बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किश्याने रेशमच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न केला कालच्या एपिसोडमध्ये. तिने खरे तर याबद्दल त्याला बोलायला हवे होते.

रेशम किती वेळा डोक्यात खाजवत असते... तोंडात बोट पण घालते.... घाण वाटत ते पहायला... काल पैसे चोरताना किती खाजवत होती डोक्यात... ईईईईई... या लोकांनी स्वतःच्या group मध्ये पहिलवान असताना नको तिथे कितीतरी वेळा शक्तीचा वापर केला आहे तरी मेघा अन group sportingly खेळले.... काल सईने रेशमला फक्त धरून ठेवल तर किती भडकली... सईचं बरोबर होते अस मी म्हणत नाही पण जे resham अन group नेहमीच वागले ते सईने एकदाच केल तर किती बोलली... हा खरंतर रडीचा डावच होता... शिवाय रे सईला आवाजावरून बोलत होती.. पण सई पेक्षा तिचाच सूर भांडणाचा वाटत होता... पण आपण कितीही दादागिरी केली तरी मेघा अन सई समोर आपला निभाव लागणार नाही हेही ओळखलं तिने... आणि मग बसली शांत...

मी कुठल्याही grp मध्ये नाही. पण अजूनही पुष्कर, स्मिता आवडतात आणि मेघा आवडायला लागलीय एकंदरीत तिचा वावर बघून.

पुष्कर जास्त सईचं ऐकत असतो ते मात्र आवडत नाही, मेघाबद्दल उगाच मागे बोलतो ते आवडत नाही. स्मिता तिच्या grp चं ऐकत असते ते आवडत नाही. दोघंही ठाम मते ठेवत नाहीत.

तो नवीन फुल टू डोक्यात गेलाय. कॅप्टन म्हणून आस्तादने झापायला हवं होतं त्याला. तसेच आऊनी bb कडे तक्रार करायला हवी होती आणि थत्ते ना कसं अरे ला कारे करायच्या आवाज चढवून तसं करायला हवं होतं.

>>रेशमही झोपते कि मुलांच्या खोलीत खूप आधिपासून. सद्ध्या बेड शेअर करत नाहीये. तोही केला असता पण बाकिचे तिला ताई म्हणतात ना Happy
प्रयत्न चांगला होता.. पण ऊत्तर चुकलं. Happy प्रश्ण पुष्कर बद्दल आहे, रेशम बद्दल नव्हे. रेशम बागेत झोपेना नाहीतर ईतर कुठे. ती कुठे का झोपली याचे ऊत्तर जगजाहीर झालेले आहे. त्यात काहीच नविन नाही. पण मुलांच्या खोलीत राजेश गेल्यापासून बेड ऊपलब्ध होताच.. आताही आहे. आता रेशम ने जे केलं तेच पुष्कर ने करावे अशी अपेक्षा असेल तर सगळच मुसळ केरात. Proud
तेव्हा मूळ प्रश्ण अनुत्तरीत राहिला.. असो. बाहेर आला की त्यालाच विचारेन.

अन ती रेशम तो चौगुले काहि सांगत होता तेव्हा किती स्पर्श करुन सांगत होता.. हिला इतकंहि कळत न्हवता का? त्यावेळी तिच्याशी त्याचं बोलणं मला नाहि आवडलं. >>>> अगदी अगदी तो तिचा हात खेचत होता तिच्याशी बोलताना.

पण सुशांत ची नेम्प्लेट काढली या अर्थी तो आता येणार नाही हे मेघा,सई न पुष्कर च्या लगेच लक्षात आलं असेल. >>> नाही, मेघाच्या सुद्दा लक्षात आले नाही. ती म्हणत होती एक आठवडयात बरा होऊन परत येईल म्हणून.

आस्तादचा फोटो खरच क्यूट आहे. Wink

सई arrogant आहे फार. मेघासारखी समजूतदार नाही. मेघा साथ देतेय म्हणून सईचं चाललंय नाहीतर खरं नव्हतं.

रेशमपण आवडत नाहीच पण task मध्ये यावेळी बरीच बरी वाटली.

बाकी नंदकिशोरची मस्त जिरवली आपल्या त्रिशक्तीने (की स्त्रीशक्तीने???) चेहरा पाहण्यासारखा झाला होता त्याचा...
भारी आहेत या तिघी.. जाणूनबुजून कोणाच्या वाट्याला जात नाहीत अणि कोणी त्यांच्या वाट्याला गेले तर त्याला सोडतही नाहीत...

