एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदू मुस्लिम वाद फार जुना आहे. मुस्लिमांसाठी पाकिस्तानची मागाणी तीस सलीच झाली होती. त्याच्या आदीच वेगळेपणाची भावना होतीच. सहज देत नाही म्हटल्यावर त्यांनी हिंसा करून आपल्या देशाचे तुकडे पाडले. बरं स्वातंत्र्य झाल्या नंतर एकमेव मुस्लिम राज्य असलेल्या काश्मिरात हिंदुना हाकलून देण्यात आलं. वेळोवेळी पाकिस्तान ची मदत घेऊन कुठे बॉम्ब स्फोट कर, कुठे Ak-57 ने मुदडे पाड आणि आत्ता तर वेळ आहे म्हटल्यावर नाव विचारून आणि संशय आला तर कलमा म्हणायला लावून हिंदु पुरुषांचे जीव घेतले. त्या विरोधात बॉयकॉट वगैरे म्हणजे सूर्याच्या तेजची तुलना विजलेल्या मेणबत्ती बरोबर करण्यासाखे आहे. पण त्याला हिंदू कडून समर्थन मिकाणारच नाही कारण हिंदू सहिष्णू आहेत. लोकं परत काश्मिरात जायला लागली. पण एकमेकां विरोधात नक्की आहेच.
अजून एक दहशतवादाला नक्कीच धर्म असतो.

<< आत्ता तर वेळ आहे म्हटल्यावर नाव विचारून आणि संशय आला तर कलमा म्हणायला लावून हिंदु पुरुषांचे जीव घेतले. >>

----- ( असे खरोखरच झाले असेल तर ) ते मानवतेचे शत्रू आहेत.

<< त्या विरोधात बॉयकॉट वगैरे म्हणजे सूर्याच्या तेजची तुलना विजलेल्या मेणबत्ती बरोबर करण्यासाखे आहे. >>
----- बॉयकॉट तर फार आधीपासून आहेच. आता तर हवे हवेसे वाटणारे कारण मिळाले आहे. so sad.

<< अजून एक दहशतवादाला नक्कीच धर्म असतो. >>
----- भवरलाल जैन यांना मारणार्‍याचा धर्म कुठला?

धर्म विचारुन मारल्या जाणे यावरुन हे कृत्य फार विचारपुर्वक रचले गेले आहे असे दिसते. मुस्लिम धर्माबद्दल समस्त भारतीयांच्या मनांत राग, घृणा यावी असे हे कृत्य आहे. जे होत आहे ते वाईट आहे.

ब्रिटिशांनी पाकिस्तान सहज दिला. त्यांनाच पाकिस्तान हवा होता , असं मानायला जागा आहे.
हिंसा दोन्ही बाजूने झाली होती.
जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर. तीन संस्थाने. तुलना केली तर काय दिसते?

वर लिहिलंय, तेच. बॉयकॉट हे आता पहिल्यांदा काढलेलं नाही. बॉयकॉटसाठी हे नवं निमित्त आहे. आर्थिक बहिष्काराचा प्रचार खूप आधीपासून सुरू आहे.

अदानीच्या पोर्टवर उतरलेल्या गांजाने पहलगामसाठी फंडिंग झालं. अदानीवर बहिष्कार कधी?

( असे खरोखरच झाले असेल तर )
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? जे वाचलेत ते खोटं बोलत आहेत की मुस्लिम द्वेष वाढावा म्हणून त्यांना तस बोलायला सांगितलं आहे? का न्यायालयात अजून सिद्ध झालं म्हणून विश्वास नाही? का अजून काही.

जे लोक असे झाले हे सांगत आहेत ते खरेच सांगत असतील. रोख द्वेष भावना पसरवण्या बद्दल आहे. मुस्लिम धर्माला भारतापासून तोडण्या च्या कटाचा भाग आहे. गेलेले २६ जिव तर आता परतणार नाहीत.

