क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये रे ये रे पावसा>>>> Lol २००३ च्या फायनलला पण मधेच थोडा वेळ पाऊस आला आणि लोकं मॅच ड्रॉ होणार म्हणून खुश झालेली ते आठवलं

Match आपलीच आहे. २५० chya आसपास ऑसट्रेलियाला निघणार नाहीत. आपल्याला ३००+ मॅचेस बघायची सवय झालेली आहे. हे पीच वेगळे आहे.

241 या विकेट वर ट्रिकी ठरू शकतं
आश्विन ला न घेता तिसरा पेसर खेळवणं आत्ता तरी सेन्सिबल वाटतं आहे. सिराज नी चांगली लाईन पकडून बोलिंग करणं जरूरी आहे.

कमिन्स नी एक पण फोर दिली नाही. आपण पण त्यांना प्रत्येक रन साठी झगडवलं पाहिजे.

५० ओवर पूर्ण खेळलो.
पण १० ओवर नंतर फक्त ४ फोर आले.
त्यात एक सिराजचा तर एक शमीचा.
सिक्स तर आलाच नाही.

१० ओवर आधी शर्माचेच ४ फोर आणि ३ सिक्स होते.

याचा अर्थ सुरुवात वेगात करणे हा डावपेच योग्यच होता. नाहीतर गेममध्ये मागे राहिलो असतो.

आता प्रश्न आहे की रोज इथे सराव करताना दव पडतेय ते आज केमिकल वगैरे मारल्यावर नसेल का किंवा कमी असेल का?

जर आपल्या गोलंदाजांना दवाने त्रास नाही दिला आणि दुसऱ्या डावात सुद्धा स्कोअर करणे तसेच अवघड असेल तर आपले फॉर्म मध्ये असलेले गोलंदाज नक्की खोलतील त्यांना.

आणि हो,
सुरुवातीला पाच सहा ओवर मारले तरी लगेच निराश होऊ नका.
त्या केसमध्ये बॉल जुना व्हायची वाट बघा.
शमी सुद्धा पाच सहा ओवर नंतर येतो
आफ्रिकेसोबत त्यांनी ६ ओवर मध्ये बिनबाद ६० मारले होते.
तरी नंतर यापेक्षा कमी टारगेट असून रडतखडत जिंकले होते.

सेमी फायनल ला भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे संघ येतील. त्यातले यजमान आणि कांगारू अंतिम सामन्यात खेळतील. भारत पहिल्यांदा फलंदाजी करून 240 धावा करेल.

हे माझे सर्व अंदाज अचूक आले आहेत. फक्त इथे लिहिले नव्हते. दिग्गज मंडळी अंदाज बांधत असताना आपण मधे अंदाज व्यक्त करू नयेत असे आम्हाला वसंतराव गोवारीकरसरांनी शिकवले होते.

आता अंतिम सामना कोण जिंकणार हे सुद्धा थोरामोठ्यांनी सांगून झाले की मग लिहीन.

240 चे टार्गेट आहे फक्त
Wide आणि त्यावर बाईज चालल्यात ते परवडणारे नाही.
सुरवातीच्या ओव्हर्स मध्ये जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न राहील ऑसीज चा.
फिल्डिंग जबरदस्त हवी आज.

<<हारली इंडिया. झोपा आता. >>
शुभ बोल रे नार्‍या!
नायागारा जेव्हढ्या जोरात पडतो त्याहून जास्त जोरात धावा गळताहेत!
नशीब दोन गेले. आता जरा आणखी नीट गोलंदाजी नि क्षेत्ररक्षण करा.

फालतू धावा खूप दिल्यात..
१५ धावा तरी सहज कमी असत्या आता तर ते एक प्रेशर असते.
आता याची भरपाई म्हणून पटकन अजून दोन विकेट हव्यात

खूप सहज खेळत आहेत ते आपली बॉलिंग
Strike रोटेट करत आहेत नीटच
4 ते 5 रन प्रत्येक over मध्ये. अधेमध्ये चौकार.

बॉल स्पिन होत नाहीये. उलट स्कीड होत बॅट वर व्यवस्थित येतोय. ऑस्ट्रेलिया इथून सेंसिबल खेळून जिंकू शकते. काहीतरी स्पेशल स्पेल हवा. नाहीतर सामना निसटतोय..

बूमाराह आणा..

आपल्या दोन विकेट गेल्या तेव्हाच बोललो हारलो आपण. पण 2031 सालचा वर्ल्ड कप आपण जिंकणार ही भविष्यवाणी अताच करतो. तुमच्या सायकल लक्षात आली असेल आता. 2003 ते 2023 या वीस वर्षाच्या घटना जशा घडल्या तशा रिपीट होणार आहेत पुढे.

Pages