अर्णव गोस्वामी व्हाट्सप डीकोडेड : सत्य की थोतांड ?

Submitted by BLACKCAT on 16 January, 2021 - 10:35

नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत

SAVE_20210116_205356.jpeg

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.

इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.

1. बाळाकोट बद्दल अर्णव कम्पणीला 3 दिवस आधी बातमी होती
2. अर्थव्यवस्था कुजली आहे
3. टी आर पी घोटाळा
4. भक्त प्रिय कंगना पिसाट असल्याबद्दलपण लिखाण आहे म्हणे

5. What's up messages are end to end encrypted , असेही त्याने एक ठिकाणी लिहिले आहे , तर तेही डिकोड झाले आहे म्हणे Proud

Group content visibility: 
Use group defaults

स्वतःची बुध्दी असणारा भक्त दाखवा आणि 1000 रुपये मिळवा.
अशी स्कीम ठेवली तरी 1000 रुपये मिळवणारा पण कोणी सापडणार नाही.

हे खरं असेल तर भाजपला उत्तरं द्यायलाच लागतील, हात झटकून चालणार नाही. काल चंद्रकांत पाटील हात झटकत होते.

उद्या कोर्टात निकाल आहेना, बघुया काय होतं ते.

मी भाजपचीच मतदार आहे. तरी काही गोष्टी नसतील पटत तर माझा विरोध असेल.

लोकशाहीच्या दृष्टीने दोन्ही घातक पायंडे पडत आहेत. >>> खरं आहे.

पर्सनली मला पुलवामा घडवलं गेलं असं वाटत नाही मात्र.

<< पर्सनली मला पुलवामा घडवलं गेलं असं वाटत नाही मात्र. >>

----- अगदी अस्सेच मला गोध्राच्या वेळेला वाटायचे.

पण पुलवामा... संसदेवरिल हल्ला... आणि एकंदरित धर्मावर आधारित टोकाचा द्वेष पसरवण्याची आणि त्यासाठी विविध कारणे (मग गोमांस खाल्ले असा निव्वळ सांश संशय येणॅ, गोमांसाची वाहतूक केली... CAA/NRC... ते लव- जिहाद... ) शोधण्याची कल्पकता हे सर्व बघता गोध्रा घडविले नसेलच असे म्हणता येत नाही.
मग संजिव भट सारखा अधिकारी अजूनही अटकेत आहे ? साधा जामिनही मिळत नाही पण पुलवामाच्या पोलिस अधिकार्‍याला (जो अतिरेक्यांसोबत काम/ एकत्र प्रवास करत होता...) जामिन मिळतो.

>> विषय अडचणीचा वाटतोय
असं काहीही नाही. लवकरच काय बोलायचं आहे याचे आदेश येतील, कॉपी पेस्ट करायला मटेरीयल मिळेल, तेव्हा सगळे टुणुक टुणुक उड्या मारत येतील बरोबर

गुलाम लोक जाम खुश झालेले दिसत आहेत, जणू काही साता जन्माचे सार्थक झाले....

असो....

जर अर्णवला बालकोट बद्दल आधीच माहित होते तर नक्कीच हे चिंताजनक आहे.

पण काही अती विद्वान लोकांनी हा निष्कर्ष काढला कि पुलवामा हल्ला भारत सरकार ने घडवून आणला, किती दुर्दैवी विचारसरणी.... अति विद्वान लोकांची.

बर इतकाच करून ना थांबता लालू चे गोडवे गाण्याची पण वेळ येत आहे किती वैचारिक दारिद्र्य...

कंगना काही कोणी ग्रेट नाही, पण तिच्या बद्दल ज्या शब्दात लिहिल आहे त्या वरून लायकी कळते..

बाकी जे चूक आहे ते चूकच आहे मग सरकार कोणाचाही असो, चौकशीतुन लवकर सत्य बाहेर आले पाहिजे.

भारत सरकार ने घडवून आणला, किती दुर्दैवी विचारसरणी.... अति विद्वान लोकांची.

भारत सरकार म्हणजे स्वतःची खासगी कंपनी आहे आणि त्या कंपनीला होईल तेवढं फायदा करून कंपनीचे जे चालक आहेत त्यांचा फायदा करणे हीच ह्या सरकार ची कार्यपद्धती आहे.
हे सरकार स्वतःच्या स्वार्थ साठी काही ही करू शकते.

