Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मालिका बघणं सोडून दिलयं तो
मालिका बघणं सोडून दिलयं तो उत्तम निर्णय होता हे इथल्या पोस्ट्स वाचून पटलं
आमच्या घरात ते शक्य नाहिये.
आमच्या घरात ते शक्य नाहिये. साबा साबु अगदी तन्मयतेने बघतात ही मालिका त्यामुळे आम्हाला काही से नसतो त्याचा वचपा आम्ही लगेच ९.३०ला तारक मेहता लावुन काढतो
आणि गवरीच्या ऑफीसचं काय?
आणि गवरीच्या ऑफीसचं काय? आत्ताच प्रमोशन मिळालंय ना? मग काही ' हँड ओव्हर' वगैरे...?
मोजो मात्र छान दाखवताहेत त्यांची काळजी व गौरी बद्दलचं प्रेम!
पण एकूणात सासरी गेली की लेकी च्या प्रायॉरिटीज झटकन बदलतात हे मात्र नक्की!
पण मला तर मोजो जरा सायको वाटत
पण मला तर मोजो जरा सायको वाटत आहेत..मुलगी सासरी गेल्यावर तिची आठवण येणे वेगळं ..
मोजो थोडं अतीच करत आहेत असं वाटत..
पण मला तर मोजो जरा सायको वाटत
पण मला तर मोजो जरा सायको वाटत आहेत..मुलगी सासरी गेल्यावर तिची आठवण येणे वेगळं ..
मोजो थोडं अतीच करत आहेत असं वाटत.. हो.ना. तिच्या शी फोन वर बोलताना म्ह्ण्तात की..कसा असणार तुझ्याशिवाय? मुली लग्न करुन सासरी जात नाहीत का?
मोजो अती करत आहेत हे नक्की.
मोजो अती करत आहेत हे नक्की. तेच जाम डोक्यात गेलं काल माझ्या. ही गवरी फोन करत्ते तर मोजो तिला विचारतो तुला तिथे काही प्रॉब्लेम नाही ना? एका दिवसात प्रॉब्लेम?
दुसरी गोष्ट जर का मोजो ला गवरी च्या लग्ना अगोदर हम्माचा कट कळला असता की आपली पोरगी कायमची बनारस ला राहणार असेल तर मोजो काय लग्न रद्द करणार होते का?
खोट्या दागिन्यांची भानगड नाही माहिती मला, पण एकूण लक्षात आला सगळा लांडा कारभार. कठिण आहे झी चे.
मी तर सिरियल नाहीच पहात.
एका दिवसात प्रॉब्लेम येऊ
एका दिवसात प्रॉब्लेम येऊ शकतो यायचा असेल तर!
आणि मोजो नी लग्न रद्द नसतं केलं तरी निदान ते हम्माशी वगैरे बोलले असते व मेंटली प्रिपेअर्ड तरी राहीले असते.
पण त्या हम्माने बनारसचे
पण त्या हम्माने बनारसचे वाईल्ड कार्ड अगदी कार्यालयात यायच्या दिवशीच बाहेर काढले ना?
त्यांच्यात मुलाची आई लग्नाला जात नाही का?
नचि आणि निशाबाय गायब आहेत.
नचि आणि निशाबाय गायब आहेत. दागिन्यांचे कळ्ळ्यावर मुंह दिखाईमधुनच हम्मा फोन करुन झापणार सावंताना आणि नेहमीप्रमाने निशा मला हम्मानेच अस करायला सांगितल होत अस सांगणार आणि सावंत त्यावर विश्वास ठेवणार.
इकडे हम्मा पुन्हा एकदा मुंबईवाल्यांच्या नावाने खडे फोडणार. लगे रहो
हम्माचा रागरंग बघून एका
हम्माचा रागरंग बघून एका दिवसात प्रॉब्लेम नाही आला असता, तरंच नवल.
मुंबईची मुलगी... या अर्थाचं
मुंबईची मुलगी...
या अर्थाचं काहीतरी कंबरेवर हात ठेवून नाकात म्हणाली...ते किती बेकार व कृत्रीम वाटलं...ते प्रेक्षकच जाणे.
