अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक अनुभव याच महीन्यात सिल्वसा येथे गेलो होतो. साबु आनि साबा पन होते बरोबर.cotteage घेतले होते, पन ते होते hotel च्या शेवट्च्या टोकाला आणी जवळच वाहणारि नदी. आत गेल्यावर एकदम आस्वस्थ वाट्ले. सकालचि वेळ होति तरिसुध्हा. मग नवर्याच्या मागे लगुन room बदलुन घेताली तेव्न्हा बरे वाट्ले. आस्वथ्ता मालाच जानावलि.

पंत!

राहूद्यात. नाही आलाय तेच बरेय ... नाहीतर भूतांना वाटेल कशाला ह्यांच्या नादी लागलो. Proud

स्वरा,

जोरात अनुभव. बरे झाले जास्त काही झाले नाही.

अश्विनी, मला अशी अस्वस्थता आंबोलीला जाणवली होती. हाॅटेलचे नाव बहुतेक शिवप्रसाद होते. मोठी बिल्डींग होती. पण २-३ च गेस्ट होते. रूम्स आतून चांगल्या होत्या. पण बाहेरून बिल्डिंग भयाण वाटली. राहीलो तसेच. पण रात्री खूप भिती वाटत होती अंधारात डोळे उघडायला.

<<<<<आमच्या घरचे दर अमावास्ये - पौर्णिमेला जागेवाल्याला नारळ देतात . तर असा हा अनुभव माझ्या आज्ज्जीचा>>>>>>>

गावात असा एक गावाचा रक्षणकर्ता असतो आणि त्याला चेडा असे म्हणतात. आमच्या घराला लागुनच आहे हे स्थान आणि २५-३० वर्षांपुर्वी जेव्हा बोईसर ला खुपच कमी वस्ती होती (हा पुर्ण भागच जंगलाचा आहे , आता औद्दोगिक वसाहतीमुळे बोईसरचा भाग जंगलासारखा वाट नाही पण बोईसरच्या बाहेर पडाल तर जंगल आणि घाट आहेत). तेव्हा रात्री घराभवती छुम छुम असा आवाज यायचा असे आई म्हणते पण आता बोईसरला इतकी वस्ती झालीये की आवाज वगैरे काही येत नाही पण दर अमावस्येला घरी त्या ठीकाणी नारळ फोडला जातो, आईने तिथे एक छोटेखानी मंदीर बनवुन घेतले आहे. जे वर्णन सांगितले आहे तेच या चेडाच्या बाबतीत ऐकले आहे, पण तो कुणाला त्रास देत नाही , रात्रीच्या फेर्‍याच्या वेळी कुणी त्याच्या रस्त्यात आलं तर मात्र उडवतो असं ऐकलय, असा अनुभव एका नातेवाईकाला आलाय २-३ वर्षांपुर्वी गावात रात्री सायकल वरुन ११.३० - १२.०० च्या दरम्यान रोडवरुन जाताना दोघांना कुणीतरी जोरदार धडक दिली आणि ते बाजुला उडाले असे म्हणाले समोर काहीच नव्हते फक्त छमछम आवाज येत होता, आणि ती माणसे उगाच काही खोटे बोलणारी नाहीत.

हा बाफ म्हनजे प्रचंड करमणूक आहे. हसावे की रडावे कळत नाही. मानसशास्त्राची पुस्तके वाचा आणि बरे व्हा !

हा बाफ म्हनजे प्रचंड करमणूक आहे. हसावे की रडावे कळत नाही. मानसशास्त्राची पुस्तके वाचा आणि बरे व्हा !

अहो करमणुक आहे तर हसुन घ्याना हवे तेवढे.. उगीच रडता कशाला? आणि डॉक्टरची वाट दाखवुन होणारी करमणुक बंद तरी कशाला करता?

मला वाचायला आवडतात इथले किस्से. लहानपणी झोपायच्या आधी अशा गोष्टी ऐकायला फार मजा यायची.

