माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते आजच्या कोर्टाच्या निकालाचा 'विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही: सर्वोच्च न्यायालय' काही परिणाम आता राधिका आणि गॅरी च्या केसवर? केड्याला पाणी घालायला अजून स्कोप दिला बघा न्यायालयाने! >>>> तिकडे कलर्स हिन्दीवर 'सिलसिला बदलते रिश्तो का' मालिकेला अश्याच शिव्या पडतायत लोकान्कडून. Proud दोघान्चा विषयच एकच आहे- उथळ , ओढूनताणून निर्माण केलेले विवाहबाह्य संबंध.

तसंही या केसमध्ये तो कायदा लागू नव्हता. विवाहित स्त्रीशी कोणी संबंध ठेवले तर तिच्या नवऱ्याला तक्रार करता येईल असा तो नियम होता.
विवाहित पुरुषाने दुसऱ्या अविवाहित स्त्रीसोबत शेण खाल्लं तरी त्याच्या पत्नीला काहीही करता येणार नव्हतं.
(घटस्फोट मागण्यापलीकडे)
विवाहित स्त्री ही तिच्या नवऱ्याची स़ंपत्ती या ग्रुहितकावर तो कायदा आधारित आहे.

काय तो... शनाया रस्त्याच्या कडेला झाडावर लपुन केड्या गुरुचा फोन ऐकते तो फनी सिन.
काहीही कारण नव्हते हा सीन घालाय्च. १० मिन्टे खाल्ली त्यात. . बेक्कार!

अगदी.....ते तिघंही अगदी आमनेसामेने दिसत होते...... किती बोअर प्लॉट...!!! निव्वाळ पाणी घालू शॉट...!!!

आणि गुरवाने तिला हॉटेल मधे सोडून केड्याला परत रोड्वर बोलाविले ना?
मग पुन्हा दोघं कसे काय हॉटेल मधे? आणि रघू बराच स्मार्ट झालाय हल्ली....
केड्याला रघू दिसूनही त्याने इग्नोअर केले? तो तर ओळखतो की रघ्याला.....

सगळे जातिवंत "ढ" आहेत. गॅरॅ आणि राधिका दोघेही त्यांच्यामते मास्टरप्लॅन आखतायत. पण साध्या-साध्या चुकाही टाळणे महत्वाचे वाटत नाही त्यांना. गॅरॅ कुठेही त्या केड्यासोबत चर्चा करत बसतो सगळी प्राॅपर्टी हडपण्याबद्दल..ते कुणी ऐकतंय का वगैरे असले फालतू विचार त्याच्या मनात येत नाहीत. तिकडे राधिका बेशुद्ध असल्याचं नाटक करतेय...हाॅस्पिटलचा सगळा स्टाफ त्यांच्या या हरहुन्नरी खेळात सहभागी झाला का? आणि तो अथर्व घरी गप्प बसू शकतो आईला भेटून आल्यावर? तो कधीच पचकणार नाही बाबाजवळ?
केड्याला आता कंटाळा आलेला आहे लिहून लिहून...त्यामुळे येणार्या जाणार्या कुणालाही एकेक सीन लिहायला लावत असेल. त्यामुळे सीन्समधे सुसंगती किंवा लाॅजिक असणे अशक्य आहे.

अथर्व चं काय? काल तर सगळी जनता आलेली राधाक्काला बघायला हॉस्पिटलात.
कुणाकडुनही कळणार नाही का गॅरी आणि श्न्याला?
राधाक्काची वैनीपण आलेली. एवढी गुप्तता! एवढी गुप्तता!

