Submitted by DJ....... on 20 January, 2022 - 22:43
२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. "तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय.
या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे.
या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला श्रद्धाचा मित्र kilwar
मला श्रद्धाचा मित्र kilwar किंवा त्याचा माणुस वाटतोय. सतत तिच्या घरात असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची होणारी बायको श्रद्धाला काही तरी सांगनार होती तिचा अचानक अपघात झाला होता.
राजेश आणि शर्मिलाला घेण्याच
राजेश आणि शर्मिलाला घेण्याच कारण काय,ते कळतच नाही.जरा कुठे सिरियल वेग घेत आहे अस वाटत तर मध्येच घुटमळतात.
आता श्रध्दाला पळवून नेणार आहेत.
आता शेरेकरसारख मलाही वाटत आहे की किल्वर वगैरे कोणी नाहीच आहे.
प्रसाद उद्या भेटणार आहे साऊला
प्रसाद उद्या भेटणार आहे साऊला, आता साऊच्या आसपास घरातले कोणीना कोणी हवं खरंतर. तो काय ड्रगजही पुरवेल तिला. साऊच्या सुटकेबद्दल तो नक्की काय सांगतो तिला, अर्धवट समजलं.
चिकू आणि त्याचे आई वडील आले
चिकू आणि त्याचे आई वडील आले की मी आवाज बंद करते. साऊ घरी आली तेव्हाही आवाज बंद. अर्धी अधिक म्युट वरच बघितली. गाला हे आडनाव आहे. ती जळालेली बाई म्हणजे चारू का.
अस मी ही ऐकल्यासारखं वाटतंय.
अस मी ही ऐकल्यासारखं वाटतंय.
आज अर्धवट बघितली. चारु इतक्यात मरेल असं वाटत नाही.
साऊच्या सुटकेबद्दल तो नक्की
साऊच्या सुटकेबद्दल तो नक्की काय सांगतो तिला, अर्धवट समजलं.....
प्रसाद सांगतो की,तुला सोडल आहे ,म्हणून तू आलीस.आता थोड्या दिवसांसाठी प्रसादला कील्वर दाखवतील आणि मग त्यालाही मारतील.
शेवटी साउला जस श्रध्दाने आणल तस कील्वरला पण श्रध्दाच शोधणार.
हाहाहा. तसंच हवं, नाहीतर
हाहाहा. तसंच हवं, नाहीतर काही न करता भोसलेला हिरो करतील.
चारु मेली नसावी असं वाटतं.
थँक यु युपि.
आई मला भूक लागली, शाळा सुटली,
आई मला भूक लागली, शाळा सुटली, पाटी फुटली, टन टन टन टन टन मस्त आहे शेरेकर. सगळं सोपं करून टाकतो. नव्वद टक्के जळालेली बाई चारू आहे सांगून मोकळा होतो. ड्रुगचं नाव मस्त ठेवलंय, किलबिल. मालिकाही किलबिल स्तराचीच आहे.
मालिकाही किलबिल स्तराचीच आहे.
मालिकाही किलबिल स्तराचीच आहे. >>> हाहाहा.
भोसलेला बहुतेक चक्क हिरवीण
भोसलेला बहुतेक चक्क हिरवीण दिली आहे.
फॉरेन्सिक डिपार्टमेंट मधली बोशुंदरा गोडबोले,आई बंगाली,वडील मराठी.
जराशी वेंधळी दाखवली आहे.
सिरियल वाढवणार असतील तर यांची जोडी दाखवतील.
भोसलेला बहुतेक चक्क हिरवीण
भोसलेला बहुतेक चक्क हिरवीण दिली आहे. >>> हेच आलं डोक्यात आणि अजुन डोक्यात गेली सिरीयल.