हे गावाचे राखणकर्ते सगळ्या गावात असायचे. आमच्या गावात गुरवांचे मोठे घर आहे आणि ग्रामदेवतेची पुजाअर्चाही त्या घरात होते. त्या घरातुन राखण्या फेरी मारायला बाहेर पडायचा अशी वदंता होती. बाहेर पडताना कोणी दरवाजात वगैरे झोपेत लोळत आला तर त्याला उचलुन बाजुला ठेवले जाई आणि कोणी मुद्दाम अनुभव घेण्यासाठी दारात झोपला असेल तर त्याला कोणीतरी अंगावर पाय ठेऊन गेल्याचा भास होई अशा भरपुर वदंता ऐकल्यात. पण या सगळ्या वदंताच. माझ्या अंगावर पाय ठेऊन कोणी गेला हे सांगणारा कोणी मला तरी भेटला नाही.

हा बाफ म्हनजे प्रचंड करमणूक आहे. हसावे की रडावे कळत नाही. मानसशास्त्राची पुस्तके वाचा आणि बरे व्हा !>>>>>
रॉबीनहूड.... सल्ल्याबद्द्ल धन्यवाद..........

रॉबीनहुड भौ , तुम्ही मानसशास्त्राची कुठली पुस्तके वाचुन बरे झालात ते सांगा , आम्हीही ती पुस्तके वाचु Biggrin

अहो करमणुक आहे तर हसुन घ्याना हवे तेवढे.. उगीच रडता कशाला? आणि डॉक्टरची वाट दाखवुन होणारी करमणुक बंद तरी कशाला करता?
>>>

साधना , हा काही हसण्यावारी नेण्याचा किंवा मनोरंजनाचाही विषय नाही. अशा अनावश्यक भीतीच्या दडपणांमुळे जी असुरक्षिततता मनात तयार होते त्यामुळे त्याला रेमेडी शोधण्यासाठे निरनिराळे तांत्रिक मांत्रिक, बुवा, पीर , बाबा , महाराज यांच्याशी संपर्क सुरू होतो. त्यातून एक शोषणाची सिस्टीम सुरू होते आणि आयुषच उद्ध्वस्त होण्याचे धोके निर्माण होतात. त्यापेक्षा शास्त्रीय सत्य काय आहे , हार्मोन डेफिसिएन्सीमुळे निर्माण होणारे ऑप्टिकल इल्ल्युजन्स, hallucination याबाबत समजावून दिल्यास अगर घेतल्यास मन भीतीरहित, फियरलेस होण्यास मदतच होइल. बर्याचशा एन्डोक्राईन ग्लँडच्या स्त्रावाच्या प्रमाणावर अशा अनुभूती अवलंबून असतात व प्रॉपर मेडिकेशन झाल्यावर त्या भावना नष्टही होतात.
इथले लिहिणारे टेक्नोसॅव्ही दिसताहेत पण वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव आहे. हे जास्त चिंताजनक आहे. हे उद्याचे किंवा सध्याचेही पालकही असणार आहेत. त्यांनी हेच अज्ञान मुलांकडेही संक्रांत करून त्यांचे लाईफही मिझरेबल करावे काय?
मी लहानपणी कुठला चांगला ग्रॅज्युएट होईपर्यन्त चांगलाच भूत घाबरट होतो. दिवसादेखील काही जागांवरून जाताना राम राम पुटपुटत जात असे. पुढे सायकॉलॉजीचा अभ्यास झाल्यावर सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या. त्यात मुख्य श्रेय आहे शाम मानव यांचे. १९८० च्या दरम्यान त्यांचा संपर्क आल्यावर या सगळ्या गोष्टी गळूनच पडल्या. त्यातल्या त्यात डॉ अब्राहम कोवूर या श्रीलंकन सायकोथेरापिस्ट्ची पुस्तके वाचून त्यातली मानसिक आणि वैद्यकीय बाबी कळल्यावर मन एकदम निर्भय झाले...
आज अमावास्येला स्मशानात सुद्धा झोपू शकेल . मुम्बईला मी एका शांत तीन मजली इमारतीत एकटा लाईट्स घालवून झोपत असे.
त्यामुळे असल्या बाबीं ना उत्तेजन देणे म्हणजे पुढच्या पिढीला अनुचित वारसा देणे होय. त्यात फक्त पिळवणूक
करणार्‍यांचेच हितसंबंध जोपासले जातील...
हा विषय माझ्या लेखी करमणुकीचा नाही . विशेष्तः स्त्रिया मुळातच असलेल्या असुरक्षीत असलेल्या आयुष्यामुळे ह्याला फार लवकर बळी पडतात ...
तुमच्यासारख्या सिनियर आणि जबाबदारीने लेखन करणार्‍या व्यक्तीने अशी भूमिका घ्यावी याचा निश्चीतच खेद होत आहे Sad

