ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होत असतानाच

54 जागांचा विरोधी पक्ष ?? हा हा हा

काश्मीर प्रश्न असेल किंवा राम मंदिर
ह्या वरून हे माहीत पडलं योग्य वेळी प्रश्न सोडवला नाही तर साधं प्रश्न सुधा गंभीर रूप घेतो.
जेव्हा भारतीय सैन्य नी पाकिस्तान वर पूर्ण विजय मिळवला होता तेव्हाच हा प्रश्न सुटला पाहिजे होता .
पण तेव्हाच्या केंद्र सरकारनी कश्मिर च भिजत घोंगडे तसेच ठेवले

विजय कुलकर्णी या भाउन्च "आमचा अड्डा" वरच वक्तव्य

---------------------------------------
त्या धाग्यावर मी दिलेले ( मी काढलेले नाही) कार्टून काही लोकांना झोंबले. त्यात खरे तर आणखी एक दुरुस्ती करावी वाटते. खांबाला बांधलेल्य काश्मीरी माणसाचे डोळे नुसते बांधले नाहीत तर ते पेलेट्स मारून आंधळे केले आहेत. काश्मीर मध्ये शांतता आहे असे सरकारी मीडिया व भारतीय मिडिया सांगत असले तरीही बी बी सी वगैरेंनी खर्‍या बातम्या दिल्या आहेत. पेलेट्स ने आंधळे झालेले लोक अ‍ॅडमिट होत आहेत.

माझ्या नातेवाईकांचा व्हा अ‍ॅ ग्रूप, कॉलेजचा ग्रूप इथे आलेले मेसेजेस पाहून कसेसेच झाले. पाकिस्तान ने पूर्व पाकिस्तानात, चीनने तिबेट मध्ये केले त्यापेक्षा आपण काय वेगळे करत आहोत ? जर्मनीत नाझी लोकांकरवी ज्यू लोकांचे शिरकाण सुरु होते तेव्हा मध्यमवर्गीय जर्मन लोकांना काहीच कसे वाटले नाही याचे मला आश्चर्य वाटे, आता नाही. समाजाच्या एका घटकाला व्हिलन म्हणून रंगवणे व त्यांचे डी हुमनायझेशन करणे इतके सोपे आहे ? ट्रंप, मोदी, पुटीन, एर्गोडॅन, एकाच पुस्तकातून शिकले आहेत असे वाटते. तिकडे चीन मध्येही तैवान व हाँग काँग निमित्ताने हा तॉक्सिक नॅशनलिझम ला भरते आले आहे.

काही कशिमिरी पंडितानी ३७० ज्या पद्धतीने हटवले त्याबद्दल निषेधाचे पत्र जहीर केले आहे, त्यांनाही आता पाकिस्तानात जायला सांगितले जाईल.

Submitted by vijaykulkarni on 12 August, 2019 - 07:41

-----------------------------------------------------------------------------

विजय कुलकर्णी भाउ, तिथे काही लिहिण्यापेक्षा इथे लिहा. तुम्ही पोस्ट केलेल्या कार्टून वर मी एक प्रश्न विचारलेला. याच धाग्याच्या प्रतिसादान्चे पान १८ पहा. त्याचं उत्तर अजुन तुम्हाला मिळालेलं नाही काय? शिवाय कश्मीरी फुटीरतावादी दिल्लीत बसुन पकिस्तानशी चर्चा करत होते , ते तुम्हाला मान्य आहे का? असेल तर का मान्य आहे?

ज्यावेळी फुटीरतावादी अशा चर्चेला बसायचे तेव्हा ते भारताला त्या चर्चेला निमन्त्रण का देत नव्हते? त्यावेळी इतर कश्मीरी फुतीरातावाद्यांचा विरोध करत होते काय?

तुमचा राष्ट्रवादाचा विरोध ध्यानात घेता, तुम्ही वास्तवापसुन कोसो दुर स्वप्नरन्जनात मश्गुल आहात अस माझं मत झालंय.

कान्दामुळ्याला मखलाशी करायला पुढे करण्या ऐवजी स्वतःच्या प्रतिसादान्वर विचारलेल्या प्रश्नान्ना स्वतःच उत्तरं द्ययला शिका की राव.

जेव्हा भारतीय सैन्य नी पाकिस्तान वर पूर्ण विजय मिळवला होता तेव्हाच हा प्रश्न सुटला पाहिजे होता

दुर्दैवाने भारतीय सैन्य नी पाकिस्तान वर पूर्ण विजय मिळवला युद्धात पण हार झाली सिमला करार करताना. करार करायला काॅंग्रेस गेलेली !!

विजय कुलकर्णी कशाला मला पुढे करतील ?
कोणते आयडी आता उत्तर देणार नाहीत हे चांगले ठाऊक असल्याने त्यांच्या तर्फे वाभाडे काढले आहेत. विकूंच्या वतीने आत्ता लिहीले आहे. इतरांच्या वतीने लिहीलेले दिसलं नाही का ?
कुणाकुणाचा ड्युआयडी ठरवायचं याचा काही सुमार कॉपरमाईन ताई ?
तब्येतीची काळजी घ्या. भास होऊ लागलेत बहुतेक.

शेवटी प्रश्नांना उत्तर देणे जमत नाही व शेलकं काहीतरी लिहुन दुसर्याना उकसवण्यात यश येत नाहीय असे पाहुन कान्दामुळा नावाचा आयडी प्रशासकांकडे पळत गेलाय नि हा धागा उडवायची विनंती केलीय.

प्रशासकांना धागा उडवायचा असेल तर त्यांनी जरुन उडवावा. पण आधी या धाग्यावरील कान्दामुळा नावाच्या आयडीच्या सर्व प्रतीक्रिया वाचाव्यात.

