बऱ्याच दिवसांपासून लिहायचं होत या विषयावर, पण मला सगळे मुर्खात काढणार आहेत हे वाचून. म्हणून विचार करत होतो लिहाव...? कि नाही.? आज म्हणलं लिहूच, आपण मूर्ख ठरून इतर चार जण सतर्क झाले तर काय वाईट आहे. नैका !
तर हे एकुणात दोन किस्से आहेत. दोन्ही बंगलोर ते नासिक व्हाया पुणे प्रवासात घडलेले. पहिला सौम्य, यामुळे माझी फक्त टिंगल झाली बाकी काहि नाही. दुसरा मात्र थोडा आहे, थोडा म्हणजे बऱ्यापैकी सिरीयसे. लै म्हणजे लै नाचक्की झाली आपली यामुळे बरका. काय करणार पण आता. असो.
====
भानगड १ : बंगलोर ते पुणे प्रवास.
मित्रहो,
शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.
या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.
तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.
तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
प्रतिसादांमधून संकलित झालेली माहिती मुख्य भागात आणून ठेवली आहे..
---
शिवशक्ती संगमची संपूर्ण व्यवस्था फारच प्रचंड होती. मला जेवढी आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
इतर स्वयंसेवकांनी हवी तसे वाढवावे आणि सुधारणा सुचवाव्या..
हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा होता. या कार्यक्रमाची तयारी अडीच वर्ष आधीपासून सुरु होती. यात एकूण सात शासकीय जिल्हे सहभागी होते.
प्रत्येक जिल्ह्यातून स्वयंसेवक संघस्थानावर आले त्यांच्याकरता बसची व्यवस्था होती. सर्व मिळून एकूण साधारणतः दोन हजार बसेस लागल्या.
पुण्यातील एका हॉटेलात ‘टिम आयडेंटीटी’चे गटग चालू होते. सर्व सहा सदस्य उपस्थित होते. कॉलेजात असताना ज्यांना आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा आहे अशा होतकरू तरुणांनी एकत्र येऊन ‘टिम आयडेंटीटी’ची स्थापना केली होती.
फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात.