२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम

Submitted by टवणे सर on 10 December, 2018 - 17:21

२०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून बघितल्या जाणार्‍या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज ११ डिसें (भाप्रवे) रोजी जाहीर होतील. त्याबद्दल चर्चा (लाथाळी) करण्यासाठी उघडलेला हा धागा.

माझा होरा:
राजस्थान, मप्र, छत्तीसगढ -काँग्रेस (मध्यप्रदेशात लहान पक्षांबरोबर युती करून, इतर दोन ठिकाणी बहुमताने)
तेलंगणा - टीआरएस
मिझोरामः माहिती नाही. सध्या तिकडे भाजपाचे वारे असल्याने कुठल्यातरी आघाडीत भाजपा असेलच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मान्य, राहुल गांधी नालायक आहेत. एकदम मान्य....
पण आता राहुल गांधी सुद्धा चालतील ह्या स्टेज ला लोक आलेत. यावर एक फर्मास लावणी होऊ द्या. कविराज..

हेला भाज्प विरोधात लाट असताना मध्यप्रदेश्मधे कडवी लधत मिलाली आहे. जनमत अगदीच विरोधात नाहिये तिथे. ह्याचे श्रेय त्यांना नको का द्यायल?.

लोकसभेमधे जाण्यासाठी कोन्गेर्सला भजपा पेक्शा जास्त त्रास त्यांच्यातुन बाहेर पडलेल्या पुर्व कोन्गेसी नेत्यांचा होणार आहे. भाजपाची vote bank loyal /fixed असते. त्यामुळे त्यांची एका मर्यादेबाहेर पडझड होत नाही. २००९ मधे सुध्दा त्यंचा performance decent होता.हे भाग्य कोन्गेसकडे नाही.in many states congress shares its vote bank with allies, and they make sure congress does not cross certain number . कारण congress ला मदत केली तर त्यांच्या राजकिय अस्तित्वाला सुरुंग लागतो.हा पेच congress कसा सोडवते ह्यावर त्यांची वाटचाल अवलंबुन आहे.

राजस्थान-मध्यप्रदेश-छत्तिसगढ इथे भाजपलाच नव्हे तर प्रत्येक भक्ताला काँग्रेसकडुन सणसणीत चपराक बसली आहे.
ज्याला पप्पु-पप्पु म्हणुन हिणवलं त्याचंच व्यक्तिमत्व या निकालाने सोन्याहुन चमकदार झालं.
येत्या ६ महिन्यात वारे नक्किच काँग्रेसच्या बाजुने फिरतील आणि सध्याचे प्रधानसेवक पुन्हा ट्रेन मधे चाय-चाय करत फिरताना दिसतील अशा आशयाच्या चर्चा आज आमच्या ऑफिस मधे सुरु आहेत.. Lol Lol Lol

अगदी काल पर्वापर्यंत मोदिंना पाठिंबा देणारे लोक आज त्यांची टर उडवत आहेत हे पाहुन आश्चर्य वाटाले. Uhoh

ज्याला पप्पु-पप्पु म्हणुन हिणवलं त्याचंच व्यक्तिमत्व या निकालाने सोन्याहुन चमकदार झालं.
<<
Lol
--
खर आहे.
आता 'एक साईड से आलू घुसाव, और दुसरे साईड से सोना निकालो' या मशीनचे पुढील वर्जन 'एक साईड से पप्पू घुसाव, और दुसरे साईड से सोना निकालो' ह्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसी पप्पू गांधीने काढले आहे.

अरे कोणीतरी माझं कौतुक करा निकाल अचूक वर्तवल्याबद्दल Happy

छत्तीसगढ क्लीन स्वीप. काँग्रेस अभिनंदन.
राजस्थान - मला १२०+ काँग्रेसला मिळतील असे वाटत होते. अजून तरी काँग्रेस १००च्या आसपास आहे, १९९च्या विधानसभेत. काँग्रेसचे अभिनंदन.
मध्यप्रदेश - पुन्हा माझ्या अपेक्षेपेक्षा चुरशीची लढत झालेली दिसत आहे.
मिझोरामः इशान्य राज्यातले काँग्रेसचे आता एकही सरकार नाही.

काँग्रेस की सरकार आ रही है। पाँच राज्यों के बेरोजगारो मे खुशी की लहर। कल सुबह तक सबको जोईनिंग लेटर मिल जाएगा।
अब कल से हर किसान ऑडी में घूमेगा। हर बेरोजगार को सरकारी नौकरी मिल जाएगी।
-whatsapp fwd

ही राज्येच नव्हे तर सगळा देशच तुमच्यासारख्या नेत्यांना deserve करतो

हे आज सकाळपासून सतरा वेळा तरी ऐकले .. जनतेला अक्कलच नाही म्हणे . म्हणजे आता २०१४ साली साक्षर होती नि आता अचानक निरक्षर झाली वगैरे ?? थोडा विचार करून तरी लिहा .२०१४ साली देश कोणाला डिजर्व करीत होता हा प्रश्न विचारला जाईल तर मग त्याचं काय उत्तर द्यायचं हाही प्रश्न तुम्हाला पडत नाही ! Sad
आणि हे अजून ४-५ राज्यांपुरतेच आहे .. अजून फारसे काही बिघडले नाही .लग्गेच आपले नेहेमीपरमाणे देश आणि सैन्य आणी विश्व पातळीला पोचायची घाई. हे असे सारखे सारखे छप्पन इंची बोलत राहू नये. पिक्सेलांचा देश आहे हा. बारीकसारीक मोजमापे आपल्यासारख्यांच्या देशात फार महत्वाची असतात . सारखे देश देश करता म्हणून सांगितले ..