या विषयावर मायबोलीवरच नाही तर इतर मीडियावरही सोयीस्कर मौन पाळलेल दिसत आहे. दुसरी एखादी बातमी असती तर पराचा कावळा केला असता मीडियावाल्यानं. सुशांतसिंग राजपूतच्या वेळेस कसला तमाशा झालेला! इथे राष्ट्रीय सुरक्षेसारखी गोष्ट पणाला लागूनही त्याच कव्हरेज नाही. धन्य तो मीडिया. तरी बर मागील आठवड्यात पत्रकार दिन साजरा केला .

२३ फेब्रुवारी - गोस्वामी something big will happen. bigger than a normal strike.
The govt is confident of striking in a way that people will be elated. Exact words used.

दासगुप्ता Good. He will sweep the polls then.

२६ फेब - बाला कोट हवाई हल्ला.

हे बिगर दॅन नॉर्मल स्ट्राइक आणि पीपल विल बी इलेटेड हे शब्द पंतप्रधानांनी किंवा अधिकारपदावरच्या कोणीही सार्वजनिक री त्या उच्चारले होते का? नसतील , तर याचा अर्थ ते अर्णवला कसे कळले? नेमके हेच शब्द असं तो म्हणतोय.

़कॉंग्रेसी चमचे व गुलमांना बर्‍याच दिवसांनी "शिमगा" करायला एकादा विषय मिळाला . Lol

बाकि "पुलवामा घडवला" असे बोलणार्‍या एकाद्या "थापाड्या"ने सज्जड पुरावे घेऊन कोर्टात जावे व सरकारवर केस दाखल करावी.

एक प्रश्न.

इतकं सगळं सापडून पण फक्त दासगुप्तावरच आरोप का दाखल केलेत मु.पो. ने ?

>> ़कॉंग्रेसी चमचे व गुलमांना बर्‍याच दिवसांनी "शिमगा" करायला एकादा विषय मिळाला . Lol

पार थोबाड फुटले तरी निर्लज्जपणे हसण्याची ही कसली देशभक्ती आहे? इतरांना छोट्या मोठ्या गोष्टींवरुन देशद्रोही ठरवणारे हे लोक स्वतः कसले देशद्रोही आहेत हे सिद्ध झालंय तरीही तुम्हाला हसू येतंय. जमल्यास आत्मचिंतन करा, तुमच्या निष्ठा देशाशीच आहेत की एका पक्षाशी?

अत्यंत नीच मनोव्रूत्ती. Sad

साडेचारशे किलोची स्फोटके जीप मध्ये घेऊन जिथून मिलिटरी जाणार आहे तिथे रस्त्याकडेला तब्बल चार तास उभा असणारा मनुष्य, कोण कुठल्या पंडेवाडीचा पांडू असणार आणि त्याबद्दल सत्तेत असलेल्या कोणत्याही नेत्याला माहित नसणार असे कोणास वाटत असेल तर तर त्यांच्या बाळबुद्धीची केवळ किवच करता येईल. जे काही झाले ते उघड आहे. बोके डोळे झाकून दुध पीत आहेत.

अरण्या पळाला व त्याचा ठावठिकाणा नाही अशी बातमी आहे. खरे खोटे माहित नाही. पण भामट्यांची एकंदर परंपरा पाहता अरण्याचा ह्यात बळी दिला जाईल असे वाटते.

पुलवामा - अतिरेक्यांसोबत पकडलेल्या डी एस पी देविंदर सिंगची काय हालहवाल?

सुशांत सिंगसाठी गळा काढणारे लोक अर्णवसाठी जास्तच गळा काढू लागलेत. सुशांतसिंगबद्दलचं त्याचं व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर येईल तेव्हा यांची फार मजा येणार आहे.

>>सुशांतसिंगबद्दलचं त्याचं व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर येईल तेव्हा यांची फार मजा येणार आहे.

खरंच यायला पाहिजे. सध्या बाहेर आलेलं चॅट फक्त दासगुप्ताच्या फोनमधलं आहे. प्रत्यक्ष अर्णबच्या फोन मधे तर काय काय निघेल..

शॉकिंग धागा आहे Uhoh

पुलवामा जर खरेच वर दिले तसे घडवलेले असेल तर.. शब्द नाहीत व्यक्त व्हायला Sad
तसे आमच्या ऑफिसमध्ये कित्येक जण तसे उघड बोलायचेही, पण राजकारणावर चर्चा म्हटली की ती मी कधी सिरीअसली घेत नाही.. जर त्या दिशेने पुरावे मिळाले तर मात्र .. खरे तर मी कोणाचा समर्थक नाही की विरोधक.. कारण सारेच पक्ष खालच्या पातळीला गेलेत राजकारणात हे ठाऊक आहे.. पण हे सत्य निघाले तर तो नीचांक ठरेल.. प्रार्थना अशीच की हे खोटे निघावे.

