ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

मी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर कधी सान्गताय? >>> तुमच्या निरर्थक, आचरट, मंदबुद्धी प्रश्नाचे उत्तर वर दिले आहे. बुद्धी वापरत असाल तर ते समजेल ते. Lol
नसेल वापरत तर तो प्रश्न आणि माझे कोट इथे पुन्हा कोट करा.

Lol , किती तो जळफळाट... माझा प्रश्न काय होता ते नीट वाचा. मग तो प्रश्न समजला की त्याच उत्तरही देता येईल. बाकी मला तुमच्या आधीच्या जिल्ब्या कोट करत बसायला वेळ व त्यात काहीही रस नाही. तेव्हा तुम्हीच आधीचे प्रतीसाद वाचा..

अहो मंदबुद्धी, तुम्हाला काहीही वाटतं कशाचंही. मुळात तुमच्या पोस्ट्समधे , विचारांमधे (?) दम नसतो. ते अत्यंत बालीश, आचरट आणि मंदबुद्धी असतात, त्यामुळे तुमच्याशी चर्चा करणे इथल्या अनेकांना अपमानास्पद वाटतं. बघितलं ना ? तुमच्याशी चर्चा करायला कमी बुद्ध्यांकाचा आयडी खास काढला म्हणजे त्या लेव्हल ला उतरून तुमचे वाभाडे काढता येतात.
तुम्हाला बुद्धी वापरण्याची सोय असती तर मागच्या पानातले उत्तर तुम्हाला समजलेच असते. आता नाही समजले तर आम्ही काय समजणार ?

बरं चला, मी तिस-यांदा संधी देईन.
तुमचा प्रश्न काय होता त्या पानाची लिंक द्या इथे. प्रश्न मी शोधून घेईन. मी ठरवलंच आहे वाभाडे काढूनच जाणार.

मी ठरवलंच आहे वाभाडे काढूनच जाणार.

नवीन Submitted by कांदामुळा on 10 August, 2019 - 11:50 >>

तुम्हाला वाभाडे काढायचेत ना, मग करा की मेहनत... तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त बुद्धी असल्याचे म्हणताय तर माझा प्रश्न शोधायला एव्हढा त्रास का पडतोय? हेच ते पान , एव्हढ्यात विसरलात?

पुन्हा कमी बुद्ध्यांकाचे प्रदर्शन ? गरज कुणाला आहे ? प्रश्न कोण विचारतंय ?
तुम्हाला उत्तर नको असेल तर पुन्हा येडे चाळे करायला येऊ नका. Lol
पाचवीतल्या मुलाकडून डोकं तपासून घ्या आधी.
याखालच्या बुद्ध्यांकाचा आयडी बनवायला सुद्धा मेहनत करावी लागेल बुवा Lol

ते सोडा कान्दामुळा भाउ.. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात वेळ घालवु नका.. आधी स्वतः केलेले वक्तव्य शोधा मग त्यापुढे माझा प्रश्नही मिळेल.. त्याचे उत्तर शोधण्यावर स्वत:ची उर्जा घालवा... Lol

हे आकलन,बुद्धी, बुद्ध्यान्क वगैरे आपण नन्तर बघू.

अंगात दम नाही, गेला रडायला. आता ही पाळी आलेली दिसतेय. Lol

नवीन Submitted by कांदामुळा on 10 August, 2019 - 12:04 >>

तुमच्यात भरपुर दम आहे ना मग प्रश्नाच उत्तर द्या की Lol
भाषेवर नियन्त्रण ठेवायच बघा, मग मला कुठेही जाउन तक्रार करण्याची गरज नाही..

तुम्हाला उत्तराची गरज आहे ना ? कोट करा. नाहीतर समर्थांनी सांगितलेली लक्षणे समजून पास देण्यात येईल.
करताय ना कोट ?

भाषेवर नियन्त्रण ठेवायच बघा >>> भूत के मुंह मे रामनाम ??? चांगली प्रगती आहे ही. हीच अपेक्षा आहे. आता चैतन्य रामसेवक हा आयडी कधी काढणार ठेवणीतला ?

आता चैतन्य रामसेवक हा आयडी कधी काढणार ठेवणीतला ?

