पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या लोकसत्ताच्या अग्रलेखात , भाजपा नेते व समर्थकांबद्दल जी भाषा वापरण्यात आलेय ती पाहाता तो लेख एकाद्या निष्ठावान कॉंग्रेसी भाटांने लिहिलाय हे लगेच ओळखू येते.>>>>>भक्तांसारखं गेमचा व्हिडिओ सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ म्हणून पसरवण्याचा कसब नाही आमच्याकडे

और एक जोक सुनाव मियां >> तुमच्या पोस्ट्स म्हणजे एकपेक्शा एक वरचढ विनोद असतात हेला भाउ. मी पामर तुम्हाला काय जोक सान्गणार?

लोकसत्ता च्या लेखात the हिंदूचा चा उल्लेख आहे .
The Hindu नी जे राफेल विषयी आर्टिकल लिहल आहे ते जे कागद चोरीला गेले आहेत त्या कागदपत्रात जी माहिती आहे त्या वर आधारित आहे .
चोरीची complaint सरकारनी केली आहे .
बघुया कागदपत्र चोर कोण आहे

सुदर्शन टीव्हीला पाकिस्तान घाबरला अशी हेडलाईन खुद्द सुदर्शन न्यूज ने दिली आहे.
ते कोण चव्हाणके नावाचा प्राणी दिसायलाच किती भयंकर आहे. त्याला पाहूनच इम्रानखानला धडकी भरली असेल.

हिंदूचा उल्लेख? तो अख्खा अग्रलेखच त्या कंप्लेंट मुळे लिहिलाय हो. माहिती चोरून प्रसिद्ध करणारे लोक भलंच काम करतात. आणि को णत्याही सरकारला ते आवडत नाहीत. मग तो विकिलीक्स वाला असू दे नाहीतर एन राम.

बरं, ती कागदपत्र प्रसिद्ध करून इतके दिवस झाले. संरक्षणमं त्र्यांनी लगेचच त्याला उत्तर म्हणून पर्रिकरांची टिप्पण्णीही प्रकाशित करवली होती. आता इतक्या दिवसांनी कायदेशीर कारवाई करायचा विचार आला? मुहूर्त मिळत नाहीए का? ली याचा पण निवडणुकीशी संबंध आहे?
कोर्टात काय झालं ते राफेलच्या धाग्यावर लिहिलंय. वाचा हवं तर.

ऐक तर पुरावे चोरीचे आणि संपादक मालक पुरोगामी विचारसरणीचे.
काय योगायोग आहे

सुदर्शन टीव्हीला पाकिस्तान घाबरला अशी हेडलाईन खुद्द सुदर्शन न्यूज ने दिली आहे.
ते कोण चव्हाणके नावाचा प्राणी दिसायलाच किती भयंकर आहे. त्याला पाहूनच इम्रानखानला धडकी भरली असेल.

सुदर्शन टीव्ही ला महाराष्ट्रात कोण्ही ओळखत नाही .

अरे व्वा, तुम्ही म्हणजे आख्खा महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे आख्खा भारत. मोदींच्या पुढचे प्रकरण दिसतेय.
आता नेहमीच्या आयडीने येऊन शुद्धीत लिहा ही विनंती.

https://youtu.be/wQ35BD_eY0U
या व्हिडियोच्या शेवटच्या क्षणांची चित्रे पहा. सर्वांत पुढल्या रांगेत सु.स्वामींच्या शेजारी कोण बसलंय?

माझ्या प्रतिसाद मुळे कोण्ही दुखावले आसेल तर मी सर्वांची क्षमा मागतो .
देश योग्य दिशेनी जायला हवं आस वाटतं आसेल तर जनतेला योग्य रस्ता मिळाला पाहिजे .
हा नालाएक आहे म्हणून मी चांगला आहे आसा प्रचार पहिला सोडला पाहिजे .
हिंदू वाईट ,मुस्लिम वाईट ,पुरोगामी वाईट .
Bjp वाईट ,काँग्रेस वाईट आशा प्रकारच्या पोस्ट आणि मत जनतेत ऐकमतं होवून देत नाही .
मीडिया सर्वसामान्य लोकांची बाजू घेते हा गैरसमज पहिला काढून टाका .
कोनी मोकळं नाही ह्या साठी .
जनतेत aikmat करून आदर्श सरकार हवे आसेल तर ऐकनेका विषयी गैरसमज निर्माण न होणाऱ्या कमेंट द्या .
हेच मला प्रामाणिक पने वाटते

