पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यानी अतिरेक्यन्चे अड्डे नश्ट केले. अतिरेक्यान्चे अड्डे सरहद्दीपासुन इतके जवळ असतील हे खरे वाटत नाही.

>>> अतिरेकी अड्डे नव्हे, लाँच पॅडस. जेथुन अतिरेकी भारतात घुसण्यासाठी गोळा होतात.

ithle comment vachun ata gondhalch vadhla...
Nakki zhal kay???

बहुदा असे सर्जिकल स्ट्राईक्स या आधी खासकरून काँग्रेसच्या काळात झाले होते हे ऐकून इथल्या काही प्रखर देशभक्तांच्या पोटात दुखू लागले आहे.
कामाचा ढिंढोरा वाजवणे हे मोदीसरकारची सुरुवातीपासूनची सवय आहे. याउलट शांततेत काम करने ही मनमोहनसिंग यांची खासीयत होती

गेट वेल सून.

< चिनूक्स | 30 September, 2016 - 00:09

२०१३च्या बातम्या आहेत. 'भारतानं बदला घेतल्याच्या'. मघाशी बेकरीत चिकटवल्या होत्या. आता पुन्हा शोधायचा कंटाळा आला>

बहुतेक या बातम्या आहेत त्या :
https://www.youtube.com/watch?v=GhLqFQ4xkVY

http://www.ndtv.com/india-news/india-gave-befitting-reply-to-pakistan-af...

http://www.thehindu.com/news/national/india-gave-befitting-reply-to-paki...

It has been done. Please understand that when we use force, that use is from tactical to operational to strategic levels. When I mention that during that incident, it was aimed at operations at the tactical level, which have been undertaken. I think this has been done by the local commander, the chiefs have nothing to do with it

http://www.hindustantimes.com/india/india-has-avenged-loc-murders-says-a...
India has avenged the murders of its soldiers along the Line of Control (LoC) by the Pakistani army last year by inflicting casualties on the neighbouring army, General Bikram Singh said on Monday
Quoting Pakistani news reports that 10 of their soldiers were killed and another 11 injured in recent clashes along the LoC, Singh said, “Our boys have done a stupendous job. They have retaliated well… and done their bit.”

लष्करी कारवाईच्या जोडीने airwaves वरही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं सध्याच्या सरकारचं धोरण असू शकतं. तो त्यांच्या बदललेल्या स्ट्रॅटेजी/पॉलिसीचा भाग.
तसंच पहिल्यांदाच सरकारने यात काही भूमिका निभावली, असं म्हणताना, आधीच्या सरकारने सैन्याचे हात बांधून ठेवले होते असा अर्थ सूचित केला जातो. त्यावेळचे सैन्याधिकारी तर म्हणताहेत, लोकल कमांडरच आपल्याला योग्य ती कारवाई करायला समर्थ आहे,त्यात सैन्यप्रमुखाला पडायची गरजही नव्हती.
तरीही पाकिस्तानच्या प्रत्येक आगळिकीला चोख उत्तर दिलं गेलं आहे.

पुन्हा हा स्ट्रॅटेजी, पॉलिसीतला फरक असू शकतो.

बहुदा असे सर्जिकल स्ट्राईक्स या आधी खासकरून काँग्रेसच्या काळात झाले होते हे ऐकून इथल्या काही प्रखर देशभक्तांच्या पोटात दुखू लागले आहे.

<<

Lol

काँग्रेसच्या काळात 'हे' झाले होते, काँग्रेसच्या काळात 'ते' झाले होते हे पटवून देण्यासाठी इथल्या कॉंगी समर्थकांची जी दमछाक होतेय ते पाहून फारच वाईट वाटतेय. Lol

बाकी,
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार उलथवुन लावायला, गेल्यावळेला कॉंग्रेजने मणीशंकर अय्यरला पाकिस्तानची मदत मागायला पाठवले होते. आता ह्या हल्ल्यानंतर पाकिस्तान कडे मदत मागायला कॉंग्रेज कुणाला पाठवणार आहे?

चला याही धाग्यावर मोदी समर्थकांचा धिंगाणा चालणार आहे. यांना खरे सांगितल्यवर पोटात दुखू लागते. वाईट वाटू लागते लगेच झूंडी घेऊन ओरडत येणे नेहमीचे झाले आहे.

चालू द्या ट्रोलिंग करणे.

