Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला फक्त सावंतांच्या घरातले
मला फक्त सावंतांच्या घरातले सीन्स आवडायचे. आता घरच गेलं. आत काय बघु मी?
<<मला फक्त सावंतांच्या घरातले
<<मला फक्त सावंतांच्या घरातले सीन्स आवडायचे. आता घरच गेलं. आत काय बघु मी?>>
आता घरच गेलं. आत काय बघु
आता घरच गेलं. आत काय बघु मी?..घर जरी गेलं तरी माण्सं तीच आहेत ओ..
काल आज्जीचे विनोद गवारी किती
काल आज्जीचे विनोद गवारी किती सिरियस घेत होती?

नुसतं असं काय ग आजी आणि तसं काय गं आजी..
हे असले लाडे लाडे संवाद प्रत्येक झी च्या शिरेलीत का बरं असतात?
आता कुठे रहाताहेत गौरीच्या
आता कुठे रहाताहेत गौरीच्या घरचे मग?
दक्षिणा.....हो ना...मला तर
दक्षिणा.....हो ना...मला तर इतका संताप आला ते डायलॉग्ज ऐकून....."हे काय आजी....तू कमरेचं दुखणं बरं व्हावं म्हणून प्रदक्षिणा घालणार..आणि मग तुझे गुढघे नाही का दुखायला लागणार....?"
:रागः ... अरे ! क्काय हे!!
किती निर्बुद्ध संवाद!
आणि गवरीला अॅबसोल्यूटली स्वतःची मतं नाहीयेत का? आईला विचारत होती ड्रेस घातला तर चालेला का वगैरे!
आंबटगोड अगदी अगदी.. आणि दहा
आंबटगोड अगदी अगदी..
आणि दहा बारा दिवसांनंतरचा मुहूर्त आहे म्हणून पण लहान मुलासारखी नाचत होती.
धगुरडी कुठली
दक्षे.......
दक्षे.......
घर गेलं मग मुक्काम कुठे या
घर गेलं मग मुक्काम कुठे या लोकांचा, निशाच्या माहेरी का?
पाच दिवसाची मुदत मिळाली आहे.
पाच दिवसाची मुदत मिळाली आहे.
नाही अन्जू, ज्या अप्पाने घर
नाही अन्जू, ज्या अप्पाने घर घेतलंय त्याच्याकडून मोजो ने ४ दिवस मागून घेतले मग अप्पाने ५ दिवस देऊन सहाव्या दिवशी घराची किल्ली माझ्या माणसांच्या हाती द्या असं सांगून तात्पुरतं त्याचक घरात रहायची परवानगी दिली आहे. पण आता ही गवारी चिकटून बसली आहे ना. धा बारा दिवस हितंच मुक्काम हाय तिचा.
काल मोजो आणि सोसायटी च्या सेक्रेटरी मधला संवाद दाखवला त्यात निशाला तुरुंगात पाठवा असं जेव्ह्वा ते सांगतात तेव्हा मोजो त्यांना म्हणतो, गौरी च्या सासरचे त्रास देतील त्यांना हे प्रकरण कळलं तर.
कुठे चाललाय भारत? सिरीयली अजून त्याच जुनाट विचारांच्या
ओहह thanx दक्षे. निशावर
ओहह thanx दक्षे. निशावर विश्वास ठेवल्यावर हेच होणार होतंना. स्वतःचीच घोडचूक मोजोची.
स्वतःचीच घोडचूक मोजोची. > तर
स्वतःचीच घोडचूक मोजोची. > तर काय! मुलगा जात होता बाहेरच्या देशात तर किती आक्रस्ताळेपणा केला. आणि आता सून कशी अहे कळल तरी वेडयासारखा विश्वास ठेवला तर दुसर काय होणार
मोजोची गत म्हणजे, बाईल वेडी
मोजोची गत म्हणजे, बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तो ही तसा अशातली आहे.
बाईल वेडी लेक पिसा, जावई
बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तो ही तसा अशातली आहे.... म्हणजे काय? जरा विस्कटून सांगा की... मला नाही कळालं
दक्षिणा, त्या म्हणीच्या
दक्षिणा, त्या म्हणीच्या धाग्यावर टाकायला हवीय ही म्हण
मितु म्हणे नचिकेतशी लग्न
मितु म्हणे नचिकेतशी लग्न करणार आहे, मग वेणुचे काय होईल?
धगुरडी कुठली>>> धगुरडी म्हणजे काय?:अओ:
नाही अन्जू, ज्या अप्पाने घर घेतलंय त्याच्याकडून मोजो ने ४ दिवस मागून घेतले मग अप्पाने ५ दिवस देऊन सहाव्या दिवशी घराची किल्ली माझ्या माणसांच्या हाती द्या असं सांगून तात्पुरतं त्याचक घरात रहायची परवानगी दिली आहे. पण आता ही गवारी चिकटून बसली आहे ना.>>>> हो ना, आणि वरुन हम्माने तिला कायमची माहेरी धाडली आहे.:अओ:
मितु म्हणे नचिकेतशी लग्न
मितु म्हणे नचिकेतशी लग्न करणार आहे, मग वेणुचे काय होईल? हाहा>>> मितु नचिशी लग्न का करणार...... निशाचे काय मग
मितु म्हणे नचिकेतशी लग्न
मितु म्हणे नचिकेतशी लग्न करणार आहे >> खरंच??? कै चाल्लय कै या शिरेलीत??
