त्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.
"अद्व्या मर्दा भूक लागलिये"
"होय रे. आज या प्रोजेक्टच्या नादात वेळ एकदम फास्ट निघून गेला"
"अरे भावांन्नो आणि कोणाला भूक लागलिये काय?"
एकदम सगळे जोरात ओरडले "हो!!!"
"चला मग डबे काढा"
"मी नाय आणला","मी पण नाही","च्यामारी म्या भी नाय आणला आता काय करायचं?"
"अरे मग ३ डब्यात आपण ८ जण कसे भूक भागवणार?"
"चला मग काटा किर्रर्रर्रर्रर्ररररर ला जाऊयात"
"हे आणि काय नविन"
"ते नविन नाय, तू नविन आहेस"
"पण ही भानगड नेमकी आहे तरी काय?"
"अरे त्ये एक मिसळपावचं नवं हॉटेल निघालय हायवेवर"