ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

बाकी तडकाफडकी राज्याचे विभाजन का केले गेले हा प्रश्न काही वर्षांपूर्वी तेलंगण व आंध्र ची जनता विचारत होती असे आठवतेय. त्यावेळी काय जबरदस्त आंदोलने व जाळपोळ झालेली ! आणि यूपीएचे केंद्र सरकार हतबलतेने बघत बसले. त्यामानाने काश्मीरमध्ये परिस्थिती आताच्या सरकारने चांगली हाताळली.

मी तर म्हणतो लगोलग अजून एक कायदा पारित करून जम्मू आणि काष्मीरची नावेपण बदलून टाका. वेदात काही तरी त्रेता किंवा द्वापार युगातल्या ईथल्या राज्यांची नावे सापडतीलच.

फुटीरतावादी जेव्हा भारत सरकारबरोबर चर्चेला बसायचे तेव्हा पाकिस्तानही चर्चेला असला पाहिजे अशी मागणी केली जात असे, किंवा फुटीरतावादी लोक परस्पर पाकिस्तानशी चर्चा करत त्यावेळी त्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अविष्कारामुळे ल्युटीयन्स फुरोगाम्यांना कोण आनंद व्हायचा !

मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला या लोकांनी सरकारी बंगले हडपुन त्यांच्या सजावटीवर 50 कोटी खर्च केले तेव्हा तर या फुरोगाम्यांना त्यांच्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

विजय कुलकर्णी भाउ, तुम्ही डकवलेल्या व्यंगचित्रातला काश्मिरी खालीलपैकी नक्की कोण?
व्यंगचित्र ढापलेलं असेल तर कदाचित तुम्हाला उत्तर लगेच सापडणार नाही, तेव्हा 2 दिवसांनी उत्तर दिलेत तरीही चालेल.

1) फुटीरतावादी
2) दगडफेक करणारा
3) इसिस चे झेंडे फडकवणारा
4) बंदुका पळवणारा व भारताच्या जवानांना बेसावध असताना गाठून ठार मारणारा दहशतवादी
5) राजकीय नेता
६) भारतीय लष्करात भरती झालेला
7) स्वतःचे काम इमानेइतबारे करून काश्मीरमधील राजकीय परिस्थितीशी काही देणेघेणे नसलेला शांत माणूस, ज्याला स्वतःच्या पोटापाण्याचीच पडलीय.
8) भारतात शिकणारा काश्मिरी विद्यार्थी
9) पाकिस्तानात जाण्यासाठी उत्सुक असलेला पण काही करण्याची हिंमत नसलेला, म्हणून फुटीरता वाद्यांना पैशाची मदत करणारा
10 ) वरीलपैकी कुणीही नाही.

जम्मू आणि काष्मीरची नावेपण बदलून टाका.
ज्याना "जम्मू काश्मिर" च नाव नीट लिहीता येत नाही त्याने सरकारने
"जम्मू काश्मिर" हे नाव बदलुन नवे ठेवावे अस सुचवणे म्हणजे मोठा जोक आहे !!

जोक वाटला तर थोडं स्मायली बियली टाका की वो. मराठी व्याकरणाचा दाखला द्यायला "जम्मू काश्मिर" नाव मराठीत नाव ठेवायचं आहे का?
मग हिंदितून जम्मू-कश्मीर चुकीचं म्हणायचं का? Proud
असो.. मी सिरियसली म्हणालो होतो....रक्तरंजित ईतिहासाच्या कटू आठवणी विसरण्याची सकारात्मक सुरूवात नावापासून व्हायला हवी.

>>© राज कुलकर्णी, प्रवक्ता, फ्रेंडस ऑफ डेमॉक्रसी, भारत.<<
होल आर्टिकल इज ए पिस ऑफ क्रॅप. देशातल्या राज्यांची स्वतंत्र घटना, ध्वज असु शकते हाच मुद्दा सारखा गिरवला आहे. परंतु त्या देशांतल्या राज्यांनी कधी बंडाळी केली का, आणि केली असेल तर त्या देशांनी ती कशी हाताळली, हे सगळं सोयिस्कररित्या टाळलेलं आहे. अमेरिकेचंच उदाहरण जे वारंवार दिलं गेलं आहे त्यावरुन लेखकाचं अमेरिकन सिविल वॉरवर काहिच वाचन झालेलं नसावं, हे जाणवतं... Wink

पाकिस्तान ल अनुरूप भूमिका घेण्यासाठी अमेरिकाच काय पूर्ण जगाचा इतिहास बदलून हिंदुस्तान chya सरकार
ला आरोपी ठरवतील आणि पाकिस्तान ल शांतीदूत .

भरत यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने किती ही आदळआपट !

