“अगं तू सुयश ला घ्यायला लवकरच येशील का, अगं काही नाही कुणाशी बोलतच नाहीये तो?” असा फोन आला आणि तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मित्राच्या वाढदिवसासाठी दोन तास तरी लागतील म्हणून त्यानंतर घ्यायला जायचे ठरले होते.
आपल्याला बाबा नाही याबद्दल तो कधीही उघड बोललेला नव्हता. तिनेही कधी बाबाची उणीव भासू नये म्हणून कोणतीच कसर राहू दिली नव्हती. पाचवीतच होता कोवळेच वय त्याचे.
मत्सर मैत्रीतही काय घडवेल सांगता येत नाही. बाबा नसण्यावरून तर चिडवले नसेल?
त्याचे डबडबलेले डोळे पाहून तिच्या मनात अनुकंपा झरू लागली.
अर्थात थोड्या प्रमाणात मत्सर चांगला असंही म्हटलं जातं . कारण तो आपल्याला प्रगतीसाठी मोटिव्हेट करतो .... मी जे आधीच्या भागात म्हटलं आहे , ते अशा गोष्टींबद्दल - ज्या प्रयत्नाने मिळण्यासारख्या नसतात ... अशी परिस्थिती जी आहे तशी स्वीकारण्याखेरीज आपल्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नसतो . अशा गोष्टींबद्दल मनात पडलेलं मत्सराचं बीज हे फार विषारी ... दिसताक्षणी गोळ्या घालाव्या या लायकीचं.... फक्त प्रॉब्लेम हा की ते शोधायला गेल्याशिवाय दिसत नाही आणि आपल्याकडे त्याला मारता येईल अशा गोळ्याही नसतात .... ह्या गोळ्या म्हणजे आत्मचिंतन .. कशाकशासाठी कौन्सिलर शोधणार ...
मत्सर , असूया , जेलसी ह्या भावनेकडे फार जजमेंटल होऊन पाहिलं जातं . अमुक व्यक्ती माझ्यावर जळते , हे सांगताना मत्सर ह्या भावनेला आपण कधीही नैसर्गिक म्हणून पाहत नाही .... काहीतरी अतिशय हीन दर्जाची भावना म्हणून पाहतो.