छ.ग., राजस्थान व म.प्र. मधे निवडणुन आल्यास, शेतकर्‍यांची कर्जे दहा दिवसात माफ करु असे आश्वासन पप्पू गांधीने दिले आहे. त्याचे पहिले आश्वासन किती दिवसात पुर्ण करतो ते आता पाहायचेय.

फॉर अ चेंज वाचतोय फक्त. अन मजा येतेय वाचायला.

अनिरुद्ध नावाचा फुटका ढोल पुन्हापुन्हा आलूसोना वाल्या मोदीच्या वाक्याला राहूल यांच्या तोंडी खपवून नेहेमीप्रमाणे दात विचकटतो आहे. याची आजकाल कीवही यायची बंद झाली आहे.

फेकी यांना माझ्यातर्फे एक (छोटी) बर्नॉल ट्यूब आहेरादाखल.

आज नेहमीप्रमाणेच त्यांनी नेहमीच्या शांततेत आणि शिस्तीत निकाल स्विकारला. कुठे ढोल नाहीत, ताशे नाहीत, गुलाल नाहीत कि मिठायांच्या ऑर्डरी नाहीत. कौतुकास्पद !

"राहुल गांधी पंतप्रधान व्हावा - नि तो ट्रंपला भेटावा." - भारतात राईट विंग (भाजपा) ला सपोर्ट करणारी अमेरिकेतली मंडळी, अमेरिकेतल्या राईट विंग (रिपब्लिकन्स) ना विरोध करताना बघून मला नेहेमीच गंमत वाटते. ह्याचं एक कारण, भारतात मेजॉरिटीत असणारी मंडळी अमेरिकेत मायनॉरिटीत असतात हे असावं का असा मला एक जेन्युइन प्रश्न आहे. तसं असेल, तर हे सापेक्ष राजकारण आहे.

वर मेरीच गिनो यांनी टाकलेल्या सर्व ट्विटशी सहमत. (शेवटचा सोडून)

छ.ग., राजस्थान व म.प्र. मधील जनतेने, पाकिस्तान परस्त व भ्रष्टाचारी व घोटाळेबाज कॉंग्रेसींच्या हाती परत सत्ता देऊन, आजच्या घडीला प्रगत राज्य असणार्‍या ह्या तीनही राज्यांना पुन्हा बिमारु राज्य बनवण्याचे दिशेला नेले आहे.
--

सर्व दत्तात्रय गोत्रियांचे अभिनंदन Lol
Submitted by बेफ़िकीर on 11 December, 2018 - 20:19
<<
ह्या राहुल गांधीचे आजोबा- पारसी की मुसलमान(?) व आजी- हिंदू की पारसी की मुसलमान(?)
वडिल- पारसी की हिंदू की मुसलमान(?) व आई- खिश्चन, मग या राहुल गांधीचे गोत्र दत्तात्रय कसे काय? ह्या प्रश्नाचा खुलासा कोणी कॉंग्रेसी समर्थक करु शकतो काय ?

अनिरुद्ध, तुमचे नेते विरोधी पक्षाच्या संदर्भात पाकिस्तानचं नाव घेऊन अनेकदा तोंडावर आपटले आहेत.
शाली आणि साडीची देवघेव करणाऱ्या आणि बिन बुलाए वाढदिवस आणि लग्नाला जाणाऱ्या माणसाचे तुम्ही भक्त आहात एवढं लक्षात ठेवा.

राहुल गांधी चे गोत्र हा त्याचा पर्सनल मामला आहे,
त्यामुळे त्याची ऊठाठेव कोणी करायची गरज नाही.

मोदींचे वैवाहिक स्टेट्स हा सुद्धा त्यांचा वैयक्तिक मामला आहे, मात्र निवडणूक विवरण पत्रात त्याचा उल्लेख झाल्याने, आणि या पूर्वी खोटी माहिती दिलेली असल्याचे उघड झाल्याने तो चर्चेत आला,
वाजपेयींचे वैयक्तिक जीवन बऱ्यापैकी स्फोटक होते, पण कोणी त्याचा उल्लेख करत नाही.
कोणत्याही नेत्यांचे पर्सनल आयुष्य घेऊन त्याच्या सार्वजनिक आयुष्याचे मूल्यमापन करायचे घृणास्पद काम केवळ भाजपेयीं लोकच करतात.

तसेच
अमुक एक नेता ,अमुक गोत्राचा/जातीचा/धर्माचा आहे म्हणून त्याला मत द्या/देऊ नका हा शुद्ध मूर्खपणा आहे,

त्यामुळे राहुल गांधींच्या गोत्राने मला तरी फरक पडत नाही,
ज्यांना पडतो ते मनाने अजून इस पूर्व काळात वावरत आहेत

सर्व प्रथम , मामाजींचे अभिनंदन,
व्यापम, नोटबंदी , GST या सगळ्याचे घाव झेलूनही त्यांनी आपला सपोर्ट अबाधित ठेवला,

नंतर राहुल गांधी आणि सिंदियांचे अभिनंदन,
हिंदुत्वाच्या कळपात 10 वर्षे गुरफटून बसलेल्या हार्ड कोअर धर्मनिष्ठ जनतेला, धर्मापेक्षा दुसरे काही महत्त्वाचे आहे हे दाखवून त्यांना आपल्या बाजूला वळऊन घेण्यात यशस्वी झाला बद्दल

Pages