पूर्वीचा उन्माद ओसरल्यानंतर मुद्द्यांवर चर्चा करायला गेले आणि तोंडावर आपटले. मग नेहमीच्या पद्धतीने एकाने वाटेल ते आरोप करायचे आणि बाकीच्यांनी (?) री ओढायची हा प्रकार प्रत्येक धाग्याप्रमाणे इथेही दिसला.

त्या आरोपात भर टाकत न्यायची म्हणजे विरोधकांचे मुद्दे काय होते याचा विसर पडून , अरेच्चा, असे भंपक विरोधक आहेत काय असे मत तयार व्हायला पाहीजे ही स्ट्रॅट्रजी दिसून येते. त्यातच आपण कुणालाही काहीही म्हणायचे आणि त्याला उत्तर मिळाले की आपले प्रतिसाद झाकून वाकीचे अ‍ॅडमिनच्या विपूत डकवायचे हे ही चालूच आहे. Lol

अ‍ॅडमिन आता कंटाळले असतील.

आता जाता जाता विरोधकांचे म्हणणे थोडक्यात.

३७० वे कलम जायलाच हवे होते, ते घालवल्याबद्दल मोदी शहांचे अभिनंदन. पण ते ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल नाराजी.
याचा आणि पाकिस्तानचा संबंध जोडून दाखवा आता.
तसेच ३७० वे कलम गेल्याबद्दल कुणी नाराजी व्यक्त केली हे पण दाखवून द्यावे. कुठल्या पान क्र. वर कुणाचा प्रतिसाद आहे ते सांगावे.

संसदेत ३७० कलम हटवल्याचे जे फायदे शहांनी सांगितले त्याचे पोस्टमार्टेम करणे म्हणजे पाकिस्तानचे म्हणणे सेम असणे कसे काय हे पण समजावून सांगावे.

वर लिहिलेल्या राज यांच्या मताशी सहमत. त्या लंब्याचौड्या मारणार्या लेखकाला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे त्या लेखातून स्पष्ट होत नाही. 90 टक्के लेखात झेंडापुराण लावलंय. त्यात अमेरिका नि फिनलंड यांची उदाहरणे देताना, एखाद्या राज्याची बंडाळी हे देश कसे निपटून काढतात, तिथली अध्यक्षीय लोकशाही यावर लेखकाने काहीही लिहिलेले नाही. (तुलना करायचीच तर सगळ्या बाबतीत करावी, फक्त सोयीच्या बाबतीत नाही) शेवटच्या पॅरामध्ये मोदींनी काही विशेष केलेलं नाही व याआधीच्या सरकारांनी 370 निष्प्रभ केले होते वगैरे तारे तोडलेत. मग जर काही विशेष झालेलेच नाहिय तर यांची कावकाव कशासाठी?

ज्याने तो प्रतिसाद डकवला , त्याने आता इथली विरोधी मते त्या लेखकाकडे पोहोचवावीत.

<< मोदी आणि शहांचे जितके आभार मानावेत तितके कमी आहेत. Happy
आणि जे लोक त्यांच्या विरूध्द बोलत आहेत त्यांचा तीव्र निषेध! Angry >>

--------- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांचे अभिनंदन मी तसेच अनेकांनी केले आहे... प्रत्येक नवदेशभक्ताला त्यांचा अभिमान आहेच.

पण त्यांच्या विरुद्ध काही बोलायलाच नको हे अजिबातच पटत नाही. ते पण चुका करत असतात, अपुरी किंवा खोटी महिती पुरवतात... त्यांची कृती काहींना खटकत असेल तर संयत भाषेत विरोध करणार्‍यांचे स्वागतच व्हायला हवे.

कालच सुषमा स्वराज यांचे एक भाषण पाहिले. सरकारविरोधात त्या किती बोलत असत. म्हणून त्यांना कुणी पाकिस्तानी एजंट म्हटल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. माझे चुकत असेल तर दाखवून द्यावे.

इतकेच काय सुषमाजी जरी विरोधात असल्या तरी त्यांच्या अमोघ वक्तव्याचे चाहते दोन्हीकडे होते. विरोधकांना शत्रू समजण्याची रीत आणि संस्कृती २०१४ पूर्वी नव्हती. ना काँग्रेसमधे, ना समाजवादी लोकांत ना इतर प्रादेशिक पक्षांमधे. अतिरेक्यांप्रमाणे विचार असलेले लोक आणि त्यांचे समर्थक सत्तेत येणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे.

थॅनोस आपटे ने अॅडमिन ना फारच छळलं होतं. ते म्याऊ पण सतत तिकडे तक्रारी करत होतं. शेवटी गेले "हे पान पहायची परवानगी नाही" या कलमाखाली गजाआड.