हाॅस्पिटलचा सगळा स्टाफ त्यांच्या या हरहुन्नरी खेळात सहभागी झाला का? >>>>>> राधिकाने हाॅस्पिटलमध्ये सुद्दा आपली दुखभरी कहाणी सान्गून स्टाफला रडवल असेल , म्हणून झाले असतील सहभागी. Lol

इतक सगळ होऊन, गुरुच खर रुप कळून सुद्दा राधिकाच 'हयान्ना , हयान्ना' सुरु आहेच. डोक्यात जात हे! Angry

"हयान्ना सुबुद्धी आली की किती बरे होईल" Disgusting !!! Sad

राधाक्काला गॅरीसारखाच नव्हे तर गॅरीच हवाय आता त्याला आपण काय करणार?
काही केल्या हि बाई आपल्याला सोडत नाही तर त्याने तरी काय करावे?

निव्वळ नवर्‍याला धडा शिकवण्यासाठी एक धडधाकट (शुद्धिवर असलेली बाई) एखाद्या हॉस्पिटलच्या आय सी यु मधली जागा अशी अडवू शकते? आणि ते ही परभारे? हॉस्पिटल मॅनेजमेंटचा यात काहिच रोल नाही? Uhoh
शनाया केड्याचा पाठलाग का करतेय? गॅरी चा प्लॅन तिला जाऊन राधिका ला सांगायचा आहे का?
गुरू शेवटी मूळपदावर आलाच म्हणायचा. शी! किती घाण सिरियल. मी गेले कित्येक दिवस पाहिली नव्हती आज पाहिली (चुकून)

मेन म्हणजे...हल्ली गॅरी आणि शनायातही काडीमात्र प्रेम राहीलेलं नाही...राधिका आणि गुरुतही नाही...मग ही सिरीयल चालतेय कशावर?
सगळे आपापसात भांडताहेत.... कट कारस्थाने करताहेत........ अरे काय चाल्लय काय?
यादवी यालाच म्हणत असावेत....!!

ही सिरियल आता खूपच कंटाळवाणी झाली आहे. खरंतर शनाया बदलायच्या आधीच संपायला हवी होती, आता उगाच ओढून ताणून वाटतेय. त्यामुळे अर्धा तास बाकी चॅनलला भटकून साडेआठला परत झी मराठी.

ते घटस्फोटाचं काय झालं यांच्या सवडीने कोर्टाच्या तारखा पडतात का ?जेव्हा मनांत आलं तेव्हा जज ला बोलावून घ्यायचे आणि रडगाणे गायचे??
का तो या मालिकेचा दाढीवाला लेखक किड्या आपण या मालिकेत घटस्फोटाचा ट्रॅक टाकलाय हेच गर्द च्या नशेत विसरलाय ?

बकुळा मावशी खरचं ओव्हर अ‍ॅक्टीन्ग ची दूकान आहे .
राधिकाची सहान्भूती जमा करण्याची सवय काय जात नाही .
आत त्या आयसीयु मधल्या सिस्टरला पण आपल्या कंपूत घेतलं
समीधाच्या मुलीचं बारसं झालं हां -- सानवी नाव ठेवलं .
रेवती ईतकी म्हातारी का दिसायला लागली ? तिची साडी मात्र नेहमीप्रमाणे मस्त होती.
नानी आणि महाजनी काकूनी फार मेकप केला होता .
गुरुचे बाबा आवडतात, एक्दम मस्त माणूस .

बारशाला राधात्या आलेल्या . नाव ठेवायला. त्यान्चीही साडी छान होती.
आयसीयु मधून एकदम साडी वगैरे नेसुन निघाल्या - सिस्टरने मदत केली तयारी करायला आणि जेनी न्यायला आली होती.
मग कार्यक्रम आटपून परत जाउन हॉस्पिटल मध्ये झोपणार .
गुलमोहरमध्ये ही ३-४ कुटुम्बच रहातात वाटतं . बाकी कोणी राधिकाला बघितलं नाही , कोणी गुरुला सांगणार नाही.

नविन शनाया ला पाहिलं - ईतके डोळे मोठे मोठे करून काय बोलते ती.
जुन्या शनायापेक्शा जास्त भैताड दिसते ती. ती निदान गोड तरी दिसायची बरेच्यदा.

