क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या तासात ३ गेल्या
नंतरचा तास विकेट लेस
पहिल्या सेशनमध्ये ३१ ओवर टाकल्या
अजून एक सेशन दोन तास हेच दोघे खेळले तर मजा येईल अखेरच्या सत्रात

सात!
नाही आठ!

हार्मर सहावी विकेट
रेड्डी तिसराच बॉल रिव्हर्स स्वीप करताना शून्यावर बाद

$%%&&*&**((!
नऊ
इतनी जल्दी क्या है? कुठे जायचे आहे?

4 वाजता हरण्यापेक्षा साडेबाराला हरलो हे एका अर्थी चांगलेच झाले असे आता वाटत आहे.
उरलेली सुट्टी दुसऱ्या मनोरंजनाच्या कामात वापरता येईल.

नका हो असे रागावू आपल्या फलंदाजांवर ! इथिओपियातून आलेल्या धुळीच्या ढगांमुळे चेंडू दिसतच नव्हता असणार त्या बिचाऱ्याना !!!!

IMG_20251126_105131.jpg

भाऊ, तुम्ही बरोब्बर सांगितले! तसेच हाँङकाँगला पण एक मोठ्ठी आग लागली, त्यामुळे सुद्धा असेल.
कारण सुदर्शन, जुरेल, राहुल, यांच्यासरखे फलंदाज नि गंभीर सारखा कोच असता भारताला कोण हरवू शकेल?

गंभीर सारखा कोच असता भारताला कोण हरवू शकेल?
>>
गब्बर के ताप से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है, खुद गब्बर च्या टोन मधे या प्रश्नाचं उत्तर : खुद गंभीर

गंभीर ने हे ट्रांझीशन मधे होणारच असे म्हटलय. हे बरोबर आहे पण ट्रांझीशन तूच फोर्स केलेस ना लेका ? मग सक्सेशन प्लॅन तयार ठेवायला हवा होता हे लक्षात नाहि आले का ? दर सामन्यामधे कोणी तरी कुठल्यातरी अनपेक्षित क्रमांकावर फलंदाजी करतो हे म्हटल्यावर सेटल कसे होणार लोक ?

वाशीला डेव्हलप व्हायला वेळ द्यायला हवे हे म्हणताना त्याला आधीच्या टेस्ट मधे किती बॉलिंग दिली हे बघणार का ? कि फिल्डींग करून त्याने तयार होणे अपेक्षित होते ?

गंभीरने काय फलंदाजांना ' विकेटवर थांबाल तर खबरदार !' , अशी तंबी दिली होती का ? खेळाडूंनी अपयशातला आपलाही मोठा वाटा उचललाच पाहिजे !!!!

“गंभीर ने हे ट्रांझीशन मधे होणारच असे म्हटलय.” - हे बॅट्समेनच्या बाबतीत मान्य करता येईल (सक्सेशन प्लॅनिंगचा मुद्दा आहेच), पण बॉलर्सचं काय? बुमराह, सिराज, कुलदीप, जडेजा हा काही अननुभवी बॉलिंग अ‍ॅटॅक नाहीये.

बाय द वे, आयसीसीने पर्थ च्या पीचला ‘व्हेरी गूड‘ रेटिंग दिलंय. गूड कॅरी, लिमिटेड सीम मूव्हमेंट आणि कन्सिस्टंट बाऊन्स मुळे. ( रेफ्री लंकेचा होता).

गंभीरने काय फलंदाजांना ' विकेटवर थांबाल तर खबरदार !' , अशी तंबी दिली होती का ? खेळाडूंनी अपयशातला आपलाही मोठा वाटा उचललाच पाहिजे !!!! >> मान्य पण त्यांच्या एकंदर अ‍ॅप्रोचमागे गंभीर चे धोरण कारणीभूत आहे असे मला वाटते. - सतत फलंदाजीमधे वर खाली करणे, हॉर्सेस फॉर कोर्सेस सारखे संघातून आत बाहेर करणे ह्यामधून नॅचरल खेळावर मर्यादा येते नि एकदा तसे झाले कि मग ....... शॉर्ट फॉर्मॅटच्या चँपियन्स खेळाडूंना टेस्ट सारख्या वेगळ्या फॉर्‍मॅटमधे फास्ट ट्रॅक करणे हा मुद्दा तर आहेच.