त्यातच आपण कुणालाही काहीही म्हणायचे आणि त्याला उत्तर मिळाले की आपले प्रतिसाद झाकून वाकीचे अ‍ॅडमिनच्या विपूत डकवायचे हे ही चालूच आहे. Lol

अ‍ॅडमिन आता कंटाळले असतील.

Submitted by कांदामुळा on 9 August, 2019 - 06:58 >>>

कांदामुळा यांच्या वरील मताशी सहमत, किरणउद्दीन, थानोस आपटे, म्याऊ इत्यादी उथळ मनोवृत्तीच्या आयडिंनी प्रशासकांच्या विपूवर गेले 2 महिने जी घाण करून ठेवलीय त्याने प्रशासक नक्कीच कंटाळले असतील. आता त्या उथळ आयडींपैकी इथे कुणीही नाही यावरूनच त्यांनी दिलेल्या त्रासाची तीव्रता समजून येईल.

. कालच सुषमा स्वराज यांचे एक भाषण पाहिले. सरकारविरोधात त्या किती बोलत असत. म्हणून त्यांना कुणी पाकिस्तानी एजंट म्हटल्याचे आजपर्यंत ऐकिवात नाही. माझे चुकत असेल तर दाखवून द्यावे

>>

वेड पांघरून पेडगावला जाणं यालाच म्हणतात. सरकारविरुद्ध बोलताना पाकिस्तानच्या बोलण्याबरोबर सुषमाजिंच बोलणं कधी जुळलं याची काही उदाहरणे आहेत काय?

इथे काँग्रेस नेते तर पहिल्या सर्जिकल स्ट्राईक्स पासून आताच्या काश्मीरवरील कारवाईपर्यंत पाकिस्तानला प्रपोगंडा रेटायला मदत होईल असेच बोलत आलेत.

इथल्या विरोधकांचे पाकिस्तानबरोबर म्हणणे कसे जुळले ते दाखवून देताय ना ?

https://youtu.be/CmPNVmxvM2M
हरीश साळवें ची प्रकट मुलाखत.
आधी एनडीटीव्ही साईट वरील बातमी मध्ये चॅनेलने नेहमीच्या सवयीने साळवें च्या प्रतिक्रियेवर च्या headline वर question mark टाकून साळवें चे म्हणणे ट्विस्ट करायचा प्रयत्न केला होता हे उघड झाले.

इथल्या विरोधकांचे पाकिस्तानबरोबर म्हणणे कसे जुळले ते दाखवून देताय ना ?

नवीन Submitted by कांदामुळा on 9 August, 2019 - 07:47 >>>

इथले फुरोगामी , दिल्लीतले ल्युतीयन्स आणि कॉंग्रेसमधले वेगळे नाहीत.

पहिल्या सर्जिकल स्त्राईकचे पुरावे मागणे.

दुसर्या सर्जिकल स्राईकचेही पुरावे मागणे व पाकिस्तान जो।प्रपोगंडा रेटत होता त्याच्याशी संबंधित बातम्या इथे आणून डकवणे. पाकिस्तान बालकोटमधील त्या जागी एव्हढा बंदोबस्त का ठेवतोय नि तिथे कुणाला जाऊ का देत नाही हे विचारल्यावर बिचारयांची फाफलली, एकही टोणगा उत्तर द्यायला पुढे आला नाही.

काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आणि भडक वक्तव्यांमुळे नेत्यांना स्थानबद्ध केले तर काँग्रेसची कावकाव सुरू झाली. हे सर्व सरकाने केलं म्हणून काश्मीर मध्ये त्वरित जाळपोळ (उदा तेलंगणा) करण्याची संधी कुणाला मिळाली नाही.

गुलाम नबी आझाद म्हणतोय की पैसे देऊन डोवल काश्मीरिंबरोबर बोलतात. हे काय आहे?

पाकिस्तानी न्युज पहिल्या तर ते लोक ज्या प्रकारे भारतातील विरोधी पक्षांचा हवाला देऊन बोलतात, त्यावरुन काँग्रेस पाकिस्तानची किती मदत करते ते दिसून येतंच.

चला आता मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या (अर्थात असलं तर, नाहीतर काहीतरी "उथळ" सारवासारव करून पळ काढू शकता)

इथे या अर्थाचे प्रतिसाद कुणी कुणी दिले आहेत ते सांगता का ? पान क्र. तरी ? शक्य झाले तर अ‍ॅडमिनच्या विपूत ज्या पद्धतीने कॉपी पेस्ट करता तसे आत्ता करून दाखवा.
विषय ३७० चा चालू आहे याचे स्मरण करून देता ना अधून मधून ? स्वतः विसरू नका.