सानवी नाव ठेवलं . >>>>> छान नाव आहे Happy

राधिकाची सहान्भूती जमा करण्याची सवय काय जात नाही .
आत त्या आयसीयु मधल्या सिस्टरला पण आपल्या कंपूत घेतलं >>>>>> नैतर काय!

गुरुचे बाबा आवडतात, एक्दम मस्त माणूस . >>>>>> +++++१११११११

बाकी कोणी राधिकाला बघितलं नाही , कोणी गुरुला सांगणार नाही. >>>> गुरुला कळल तर कळू दे. त्यात काय एवढ घाबरण्यासारख? गुरुनाथ कित्तीदा विश्वासघात करतो तिचा निर्लज्जपणे, तिने एकदाच केला हया भैताडाचा विश्वासघात तर काय बिघडल? जशास तसे!

जुन्या शनायापेक्शा जास्त भैताड दिसते ती. ती निदान गोड तरी दिसायची बरेच्यदा. >>>> जुनी शनाया कधीच भैताड दिसली नाहीये. ती गोडच दिसायची प्रत्येक सिन मध्ये. खरतर तीच शोभते शनाया म्हणून. नव्या शनायाला तिची सर येणार नाही.

गुरुला कळल तर कळू दे. त्यात काय एवढ घाबरण्यासारख? >>>> मी कशाला घाबरतेय !!!! . Happy त्या गुरू ला कळलं पण शेवटी manage केलचं

मी कशाला घाबरतेय !!!! >>>> अहो स्वस्ति, मी राधिकाने कशाला घाबराव, अस म्हणत होते.

अरे- अजून तुम्ही शिरेल बघताय काय.. अभिनंदन ! >>>>> नाही बघत. इकडच्या प्रतिकिया वाचून प्रतिसाद देते.

मी कशाला घाबरतेय !!!! >>>> अहो स्वस्ति, मी राधिकाने कशाला घाबराव, अस म्हणत होते. >>>> सुलु कळलं .
मी मस्करी केली ओ Happy

Lol
रोज अपेक्षाभंग झाला तरी आमची खोड काही मोडत नाही.
केड्याच्या मुर्खपणाची मजल पार सातासमुद्रापार गेली आणि यापुढे अजून काही होणे नाही असे वाटते न वाटते तोच केड्या अजून नवीन किडे करतो.
आता सरप्राइझ रिव्हीलींगचा उच्च कोटीचा थरारक प्लाॅट चालू आहे. तरी माती खाणेच नशीबी आहे...सगळ्यांच्याच.

बारशानंतर नुसतंच पाण्याला फोडणी देणं चाललं होतं..उद्या काहीतरी घडेल.
पण राधिकाने ते कागद फाडले कशाला?
पोलिसात देता आलं असतं.

<<काल शनाया पिऊन जरा सा झूमलू मैं वर नाचली रस्त्यावर<< हो ना हे काहितरीच फुळकावणी सुरुये.

ज्या आईला गुरु किती नालायक आहे हे दाखवण्यासाठी राधाक्का कोमातुन बाहेर आल्यावरही नाटक करत होती, ....त्यात इत्के एपिसोड्स खाल्ले. त्या आईसाहेबाना गुरु बाळ 'मी राधिकाच्या कम्पनीसाठीच करत होतो हे सर्व आई, " अस म्हणुन एका क्षणात गुन्डाळुन ठेवीन असे दिसतेय.

अन आता काय राधाक्का शनायाबरोबर हातमिळवणी करणार म्हणे.

बघतोय.. बघतोय! आता येणारा एपिसोड तरी शेवटचा असेल ... या अपेक्षेने बघतोय >>> ताई गरज नाही हो , नविन सिरीयल प्रोमो दिसला आणि ती त्या जागी असेल तर आणि तरंच ह्या मालिकेचा शेवटचा एपिसोड येईल नाहीतर अनंताकडे वाटचाल आहे बघा याची Wink .

Pages