असं होय ?
म्हणून अतिरेक्यांचा आकडा का महत्वाचा ? त्यामुळे मोदी येतील ही भीती वाटते का असे म्हणत होता होय ? बरं
आणि २५० कुठून आले या प्रश्नाला ही बगल. मला केशव उपाध्येंचा प्रकार वाटत होता. पण तुम्ही तर ते हे निघालात..

मनाला न पटणारे युक्तिवाद सुधा वाचायची तयारी आसावी लागते .

अगदी बरो बर. . म्हणून माझाही युक्तीवाद वाचा व ऐका ..65 71 चे युद्ध एकाचे आणि इतर.युद्धे इतरांचे -- असे बोलणार्या देशद्रोही लोकाचे भर चौकात तिआनमेन केले पाहिजे असे माझे मत आहे । तुमको कुछ प्राब्लेम ??

.

पावटे
पहिले हे तुम्ही सांगा युद्ध सरकार विरूद्ध आसात की देशाविरुद्ध

,,

बाकी तुम्ही स्वतःला खूपच त्रास करून घेत आहात

हहेही अगदी बरो बर . तुमच्या सारखे देशद्रोही लोक बघितले की मला फार त्रास होतो . बीपी वाढते। चक्कर येतात .. छातीत दुखते

माझे काहिही बरेवा ईट झाल्यास या देशद्रौही लोकाना जबाब दार धरावे हे इथे लिहून ठेवतो याची कृपया नोंद घ्यावी ।।

आसात नावाचा कोणताही देश नाही. भारतात एक आसाम नावाचे राज्य आहे. त्या राज्याविरुद्ध तुमचे युद्ध का चालू आहे ?

उन्माद आहे हा

पावटे

ही काय भान गड आहे ?? एकदा दुर्लक्ष केले .. परत पावटे ? माझे.नाव पावट्या आहे .. निवडनुकी आल्यात जरा सन्मानाने वागवायला शिका . .. नावांसकट व नावे बदलून फायली गायब करता काय रे भामट्यानो ?? काय एकेक छंद चायला !!

आत्तच सकाळ्मधे वाचले की भारताने हवाई हल्ले केलेल्या बालाकोट येथील मदरशाला भेट देण्यास पत्रकारांना आज पाकिस्तानने रोखले. गेल्या नऊ दिवसांतील ही तिसरी वेळ आहे. जर भारताच्या विमानानी बॉम्ब झाडाझुडपावर टाकले असे सिद्धु व इतर अनेक असे म्हणत आहेत तर पाकिस्तानने असे का बरे असे केले असेल. याचे कारण एक आणि ते म्हणजे तो camp पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे त्यावरून कितीजण मेले याची कल्पना येऊ शकत आणि ते त्यान्च्या गुप्तचर सन्स्थेला नको आहे.

काल नागपुरात गडकरींनी सांगितले की फिलिपिन्स मधे उडती डबल डेकर बस आहे. माझ्या खात्याने नुकताच या बससाठी सामंजस्य करार केला आहे. लवकरच उत्तराखंड मधे ही बस सुरू करू, यावर गडकरींना नेटीझन्सनी ट्रोल केल्यावर भक्तांनी गडकरींच्या समर्थनार्थ हा व्हिडीओ जारी करून सर्वांची तोंडं बंद केली. व्हिडीओ नक्की बघा. भक्त अच्छे होते है..

https://www.youtube.com/watch?v=w9x1BN9wSXY&fbclid=IwAR2UqVZp8Oq1IL_ZAyh...