गेल्यावळेला कॉंग्रेजने मणीशंकर अय्यरला पाकिस्तानची मदत मागायला पाठवले होते. आता ह्या हल्ल्यानंतर पाकिस्तान कडे मदत मागायला कॉंग्रेज कुणाला पाठवणार आहे? >>

कृपया आपल्याकडे काही पुरावे असल्यास द्यावे अन्यथा याविरुध्द आपली तक्रार होऊ शकते याची जाणीव ठेवावी. काँग्रेस आणि अजुन कुठलाही दुसरा पक्ष असे करणार नाही याची खात्री आहे. काँग्रेसने अधिकृत भुमिका घेऊन अय्यर ला पाठवले हे कृपया सिध्द करावे. अन्यथा फुकटच्या बाता मारून मोदीसमर्थकांनी इतरांची करमणूक करू नये.

अ‍ॅडमिन कृपया इथे लक्ष द्यावे.

झी, हिन्दुस्तान टाईम्स, एक्स्प्रेस या तिघांपैकी दोघांवर माझा विश्वास आहे. शिवाय २०१४ साली 'आम्ही धडा शिकवला' हे निवृत्त अधिकार्‍यानेच सांगितलं आहे. ते तर सर्वत्र प्रकाशित झालं होतं.>>
------- सहमत. कॉन्ग्रेसच्या काळातही प्रत्येक हल्ल्याचा हिशोब चुकता होतच होता. फक्त त्या बातम्या पब्लिक होत नसत (अशी कारवाई आम्ही केली हे जाहिर मान्य न करणे हा त्यान्च्या योजनेचा भागही असेल). >>>>>>>+1111111

Any army person will agree with this . But not openly. Happy Wink

इथे मुद्दाम त्याच जुन्या मुद्द्यांवर वादविवाद करणार्‍या सर्वांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल. तेव्हा प्रतिसाद देताना ते लक्षात ठेवा.

काँग्रेस आणि अजुन कुठलाही दुसरा पक्ष असे करणार नाही याची खात्री आहे.
>>>>
किती हा अंध विश्वास .....

प्रशासकांची सुचना आता पाहिली,
म्हणून हा प्रतिसाद संपादीत केला आहे.

धाग्याचा हेतु सरळ आहे भारतीय लष्कराने जी कारवाई केली त्याबद्द्ल शुभेच्छा देण्यासाठी हा धागा आहे,
त्या शुभेच्छा द्या आणि फुटा,
आपले फुकटचे राजकीय ज्ञान पाजळुन मिच किती राजकीय ज्ञानी आहे हे दाखवायची गरज नाही, साला तुम्ही धाग्यावर एकत्र येऊ शकत नाही तर देशासाठी काय एकत्र लढणार? बोलबच्चन सगळे

vaibhavayare12345

धाग्याचा हेतु सरळ आहे भारतीय लष्कराने जी कारवाई केली त्याबद्द्ल शुभेच्छा देण्यासाठी हा धागा आहे,
त्या शुभेच्छा द्या आणि फुटा,
आपले फुकटचे राजकीय ज्ञान पाजळुन मिच किती राजकीय ज्ञानी आहे हे दाखवायची गरज नाही, साला तुम्ही धाग्यावर एकत्र येऊ शकत नाही तर देशासाठी काय एकत्र लढणार? बोलबच्चन सगळे++++++++++++++१११११११११११११११११११११११ सहमत

<<आपले फुकटचे राजकीय ज्ञान पाजळुन मिच किती राजकीय ज्ञानी आहे हे दाखवायची गरज नाही, साला तुम्ही धाग्यावर एकत्र येऊ शकत नाही तर देशासाठी काय एकत्र लढणार? बोलबच्चन>>
----- अहो वैभव हा धागा विक्रम यान्नी सुरु केला आहे.

"सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती. " विक्रम यान्च्या विनन्तीला मान देत मायबोलीकर आपाली मते मान्डत आहेत. चर्चा करायला, वेगळे किव्वा विरोधी विचार समजावुन घेतल्याने आपली विषयाबद्दलची प्रगल्भता वाढते.

भारतीय लष्काराचे अभिनंदन! Happy

आम्ही इथे बसुन निवान्त टिवल्या बावल्या करु शकतो! कारण आपण सीमेवर शिर तळहाती घेऊन उभे आहात!

आणि अ‍ॅडमीन साहेबांनी देखिल सांगुन 'सर्जिकल ऑपरेशन करु' जाणीव करुन दिल्याबद्दल त्यांशे शतशः आभार!

वैभव, १००% सहमत!!