पण मुलांच्या खोलीत राजेश गेल्यापासून बेड ऊपलब्ध होताच.. आताही आहे. आता रेशम ने जे केलं तेच पुष्कर ने करावे अशी अपेक्षा असेल तर सगळच मुसळ केरात. Proud
तेव्हा मूळ प्रश्ण अनुत्तरीत राहिला.. असो. बाहेर आला की त्यालाच विचारेन.>>> काये प्रश्न? Proud
पुष्कर काय आधिपासून मुलींच्या खोलीत झोपत नाही. रे सारखे त्याच्याकडे तसे कारणही नाहिये. मधे मे श म्हणाल्या होत्या कि आज एक लक्षात आले का? या गटातले सगळे या रुममधे आणि त्या गटातले सगळे बाहेर आहेत. बिबॉच्या घराच्या वाटण्या झाल्यात Happy तेव्हा कळले कि तो तिकडे झोपतोय.

मामी, लगे रहो.हम तुम्हारे साथ है..
Submitted by Chaitrali on 8 June, 2018
>>>>

+११११...
मामी... काळजी नसावी..
आपल्या कॉलेज मित्रांचा ग्रुप जो जगभर पसरला आहे ( भारता सहीत) त्यांचा फुल्ल पाठींबा आहे आपल्याला..

>>मेघा साथ देतेय म्हणून सईचं चाललंय नाहीतर खरं नव्हतं.
मला तर ऊलटं वाटतय.. सई साथ देतीये म्हणून मेघा चं निभावतय.. आणि पुष्की साथ देतोय तोवर सई चं निभावतय.. तीन चिकटलेली बाळं पण एकच हृदय असं काहीसं..tough call!

जाणूनबुजून कोणाच्या वाट्याला जात नाहीत अणि कोणी त्यांच्या वाट्याला गेले तर त्याला सोडतही नाहीत...
Submitted by मोक्षू on 8 June, 2018 >>

>>>>>>>>>
+++१११

रेशमने सईच्या उश्या quality control मध्ये reject न करुन अजुन एक डाव जिंकला.... तिला आता बहुदा कळलय की टास्क जिंकण्यापेक्षा लोकांची मने जिंकणे जास्त महत्वाचे आहे!>>>> +१११ हे त्यांच्या ग्रूपधल्या दोन्ही हुशार लोकांच्या ध्यानात आलंय. आस्त्याने सेफ एरियाच्या व रेशमने कालच्या टास्कच्या शेवट फेअर वागून नक्कीच मने जिंकलीत.
सगळ्यात धोकादायक सिच्युएशनम्ध्ये सध्या भूषणच वाटतोय. किश्याची री प्रत्येक ठिकाणी ओढल्याने वाट लागू शकते त्याची.

भारता बाहेरुन जर मत द्यायचा मार्ग असता तर रे ग्रुप सगळ्यात अगोदर बाहेर गेला असता... Happy
खुपच सपोर्ट आहे मेघा सईला .. असो..

-- रेशम मुलांच्या खोलीतला बेड सोडत नाही म्हणून पुष्करला दुसरीकडे झोपावं लागतंय असंही असू शकतं ना!

-- राजेशबरोबरची भानगड करुन, सुशांत आणि आस्तादला भानगड करण्याविषयी विचारणा करुनही रेशमकडे डेग्निटी शिल्लक आहे हे ऐकून बरे वाटले. Wink

तो चौ आउंना छळत असताना त्यांच्या हेल्थसाठी त्यांना उचकवू नका हे हिरिरीनी सांगणारा मेघाचाच गृप होता ना! रेशम, आस्ताद आणि कंपनी बघ्याचीच भूमिका पार पाडत होते! हो हो ते त्यांची डिग्निटी जपत होते नाही का! बरोबर आहे.

एकच व्होट काऊंट होत असेल तर आज माझ्यावतीनी मेघाला माझं व्होट!

कालच्या भांडणार मे नंकि वर खूपच चिडली होती पण भांडतानाही ती त्याला 'किशोरदादा' असेच बोलत होती. त्याच्याकडून आदराने बोलण्याची अपेक्षा करताना ती त्याच्याशी आदराने भांडली Happy

कालच्या भांडणार मे नंकि वर खूपच चिडली होती पण भांडतानाही ती त्याला 'किशोरदादा' असेच बोलत होती. त्याच्याकडून आदराने बोलण्याची अपेक्षा करताना ती त्याच्याशी आदराने भांडली

>>>एक्झॅक्टली. सई आणि मेघा कधीही डिग्निटी सोडत नाहीत. सई देखिल नेहमी 'रेशमताई' च म्हणते. डिग्निटी कधीच सेल्फ प्रोक्लेम्ड नसते तर ती इतरांना जाणावायला हवी.

तिघीही, मे, स, शरा त्या गल्लीगुंडाशी सभ्यपणेच बोलत होत्या. सगळ्यात वाईट आस्तादचं अधःपतन बघून वाटलं, कदाचीत त्याला असम बोललेलं आवडलं नसेल पण फक्त रेशमचा दबाव असा की बिचार्‍याला बोलता आलं नसेल.

