Breaking point.
काल परवा "आयत्या घरात घरोबा" चित्रपट बघत होतो, शेवटी जेव्हा अशोक सराफ छत्री गोल फिरवत निघतो, तेव्हा नकळत डोळे ओलावले. मग सहज आठवून पाहिलं की एरव्ही माझ्यासारखे बऱ्यापैकी दगडी मनाचे लोक कोणते चित्रपट वगैरे बघताना हळवे होत असतील.. सुरुवात माझ्यापासून करतो, मला सगळ्यात जास्त भावनिक करणारे चित्रपटातील प्रसंग..
१. साला ये दुख काहे खतम नहीं होता बे? (मसान- शालू गुप्ताचा मृत्यू)
२. ऑक्टोबर चित्रपट (वरुण धवनला सहन करता येईल असे दोनच चित्रपट आहेत, ऑक्टोबर आणि बदलापूर).
३. हायवे -हिंदी. महावीरला गोळी घातल्यावर आलियाचं रडणं बघून..
४. सदमा... (अगतिक, असहाय्य कमल हसन)