म्हणतात की ते फेकून द्यावं. त्यामुळे असं करणं योग्य की अयोग्य समजत नाही मला.

मी रसमलई करण्याचा प्रयत्न केलाय, पण ते पनीरचे गोळे स्मुथ टेक्श्चरचे नाही होत. मी खुप मळलं आणि पाकात सोडून दिले, कालच बासुंदी केली होती ती उरली आहे, तर त्यात घालून रसमलई होइल. धन्यवाद सगळ्यांना

खळखळून तापवून लिंबाचा रस घालून नंतर पनीर चे पराठे किंवा पनीर भुर्जी करता येईल.हेब्बर किचन ची पनीर भुर्जी रेसिपी मस्त आहे
आमच्याकडे 1 लिटर नासलेल्या गोकुळ दुधाची पनीर भुर्जी झाली.
गोकुळ एरवी पण आमच्याकडे 1 दिवस उशीरा येते.त्यामुळे फ्रीजमध्ये चुकून दीड दिवस राहिले की नासते.
(हे सर्व लिहिल्यावर वाचले की पाकगोळे झाले.पुढच्या वेळी नासलं की पनीर भुर्जी करा ☺️☺️)

शाळेत असताना मी एकटा रहात असे. दूध बर्‍याच वेळा नासायचे. साखर, केशर , वेलदोडा घालून आटवून एकदम मस्त पदार्थ तयार होतो. Happy त्याच नाव माहित नाही>> नासकावणं/ नासकावणी

मी अंजलीच्या कृतीने वेज बिर्याणी करते, मेधाच्या कृतीने मटण बिर्याणी करते आणि सामीच्या कृतीने चिकन बिर्याणी करते. तीनही पाकृ हमखास प्रकारातील आहेत.

सामीच्या कृतीने चिकन बिर्याणी मी उद्या करणार आहे.घरात नेमकं लेग पीसेस आहे असं वाटलं तर बोनलेस पाकीट आहे. बघू काय गोंधळ घातला जातो ते Wink

मी ते नासलेले दूध आत्ता फ्रिज मधनं काढले आणि पाणी काढून टाकू म्हणोन चाळणीवर टाकले तर अर्ध्याहून अधीक चाळणीतून सांडूनच गेले. फक्त गोकुल फेमस फॅट उरली. ती कुत्र्याच्य दुधाच्या वाटीत टाकली किस्सा खलास. आपण घरच्या घरी अप्रतिम बंगाली मिठाई बनवली वगैरे सुखस्वप्ने विरली व हिर्वागार पोपट झाला. हे दु:ख बटर दोशा खाउन गिळले.

आज वीकेंड व गेम मध्ये स्पेशल इवेंट आहे. तो खेळायचा सोडून कोण असल्या उचापती करेल.

दूध वाला बेल मारून सर्वांना झोपेतून उठवतो म्हणून आम्हीच बेल बंद करतो. ह्या नवाबी पणा पाई अर्धा लिटर दूध गेले वाया.

अमा तुमचे आमचे सेम असते, आता मला कोणीतरी सांगा काय करू ते, मी 1 लीटर दुधाला विरजण लावलं, बहुतेक विरजण आंबट नसाव ,किंवा कमी पडले असावे पण दह्याला तार सुटली आहे, दही नीट लागलं नाही,कोशिंबीर मध्ये टाकले तर चव जाते, ते फेकवत नाही आंबा लस्सी चा विचार होता पण नवरा म्हणाला की खराब लागेल, तर काय करावे

कढीपत्त्याला आवडेल
पातळ करून टाका
जर तार सोडल्यास बाकी चांगले वाटत असेल तर दशमी/ग्रेव्ही भाजी/थालीपीठ/पराठ्यात वापरून टाका.

अमा तुमचे आमचे सेम असते, आता मला कोणीतरी सांगा काय करू ते, मी 1 लीटर दुधाला विरजण लावलं, बहुतेक विरजण आंबट नसाव ,किंवा कमी पडले असावे पण दह्याला तार सुटली आहे, दही नीट लागलं नाही,कोशिंबीर मध्ये टाकले तर चव जाते, ते फेकवत नाही आंबा लस्सी चा विचार होता पण नवरा म्हणाला की खराब लागेल, तर काय करावे>>>
टाकून देणे.
इथे नासलेल्या दुधाच्या मीठायांचे वाचून लिहित आहे , पण दुग्धजन्य पदार्थ खराब/नासले असतील तर रिस्क का घ्यायची ? दुध नासून पनीर तयार होणे आणि आपण व्यवस्थित लिंबु पिळुन पनीर तयार करणे यात फरक असणार आहे . मला शास्त्रीय माहिती नाही पण लहानपणापासून घरी पहात आले आहे कि नासलेले दुध कधीच कशाकरीता वापरू नये.

नासलेले दुष्ट नुकतेच नासलं असेल तर नीट खळखळा उकळून मग पनीर ला वापरल्यास हरकत नसावी.लिंबू हा फक्त एजंट.लिंबू नसल्यास जुन्या पनीर चे पाणी (व्हे) वापरून पनीर बनतोच.
'खराब' वाली स्टेज बरीच नंतर चालू होते काही न केल्यास.शिवाय इडली/अनारसा पीठ इत्यादी आपल्या खाण्यात पदार्थ आंबवणं आहेच की.

Pages