पुलवामाच्या वेळी, स्फोट झाल्याच्या काही तासांत राज्यपाल मलिकांना शांत रहाण्याचा " सल्ला " मिळाला होता याची पण आठवण होते.

<< उदय, नावं विचारून, कलमा पढायला लावून मारलंय. स्त्री पुरुष अशा दोघांनी सांगितलय. >>
------ no words, sad. Sad

बैसरन व्हॅली दोनच दिवसांपूर्वी पर्यटकांसाठी खुली केली गेली, तेही आम्हांला न कळवता , अशा पुड्या सोडणार्‍यांनी त्यापेक्षा राहु केतू आले होते, असं तरी सांगायचं.

हा प्रतिसाद मी दुसऱ्या धाग्यावर दिला आहे.
राजेंद्र साठे ह्या पत्रकाराने लिहिलेला "मुस्लीम नावाचा राक्षस "
https://rightangles.in/2017/05/30/devil-called-muslim/
अत्यंत वाचानीय लेख.
आणि हा अजून एक प्रियांका तुपे ह्यांचा लेख
https://aisiakshare.com/index.php/node/8389

साठे यांनी लिहिलेल्या लेखांशी रेलेट करू शकलो. लेकीच्या वर्गात एक मुसलमान मुलगा आहे. पाहलगाम घडल्यावर त्याच्या समोरच बाकीच्या मुलांनी जे काही गरळ ओकले ते लेकीने घरी येऊन सांगितले. त्या मुलाची कशी कानकोंडी अवस्था झाली हेही सांगितले. समाज दुभंगत जातोय. अघोषित गाजा आपण निर्माण करतोय. हे खुप वाईट होत जाणारे. आणि हयात हिंदू देखिल तेव्हढेच भरडले जाणारेत हेही नक्की.

<<<हे खुप वाईट होत जाणारे. आणि हयात हिंदू देखिल तेव्हढेच भरडले जाणारेत हेही नक्की.>>>

---- exactly, कोणीही सुटणार नाही.

राजेंद्र साठे यांच्या लेखाचे सार म्हणजे आदी स्वतः घाण करायची आणि वास आला की म्हणायचं याचा त्रास होतोय.

रात्रीचे चांदणे
मान गये आपकी पारीखी नजर को.
Man Of Match ह्या खिताबाचे आपण मानकरी आहात.
हे म्हणजे संत्या जुवेकराच्याही वरताण आहे.

केंद्र सरकार जातिनिहाय जनगणना करणार - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

(बिहार निवडणुका ? #)

मास्टरस्ट्रोक #

पहलगामवरून जनतेचे लक्ष विचलित #

नरेंद्र मोदींनी एका रात्रीत २८ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घातली, आणि पाकिस्तानात जणू भूकंपच आला! रस्त्यापासून संसदेपर्यंत, लष्करापासून गल्लीपर्यंत, सगळीकडे हलकल्लोळ माजलाय.
- इस्लामाबादेत पाकिस्तानच्या संसदेवर दगडफेक!
- पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी राजीनामा दिला आहे.
-युट्युब चॅनल बंदीमुळे पालिस्तानी लष्कराची सप्लाय चेन कोसळली.
-पाकिस्तानात मटण महागले, बोकडचोरीच्या घटना वाढल्या.
- कराचीत लोक उंच बिल्डिंगवर चढून उड्या टाकताहेत कारण खायला काही नाही.
- सिंधू नदीत उड्या टाकून अनेकांची आत्महत्या, कारण मोदींचा मास्टरस्ट्रोक!
-पाकिस्तानचे नेते मिळेल ती फ्लाईट पकडून देश सोडताहेत.
-अतिरेकी गुफेतून बाहेर येऊन स्वतावर गोळ्या झाडताहेत.
- अनेक मुल्ला मौलवींचे पाकिस्तान सोडून पलायन!
- “28 चॅनल बंदीचा मास्टरस्ट्रोक मागे घ्या” पाकी पंतप्रधानांची मोदींकडे भीक!
- युट्यूब चॅनल बंदीने पाकी पंजाबातील गहू उत्पादनावर परिणाम. पाकी शेतकरी हवालदिल!
- पाकी परिवहन यंत्रणा कोलमडली!
- गहू पाकी सीमांवर अडलेला, युट्युब चॅनल चालू झाल्याशिवाय गहू देशाबाहेर निघणे कठीण!
- पाकव्याप्त काश्मीरात बर्फ वितळण्यास सुरुवात, ह्यामागे मोदींची २८ युट्युब चॅनलवरील बंदी कारणीभूत, जागतिक हवाईसुंदरी असोसिएशन च्या प्रमुखांचे मत!
- हे सगळे पाहून मोदी, डोभाल नी शहा ह्यांनी पार्टी केल्याची बातमी.