Submitted by कांदामुळा on 10 August, 2019 - 12:11 >>

ते मला कस माहीत असणार? मी तुमच्यासारखे ड्युआयडी वागवत नाही.

वाभाडे कधी काढताय ते तरी सान्गा, मग मी एक तास राखुन ठेवतो. फक्त उद्या आपल्याला वेळ नाही. तेव्हढा उद्याचा दिवस सोडुन कुठलाही दिवस निवडा..

अरे राज ठाकरे च्या चमच्या. राज ठाकरे बोलका पोपट आहे. लोकांना त्याची भिती वाटते म्हणून राजसाहेब राजसाहेब म्हणतात. रमेश किणीला कोणी मारलं हे मी कांदा मुळा ला विचारलं आहे. मी कुणाचा ड्यू आयडी नाही. तू मला चांगलाच ओळखतोस ना. लागला राज ठाकरे च्या बोलण्यावरून उड्या मारायला.

तर आपण मुळ विषयावर येउ.

१) ३७० कलम व पर्यायाने कश्मीरचा विशेष दर्जा काढुन टाकणे हे भाजपच्या निवड्णुक अजेन्ड्यावर होते. मोदीन्ना भरभरुन मते देउन जनतेने तो अजेन्डा राबविण्यासाठी मोदिन्ना हक्क दिले.
२) ३७० कलम हटवले तर काय काय परिणाम होतील याच्या धमक्या विविध लोकान्नी दिल्या. त्या विस्तारभयामुळे येथे देत नाही. ती प्रक्षोभक वक्तव्ये केली गेली नसती तर सरकारने त्या लोकांना नजरकैदेत वा तुरुंगात टाकले नसते.
३) भाजप ३७० कलम हटवत नाही हे वारन्वार मोदीविरोधी ट्रोल्स अधोरेखीत करत होते.
४) कश्मिरचा विशेष दर्जा कसा हटवायचा हा निर्णय "भारतीय" जनतेने निवडलेल्या सरकारचा आहे.
५) सरकारने अतिशय समर्थपणे परिस्थिती हाताळली व अशा निर्णयानन्तर लगेच होणारी आन्दोलने व जाळपोळ झाली नाही (आठवा अतिशय बेजबाबदारपणे केलेले तेलंगणा व आंन्ध्र विभाजन)
६) आतपर्यन्त विशेष दर्जा असताना कश्मीरी लोकांना आपलेसे करु न शकलेले लोक अजुनही त्याच स्वप्नरंजनात आहेत व सरकारने काय करायला पाहीजे याचे चर्वितचर्वण करत आहेत. अशा लोकांनी आता गप्प बसलेलेच बरे , कारण गेल्या ७० वर्षांत कश्मीरी जनता भारताच्या जवळ येण्याऐवजी लांबच जात राहीलीय.
७) आता कश्मीर मध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे काम सरकारला प्राधान्याने करावे लागणार आहे, ज्याचे सुतोवाच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेय.
८) विरोधकांनीही प्रक्षोभक वक्तव्यांना आवर घालायला हवा व हा निर्णय मान्य नसेल तर कायदेशीर मार्गाने जावे.
९) तरीही ज्यांना काश्मीरचा विशेष दर्जा कायम ठेवायचा आहे त्यांनी पुढील लोकसभा निवड्णुका या अजेन्ड्यावर जिंकुन स्वतःचे सरकार स्थापावे व कश्मीरला विशेष दर्जा बहाल करावा.

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल I stand corrected.
आपण काश्मीरमधून लग्नासाठी मुली आणू शकू, असं काही लोक म्हणताहेत, असं ते म्हणाले. (आपण आणू असं ते म्हणाल्याचं वर्तमानपत्रांत वाचलं होतं)

एकंदरित ३७० रद्द झाल्याचा हा फायदा लोकांना वाटतोय.