भक्तांच्या रडकथेकडे दुर्लक्ष करायचे ठरवले आहे. रॉयटर ही संस्था स्वतः जाऊन आली आहे. अल जझिरा आणि बीबीसी या अन्य दोन जगविख्यात संस्थाही सोबत होत्या. भारताच्या वृत्तात उद्ध्वस्त झालेली इमारत डोंगरावर त्यांना शाबूत दिसली. भारतात भक्तांनी आधीचे आणि नंतरचे फोटोही जारी केले आहेत. त्याबाबतची लिंकही मी वर दिलेली आहे. नंतरचा म्हणून जो फोटो दिला आहे तो वीस वर्षे जुना आहे. बांधकाम चालू असतानाचा आहे. हे फोटो झूम अर्थच्या साईटवरून घेतले आहेत. या साईटच्या संस्थापकांनी आमचे फोटोज अपडेट नसतात असा खुलासा केला आहे. त्यामुळेच दोन्ही फोटोच्या रंगात फरक आहे.

बीबीसी आणि रॉय्टरचे दोन्ही वृत्तांत दिले आहेत.
ज्या संस्थांचा हवाला देऊन भारतातल्या वर्तमानपत्रांमध्ये " आता वर जाऊ दिले नाही" अशी रड ठोकली जातेय, त्या संस्थांनी तिथे उद्धवस्त बांधकाम असल्याची कुठलीही पुष्टी केलेली नाही. उलट बांधकाम जैसे थे आहेत असे निर्वाळे दिलेले आहेत. रॉयटर या संस्थेने सॅटेलाईट इमेजेस प्रसिद्ध करून असा निर्वाळा दिलेला आहे. या वृत्तात छताला छिद्र पाडून बाँब आत घुसल्याची कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत अशी ग्वाही रॉय्टरने दिलेली आहे. वर कुठेतरी लिंक आहे.

तर मग याच संस्थांना जाऊ दिले नाही असे भोकाड पसरून या संस्थांच्या नावे काय खपवायचे आहे ?

रॉयटर ही संस्था स्वतः जाऊन आली आहे. अल जझिरा आणि बीबीसी या अन्य दोन जगविख्यात संस्थाही सोबत होत्या. भारताच्या वृत्तात उद्ध्वस्त झालेली इमारत डोंगरावर त्यांना शाबूत दिसली.

भारतीय वायू दलाची आधुनिक फायटर विमान हल्ला करण्यासाठी झेपावली ( ह्याला कोण्ही खोटं ठरवलं नाही)
Pok मध्ये जावून त्यांनी टार्गेट वर जावून बॉम्ब वर्षाव केला तो पण अत्यंत आधुनिक समजल्या जाणाऱ्या यंत्रणा वापरून (हे सुधा कोण्ही खोटं ठरवलं नाही )

मग ते बॉम्ब गेले कुठे?
टार्गेट चुकलं की आजुन काय
तुमचं काय मत आहे ह्या विषयी
ह्यातून परत तीन शक्यता निर्माण होतात विमानात ज्या आधुनिक यंत्रणा आहे ती भरवस्या ची नाही .
ज्या pilot ni सहभाग घेतला तो कुठे तर कमी पडला .
की काहीच घडल नाही सरकार फक्त दावा करतेय नक्की तुमचं आक्षेप कशावर आहे

ओ राजेश छाप १८८
पुन्हा पुन्हा काय लावलंय रामाची सीता कोण ते ? मुद्दाम करता का वेड्याचं सोंग घेऊन ?की खरोखर ठार वेडे आहात ?

माझे मत विचारणारे तुम्ही कोण ? आणि मत देणारा मी कोण ? तुम्ही जाऊन आलात की मी जाऊन आलोय ? रॊयटर आणि बीबीसी जाऊन आलेत. बॊंब कुठे गेलेत हे अमित शहा ला विचारा. त्याने सांगितलेय २५० मारलेत. त्याला विचारा कुठून मिळाली माहिती. हवाई दलाने नाकारले आहे वृत्त. आकडे कुठून आले याला बगल मारत नेहमी ...... भाषण ठोकता आणि .......... सारखे प्रश्न विचारता. नशीब तुम्ही समोरासमोर नाहीत ते !

पल्लवी जोशी ताईंच्या ग्रहण मालिकेतल्यासारखी अनेक समांतर विश्व असतील.
एकात तीनशे अतिरेकी मेले.
एकात काय झाले ते माहीत नाही.
एकात इमारत शाबूत, फक्त आतले अतिरेकी मेले.
एकात तीनशे फोन मेले.

Pages