कोणाला चांगले हापुस, पायरी वगैरे आंबे विक्रेते माहीती आहेत का?
ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मित्र/परीवारांनी अनुभव घेतला आहे.
मला मुंबईत कोणाला तरी भेट पाठवून द्यायचीय. ऑनलाईन पैसे भरायचे असतील तर उत्तम.
नसली तरी पैसे पोस्ट करेन पण खात्रीशीर ठिकाण माहीती हवे आहे. ( काळेबंधू आंबेवाले नको आहेत, खूपच वाईट अनुभव आहे दोन वर्षाचा.
परवा एका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञाचा कार्यक्रम टी. व्ही. वर लागला होता. त्यातले त्यांचे एक वाक्य मला फार महत्वाचे वाटले. त्यांनी सांगितले, ‘दिनचर्या सुधारली की, अहोराञ आरोग्याच्या समस्या काढता पाय घेऊ लागतात.’ म्हणजे, दिनचर्या वेळेवर पाळू लागलो की शरीर पण शहाण्यासारखं वागू लागतं!
माणुस हा असा प्राणी आहे जो फक्त पोट भरण्यासाठी खात नाही,जे खातो त्याची चव कशी आहे याचा सखोल विचार करणारा माणुस हा एकमेव प्राणी असावा.पण प्रत्येक माणसाला एखाद्या पदार्थाची चव सारखीच लागते असा आपला समज आहे.पण तो खरा नाही.याचा शोध म्हणावा असा प्रकार १९३१साली लागला.
नमस्कार,
जी औषधे नेहमी थंड तपमानात ठेवावी लागतात अश्या औषधांकरता प्रवासात कोणती कूलर बॅग वापरावी? त्यात जास्तीत जास्त किती काळाकरता औषधे थंड राहू शकतात? आठ-दहा दिवसांच्या प्रवासाकरता जर मध्ये कुठेच फ्रिजची व्यवस्था नसेल तर कोणती कूलर बॅग वापरणे फायद्याचे आणि सोयीचे ठरेल? मी नेटवर शोधाशोध केली तर ३० तास कुलींगकरता आठ हजार रुपये वगैरे किंमतीच्या बॅगा उपलब्ध आहेत. तुम्हा कोणाला अश्या बॅगा वापरायचा अनुभव असेल तर तुमचे अनुभव जरूर मांडा.
अनेक धन्यवाद.
सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.
वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास ! निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं.
टक्कल पडायला लागणे हे कोणत्याही पुरुषाला इन्फेरीओरीटी कॉम्प्लेक्स द्यायला पुरेसे असते.
माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड(पौर्वात्य)ऑस्ट्रेलॉईड्स(भारतीय),निगरॉईड्स(आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत ,तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत.बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत(creativity)खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.जर पौर्वात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त असेल तर बहुतांश शोध ,सर्ज
बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं.