नागरिकत्व सुधारणा विधेयक - हिंदूराष्ट्राकडे वाटचाल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2019 - 13:21

नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.

काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.

या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अ‍ॅडमिन यांनी ईथल्या भटक्या आयडींची योग्य ती व्यवस्था केलेली दिसते. ऊत्तम!
जरा आता BLACKCAT या आयडी च्या लिखाणाकडे ही लक्ष असू दे ही विनंती. त्यांचि काही विधाने तर अत्यंत गलिच्छ पातळीवरील आहेत. हे पहा:
>>इतका गोंधळ घालण्यापेक्षा, इथल्या हिंदू तरुण तरुणींनी तिकडून लग्नाचे साथीदार आणावेत , म्हणजे सामाजिक प्रश्न आपोआप सुटेल.
राजीव गांधींना शिव्या घालण्या ऐवजी त्यांचे अनुकरण करा, एका हॉटेल कर्मचारिणीला त्यांनी घरात , पक्षात व देशात मानाचे स्थान मिळवून दिले.

यात गलीछ काय आहे? इथल्या हिंदू मुलांनी पाकिस्तानातील हिंदू मुलींशी लग्ने करावीत व त्या पूर्ण परिवारास भारतात येण्यास मदत करावी

राजीव बरोबर लग्न करून सोनिया भारतीय झाली ना ? सेम मेथड

हा पूर्ण प्रतिसाद वाचा ---

जगातले कोणतेही सरकार गरिबांना नागरिकत्व देत नाही

पैसेवाला भंपक असला तरी चालतो.

भारतीय नागरिकत्व घ्यायला किती खर्च येतो ? नेटवर 15000 दिले आहे,
म्हणजे एका घराला 60000 रु

शहा माफ करणार का फी?

इतका गोंधळ घालण्यापेक्षा, इथल्या हिंदू तरुण तरुणींनी तिकडून लग्नाचे साथीदार आणावेत , म्हणजे सामाजिक प्रश्न आपोआप सुटेल. भाजपात तर इतके लोक बसलेत

राजीव गांधींना शिव्या घालण्या ऐवजी त्यांचे अनुकरण करावे , एका परदेशी हॉटेल कर्मचारिणीला त्यांनी घरात , पक्षात व देशात मानाचे स्थान मिळवून दिले.

ज्यांनी ३७० नंतर कश्मिरींवर गलिच्छ विनोद लिहिले तेच ढोकळा माफिया उर्फ उपरे शहाणे शहाजोग पणा शिकवीत आहेत यात नवल ते काय Wink

Proud
370 नन्तर काश्मिरी मुलिंबरोबर लग्ने करणार होते,

आता पाकिस्तानच्या गरीब हिंदु मुलिंबरोबर लग्ने करा म्हणतोय , तर माझ्याच नावाने बोंब मारताहेत

या कायद्याला इतका जोरदार पाठींबा मिळत आहे की मराठा मोर्चाचे जुने फोटो, CAB समर्थनाचे म्हणून फिरवीत आहेत, नवे फोटो काढायची उसंत मिळत नाही आहे.

CAA NRC च्या विरोधात उ प्र मधले दंगेखोरांनी बसेस सरकारी वहाने, पौलिस वॅन्स वैगेरे जाळली होती. उ प्रचे मु मं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केल्या प्रमाणे दंगेखोरांची मालमत्ता पाॅपर्टी जत्प करायला सुरुवात केलेली आहे.
https://m.timesofindia.com/india/2-days-after-yogi-adityanaths-warning-u...

आसाममधील चिरांग जिल्ह्यातील बिजनी गावात राहणाऱ्या पार्वती दास या ७० वर्षीय महिलेला NRC च्या कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्याने त्यांना निर्वासित छावणीत डांबण्यात आलंय. त्यांच्या दोन कागदपत्रांमध्ये आजोबांच्या नावात तफावत आढळल्याने त्यांना कैदेत ठेवण्यात आलंय. पार्वती यांचा मुलगा बिस्वनाथ दास आईला जामीन मिळावा म्हणून न्यायालयाच्या चकरा मारतोय. पण न्यायालयाने जामीन नाकारल्याने तो हताश झालाय.

बिस्वनाथ हा रिक्षा चालक आहे. त्याची कमाईही तुटपुंजी आहे. मात्र आईला जामीन मिळावा यासाठी त्याने आतापर्यंत ७० हजार रुपये वकिलांवर खर्च केलेला आहे. तर त्याचे १ लाखांहून अधिक रुपये गुवाहाटी कोर्टाच्या चकरा मारण्यात खर्च झालेले आहेत. निर्वासित कॅम्पमध्ये डांबण्यात आल्यापासून पार्वती यांची तब्येत बरी नाहीये. बिस्वनाथ म्हणतो, "मला तिला तिथे मरू द्यायचे नाहीये. तिने आपल्या घरी आनंदात राहावं अशी माझी इच्छा आहे."

पार्वती यांनी रहिवासी पुरावा म्हणून १९४९ पासूनचे वडिलांचे रेशन कार्ड मतदार यादीत असलेले वडिलांचे नाव आणि ग्रामपंचायतीने दिलेला दाखला जमा केला. मात्र ते ग्राह्य धरण्यात आलेले नाहीयेत.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे जी लोकं NRC मुस्लिमांकरिता आहे असं मानून उड्या मारताय त्यांच्या लक्षात येत नाहीये की यात केवळ मुस्लिम भरडले जाणार नाहीयेत. अनेकांच्या घरातील स्त्रियांची कागदपत्रे नाहीयेत. ग्रामीण भागातील महिला, आदिवासी महिलांची कागदपत्रेच नसतात. शहरातील अतिहुशार लोकं कागदपत्रांची पूर्तता करण्यात काय अवघड आहे म्हणून फुशारक्या मारताय. त्यांना ग्रामीण भागातील लोकांचे कागदपत्रांचे प्रश्न माहिती नाहीयेत. ग्रामीण भागातील हिंदुत्ववादी आणि भाजप समर्थकांनाही हेच दिवस पाहायला मिळणार आहेत.

आज आसाममधील बिस्वनाथ न्यायालयाच्या चकरा मारतोय. त्यात आर्थिक झळ तर बसलीच आहेच, मात्र मानसिक त्रास झालाय तो वेगळाच. आईची तब्येत खालावल्याने तिचा मृत्यू होण्याची भीतीही आहेच. ज्या शहरी अतिहुशारांना आणि हिंदुत्ववाद्यांना वाटतंय की कागदपत्रे सादर करण्यात अवघड काय आहे त्या बुळ्यांनी एक महिना नंदुरबार, धुळे, विदर्भ किंवा महाराष्ट्रातील एखाद्या खेडे गावात जाऊन किमान १०० लोकांची NRC ला आवश्यक असलेली कागदपत्रे एका महिन्यात जमा करून दाखवावीत. नुसत्या तेथे जाऊन सूचना करू नये, तर तेथील ग्रामीण भागातील लोकांसोबत शासकीय कार्यालयाच्या खेपाही माराव्यात म्हणजे कळेल की इथं बसून आपण केवळ मानसिक नसबंदीचे प्रदर्शन मांडतोय.

सोर्स: sabrangindia.in

सोबत पार्वती यांचा फोटो.

राहुल बोरसे
https://www.facebook.com/100001122079843/posts/2563683530345691/
**

https://mobile.twitter.com/ShefVaidya/status/1208424420953313281

बापरे ती आयेशा जी कॅब प्रोटेस्टचा चेहरा आहे (the shero ) तिचं पुलवामावरील हल्ला आणि आपल्या जवानांचे मृत्यू सेलिब्रेट करणारं ट्विट सापडलं आहे. ते नंतर तिने डिलीट केलं पण ऑलरेडी व्हायरल झालं होतं. हे असले लोक आता पुरोगामीना आपला चेहरा, प्रतिनिधी वाटत आहेत? बाकी राजकीय भूमिका काहीही असो, पण या लोकांना एमपॉवर करून हे उद्या तुम्हालातरी सोडणार आहेत का?

बापरे ती आयेशा जी कॅब प्रोटेस्टचा चेहरा आहे (the shero ) तिचं पुलवामावरील हल्ला आणि आपल्या जवानांचे मृत्यू सेलिब्रेट करणारं ट्विट सापडलं आहे. ते नंतर तिने डिलीट केलं पण ऑलरेडी व्हायरल झालं होतं. हे असले लोक आता पुरोगामीना आपला चेहरा, प्रतिनिधी वाटत आहेत? बाकी राजकीय भूमिका काहीही असो, पण या लोकांना एमपॉवर करून हे उद्या तुम्हालातरी सोडणार आहेत का? >>

ते तिचं अकाउंट नाही. भक्तांनी स्वतःच खोटं अकाऊंट बनवून स्वतःच खोटं ट्वीट केलेलं दिसतंय. तिचं अकाऊंट https://twitter.com/AyshaRenna आहे.

बाकी AltNews सिन्हामुळे पक्षपाती, पण शेफाली वैद्यचे फोटो तसेच्या तसे शेअर करणार. आवडलंय. Lol

ते तिचं अकाउंट नाही. भक्तांनी स्वतःच खोटं अकाऊंट बनवून स्वतःच खोटं ट्वीट केलेलं दिसतंय. तिचं अकाऊंट
https://twitter.com/AyshaRenna आहे.
>>

@ भास्कराचार्य ,

वरिल अकाऊंट डिसेंबर २०१९ मधे सक्रिय केले गेले आहे.

तुम्हाला असे म्हणायचे आहे का,
की हि दहशतवादी महिला, डिसेंबर २०१९ आधी ट्विटवर सक्रिय नव्हती. दहशतवाद्यांना सपोर्ट करताना किमान मुलभुत माहिती तरी घ्या.

ईशरत जहॉ देश की लडकी थी !! सोनिया जी के आँसु थमने का नाम नही ले रहें थे !!
हेच अंतिम सत्य मानणार्यां कडुन काय अपेक्षा ठेवणार ?

बाकी AltNews सिन्हामुळे पक्षपाती, पण शेफाली वैद्यचे फोटो तसेच्या तसे शेअर करणार. >> That's a real संतुलीत‌पणा Wink

दहशतवाद्यांना सपोर्ट करताना किमान मुलभुत माहिती तरी घ्या.
Submitted by प्रसाद... on 22 December, 2019 - 10:54
>>

छे, मुलभुत माहिती वगैरे घ्यायची काय गरज ?
पुरोगाम्यांनी एकदा म्हटले ना, की ते फेक अकाऊंट आहे, मग तेच खरे आहे.

ती निरागस मुलगी CAA पास व्हायच्या आधी सोशल मिडीयावर अजिबात सक्रिय नव्हती. भारत सरकार CAB सारखा भयंकर कायदा आणुन मुसलमानांवर अत्याचार करत असल्याचा तीला साक्षात्कार झाला व डिसेंबर २०१९ मधे ती ट्विटरवर सक्रिय होऊन ती सरकारचा विरोध शांततापूर्ण मार्गाने करु लागली.

त्या पारवतीच्या केसमध्ये ...

मुळात , नवर्याचे नागरित्व सिद्ध झाले अन बायकोशी लग्न झाले हेही सिद्ध झाले की बाई आपोआपच नागरिक होईल ना? तिची माहेरची कागदपत्रे कशाला?

कायदा पास झाला म्हणजे लागू झाला आता अमलबजावणसाठी
सर्व राज्यांना निर्देश देणे जे ऐकत नाहीत त्या राज्यसरकार ना प्रथम समजावणे नाही ऐकले तर घटनेने बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करून ती बरखास्त करणे हे काम राहिले आहे.
कोणती कागद पत्र हवीत कोणाला देणे भाग आहे ह्याचे सर्व नियम सरकार जाहीर करेल.

पण अगदी आजोबा चा proof मागितला तर सर्वांचा बाप हिंदूच होता हे सिद्ध होईल ही मोठी अडचण आहे

म्हणे काँग्रेसने शिवसेनेला सांगीतलय की CAA राज्यात लागु करायचा नाही !
अजुन काही राज्य CAA राज्यात लागु करायच्या विरुद्ध आहेत !
मुळात नागरिकत्व हा विषय केंद्राचा आहे आहे आणि त्यात राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही !

मुळात नागरिकत्व हा विषय केंद्राचा आहे आहे आणि त्यात राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही !
नवीन Submitted by युनिस on 22 December, 2019 - 13:47
<<

विरोध करणार्‍यांना तेवढी अक्कल असती,
तर आज देशभरात जो हिंसाचार व जाळपोळ सुरु आहे ती झाली नसती.

राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अशी राज्य सरकार बरखास्त करता येतील हा एक उपाय आहे ..
किंवा टोकाचा उपाय घटनेने च दिलेल्या अधिकाराचा वापर करून अशा लोकांवर देश द्रोहाचा खटला चालवता येईल.
तसे अधिकार केंद्र कडे आहेत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील रामलीला मैदानात 'धन्यवाद रॅली'ला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या सभेद्वारे भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकणार आहे. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहतींना नियमित केल्याबाबत पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भाषणे सुरू झाली आहेत.

पण अगदी आजोबा चा proof मागितला तर सर्वांचा बाप हिंदूच होता हे सिद्ध होईल ही मोठी अडचण आहे

Proud
अडचण काय त्यात ? सावरकरनी लिहून ठेवले आहे

अडचण काय त्यात

चहा पेक्षा किटली गरम असे आम्हाला bindast म्हणतात येईल proof सहित

Pages