6 months of tenure left, Govt recalls Krishnamurthy V Subramanian from IMF board
Concerns flagged over ‘impropriety’ linked to his book promotion, violation of 'internal protocols,' say sources

गुणव त्ते पेक्षा जीहुजुरीला महत्त्व दिल्याचे परिणाम. नोटाबंदीचं समर्थन केल्याचं बक्षीस म्हणून मुख्य आर्थिक सल्लागार झाले होते.

मी लहान होतो तेव्हा जत्रेतून एक खेळण्यातली कार घेऊन आलो होतो. मागे ओढल्यावर पुढे जाणारी कार होती, वेगळीच होती, खूपच फास्ट आणि जास्त वेळ चालायची. एका पोराला ते बघवत न्हवतं तो सारखा मला चिडवायचा. हळूहळू त्याची डेरिंग वाढली आणि तो चक्क घरापर्यंत मला येऊन चिडवायला लागला. माझी तळपायाची आग मस्तकात गेली. त्या जत्रेतून मी एक लाकडी तलवार पण आणली होती ती मी हातात घेतली. त्याकाळी अलिफ लैला सीरियलीत सिंदबाद समशेरे सुलेमानी तलवार वापरताना या अल्ला कर मदत बोलून तलवार चालवायचा हे मी बघितलं होतं आणि मी पण त्या लाकडी तलवारीला स्मशेरे सुलेमानी समजायचो. मी ती तलवार वर उचलली आणि जोरात या अल्ला कर मदत बोललो आणि त्वेषाने त्या पोराच्या अंगावर चालून गेलो. माझा तो अवतार पाहून पोरगा जो काय पळत सुटला विचारू नका. मी त्याला गाठून तलवारीचे दोन रट्टे पाठीवर टाकले तसा जमिनीवर पडून कळवाळायला लागला. मॅटर मोठा आहे समजताच मी तिथून फरार झालो.

आई मला छोटीशी तलवार देना!
तलवार घेईन शत्रूला घेरीन,
रट्टे देईन पाठीत सप सप सप!
-छोटा बोकलत!

हो. मीही ही बातमी वाचली. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांचे नंबर तफावतीत शेवटचे आहेत. पहिलं मॉडेल स्टेट गुजरात. राजस्थान वर आणि उत्तर प्रदेश बरंच मागे हे पाहून नवल वाटलं.

ह्या बातम्या युद्धात विरून जातील. आणि जनतेला देखिल काही पडलेली नाहीये. असो.
आजचा लोकसत्ता मधील अग्रलेख वाचला का ?

During her visit to Madhya Pradesh’s Satpura Tiger Reserve in November, actor Raveena Tandon found herself in a controversy after a complaint was filed regarding her safari vehicle trying to obstruct a tiger’s movement. Raveena raised the matter with the Maharashtra forest authorities who spoke to their MP counterparts. Result? MP forest minister Kunwar Vijay Shah invited Raveena to a ‘forest fair’ in Bhopal as a guest and then sent her on a safari to Satpura with his family members. Later, the actor clarified that she was unfairly targeted. This was not the first time Shah displayed star-struck behaviour. In 2020, he had sent a dinner invite to Vidya Balan who was shooting for a film in MP. When the actor declined the invite, he reportedly disallowed the film’s shooting, something the minister denied later.

Pages