माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या पानवलकरांना सांगूण काही उपयोग होणार नाही.

झी आणि कलर्स टीव्ही सिरियल्स शी संबधीत (ज्यांना आपण नेहमी बघत असतो) असे चार-पाच जण माझे क्लायंटस आहेत , त्यांच्याशी या मुद्द्यांवर मी बर्‍याच वेळा बोललेलो आहे. मुळात हे पानवलकर टाइपचे रोल करणारे लोक काही नटसम्राट नाहीत, डेली वेजेस वर काम करणारे बिगारी आहेत , स्टूडीओत जायचे , बोलावतील तेव्हा कॅमेर्‍या समोर उभे राहायचे (तो पर्यंत चकाट्या पीटत ताटकळत बसायचे ), देतील ते डायलॉग्ज मेंदू गहाण ठेऊन बोलायचे , या पानवलकरांचे तर सोडाच पण प्रस्थापीत कलाकार सुद्धा पैशाचे मिंधे असतात, सिरियल मध्ये जे काही चालले आहे ते त्यांनाही पटत नसते पण करणार काय ? तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी काहीशी त्यांची अवस्था असते. जराशी सुद्धा कुरकुर केली किंवा बाहेर बोलले तर हातातले काम तर जाईलच शिवाय दुसरे काम मुळूच शकणार नाही अशी व्यवस्था केली जाते , अत्यंत किळसवाणे राजकारण चालते या चॅनेल्स वर. प्रत्येक चॅनेल वर काही गॉड फादर असतात , कंपू असतात त्यांना सांभाळावे लागते , हॉ जी हॉ जी करावेच लागते .

माझ्या या क्लायंट्स नी बरेच सुरस (काही किळसवाणे!) किस्से सांगीतले आहेत , मोठे मोठे कलाकार (रंगकर्मी) म्हणवणारे किती खालच्या पातळीवरचे गलिच्छ राजकारण करु शकतात ते ऐकून अंगावर शहारे आलेत.

सगळे टीआरपी वर अवलंबून असते. आपण आपल्या हाततल्या रिमोट चा प्रभावी वापर करुन ही टीआरपी खाली खेचू शकतो. ते झाले की सिरीयल गुंडाळली जाते.

राधिकाचा इतका क्लोज अप का दाखवतात ? :रागः:

तसेच बनीचाही क्लोज अप दाखवतात. त्याच्या डोळ्यांत डिफेक्ट आहे...तो लपवायचा का अधोरेखित करायचा? काल गुरुला हॉटेल मधे जायला ठाम पणे नाही का म्हणता आले नाही? ...एरवी तर मारे तोंड सुख घेत असतो की आई बायको वर!
शनाया वॉज गॉर्जस इन ऑरेंज आउटफिट !
आणि ती अगदी काही घाबरट नाहीये....गुरुला स्पष्ट ऐकवत असते!
गुरु आणि राधिका सोडून मला सर्व आवडतात :रागः:

गुरु आणि राधिका सोडून मला सर्व आवडतात
>>> +1. त्यातल्या त्यात गुरू परवडला पण ती निब्बर डोक्यातच जाते

परवा मी गुप्ते भाऊंना आमच्या घराच्या इथे पाहिलं. रात्री १० च्या सुमारास. मी कंपनीच्या बसमधून उतरून घरी निघाले होते.>>>> अगं दक्षिणा ताई नोकरी शोधत असेल ग तो.

मला एका कलाकाराने सांगितले होते की आम्हाला कथानक काय आहे हे माहितच नसते.आमचे डायलॉग आम्हाला सेट वर दिले जातात. ते पाठ करून आम्ही ते म्हणतो.

त्यातल्या त्यात कधीतरी बघितल्यावर बघावेसे वाटतात ते समिधा, रेवती आणि गुप्ते. कायम ग्रेसफुल छान कॅरी करतात स्वतःला. जेनी पण अति मेकअप करते बरेचदा नाहीतर ती ही बरी आहे.

बाकी सर्वांच्यात तोचतोच पणा आणि तेच तेच.

मी charactor किंवा अभिनयाबद्दल बोलत नाहीये. कधीतरी क्वचित सिरीयल बघितल्यावर, ज्यांना बघितलं की प्रसन्न वाटतं त्याबद्दल फक्त.