>>>>> त्यामुळे असल्या बाबीं ना उत्तेजन देणे म्हणजे पुढच्या पिढीला अनुचित वारसा देणे होय. त्यात फक्त पिळवणूक
करणार्‍यांचेच हितसंबंध जोपासले जातील... <<<<
वुईथ ड्यू रिस्पेट युवरसेल्फ, पण अमानवीय घटना निव्वळ "शारिरिक केमिकल लोचामुळेच फक्त" होतात व त्यामुळे "पिळवणूक " करणारांचेच हितसंबंध जपले जातात हा नि:ष्कर्ष मला वैद्यानिक अंधश्रद्धेचा व एकांगी विरोधाचा वाटतोच वाटतो, शिवाय अशाच तर्का/न्यायाने, तुम्ही अन्निसवाले लोक जेव्हा "(हिंदू) देवांबद्दल" काही सांगु पाहिले तर तिथेही येऊन विघ्न आणू पहाता, व तुम्हाला भुतपिशाच्चासहित "देवधर्महि" नकोसा होतो तेव्हा तुमच्या विज्ञाननिष्ठतेविषयी निश्चितच शन्का येऊन, ती विज्ञानावरची अतिरेकी अंधश्रद्धाच आहे असे मानणे भाग पडते, व ती तशी नसेल, तर निश्चितच काही "विशिष्ट" उद्देश त्यामागे आहे असे जाणवते.
दुसरे असे की ती "पिळवणूक" वगैर जे म्हणता, त्या निवडक बाबींचा तेव्हडाच फक्त गाजावाजा होतो, पण इये देशी असंख्य लोकांना "चांगले बुवा, व त्यांचे सल्ले" मिळाल्याने उपयोग होतो त्यास तितकी प्रसिद्धी मिळत नसते. अन इथेच नक्की करु पहातो, मी डॉक्टर/वकिल /किराणा दुकानदार, इतकेच कशाला रस्त्यावरची भाजीवालीकडे गेलो तरी "माझ्या नशिबात" जर मला फसविणारेच भेटत रहाणार असतील, तर ते वरील ठिकाणी कायम भेटतीलच पण नात्यातही भेटतील... व नशिबात नसेल, तर मी कधीही फसविला जाणार नाही इतका सरळसोट व्यवहार होताना, जेव्हा डॉक्टर/वकिल्/भाजीवाला/किराणावाला इत्यादींकडुन कोणी फसविले गेले तर जसे कोणी त्या त्य डॉक्टरी शाखेस खोटे ठरवित नाही , वकिली/न्यायदानाच्या प्रक्रियेस खोटे ठरवित नाही, तर मग निव्वळ काही बुवा फसविणारे अस्तील, तर आख्खे परलोकवासियांबाबतचे शास्त्र/दाखले, देवधर्माच्या बाबीच तेव्हड्या लग्गेच खोट्या कशाकाय ठरविता? येऊन जाउन, ते हातातुन अंगारा वगैरे काढुन दाखविण्याचे थातुरमातुर प्रयोग दाखवुनच ना? लक्षात घ्या हूडा साहेब, पब्लिकचे स्वतःचे असे अनुभव असतात, व ते अनुभव विश्व फार मोठे आहे व त्यावरुनच ते योग्यायोग्यतेचा विचार करीत असतात. त्यांना सरसकट खोटे/अविश्वासार्ह ठरविणे तुमच्या कोणत्या विज्ञाननिष्ठ/बुप्रावादी बुद्धित बसते... काय की.
असो..