हा भाग तर अगदी बावळट..गौरी लहान मुलं नाटकात अभिनय करतात तसा करत होती..हसायलाच आले >>>> +1
पण मला तर मोजो जरा सायको वाटत
पण मला तर मोजो जरा सायको वाटत आहेत..मुलगी सासरी गेल्यावर तिची आठवण येणे वेगळं ..
मोजो थोडं अतीच करत आहेत असं वाटत..>>>>>>>> हां त्यांची ओव्हरअॅक्टींग होतेय जरा पण काही बाबा असतात हो असे.
माझे बाबा खूप हळवे माझ्या बाबतीत. कारण मी एकुलती एक....... त्यामुळे त्यांचे वागणे म्हणाल तर थोडे असेच होते. आता बिचारे या जगात नाहीत. पण माझ्या लग्नात मी सासरी जायला निघाले तेव्हा ते एका कोपर्यात उभे राहून खूप रडत होते. आणि दुसर्या दिवशी पण फोनवर खूप रडले. आमच्याकडे पूजा होती माझ्या आईवडिलांना बोलवले नाही. या गोष्टीला आता ११ वर्ष उलटून गेली तरी हा सल मनातून जात नाही. आता खूप वाटते तेव्हा का मी विचारले नाही. सॉरी या मालिकेच्या निमित्ताने वडिल मुलीचे नाते बघून त्यांची खूप आठवण आली म्हणुन मन मोकळे केले. (अवांतराबद्दल क्षमस्व)
अंजली , पटलं . माझ्या सक्ख्या
अंजली , पटलं .
.
माझ्या सक्ख्या मैत्रीणीचं लग्न नागपूरला झालं. मी तिच्या कुटुम्बियांसोबत मुंबईहून गेले होते.
तिची विदाई झाली पहाटे (उत्तर भारतियाशी लग्न केलं तिनेही ) आणि आम्ही हॉटेलरूम वर परत आलो.
तिचे वडील , तिच्या आईपेक्शा जास्त रडत होते.
मलाच गलबलून आलं त्याना हुंदके देताना बघून.
स्वस्ति मोजोंचा स्टँड पटला
स्वस्ति

मोजोंचा स्टँड पटला की ती लहान असल्यापासून मी ठरवले होते तिला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही वगैरे वगैरे हे सगळं मी अनुभवलेय म्हणून सांगू शकते. पण आई वडिलही शेवटी अॅडजस्ट करतातच मुलीचे सुख आणि कधीकधी नाईलाज म्हणून.
वर उल्लेखल्याप्रमाणे मी एकटीच असल्याने असं वाटायचं आईवडिलांना सोडून कुठे जाऊ नये पण जसं लग्न झालंय तसं मी पुण्याच्या काय देशाबाहेरच आहे कायम. माहेरपण कमीच
फक्त सिरीअलीत जास्तच आकांडतांडव करतायत फसवलं फसवलं म्हणून. मनाची थोडी तरी तयारी असतेच वधुपित्याची की मुलीचे जिकडे सासर असेल तिथेच ती जास्त काळ राहणार याची.
Repeat post
Repeat post
ती हम्माचं काम करणारी नटी कोण
ती हम्माचं काम करणारी नटी कोण आहे ? काम भारी केलेय. अगदी राग यावा इतकं
आताचा ट्रेंड असा आहे बहुतेक सिरीअलीत की मुलाची आई कारस्थानी आणि मुलाला शेवटपर्यंत पत्ता नाही.
नील-ललिता, मुन्ना - अम्मा, पिंट्या - कलाबाई
रच्याकने गौरीची ती जाऊ सरला पपेटसारखी दिसते ना?
>>>>मालिका बघणं सोडून दिलयं
>>>>मालिका बघणं सोडून दिलयं तो उत्तम निर्णय होता हे इथल्या पोस्ट्स वाचून पटलं <<<
+१
मुंबईची मुलगी सीन भारी होता!
मुंबईची मुलगी सीन भारी होता! :p :-p

बिचारी गवरी किती प्रयत्न केला तरी अभिनय झेपत नाही तिला
आता शिव आणि गवरी मुंबईला काही कळवणार नाहीत; मुंबईवाले बेघर झाले तरी लेक-जावयाला काही समजू देणार नाहीत
मधल्यामधे प्रेक्षकांचे हालहाल होणार!