गुलाम नबी आझाद यांचे वक्तव्य इथे कुणी कोट केलेय हे पण दाखवा. उगीच साप साप म्हणून भुई धोपटणे चालू आहे.

जर दाखवता येत नसेल तर भरत यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. ती देता येत नसेल तर तसे सांगा. पण धागा भरकटवताना केलेल्या खोट्यानाट्या आरोपांची लाज बाळगा.

हा हा हा,
कांदामुळा, जाम प्रिडिक्टेबल आहात तुम्ही... एक सल्ला देईन, जेव्हढी झेपते तेव्हढीच उडी मारत जा. नाहीतर ही अशी अवस्था होते.

सुषमा स्वराज यांच्याबाबतीत जो प्रश्न मी विचारला त्याच उत्तर कधी देताय? तो विषय तर तुम्हीच सुरू केला.

सुषमा अटलजी भेटले म्हणे...

दीदी आयी..
दीदी आयी..

भागते भागते ही
प्रमोदजी द्वारपे आये
आ रही सुषमादी को देख
प्रसन्न मुस्कुराये।

अटलजी पुछ रेहे थे
“इतने जल्दी? क्यों? कैसै?”
तभी भागते आयी दीदीने
पैर उनके नेहेलाये
अपने आँसुओंसे।

“क्यों सुषमा.. जल्दी क्यों आयी हो?
माँ भारती ने छोड़ा कैसे?”
अटलजी ने घेर दिया सवालोंसे
“या तुम भाग आयी हो?”

नकार कर वह विदूषी बोली..
संस्कार है आपकेही हमपर..
हम भला कैसे भागेंगे..
समय आ गया है अब, अटलजी
हर एक सपना हमारा
हम पूरा कर दिखायेंगे।

तभी आये श्यामा दा कहींसे
और भी कईं साथ थे..
देख झुकी वह संस्कारी नारी
आशिष जो उनके लेने थे।

उठो बेटा.. तुम यहाँ पर
तो वहाँ कौन अब गरजेगा?
हमारी सरकार तो है बनी..
पर प्रभावशील भाषण
कौन अब करेगा?

चिंता न करें आप सब
स्मृति-पूनम को छोड़ मैं आयी हूँ
प्रभावी वक्ता हैं तो वह भी
मैं कुछ नया समाचार लायी हूँ।

एक क़ायदा .. एक निशान
अब एक ही है संविधान
कश्यप ऋषि की पावन धरा यह
अब ले रहा है हिंदुस्तान।

समान नागरी क़ायदा कर
मोदी जी ने वचन है पूर्ण किया
स्वर्गभूमी कश्मीर को अब
दरिंदोके चंगुलसे मुक्त किया।

रोक नहीं पायी मैं खुदको
यही ख़बर जो सुनानी थी
तीन घंटोमे ही निकल पड़ी मैं..
नीचे जश्नकी तैय्यारी थी।

सपना था आपका ओ श्यामादा..
वह हम सबने है पूर्ण किया..
विश्वमें उभरेगी माँ भारती अब
बाक़ियों ने मुझे है वचन दिया।

संकल्प सिद्धी हुइ हमारी अब..
इसिलिये मैं चली आयी..
विश्वविजेता बनेगा भारत
मौसम ने ली है अब अंगड़ाई।

ख़ुश हुए सब..
यह ख़बर सुनके..
बोले...
अब वापस चलना है।
ऋण माटी का
फिटा नहीं अब..
जन्म वहींपर लेना है।

वंदे मातरम्।

कांदामुळा , गरज आहे का या सगळ्याची ?
अडचण झाली की पुढची दोन तीन पाने याच पद्धतीने बाकीच्या धाग्यांवर सुद्धा हेच झाले आहे. त्यात नवल ते काय ?

वेलकम संजय भाऊ, कांदामुळा यांना मदतीची गरज आहे. त्यांनी सुषमा स्वराज यांच्याबद्धल जे लिहिले, ते काहीही मागचापुढाचा विचार न करता लिहिले. त्यावर प्रश्न विचारल्यावर आता कदाचित त्यांचे संशोधन सुरू असेल. असो, अशा प्रकारे काहीतरी खरडणे व नंतर सारवासारव करण्याची वेळ येणे हे काँग्रेसी समर्थकांना नवीन नाही.

भरतने जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे हवी असतील तर तो स्वतः पाठपुरावा करेल.

तेव्हढं सुषमा स्वराज यांच्याबद्धलच्या तुमच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आठवणीने द्या. मी पाठपुरावा करत राहीन.

तुमच्या मते भाजपच्या चुका काढणारे सगळे फक्त काँग्रेसी समर्थक असतात का ? किंवा कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्तेच असतात का ?
सामान्य नागरिकांना मतं नसतात का ?
तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात ?

Pages