मितु नचिशी लग्न का
मितु नचिशी लग्न का करणार...... निशाचे काय मग>>> ते काय झाल, गौरी मितु आणि वेणूला ते नकली हार प्रकरण सान्गत होती, तेव्हा मितु रागाच्या भरात बोलली,"निशाला आफ्रिकेच्या जन्गलात पाठवून दयायला हव. वेणुने विचारल, "मग नचिचे काय होईल?' सो, मितू म्हणाली, " मी करेन नचिशी लग्न." हयात डायरेक्टर ने हिन्ट तर दिली नाही ना.
आज काय झालं ?
आज काय झालं ?
भयानक प्रकार दाखवताय
भयानक प्रकार दाखवताय इथे..
गौरी चं लग्न दाखवलं आणि नंतर परतमूळ .
असा कोणता मुहूर्त होता यांच्या लग्नाचा? लग्नानंतर लगेच दिवाळी आणि नवी नवरी माहेरी धनतेरस ची पूजा करतेय.
सगळचं गंडलय
काय लगेच त्या गोउरीचा मेकओवर
काय लगेच त्या गोउरीचा मेकओवर केलाय. कपडे काय, दागिने काय, सिंदुर काय. जॉबची काळ्जी नाही, करिअरचा पत्ता नाही, आईवडिलांचे दु:ख कळ्त नाही. आजकाल मुली अशा नसतात.
तिने निशाला झापले ते पण असे अचानक रुचले नाही. निशा मस्त लब्बाड मांजरीसारखी वाटते. ड्रामा तर सहीच करते. शुगो ओवरएक्टींग. बनारसचे सगळे सिन्स महाबोअर.
धनतेरस नंतर पाडवा दाखवला..
धनतेरस नंतर पाडवा दाखवला.. लक्ष्मी पूजन..? नवी नवरी माहेरी असते का लक्ष्मी पूजन ला.? मालिकेत सर्व सण दाखवायचा किती अट्टाहास..!
गौरी च्या लूक बद्दल अगदी सहमत.. लग्नानंतर काही तरीच दिसायला लागली आहे.. असे कुणाला बोलू नये दिसण्यावरुन पण गौरी चांगल्या तून वाईट अशी दिसतेय.!
ते बनारसचे घर म्हणजे दिया और
ते बनारसचे घर म्हणजे दिया और बाती हम मधला सेट आहे
आजच्या एपिसोडात तर नाश्ता चहा
आजच्या एपिसोडात तर नाश्ता चहा करताना गवरी आणि तिची आई दाखवल्यात.
दोन्ही चा गारगुट्टा करून, चहा तसाच्च गार गाळला
गवरी नेहमीप्रमाणे थंड शिवाय सुजरी दिसत होती.
हो ना...किती पिवळे धम्मक ते
हो ना...किती पिवळे धम्मक ते पोहे! आणि कळस म्हणजे शिव आणि वेणूला ब्रश करुन चुळा भरतांना दाखविण्याची काय गरज होती? अगदी किळस वाटते कुणी दात घासतांना बोललं की...!!!!
दुसरा कुठलाही सीन दाखवायचा की! .. आवराआवरी करताना वगैरे!
आणि शिव काय आता सावंतांना ऐंशी लाख देणारे...? त्यापेक्षा त्या निशाला सर्व मिळून का नाही झापत...? त्यात काय लपवायचे गवरी पासून?
आणि कळस म्हणजे शिव आणि वेणूला
आणि कळस म्हणजे शिव आणि वेणूला ब्रश करुन चुळा भरतांना दाखविण्याची काय गरज होती? अगदी किळस वाटते कुणी दात घासतांना बोललं की.>>> अगदी अगदी. आणि असे सिन्स कितीवेळा दाखवलेय सिरियल मध्ये. वेणु दात घासत बोलताना तर कधी कधी त्याच्यावर camera असतो तेव्हा तेव्हा तर यक्स वाटत.
तसेच युपीचे लोक पान खाऊन रस्त्यावर थुकतात तेही सारखे सारखे दाखवायची गरज नाही सिरियलमध्ये.
त्यापेक्षा त्या निशाला सर्व
त्यापेक्षा त्या निशाला सर्व मिळून का नाही झापत...? त्यात काय लपवायचे गवरी पासून?>> +१००
काल गवरी किती नॉन सेंस बोलत
काल गवरी किती नॉन सेंस बोलत होती शिवशी..!! किती कृत्रिम आणि बेगडी! तिला अजिबातच डायलॉग डिलीव्हरी जमत नाही. सानुनासिक आणि लाडे लाडे विचित्र बोलते. आणि किती इल्लॉजिकल..म्हणे आता तू जावई झालास..तुला आता बाबांच्या बोलण्याचा राग येतो.....हट यार ! ....अशा नसतात मुली....त वरुन ताकभात कळतो बाबांकडे नुसतं पाहून !
Pages