बाकी या व्हॉट्सप चॅट फोटो चे खरे खोटे कोण करणार? कोणी पसरवलेत हे?
कारण एखादा खरा असला तरी आता मार्केटमध्ये बरेच फेक फोटोशॉप कॉपी फिरणार आता..

इथले जे अंध भक्त आहेत हे नक्कीच 40 पैसे /प्रती पोस्ट अशा पगारात इथे पोस्ट करत होते ह्याची खात्री पटली आहे.
ह्या धाग्यावर एक पण भक्त आला नाही ह्या वरून हे सिद्ध होत आहे.
जो पर्यंत आदेश येत नाही,सामुग्री येत नाही,पैसे किती लागतील पोस्ट करायला हे ठरत नाही.
तो पर्यंत भक्त इथे एक पण कॉमेंट देणार नाहीत.

बाकि "पुलवामा घडवला" असे बोलणार्‍या एकाद्या "थापाड्या"ने सज्जड पुरावे घेऊन कोर्टात जावे व सरकारवर केस दाखल करावी.

सरकार देशद्रोही शेतकऱ्यांना तुरुंगात टाकायचे सोडून त्यांच्याबरोबर चर्चा करतंय. कन्हैयाला जसे देशद्रोह आरोपाखाली अटक करून रितसर खटला चालवून फासावर लटकवले तसे देशद्रोही शेतकरी आंदोलनकर्त्यांना अटक करून ... जाऊ दे .

त्यक्ष अर्णबच्या फोन मधे तर काय काय निघेल.>> फार निवडक माहिती बाहेर येईल आली तर कारण तेच ऐतिहासिक, राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य असल्यामुळे कथित चॅट सार्वजनिक रित्या उघड करू शकत नाही. फार फार तर न्यायाधीश पाहू शकतील खटल्याचा भाग म्हणून.

अर्णव प्रकरणामुळे सोशल मिडियावर धुरळा उडालाय. पण ग्राउंड लेवल पर्यत ही बातमी पोहोचली नाही. मविआने लोकांना ह्या बाबतीत माहिती मिळेल यासाठी कार्यकर्त्यांना ग्राउंड लेवल वरच्या लोकांचे प्रबोधन करायला पाठवावे.

काल रात्री १२ च्या बातम्यांमध्ये ABP माझा वर अर्णब - दासगुप्ता चॅट बद्दलची बातमी होती. त्या आधी ६ आणि ९ वाजता असे काही दाखवल्याचे आठवत नाही. आज सकाळपासून तर बातम्या पहिल्या नाहीत, त्यामुळे कल्पना नाही अजून ती बातमी सुरु आहे का. पण नक्की काय विचार होता रात्री १२ ला बातमी दाखवण्याचा, कि फक्त आम्ही बातमी केली, पण प्रसारण कधी करायचे आणि जितके कमी लोक बघतील तेवढेच उत्तम. मीडियाला हा विषय गंभीर वाटत नाही, पण हेच जर ह्रितिक - कंगना चे चॅट असते तर प्राईम टाइम ला बातमी चालवली असती.

>> फार निवडक माहिती बाहेर येईल आली तर.

खरं आहे. अर्थात अंतर्गत राजकीय मिलीभगत होत असेलच (तुमचा अर्णब तर आमचा क्षयज्ञ). अशा गोष्टी बाहेर आणण्यापेक्षा योग्य वेळी बाहेर आणणे हे राजकारण आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने का होईना पण असे सगळे चोर सापडले पाहिजेत.

अर्णबची यावर काहीच प्रतिक्रिया नाही म्हणून प्रकरण गंभीर वळण घेत आहे.

https://www.republicworld.com/india-news/general-news/republic-media-net...

रिपब्लिक ने स्वतःच्या बचावर्थ हा नेहमीप्रमाणे डिस्ट्रॅक्ट करण्यासारही जिंगोईस्ट लेख टाकला. पण यातसुद्धा चॅट खोटे आहेत किंवा अर्णबच्या बचावासाठी चकार शब्द लिहिला नाही आहे.

Pages