भरपूर अवार्डस ह्या सिरीयलला,
भरपूर अवार्डस ह्या सिरीयलला, आत्ताच कुठल्यातरी news channel वर बघितलं. शिव, गौरी सर्वोत्तम नायिका नायिका.
ती हम्माचं काम करणारी नटी कोण
ती हम्माचं काम करणारी नटी कोण आहे ? काम भारी केलेय. अगदी राग यावा इतकं >>>>>>>>>>>>>
त्या अम्मा चा रोल करणाऱ्या नटी चं नांव माधुरी संजीव आहे .
काय योगायोग आहे ? सिरीयल च्या नायिकेचं नांव ही सायली संजीव आहे.
हारावरून इथे 'होणार सून मी'
हारावरून इथे 'होणार सून मी' ची पुनरावृत्ती. मुलीकडच्या खलप्रवृत्तींनी हारात राडा करायचा. जावयाने ऐनवेळी विकत घेऊन दुसरा हार पेश करायचा.
काल बर्याच दिवसानी जुना शिव
काल बर्याच दिवसानी जुना शिव दिसला.
http://www.loksatta.com/manor
http://www.loksatta.com/manoranjan-news/full-list-of-zee-marathi-award-2...
हे घ्या....११ पुरस्कार मिळालेत मालिकेला...

सर्वोत्कृष्ट मालिका – काहे
सर्वोत्कृष्ट मालिका – काहे दिया परदेस
गौरी म्हणे सर्वोत्कृष्ट नायिका ,काहीही हं झी 
सर्वोत्कृष्ट कुटुंब – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायिका – गौरी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायक – शिव – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट भावंडं – गौरी-नचिकेत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट जोडी – शिव गौरी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट वडील – मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासू – आजी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासरे – मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सून – गौरी – काहे दिया परदेस
वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत लक्षवेधी चेहरा – गौरी – काहे दिया परदेस........
ही यादी पाहून आश्चर्य वाटतंय ....
सर्वात थंड चेहरा अशी कॅटेगरी
सर्वात थंड चेहरा अशी कॅटेगरी पण ठेवायला हवी होती , गौरीचं जिंकली असती ..........
वासरात लंगडी गाय शहाणी. पआमु,
वासरात लंगडी गाय शहाणी. पआमु, कारेदु, नांदा आणि सौभाग्यवती या ४ मालिका संपल्यामुळे आणि खुकखु नविन असल्यामुळे यावर्षी सगळे पुरस्कार याच मालिकेला मिळणार होते. जर पुढल्या वर्षी हि मालिका संपलेली असेल, तर त्यावेळी सगळे पुरस्कार खुकखुला असतील.
सगळयात कहर म्हणजे अभिनयात माठ असलेली थंडाक्का सर्वोत्कृष्ट नायिका! अरेरे, काय वेळ आली आहे झी मराठीवर!
मे बी बाकीच्या शिरेल्स
मे बी बाकीच्या शिरेल्स याहीपेक्शा वाईट वाटत अस्तील लोकांना म्हणुन कादिप बेस्ट........
सर्वोत्कृष्ट खलनायिका – शनाया
सर्वोत्कृष्ट खलनायिका – शनाया – माझ्या नव-याची बायको >>>> निशा deserve करते हा अवार्ड
सर्वोत्कृष्ट सून – गौरी –
सर्वोत्कृष्ट सून – गौरी – काहे दिया परदेस>>> गवरी आता कुठे सून झालिये आणि लगेच सर्वोत्कृष्ट
सर्वोत्कृष्ट खलनायिका – शनाया – माझ्या नव-याची बायको >>>> निशा deserve करते हा अवार्ड>>> येस
पण सर्वोत्कृष्ट नायिका खरे तर
पण सर्वोत्कृष्ट नायिका खरे तर सौभाग्यवती मधी लक्ष्मी ही होती किंवा इव्हन स्वानंदी पण छान काम करत होती की! हे पुरस्कार फक्त अॅक्टिव्ह मालिकांसाठीच असतात की काय..? ज्या नुकत्याच संपल्या पण मागच्या वर्षांत होत्या अशांना नाही का?
Pages