म्हणे विरोधी मत लिहायला देत नाहीत. यां लोकांच्या स्वतःच्या मतांबाबत इतरांनी प्रश्न विचारले की पळ काढतात नि आम्हाला मत व्यक्त करायला देत नाहीत वगैरे मखलाशी सुरु करतात.

यावरुन रागा चे "संसदेत ५ मिनिटे बोलु द्यावे, मग बघा कसा भुकंप (= वाभाडे !) होतो ते पहा" हे स्टेटमेंट आठवले.

कुणाचंही नाव घेतलं नव्हतं तरी बरोब्बर बाण लागला. पहिल्या अवतारापासून अ‍ॅडमिनची विपू ज्याने ८०% च्या वर व्यापून टाकली आहे त्याचा थयथयाट पाहून मनोरंजन झाले. Lol

हे काय चाललंय ते पहा.

https://indianexpress.com/article/india/article-370-scrapped-because-jk-...

शोभा डे व अब्दुल बसित

https://www.loksatta.com/desh-videsh-news/shobha-day-wrote-article-under...

शोभा डे चा खुलासा
https://www.loksatta.com/desh-videsh-news/shobha-day-wrote-article-under...

आता "तो लेख मी लिहिलाच नाही" ही मखलाशी शोभा डे कडुन कधी होणार याची वाट पाहातोय.

हा तो लेख - https://timesofindia.indiatimes.com/blogs/politically-incorrect/burhan-w...

Mukesh Ambani creates History . Saudi Aramco to invest 15 billion dollars (20% of 75 B$) into Reliance . Way to go

देश हिंदूंचा , हिंदूंच्या पैशावर चालतो , म्हणणाऱयानो,

20 % मुसलमानांच्या वाटणीचे 20 % पैसे मक्का मंदिन्यावरून आले.

Proud

अंबानी को बकरी ईद का तोहफा मिल गया

काश्मीर खो-यात मोदी सरकारने शांतता निर्माण केली. बीबीसीचा व्हिडीओ.
https://www.bbc.com/hindi/india-49306716

३७० हटवल्याबद्दल काश्मिरी मुस्लिमांचा पाठिंबा - व्हायरल व्हिडीओ - बीबीसीचा रिपोर्ट
https://www.bbc.com/hindi/india-49322020

20 % मुसलमानांच्या वाटणीचे 20 % पैसे मक्का मंदिन्यावरून आले. >>>>

लाज, नैतिकता वगैरे गुंडाळून ठेवल्या की वरीलप्रमाणे लिखाण होते. हे लोक अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्यासाठी देशाशीही गद्दारी करतील.

वर दिलेल्या लिंक्सला दिलेली शीर्षके ही सरकार विरोधात नाहीत. त्यामुळे द्वेषपूर्ण आणि देशद्रोही नाहीत.
लिंक मधे काय आहे ते माझ्या हातात नाही.

आम्ही आमचेच कौतुक केले तर लांगुलचालन कसे ?

नवीन Submitted by BLACKCAT on 12 August, 2019 - 22:29 >>>

तू कोण आहेस ते मला कसं कळणार? प्रोफाईलमध्ये लिहून ठेव.

Indian express group,the hindu,the wire,बीबीसी ही प्रसार मध्यम नेहमीच काश्मीर चा विषय आला की भारता विरूद्ध भूमिका घेतात त्यांचा तोच अजेंडा आहे .

बहुसंख्य लोक भारत सरकारच्या निर्णयावर खुश आहेत .
काही विघ्नसंतोषी लोक नेहमीच निगेटिव्ह विचार करत असतात .

कांदामुळा, खात्रीलायक माहितीसाठी

Take a look at Imtiyaz Hussain (@hussain_imtiyaz): https://twitter.com/hussain_imtiyaz?s=09

Take a look at Shahid Choudhary (@listenshahid): https://twitter.com/listenshahid?s=09

Take a look at DIPR-J&K (@diprjk): https://twitter.com/diprjk?s=09

ह्यासारख्या सोर्सकडे लक्ष ठेवा. तुम्ही दिलेल्या लिंकमधले contents काही पाकपुरस्कृत ट्वीटर हॅंडल्सवर (that too verified) असलेल्या contents टाईप आहेत. ह्या ट्वीटर हॅंडल्सना बंद करण्याची कारवाई चालू आहे. ती कारवाई होण्याच्या आधी त्यातले एक दोन मी स्वत: वाचले होते कुठलेतरी रिप्लाय ट्रेस करताना. खूप वाईट पद्धतीने प्रोपगांडा चालू आहे.

Remove Pak-Operated Accounts Fuelling J&K Turmoil, Centre Tells Twitter

https://www.ndtv.com/india-news/remove-pak-operated-accounts-fuelling-ja...

तेव्हा सगळ्यांनीच हा सेन्सिटिव्ह मॅटर जबाबदारीने बघितलेला बरा.

अश्विनी के,
फेक ट्विटर अकाउंट्सचा आणि बीबीसीच्या वार्तांकनाचा काय संबंध आहे ?

“काश्मीरच काय तर पाकिस्तानही भारताचा भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे हे नम्रपणे मान्य करायला हवे’, असे मत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी भारताने अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या प्रकरणाबद्दल बोलताना नोंदवले आहे. इतकचं नाही तर काश्मीर कधीच पाकिस्तानचा होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.

छान ,

अभिनंदन
भारत हा हिंदू धर्मापेक्षाही जुना आहे, ( आणि हिंदू धर्मच सर्वात प्राचीन असल्याने तो सर्व धर्मामपेक्षाही जुनाच ठरतो)

सुंदर सत्य सांगितल्याबद्दल अभिनंदन

Pages