मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 April, 2025 - 14:06

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

हो, जोरदार चर्चा चालू आहे
बातम्या बघत असाल तर कल्पना असेलच.

१) असे झाल्यास सर्वसामान्य जनता ज्यांना राजकारणात फारसा रस नसतो त्यांचे मत काय असेल हे जाणून घ्यायला कुठल्या बातम्या बघायची किंवा सर्व्हे करायची गरज नाही.
पण तरी या व्हिडिओ मधील मतेच कानावर पडतील याची खात्री आहे.

https://youtu.be/rtSd_uMpi1I?si=tSmz4uAb7xdlO5hD

२) राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा दोन-तीन गटात विखुरले गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना, बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या मतदारांना, त्यांच्या घरातील नव्या पिढीला सुद्धा या दोन भावांनी एकत्र यावे असे आतून कुठेतरी वाटत असावे हे खात्रीने सांगू शकतो.

३) इकडचे तिकडचे फुटलेले सारे मावळे शिंदे ठाकरे एकत्र होण्याची शक्यता आहे. कारण भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत.

४) गेले काही वर्षे आपण महाराष्ट्रात अगदी कोणाचीही… कोणाशीही आणि केव्हाही युती झालेली बघितली आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र यायला लाजायची बिलकुल गरज पडणार नाही.

५) सध्या मराठी विरुद्ध हिंदी मुद्दा जोरदार चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर हे मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आले तर नक्कीच भरघोस पाठिंबा मिळणार याची खात्री वाटते. कारण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवणाऱ्या मराठी माणसांकडे तसाही दुसरा कुठला पर्याय दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती शिवाय आपली मराठी वाचू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे यांनी ही वेळ साधली तर तो मास्टरस्ट्रोक ठरेल.

काय बोलता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तासाही हिंदीच्या मुद्द्यावर सरकारने माघार घेतली असल्याच्या बातम्या आहेत. दुसरं म्हणजे निवडणुका भरपूर लांब आहेत अजून. तो पर्यंत हिंदीचा मुद्दा संपून जाईल.
खरं तर स्वतःच्या अस्तित्वसाठी हे दोघ एकत्र आले तर आले नाहीतर शक्यता वाटत नाही. आणि समजा एकत्र आलेच तर जास्त काय होईल असं वाटत नाही. फक्त मुंबईत राहून प्रत्येक गोष्टीला विरोध करून मत मिळणार नाहीत. ऐन निवडणुकीतही हे दोघे फार फार तर एक दोन सभा घेत असतात. त्यामुळं मुंबई बाहेर समार्थन तर मिळणारच नाही.
त्यामुळे फक्त मीडिया मध्ये थोडी फार हवा होईल प्रत्यक्ष जमिनीवर नाही.

यंदा मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे.
तिथे सत्ता आली तर बरीच आर्थिक गणिते बदलतील.
उर्वरित महाराष्ट्राचा विचार इतक्यात करायची गरज नाही.

>>खरं तर स्वतःच्या अस्तित्वसाठी हे दोघ एकत्र आले तर आले नाहीतर शक्यता वाटत नाही. आणि समजा एकत्र आलेच तर जास्त काय होईल असं वाटत नाही.<< +१
गेल्या विधानसभेच्या निवडणुकित मनसेचे आमदार शून्य, आणि सेनेला काँग्रेस्/मुस्लिम वोट बँकेच्या कृपेने मतं मिळाली. परंतु मूळात प्रॉब्लेम हा आहे कि दोघांचीहि ठोस अशी भूमिका नाहि, विचार नाहि. दोन्हि पक्ष महाराजांचं नांव घेउन मोठे झाले, पण त्यांना महाराज कधी कळलेच नाहित. महाराजांनी पेटवलेली स्वराज्याची विचाररुपी मशाल, त्यांच्या निवर्तनांनंतर १००+ वर्षं पेटत राहिली. आणि इथे यांनी हातात घेतलेला एकमेव मराठी माणसाचा मुद्दा साफ फेल गेलेला आहे. सेना तर आता उघडपणे गुजरात्यांची लाल करण्यात धन्यता मानत आहे. मुंबईत मराठीचा टक्का घसरतोय हे सांगताना यांना लाज वाटत नाहि, कारण गेली कित्येक वर्षं यांनी अवलंबलेली धोरणं मराठी माणसाच्या उरावर बसणारी आहेत हे एकतर समजण्याची प्रगल्भता यांच्यात न्हवती, किंवा त्याला विरोध करण्याची ताकद..