अ‍ॅडमीन साहेबांनी देखिल सांगुन 'सर्जिकल ऑपरेशन करु' जाणीव करुन दिल्याबद्दल त्यांशे शतशः आभार!>> Lol +१०१

धन्यवाद अ‍ॅडमीन.

मारलेल्या अतिरेक्याचे फोटो वायरल झालेले आहेत, त्या मृतदेहाचे फोटो बघता खुप वाईट रित्या भारतीय लष्कराने त्यांना अक्षरशः कापुन काढलेल आहे हे जाणवत , उरीचा बदला अक्षरशः घेतला आहे !!

३६ अतिरेक्यांना एकाच वेळी एकाच ठिकाणी यमसदनाला पाठवल्याने त्या अतिरेक्यांच्या ग्रुपला जबर हानी झालेली आहे. त्यात त्यांचे हँडलर्सही मारले गेलेत. बराच मोठा फटका त्यांना बसलेला आहे.

धन्यवाद अ‍ॅडमिन.
=====================================
या धाग्याचा हेतू पुनः एकदा खाली उधृत करतो.

" सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती ".

कृपया आपली मते व आपल्या प्रतिक्रिया या मुद्द्यावर केंद्रित केल्यास उदबोधक चर्चा होऊ शकेल. धन्यवाद.

भारतीय सैन्याचे आणि ह्या मोहिमेत भाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन!
जय हिंद! भारत माता की जय!

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
मधेच या विजा भयाण हासती
दहा दिशांतुनी तुफान व्हायचे

प्रलोभने तुला न लोभ दाविती
न मोहबंधने पदांस बांधिती
विरोध क्रोध वा तुला न थांबवी
न मोह भासतो गजांत वैभवी
न दैन्यही तुझे कधी सरायचे

वसंत वा शरद तुला न ती क्षिती
नभांत सूर्य वा असो निशापती !
विशीर्ण वस्‍त्र हो विदीर्ण पावले
तरी न पाय हे कधी विसावले !
न लोचना तुवा सुखे मिटायचे

नभात सैनिका प्रभात येउ दे
खगांसवे जगा सुखात गाउ दे
फुलाफुलांवरी सुवर्ण शोभु दे
जगास शांतता सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी तुझे ठरायचे

सैन्यदलाला सलाम! _____/\______.

काही आयडीजनी इथे पोष्टी टाकल्या पण त्यांना एका वाक्याने भारतीय सैन्यदलाच साधं अभिनंदन करावसं वाटलं नाही पाहून सखेद आश्चर्य वाटलं .

शोभा, किती दिवसांनी हे गाण वाचलं. शाळेतले दिवस आठवले. समरगीतांच्या स्पर्धांमधल हे अगदी आवडीच गाणं होतं.

वैभव अगदी +१
काही आयडी "सेक्युलर ढोंगी ,फाट्यावर मारणे" वगैरे भाषा वापरून तसेच मुद्दामून इतरत्र विषय आणून घुसवतात जेणे करून इतर आयडी रीअ‍ॅक्ट होतील. अशा आयडींविरुध्द सर्जिकल अ‍ॅक्शन घेणे जरुरी आहे.

भारताने निव्वळ अतिरेकी मारले आहे असे घोषित केले आहे यावरून पाकिस्तानची गोची झाली. कारण मान्यता दिली तर त्यांच्या भागात अतिरेकी आहे हे सिध्द होईल आणि युध्द पुकारले तर अतिरेकींना मारले म्हणून त्यांना थारा देणारा देश म्हणून पाकिस्तानची नव्याने ओळख निर्माण होईल.
पण सैनिकी कारवाई करणे अथवा न करणे हे दोन्ही नवाज शरीफ यांच्या हातात नाही. तिथले अधिकार हे सैन्याच्या हाती केंद्रीत झाले आहे. भारताविरुध्द युध्द पुकारण्यासाठी सैन्याला आधी शरीफ यांना पदच्युत करावे लागेल. ते झाल्यास नव्याने आर्थिक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या काही अ‍ॅक्शन घेणे पाकिस्तानला शक्य नाही.

किती दिवसांनी हे गाण वाचलं.>>>>>>>.मला नेहमीच आठवत असतं. सैन्याबद्दल काही एकलं, वाचलं, की प्रथम हे गाणं आठवतं. ते देशासाठी करत असलेला त्याग, कष्ट, हे सगळं आठवतं आणि त्यांच्याबद्दल नितांत आदर वाटतो.

Pages