हो ना, किशोर उना ला छळत होता, लाइन क्रॉस होतेय हे दिसत होते तर आस्ताद, स्मिता, रेशम यांनी का नाही काहीच म्हटले? स्मिता तर तिथेच होती. ते अर्ग्युमेन्ट जिंको किंवा हरो, काहीतरी स्टँड घेतला असता तर त्यांची इमेज सुधारलीच असती उलट. आस्ताद तर उंदरासारखा पळाला किशोर रूम मधे येऊन "काय झाले माझ्याबद्दल बोलता का" म्हणून गुरकावल्यावर!! काही नाही काही नाही आम्ही असंच बोलतोय म्हणे. पब्लिक वोटिंग चा फंडा त्यांना कळलेला नाही हेच खरे.

रेशम ग्रुपची दादागिरी ५-६ असा सामना झालाय म्हनुन चालूय असे वाटते. आता जर त्या ग्रुपमधला एक जण गेला आणि ऋतुजा आली की बघा यांची कशी वाट लागते ते..

आरती तर तुम्ही करता योग. मी फक्त शक्यता वर्तवत आहे.
आधीच्या धाग्यावरदेखिल पहा. राजेश, रेशम, सुशांत यांची आरतीच चालू होती केवळ.
एनी वे, माझं मत मेघाला गेलं, किश्याने राडा आधी केला असता तर आउला दिलं असतं..

रेशम ग्रुपची दादागिरी ५-६ असा सामना झालाय म्हनुन चालूय असे वाटते. आता जर त्या ग्रुपमधला एक जण गेला आणि ऋतुजा आली की बघा यांची कशी वाट लागते ते..>>>>+१ १११ आत्ताच अर्धी वाट लागली आहेच.... असं झालं तर पूर्णच लागेल...

योग, तुम्ही स्वतः त्या रेशम गृपमध्ये असल्यासारखे त्यांच्या अगेन्स्ट आलेल्या पोस्ट्स अंगाला का लावून घेताय?

सई मेघा यापैकी कोणी चुकले तर आस्ताद लगेच त्यांना ओरडून बोलतो पण स्वतः च्या ग्रुप मधले चुकीचे वागले तर काहीच बोलत नाही. उदाहरणार्थ . सुशांत ने सई ला धमकी दिली होती. नंद किशोर नीट नव्हता बोलला .

तो चौ आउंना छळत असताना त्यांच्या हेल्थसाठी त्यांना उचकवू नका हे हिरिरीनी सांगणारा मेघाचाच गृप होता ना! रेशम, आस्ताद आणि कंपनी बघ्याचीच भूमिका पार पाडत होते! हो हो ते त्यांची डिग्निटी जपत होते नाही का! बरोबर आहे.

एकच व्होट काऊंट होत असेल तर आज माझ्यावतीनी मेघाला माझं व्होट!

Submitted by शुगोल on 8 June, 2018
>>>>>>>>>>

अरे, मस्त मुद्दा शुगोल... +१११
नाहीतर काय.. आऊचा छळ पाहुन पुष्कर मेघा ग्रुप ने योग्या बाजु घेतली त्यांची..

किश्याने रेशमच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न केला कालच्या एपिसोडमध्ये. >>> +१११
हा नंकी चे मुलींशी बोलणे आणि त्यावेळची त्याची देह बोली , नजर आक्षेपार्ह वाटते. स्मिता ला पण अतिशय उपहासाने सुरवातीला 'चहा करता येतो का' म्हणुन विचारत होता.
इथे नं की ला सपोर्ट करणार्या लोकांसाथी नीट स्पष्टीकरण देता येणार नाही , पण बायकांचा जो सिक्थ सेन्स असतो म्हणतात ते जजमेंट वापरून मला असे वाटते की हा माणुस नुसता MCP नाही. कोणत्याही मुलीने याच्याबरोबर जास्तीत जास्त अंतर ठेवून रहावे असे वाटते.

पुंबा voting cycle,चालू असे पर्यंत per episodeएक वोट देता येते तुम्ही आजचा episode झाल्यानंतर आऊला मत देऊ शकता. पण ११ वाजण्याच्या आधी

आस्ताद ने नन्द्किशोर ला विचरल जेव्हा की हे भांडण कशामुळे सुरु झाल.. तेव्हा नन्द्किशोर म्हणाला " मला ( भांडण ) सुरुच करायचच होत.. "..
त्यावर आस्ताद म्हणतो .. "हो..मल ते माहीत च होत.. Happy " .. घ्या.. म्हणजे जे झाल त्याला याचा आडवळनाने पाठींबा..

..आणि आपण आपेक्षा करतोय की आस्ताद सुधारलाय व त्याने नन्द्किशोरला भांडु नको म्हणुन समजवाव... Happy

Pages