श्रीक्रुष्ण

सख्या रंग तुझा सावळा

Submitted by स्वप्नाली on 26 August, 2016 - 15:34

सख्या रंग तुझा सावळा
श्रावणी बरसे घन-नीळा
जीव आसुसला हरी-दर्शना
पावा वाजव रे कान्हा

केशर उधळीत आला भास्कर
सात अश्वान्च्या रथी स्वार
सोनसळी मोहरली वसुंधरा
कमल पुष्प मुक्त करी भ्रमरा

वाट पाहते यमुनातीरी
कधी येणार श्रीहरी
उन्हं आली डोईवरी
गोपी निघाल्या बाज़ारी

अशी जायची नाही मी घरी
घट झाला जड कटेवरी
करू नको उशीर आतातरी
पावा वाजव रे श्रीहरी

चुगल्या क़री पैन्जण
मौन धरे ना कांकण
जमल्या सख्या गौळण
पूसे, कुठे तुझा साजण

आल्या सावल्या दाटून
आला ग चंद्रमा नभी
थकली असेल वाट पाहून
आई दारातच उभी

निजले ग रान-फूल
घरी परतल्या गाई
सख्या घालीतो चांद-हूल

त्रिवार अर्जुन!!!

Submitted by आदित्य डोंगरे on 14 January, 2012 - 13:58

त्रिवार अर्जुन!!!
महाभारत! भारतीय माणसाचा जीव की प्राण! यातील अनेक पात्रांना अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आदर्श मानत आलेली आहेत. पण त्यातल्या त्यात अर्जुन हा सर्वांना, विशेषतः तरुणांना नेहेमीच हवा हवासा वाटलेला आहे. लाडका असणं ठीक आहे, पण आजच्या तरुणासमोर तो आदर्श ठेवू शकेल? होय, अगदी नक्कीच ठेवू शकेल. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात IT industry मध्ये काम करणारया तरुणांसमोर तर शब्दशः त्रिवार आदर्श ठेवू शकेल तो. त्याच्या जीवनातील ३ प्रसंगांमुळे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - श्रीक्रुष्ण