लोक बिरादरी प्रकल्प

थांबला न सूर्य कधी....थांबली न धारा - २

९ ऑक्टोबर २०११ रोजी या लेखाचा पहिला भाग मायबोली वर प्रकाशित केला होता.....
दुसरा भाग:

थांबला न सूर्य कधी.....थांबली न धारा

स्व. श्री. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांच्या परिवारात ते ही डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या पोटी जन्माला येणे हे माझे खरोखरच भाग्य आहे. जन्मापासून गडचिरोली जिल्ह्यातील लोक बिरादरी प्रकल्पात वाढलोय. तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. दुर्दैवाने बाबा आणि साधनाताई आमटे (आजी-आजोबा) यांचा अतिशय थोडा सहवास मला लाभला. बाबा - आजी दोघही चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचा कर्मभूमीत आनंदवनात राहायचे. ३-४ महिन्यातून एकदा त्यांची लोक बिरादरी प्रकल्पाला भेट असायची. १-२ दिवस राहून ते आनंदवनाला परतायचे.

लोक बिरादरी प्रकल्प - मदतीचे आवाहन

मायबोलीकरांनो,

अनिकेत आमटे यांनी सर्व कनवाळु लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.

"
लोक बिरादरी प्रकल्पात बोरवेल करावे लागणार....उन्हाळ्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवते आहे....एका बोरवेलचा खर्च अंदाजे रु.५० ते रु.५५ हजार इतका येईल...मदत अपेक्षित आहे..."