अंजूला अनुमोदन. आधीच तो भोसले
अंजूला अनुमोदन. आधीच तो भोसले डोक्यात जातो. करत काहीच नाही आणि उगाच मिशांना पीळ मारत फिरत असतो. नाव तरी काय बोशूधरा. असं नाव असतं का. ते लोक बोलताना गोल गोल बोलतात पण नावं नॉर्मल असतात त्यांची, हो ना? मुळात हे बंगाली पाणी घालायची काय गरज. आता राजेश शर्मिला चिकू आणि हे नवीन पात्र असा टाईमपास करतील. मी अर्धा अधिक वेळ म्युट करूनच बघते.
डॉ .निरंजना म्हणून मनवा नाईक
डॉ .निरंजना म्हणून मनवा नाईक आली आहे.
तिची एन्ट्री अशी गूढ का आहे का ते नाही,म्हणजे तिच बोलण,वागण,नचर अस संशयी ठेवल आहे की आपल्याला वाटाव की हीच किल्वर आहे.
अजून किल्वर कोणाला दाखवायच हे कंपनीच ठरलेल दिसत नाही.
बाकी अजून शेरेकर आणि भोसलेच वर्बल युध्द चालूच आहे.
तो भोसले त्या हॉटेलवाल्याला काय बावळटासारख उचलतो,तो सांगतोय की मी 300पार्सल्स दिली त्यातल एक तुमच्यापोलिस स्टेशनच होत,फूटेज चेक करा,तरी त्याला मारत बसलाय,झेलेला विष त्या पार्सलमध्ये बाहेर पण कोणीही घालून देऊ शकेल,एवढ साध कस कळत नाही.
काल नाही बघितली ही सिरीयल,
काल नाही बघितली ही सिरीयल, मनवा नाईक शॉट बघितला युट्युबवर, ही इतकी कृत्रिम अभिनय का करायला लागली. खुप मागे एका हिंदी सिरीयल मधे आवडलेली मला.
शेरेकरच काम करणार मनवा नाईक
शेरेकरच काम करणार मनवा नाईक ऑर क्रिएटिव्ह कंपूतला आओळखीचा आहे का,केवढा फुटेज खात आहे.एवढ फुटेज तर मधुगंधा कुलकर्णीला पण मिळत नाही आहे.
कालचा भाग कहर होता.
एवढे महत्वाचे डीएनए रिपोर्ट्स ,तेही शेरेकरने मागणी केलेली नसताना,कुठल्या वेंधळ्या बाईला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन यायला सांगतील.
शेरेकरला साऊशी बोलायला घरातल्यानी दिल नाही,पण तिच्या घरी मात्र कोणीही येऊन तिला भेटत,बोलत.
अजब आहे सगळ.
शेवटी स्ट्रॉबेरी पिक्चर
शेवटी स्ट्रॉबेरी पिक्चर निर्मित 'तुमची मुलगी काय करते' ह्या मालिकेत निर्मात्या 'मनवा नाईक' ह्याही आल्या, आणि तिकडे 'बॉस माझी लाडाची' ह्या दुसऱ्या मालिकेत आई 'मीना नाईक' ह्यांही एका कसल्यातरी भूमिकेत दिसत आहेत.
बोअरच होतेय, हल्ली मी टीव्ही
बोअरच होतेय, हल्ली मी टीव्ही लाऊन ठेवते पण लक्ष फार देत नाही.
सर्व मेन पैसा कुठे लपवला नताशाने हे शोधत असणार (ते फक्त साऊला माहीती असणार) , नीलांजनाही त्यासाठीच आलेली असणार, आधी पॉझिटीव्ह दाखवली आहे उगाचच.
ही सिरीयल काही संपायचं नाव घेत नाहीये. ताराराणी संपतेय, त्याजागी नवीन येतेय. तीही मी बघत नव्हते म्हणा.
शेवटी ठरल एटदाच किल्वर कोण ते
शेवटी ठरल एटदाच किल्वर कोण ते.
स्वत: निर्मातीण बाईच आल्या मैदानात किल्वर बनून.