ओह रॉबिनभाउ अंनिसवाले का? असो असो.

इथे ज्याला ज्याला अनुभव आलेत ते मांडलेत , कुणी सीरीयसली घ्याच असं नाही , वाचा पटलं तर ठीक नाही तर सोडुन द्या करमणुक समजुन. रॉबिनभाउंना असे अनुभव आले असते तर त्यांनीही इथे अनुभव मांडलेच असते, अनुभव नाहीत म्हणुन करमणुक होत आहे त्यांची.

चांगलय.

रॉबीन,
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. पण ते अर्धसत्य आहे. या गोष्टी केवळ आपल्याला दिसत नाहीत, जाणवत नाहीत म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणणं योग्य नाही. या निर्विवाद सत्य आहेत. फक्त एकदा आपले पूर्वग्रह बाजूला करून योग्य आणि जिज्ञासू वृत्तीने यावर वाचन करावे, अभ्यास करावा. Happy

लिंबूने जे लिहिलय त्याला १००% अनुमोदन आहे.

पहिल्या भागातली करमणूक इथेही...
रॉबिनभाउ,इथे पहिले पाढे पंचावन्न असतात...
हाय काय न् नाय काय... तरीपन या बीबीवर जुने फारसे दिसत नै.सगळे नविनचेत...२-३ सोडले तर..

लिम्ब्या तुझी विचारसरणी भयावह आहेच आणि धोकादायकही. तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून माझी प्रार्थना !
जिथं तिथं अंनिस अंनिस थयथयाट केल्याने , आणि हिंदू धर्म घुसवल्याने तुम्ही काही मोठे फार धर्मवीर होत नाही. हा सगळ्याच धर्माचा प्रॉब्लेम आहे. आणि परदेशातला सुद्धा .

शाम मानवांचा उल्लेख आल्याने बहुधा लिम्ब्या आणि बाळोबाचे डोके फिरले असावे .

जिथं तिथं अंनिस अंनिस थयथयाट केल्याने >>>
तेच तुम्ही समजून घ्या आणी आ़णखी पकवू नका. धन्यवाद.

आणि शाम मानव म्हणजे तेच ना, सनातन संस्थेने मुख्यमंत्री फडणवीसांवर संमोहनाचा प्रयोग केलाय असं म्हणणारे Rofl

--------------

चला लोकहो आता नेहमीच्या पोष्टी येऊद्या.

आणि शाम मानव म्हणजे तेच ना, सनातन संस्थेने मुख्यमंत्री फडणवीसांवर संमोहनाचा प्रयोग केलाय असं म्हणणारे

>>.
असतीलही. माझ्या दृष्टीने अभ्यासासाठी डॉ. डीन कोली नावाच्या प्रसिद्ध थेरापिस्टशी ओळख करून देणारे व्यक्ती म्हणून मी त्याना ओळखतो.
असो तुमच्या डोक्याबाहेरच्या आहेत ह्या गोष्टी !