हं! अंजू हे मात्र बरोबर आहे. समिधा आता उलट टवटवीत दिसते. आधी ती चिडायची तेव्हा नव्हती आवडत . ( म्हणजे तिचा अभिनय आवडत नव्हता) रेवती आणी गुप्ते आधी पण छान दिसायचे, आता उलट जास्त फ्रेश वाटतात.

सिरीयल बघणार होते, पण राधाक्कांनी मुर्खपणा कंटिन्यु केल्याने बघण्यात रस उरला नाही. राधाक्का स्वतः ला सत्यवचनी, सत्यधर्मपरायण समजत असल्याने सिरीयलचा बोर्‍या वाजायचा तो वाजलाच आहे.

अभिजीत खांडकेकरचे विशेष कौतुक, तो अभिजीत न वाटता गुरुच वाटतो.

हिला त्या सौमित्र चा एव्हढा राग येण्याचे कारणच काय? त्याने काय फसवणूक केलीये हिची ? उलट गुरवालाच चार शब्द सुनवायचे..की तुम्हाला काय करायचे आहे? मी बघून घेईन. एथिक्स च्या गोष्टी निदान तुम्ही तरी मला सांगू नयेत!
तर बसली आपली सत्यवचनी धर्मपरायणते ची माळ ओढत. अरे हुडूत! जा म्हणायचं गुरवाला उडत!
तर उलट त्या सौमित्र लाच बोलत बसली..
लेखकाची कंसेप्ट मुळात गंडलेली आहे. तो चुकीच्या दिशेने कंसिस्टंटली विचार करतोय...आणि राधिकाचं पात्र असं भरकटलेलं, भयताड आणि बेसलेस दाखविलं आहे.

Angry

कसल्या लंब्या बाता मारतेय ती राधाक्का सौमित्रला. दुरावलेलं नातं काय, विश्वासघात काय. कायच्याकय भयताड. >> हे कधी झालं? Uhoh की आजच्या भागात आहे?
कालच्या भागात गुरू सर्वांना बोलवून बागेत गोळा करतोय इथवर पाहिलं.
आणि सौमित्र कोण आहे हे बिंग फोडणं हे फार ग्रेट काम का वाटतंय गुरू ला? चांगल्या कंपनीचा मालक आहे, तो काही गुन्हेगार वगैरे नाही Uhoh

सौमित्र कोण आहे हे बिंग फोडणं हे फार ग्रेट काम का वाटतंय गुरू ला? चांगल्या कंपनीचा मालक आहे, तो काही गुन्हेगार वगैरे नाही>>पण राधाक्का अशी काही रीअ‍ॅक्ट होतेय की ५-६ खुन करुन पळालेला खुनी आहे तो.
हा भाग झाला की माहित नाही मी मधेच झलक बघितली.

सिरियल पाहिली नाही पण राधिकाचा एक डायलॉग ऐकला जाता येता मे बी अ‍ॅड मधे.. की
" दुरवलेलं माणुस (म्हणजे गुरु) जवळ येउ शकतो पण विश्वासघाताला (एस. बी.) माफी नाही "
असं काहितरी.. म्हण्जे गुरुला एकवेळ माफी मिळेलं पण एस बी को नही जी..
Uhoh

हिला त्या सौमित्र चा एव्हढा राग येण्याचे कारणच काय? त्याने काय फसवणूक केलीये हिची ? उलट गुरवालाच चार शब्द सुनवायचे..की तुम्हाला काय करायचे आहे? मी बघून घेईन. एथिक्स च्या गोष्टी निदान तुम्ही तरी मला सांगू नयेत!
तर बसली आपली सत्यवचनी धर्मपरायणते ची माळ ओढत. अरे हुडूत! जा म्हणायचं गुरवाला उडत!
तर उलट त्या सौमित्र लाच बोलत बसली..
लेखकाची कंसेप्ट मुळात गंडलेली आहे. तो चुकीच्या दिशेने कंसिस्टंटली विचार करतोय...आणि राधिकाचं पात्र असं भरकटलेलं, भयताड आणि बेसलेस दाखविलं आहे. >>>> किती बोर करत आहेत ही लोकं....ह्याला आदर्शवाद म्हणावं की दुराग्रह. उगाचच सारखं कोणी कसं वागावं हे राधिका सांगत बसणार...त्यातही काही सुसुत्रता नाही

हा भाग मला उद्या बघा यला मिळेल. पण मग एस बीचा बिझनेस व पैसे परत करेल का? परत हातात बॅगा घेउन रोडवर पासून सुरूवात?