गंभीरसारख्या खडूस बॅटसमन ला त्याचा अ‍ॅप्रोच कोच म्हणून भारतीय बॅटसमन मधे परावर्तित करता येत नाही ह्यासारखी आयरनी नसावी Happy

“गंभीर चे धोरण कारणीभूत आहे असे मला वाटते. - सतत फलंदाजीमधे वर खाली करणे, हॉर्सेस फॉर कोर्सेस सारखे संघातून आत बाहेर करणे ह्यामधून नॅचरल खेळावर मर्यादा येते नि एकदा तसे झाले कि मग ....... शॉर्ट फॉर्मॅटच्या चँपियन्स खेळाडूंना टेस्ट सारख्या वेगळ्या फॉर्‍मॅटमधे फास्ट ट्रॅक करणे हा मुद्दा तर आहेच” - टोटली सहमत.

आपण कधीही मान्य करायचे नाही कि SA चे खेळाडू आपल्यापेक्षा चांगले खेळले. जयस्वाल आणि के एल राहुल ते त्यांच्या जागेवरच खेळत आहेत, त्यांनी काय दिवे लावले?

* गंभीर चे धोरण कारणीभूत आहे ..* - मान्य, पण गंभीर हाच सर्वस्वी जबाबदार आहे अशी हवा निर्माण करणं ही स्वतःची फसवणूक होईल, असं मला वाटतं. राष्ट्रीय संघात गुणवत्तेवर स्थान मिळवलेल्या खेळाडूंना मैदानात उतरल्यावर परिस्थितीनुसार स्वतःचं कसब दाखवणं ह्या प्रेरणेपलीकडे इतर सर्व बाबी गौण वाटतात - व तशा वाटल्याच पाहिजेत - ही माझी समज आहे. त्यामुळे, गंभीरची सबब इतक्या वाईट कामगिरीला देणं साफ चुकीचं आहे, हे माझं प्रामाणिक मत. अर्थात, द. आफ्रिकेला श्रेय देणं योग्यच.

हॉर्सेस फॉर कोर्सेस . कसोटी साठी योग्य असे खेळाडू निवडले होते का? संघ तसा होता का? त्यामागे विचार काय होता? मी वाचलं की आपल्या संघात ६ डावखुरे फलंदाज होते. पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेच्या ऑफ स्पिनरला ८ बळी मिळाले.

पराभवाचं एक कारण संघनिवड हेही आहे. आणि त्याला जबाबदार कोण?

# आपले ते हे मोड ऑन.

पहिली कसोटी ५ सत्रांत आटोपली. पण दुसरी आपण पाच दिवस खेचली. ही प्रचंड मोठी सुधारणा आहे.
आणखी सामने असते तर तिसरा आपण ड्रॉ केली असता. चौथा चुरशीने आणि पाचवा आफ्रिकेला लोळवून मालिका बरोबरीत सोडवली असती.
आता कसोटीचा सूड एकदिवसीय सामन्यांत उगवतो की नाही पहा. आपले ते हे पण बॅट परजून तयार आहेत.

एकूणच मालिका रटाळ झाली.
आता फार चर्चा करायची सुद्धा इच्छा राहिली नाही.

नेहमी कसोटी मालिकेची जास्त उत्सुकता असते पण अश्या गचाळ मालिकेनंतर आता वन डे मध्ये रोहीत शर्माला खेळताना बघायला मिळेल याची उत्सुकता जास्त आहे.

तीनच सामने आहेत. पाच हवे होते. असो, निदान एक शतक आणि एक अर्धशतक बघायला मिळावे अशी इच्छा.
कोहली देखील चांगले खेळावे अशी इच्छा. दोघांना २०२७ वर्ल्डकप खेळताना बघायचे आहे

@ भरत,

आफ्रिका गेल्यावेळी आपल्याकडे आली होती तेव्हा हे चित्र होते.
आफ्रिकेचा भारत दौरा २०१९–२०

पहिली कसोटी
सामनावीर – रोहीत शर्मा
दोन्ही डावात शतक
१७६ & १२७

दुसरी कसोटी
सामनावीर – विराट कोहली
नाबाद द्विशतक २५४

तिसरी कसोटी
सामनावीर – रोहीत शर्मा
द्विशतक २१२
सुरुवातीला भारताची स्थिती ३९–३ होती. पण अखेर डावाने विजय

मालिकावीर रोहीत शर्मा
४ डावात ५२९ धावा
सर्वाधिक विकेट आर आश्विन

भारत ३ – ० आफ्रिका
त्यातील दोन डावाने जिंकलो.

शर्मा ३ सिक्स मारून वर्ल्ड रेकॉर्ड. अजून थांबायला पाहिजे होता.
आता गायकवाड आलाय म्हणजे कारभार आटोपल्यात जमा. द्रविड जसा टुक टुक खेळायचा तशीच कंटाळवाणी ब्याटिंग.

या फॉरमॅट मध्ये रोहित आणि कोहलीला पर्याय नाही हेच खरे !!

विराट कोहली smashed his 52nd century in the odi format and has now broken Sachin Tendulkar's record for the most tons in a single format.

Pages