मुंबई महानगरपालिका हि कॅशकाउ आहे, जिच्या जोरावर सेनेने मंत्रालयाचा सहावा मजला काबिज केला. सेना+मनसेने मुंबई महानगरपालिका जिंकली तर यांना काहितरी भवितव्य आहे, अन्यथा हे दलित पॅन्थरच्या मार्गावर आहेत. कारण सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाहि...

राज ठाकरे यांच्या पक्षाचे अस्तित्व संपलेले आहे. ते छान टिका नक्कल करतात, सभेला गर्दी खेचतात, पण त्यांच्या पक्षाचे लोक निवडून येत नाही. ED, CBI च्या धाकापुढे सहज लोटांगण घालतात तर कधी अचानक सत्तेला आरसा दाखविण्याचे धाडस करतांना दिसतात पण त्यातही सातत्य नाही.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील पण ते स्वत: साठी... मराठीसाठी नाहीच.

ED, CBI च्या धाकापुढे सहज लोटांगण घालतात तर कधी अचानक सत्तेला आरसा दाखविण्याचे धाडस करतांना दिसतात पण त्यातही सातत्य नाही.
>>>>
जर पॉवर आली तर धाकापुढे लोटांगण घालायची गरज पडणार नाही. अन्यथा तसेही भाजपा सोबत जे आहेत ते लोटांगण घालणारेच आहेत. आणि भाजप खुद्द धाक दाखवणारे. ते पाहता कधीतरी अचानक का असेना सत्तेला आरसा दाखवणे जमेची बाजू आहे.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील पण ते स्वत: साठी... मराठीसाठी नाहीच.
>>>>>
लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे नेते दुर्मिळच. ते स्वतःसाठीच येऊ देत एकत्र. पण मुद्दा मराठीचा घेऊन येऊ शकतात. आणि तो मुद्दा घेऊन आले तर निदान त्यात तरी काही चांगले करणे त्यांना भाग आहे. मधल्या काळात चुका सगळ्यांनीच केल्या आहेत. यांना सुधारायची संधी आहे.

मुद्दा मराठीचा आता राहिलेला नाही.विधानसभा निवडणूक प्रचारात राजने उद्धववर सडकून टीका केली आहे. कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षाला सत्तेसाठी जाऊन मिळाल्यावर सरळ सरळ गद्दार म्हटले आहे. आणि मुसलमानांकडून हिंदुत्ववादी असल्याचं प्रमाणपत्र घेण्यावरही टीका झाली. आता दोघेही परदेशात बोलणी करणार अशी वदंता आहे. पहलगाम हत्याकांड झाल्यावर मोदी ताबडतोब परत आलेत सौदीमधून, हे दोघे परत येणार का आणि आपली निष्ठा , हिंदुत्ववादी आहे हे दाखवणार का हा नवीन मुद्दा लक्षात घ्या.

उबाठा सेनेशी युती करण्यास मनसे चे मोठे नेते मनाने तयार नसल्याचे चित्र आहे. उबाठा सेनेने काही अटी घातल्या आहेत.

मुद्दा आणि ठाकरे दोन्ही आता इतिहासजमा झाले आहेत.

मुद्दे मिळत नसतील तर रस्त्यावर उतरा आणि लोकांमध्ये फिरा, त्यांच्याशी बोला. एकेक आयुष्य पुरणार नाही इतके मुद्दे मिळतील. ते करायचे सोडुन ही नाटकेच करायची असतील तर आता तुम्हाला व तुमच्या नाटकांना प्रेक्षक उरले नाहीत हे तरी समजुन घ्या. तेही समजत नसेल तर कमावलेल्या पैश्यांचा उपभोग घेत निमुट पडा. स्वतःचे हसु करुन घेऊ नका.

मधल्या काळात चुका सगळ्यांनीच केल्या आहेत. यांना सुधारायची संधी आहे >>>
हे दोघे आणि त्यांनी केलेल्या चुका आता सुधारण्यापलिकडे गेल्या आहेत! दोघे एकत्र आले तर त्यांना जो काही थोडाफार जनाधार उरलाय तो पण घटेल.