रॉबीनहूड तुम्ही म्हणाताय त्या विषयावर स्वतंत्र धागा होऊ शकेल: "वरकरणी वाटणारे अमानवीय अनुभव आणि त्यांचा झालेला उलगडा". असे प्रकार सुद्धा भरपूर असतात नक्कीच. (उदा. रात्री येणारा घुंगराचा आवाज: घुबडाच्या पायात बांधलेला घुंगरु, झोपेत आजूबाजुला काही घडत असताना त्या आवाजाने / वासाने / स्पर्शाने स्वप्न ट्रिगर होणे मग जाग आल्यावर स्वप्नातील काही खुणा प्रत्यक्षात दिसल्यावर अमानवी अनुभूती वाटणे, इत्यादि. ) कदाचित असले अनुभव लोकांनी शेअर केले तर इथल्या काही अनुभवांचा उलगडा त्यातून होण्याची शक्यता असेल.

कुणाला अमानवीय अनुभव आलाय, त्याचा अद्याप उलगडा झाला नाहीय, तो शेअर केला म्हणजे ती व्यक्ती अंधश्रद्धेला बळी पडली आहे / पडणार आहे असेच नाही. प्रत्येक वेळी ते ज्ञात असलेल्या halluncinations च्या प्रकारातच मोडते असेही नाही. मानसशास्त्राला सुद्धा अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय.
हा धागा वाचताना भूतावर विश्वास ठेवलाच पाहिजे असेही नाही.

कृपा करून या सगळ्यासाठी वेगळा धागा काढा.
रॉहु , मला तुमचे म्हणणे बर्‍याच अंशी पटले पण या गोष्टींवर विश्वास ठेवणे न ठेवणे हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस असू द्यावा.
जोपर्यंत कोणी आपल्यावर त्याचं कोणतंही मत लादत नाही तोपर्यंत आपण कोणाच्या नादी न लागलेलं बरं.
माझा स्वतःचा 'भुत' या कन्सेप्ट वर विश्वास नाही तरीही मला त्यांची भिती वाटते. मानसिक खेळ असावेत बहुदा. एखाद्याचा उंचीचा फोबिया असतो म्हणजे उंचावर काही तरी भयानक असतं असं नाही ना? तसच एखाद्याला या गोष्टी पटतात म्हणून सगळ्यांनाच पटायला हव्या किंवा भुतंखेतं असायलाच हवीत असंही नाही ना?
त्याच बरोबर ती नसावीत असंही नाही. ज्याला जे वाटतंय त्याला ते वाटू देत की.
माझ्या पहाण्यात अशी माणसं आहेत जी मानसिक आजाराला भुताखेताचं नाव देतात आणि मी कितीही माथेफोड केली तरी त्यांचंच बरोबर म्हणतात. आंगारे धुपारे करतात आणि अंतिम क्षणी दवाखान्यात पळतात Uhoh मग डॉक्टरने बरं केलं नाही म्हणून डॉक्तरच्या नावाने ओरडतात...कसं असतं ना ज्याला जे वाटतंय ते अजिबात कशानेच बदलणार नसतं ....ना चर्चेने ना त्राग्याने.. कशाला माथेफोड उगाच मग?

माझ्या बाबतीत म्हणालं तर माझा देवावर ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच या गोष्टीवर विश्वास आहे की जिथे सर्वशक्तीमान भगवंताची सत्ता आहे तिथे भुताखेतांना थारा असणे शक्यच नाही.

पण म्हणून मला श्रद्धाळू वा अंधश्रद्धाळू म्हणण्याचा अधिकार मी तोपर्यंत कोणालाच देत नाही जोपर्यंत मी स्वतःहुन त्या व्यक्तीला काही सांगायला/ शिकवायला/ विचारायला जात नाहीये.

माझा कितीही विश्वास नसला तरी मला या गोष्टी वाचायला आवडतात हे ही खर Happy

तेंव्हा माझी सगळ्यांनाच विनंती आहे की तुमचे पर्सनल स्कोअर सेटल करणं इथे थांबवा.
त्यासाठी तुमच्या तुमच्या विपू आहेत. वाहती गप्पांची पाने आहेत.गेला बाजार नवा धागा काढण्याची सोयही आहे.

क्रुपया आता इथे फक्त आणि फक्त अमानविय किस्सेच येऊ द्यात ही नम्र विनंती.

Pages