नाईक बाईंना मोह आवरला नाही अभिनय करण्याचा.
हेच लिहायला आलेले UP
हेच लिहायला आलेले UP
शेवटी शो च्या निर्मिती ताईंना किलवरपद घ्यायचा मोह आवरला नाही.
कालच्या भागात तसच वाटलं पण आज
कालच्या भागात तसच वाटलं पण आज फ्लॅश बॅक दाखवताना मनवा मॅडम म्हणाल्या चारू गाला ला.. किलवर ला सांगा तिला सोडायला .. तिला घरी जाऊ द्या .. तिच्या कडून माहिती काढायची जबाबदारी माझी.. आणि आज प्रसाद तिच्या कडे treatment साठी येतो त्याला ती म्हणते सावनी वर काम चालू झालंय...अजून ठरत नाहीये वाटतं...प्रसाद ला करतील उभ अस वाटतंय.. खूप दिवसांपासून अभय , श्रध्दा चे बाबा गायब आहेत..
अभय त्या सन मराठीत पण काम
हो किलवर मनवा पण नाहीच .
ती मूर्ख सावनी सर्व डायरी प्रकरण शेरेकरला सांगते.
अभय त्या सन मराठीत पण काम करतो बहुतेक. एका सिरियल प्रोमोत बघितला, व्हिलन असावा. सिरियलचे नाव विसरले पण एकटी मुलगी घर सांभाळते नोकरी करून, बाकी रिकामटेकडे आणि अपेक्षा करणारे असा काहीसा विषय आहे.
अरे देवा,म्हणजे नाईक मँडम पण
अरे देवा,म्हणजे नाईक मँडम पण किल्वर नाहीतच का,?
अजून किती भागाच एक्स्टेशंन मिळाल आहे यांना?
आता शेरेकरलाच किलवर दाखवा
आता शेरेकरलाच किलवर दाखवा
अजून किती भागाच एक्स्टेशंन
अजून किती भागाच एक्स्टेशंन मिळाल आहे यांना? >>> चिरंजीवी करणार बहुतेक. आपण सोडलेली बरी.
किती घोळ घालत आहेत हे लोक
किती घोळ घालत आहेत हे लोक.नुसती गुंतागुंत. काही दिवसांनी लेखक आणि दिग्दर्शक विसरतील की नक्की काय दाखवल आणि काय दाखवायच आहे.
मध्येच काय तो झेलम,मग तो व्हिडीओ गेम,त्या मुलाचा म्रुत्यू.
कशाचा कशाला मागमूस नाही.
सिनियर लोकांना घरी बसवलेल दिसत आहे.
मला वाटतं किलवर ही एक
मला वाटतं किलवर ही एक व्यक्ती नाही, तीघं असतील.
निलांजना, प्रसाद, चारु
सुरवातीला मी खूप आवडीने
सुरवातीला मी खूप आवडीने बघायचे . लिमिटेड एपिसोड असतील असे वाटलेले. आता सोडून दिली.
मला वाटतं किलवर ही एक व्यक्ती नाही, तीघं असतील > मेन्टेलिस्ट च्या रेड जॉन सारखे
भोसले डोक्यात जातो. कहिच्य
भोसले डोक्यात जातो. कहिच्य काहि चालले आहे मालिकेमध्ये
निलांजनाबद्दल साऊला संशय आलाय
निलांजनाबद्दल साऊला संशय आलाय बहुतेक, बॅगेची माहिती मिळवायला अधीर झालेली वाटली तिला, किंवा दुसरं म्हणजे तिला आधी बघितलेलं आठवतही असेल, जरी तेव्हा साऊ शुद्धीत नव्हती, तरीही पुसट चेहेरा आठवत असावा.
संपवा आता.
टाइम पास चालला आहे. सावनीच
टाइम पास चालला आहे. सावनीच किलवर आहे हे दाखवा आणी संपवा मालिका !
Pages