तो एस बी फार वीअर्ड हसतो. फसलेला अनारसा आहे निव्वळ.

१ ) राधाक्का ने फेशियल करण्याची गरज आहे, फार निब्बर दिसते.

२) गुरुने दाढी करण्याची गरज आहे, मधून मधून खाजवत असतो तो.

३ ) शनयाला पूर्ण नहाण्याची गरज आहे, फार चिपचिपीत दिसतात तिचे केस.

४ ) केड्याला पण दाढी करण्याची गरज आहे, अंघोळ करत नसावा, कारण चेहेरा तेलकट दिसतो.

५ ) सौमित्रने चष्मा नीट साफ करावा, त्यावर फार बाष्प जमले आहे.

६) केड्या व सौमित्र दोघांनी राधा व गुरु यांनी नक्की काय करायला हवे हे एकदाच व अंतिम ठरवावे, म्हणजे प्रेक्षकांचा जीव कपात/ भांड्यात/ ग्लासात पडेल.

७) झी मराठी ने सुधरण्याची गरज आहे, कारण प्रेक्षक फार वैतागलेत.

१ ) राधाक्का ने फेशियल करण्याची गरज आहे, फार निब्बर दिसते.
२) गुरुने दाढी करण्याची गरज आहे, मधून मधून खाजवत असतो तो.
३ ) शनयाला पूर्ण नहाण्याची गरज आहे, फार चिपचिपीत दिसतात तिचे केस.
४ ) केड्याला पण दाढी करण्याची गरज आहे, अंघोळ करत नसावा, कारण चेहेरा तेलकट दिसतो.
५ ) सौमित्रने चष्मा नीट साफ करावा, त्यावर फार बाष्प जमले आहे.
६) केड्या व सौमित्र दोघांनी राधा व गुरु यांनी नक्की काय करायला हवे हे एकदाच व अंतिम ठरवावे, म्हणजे प्रेक्षकांचा जीव कपात/ भांड्यात/ ग्लासात पडेल.
७) झी मराठी ने सुधरण्याची गरज आहे, कारण प्रेक्षक फार वैतागलेत. >>१११११११११११११११११११११११११११११११
Submitted by रश्मी.. on 30 May, 2018 - 17:38 >>>>१११११११११११११११११११११११

अगो हसतीस काय गों इतकी? माका ही शिरीयेल, यातली लोकां यापैकी खराच कुणीच आवडत नाय. दुसरो टाईमपास नसतो ना ह्या येळेक.

जुन्या सिरीयल पैकी दाने अनारके, मुंगेरीलाल के हसीन सपने आणी असंभव या माझ्या प्रचंड आवडत्या सिरीयल.

रश्मी Lol

अग ह्या सगळ्यापेक्षा प्रेक्षकांना सिरीयल सोडून द्यायची गरज आहे, रादर केव्हाच होती हे लिहिलं असतंस तर जास्त बरं झालं असतं Wink .

कालचा एपिसोड असला भंगारछाप होता की बस्स!
गुरू सर्वांना गार्डन मध्ये गोळा करून काय सांगतो तर, सौमित्र हा दुसरा तिसरा कुणी नसून एका अमेरिकन कंपनीचा मालक आहे. ही पण काय अशी सांगायची गोष्ट आहे? Uhoh जसं काही सौमित्र २-३ खून आनि ४-५ बलात्कार करून पळाला आहे. Uhoh
राधिकाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं म्हणजे भिक मिळाली असं बोलून गुरू तिच्या सो कॉल्ड् स्वाभिमानाला हात घालतो. आजकाल कोण सचोटिने मिळवतो गोष्टी? Uhoh सर्व ठिकाणी फेव्हरिटिझम, लाच खाऊन पात्र नसलेल्यांना काम देणे इ. सुरू असते. आणि गुरूच्या भिकेच्या वक्तव्यावर विश्वास दाखवणे म्हणजे स्वत:च्या कर्तृत्वावर संशय घेणे आहे हे कसं राधिकाला कळत नाही? Uhoh
आणि इतकं आयुष्य पाहिलेल्या गुरूच्या आई वडिलांना आणि नाना नानींना यावर काहीच से (say) असू नये? Uhoh

Pages