दोघे एकत्र आले तर त्यांना जो काही थोडाफार जनाधार उरलाय तो पण घटेल.
>>>

प्लस मायनस होणारच. पण ओव्हरोल वाढेल असे मला वाटते. निदान मुंबई बाबत तरी. कारण मी जनमत बघितले आहे जवळून.
आणि तसेही स्वतंत्र राहून त्यांना भविष्य उरले नाही असे मला वाटते. आता अहंकार हट्ट दाखवतील तर राजकारणातून कायमचे बाहेर पडतील. ते नको असेल तर येतील एकत्र.

दोघही एकत्र येणार नाहित, ..आले तरी मतदाराला काहिही फरक पडणार नाही...दोघही आलमोस्ट सपलेले पक्ष आहेत...मनसे तर आता मायनस मधे जाइल...दोघही नेतेही धडधडुन राजकारण करणारे नाहित...दोघाकडेही अमाप पैसा आहे...पुढच्या ७ पिढ्या खावुन सपणार नाही इतका...दे हार्डली केअर! राजकारण हा साइड बिझनेस आहे..फक्त रेलिव्हन्स राहावा...ठाकरे पुत्र म्हणून लोकानी आपला उदो उदो करत राहाव म्हणून...नथिन्ग मोअर नथिन्ग लेस!

>>> कारण भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत.

सध्या?

मग त्यामुळे शिंदेसाहेब पद सोडणार आहेत का?
=====

'भाजपा को लेकर" या हिंदी विधानाचे 'भाजपला घेऊन' असे तर केले नाहीयेत ना? की तो मास्टरस्ट्रोक आहे?

=====

महाराष्ट्राचा स्वतंत्र पासपोर्ट, व्हिसा आला की मराठीबाबतचे नियम करणे त्या दोघांना जरा सोपे जाईल बहुतेक

'भाजपा को लेकर" या हिंदी विधानाचे 'भाजपला घेऊन'
>>>>
अच्छा, हा शब्द असा हिंदीतून शब्दशः भाषांतर करून आला आहे का... असे बरेच शब्द सवयीने वापरले जातात. लक्षात आले की काळजी घेतो.

सध्या? >>> २०२४ निवडणूक निकालावरून आणि शिंदे गट सुद्धा सध्या नाराज असल्याचे कानावर पडते त्यामुळे सध्या म्हणालो.

"नाजायज अफरातफर" व्वा.
भाषा प्रवाही पाहिजे. नाहीतर भाषेचे डबके होईल.
नाहीतर आपण आजही
"श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।"
असेच लिहीत राहिलो असतो.

केकू +१
शब्दांची अशी नाजायज अफरातफर बंद केली तरी मराठीवर पुष्कळ उपकार होतील. >> असं काही नसतं! लोकांना आवडलं तर लोक तसेच शब्द वापरणार आणि तेच रुढ होऊन भाषेत समाविष्ट होणार.

मला वाटते की साजिरा ह्यांचा तो प्रतिसाद ॠच्या तंगड्या खेचण्यासाठी उपरोधिक स्वरूपाचा असणार. ॠच्या धाग्यावर अशा गमती जमती चालतात and I think he enjoys it.

माझी बोलीभाषा बंबैया मराठी आहे. त्यामुळे अश्या चुका माझ्या बोलण्यात लिहिण्यात खूप होतात. मायबोलीवरचे जाणकार मंडळी त्या हुडकत असतील तर ते चांगलेच आहे. ज्या ज्या पटतात त्या मी शक्य तितके त्या बदलायचा प्रयत्न करतो. निदान लिहिण्यात तरी काळजी घेतो. कारण मायबोली पलीकडे भले मोठे जग माझ्या आजूबाजूला आहे जिथल्या लोकांना माझी मराठी सुद्धा भारी वाटते. हो खरेच असे आहे. वासरात लंगडी गाय टाईप.. झाल्यास मी यावर स्वतंत्र धागा काढतो. तसेही मराठी प्रेमाचा धागा शिल्लक आहेच. पण इथल्या कित्येक लोकांची मराठी फार उच्च दर्जाची आहे. तिथवर मी जाऊ शकत नाही आणि कदाचित जायचे सुद्धा नाही. पण तरी इथून छोट्या मोठ्या गोष्टी शिकून माझी मराठी अजून कशी सुधारता येईल हेच बघत असतो.

हो, बंबैय्या मराठी हा शब्द प्रचलित नाही. मीच पहिल्यांदा वापरला. सांगायचा मुद्दा हा की हिंदीचा प्रभाव असलेली मराठी. गंमत म्हणजे अशा हिंदीचा प्रभाव जी स्वतःही शुद्ध आणि सात्विक नसून ती देखील बंबैय्या आहे Happy