३७० रद्द झालेला नाही. ३७० कलम आहेच. ते ऑलरेडी पातळ झालेलं होतं.
मात्र त्यात बदल करून मोदी शाह जोडगोळीने संपूर्ण देशाच्या चर्चेचा फोकस आपण मोठा तीर मारल्याच्या थाटात केला आहे. संपूर्ण देश आज मोदी शाह यांच्या चालीला बळी पडला आहे.
३७० कलम रद्द झाल्याने मोठा कोणताही सकारात्मक बदल घडून येणार नाही हे सिद्ध झाले आहे. ते रद्द न करताही वेळोवेळी जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या संमतीने अनेक बदल त्या राज्यात घडून आले होते.

गुंतवणूक / रोजगार / शिक्षण हे मुद्दे फोल आहेत. ३७० ची ही नौटंकी न करताही या बाबी सहज शक्य होत्या. उलट ज्या राज्यात ३७० नाही तिथे गुंतवणूक का नाही हा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे. आता त्या त्या राज्यातल्या विरोधी पक्षाने लावून धरणे आवश्यक आहे. जिथे काँग्रेस असेल तिथे भाजपने जिथे भाजप असेल तिथे काँग्रेसने हा प्रश्न विचारला पाहीजे.

मात्र या दरम्यान केलेल्या त्रिभाजनामुळे आपण पाकव्याप्त काश्मीर सोडून दिले आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. मोदी शाह आणि त्यांना मानणारे अंधभक्त यांच्या दृष्टीने प्रश्न विच्चारणे म्हणजे द्वेष करणे असे असल्याने त्याचे उत्तर काय मिळणार हे सांगणे नकोच.

Submitted by मी-माझा on 10 August, 2019 - 03:39 ---> +१ मी-माझा
पण कितीही सांगूनदेखील मोदी विरोधकांना काहीच समजणार नाही. किंवा समजत असले तरी मुद्दाम मोदी मुळे विरोध सुरु ठेवतील. मोदीद्वेषाने त्यांची मने कलुषित झालेली आहेत. त्यात सरकार एकामागून एक अनेक चांगले निर्णय घेत असल्याने त्यांची लोकप्रियता अजून वाढत आहे आणि हे पाहून यांचा जळफळाट होतोय. त्यामुळे कितीही सांगून उपयोग नाही. ते इथे स्पॅमिंग करताच राहतील. पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही (आणि हे त्यांनापण माहित आहे). पण करणार काय दुसरा मार्गच त्यांना सापडत नाही त्यामुळे हे लोक असेच इथे आरडाओरडा करत राहतील अन तिकडे मोदी असेच देशहिताचे निर्णय घेत राहतील. आपण फक्त यांचा जळफळाट पाहून मजा घ्यावी अजून काय Happy

केवळ एखाद्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात एखादी गोष्ट घातली होती आणी त्या पक्षाला बहुमत मिळाले या कारणाने ती गोष्ट नैतीक किंवा समर्थनीय होत नाही. घटनेचे मूळ स्वरूप अगदी ९९% बहुमतानेही बदलता येत नाही. एखाद्या राज्याच्या भवितव्याचा प्रश्न त्या राज्यातील लोकांना व लोकनियुक्त प्रतिनीधीना अंधारात ठेवून घेणे चुकिचे आहे.

समजा मुंबई केंद्रशासीत करायचे ( व तिचा दिल्ली सारखाच विकास करायचे) वचन एखाद्या पक्षाने दिले व तो प्रचंड बहुमताने सत्तेवर आला, नंतर अचानक एके दिवशी उद्धव ,राज, शरद पवार वगैरे लोकांना नजरकैदेत ठेवले, मुंबईत प्रचंड सैन्य व पोलीस बोलवले. मुंबईतील इंटरनेट व मोबाईल सेवा बंद केल्या. १४४ लागू केले. व मग मुंबई महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासीत करायचा निर्णय मुंबईकरांना कोणताही से न देता घेतला तर ?

एखाद्या पक्षाने आंतरजातीय विवाहावर बंदी घालायचे आश्वासन दिले व मग तो सत्तेवर आला तर ?

विजय कुलकर्णी
पद्धत तर चुकीची आहेच.
पण राज्यसभेत जेव्हां अमित शहांनी ठराव मांडला तेव्हां त्यात पाकव्याप्त काश्मीरबद्दल काहीच नव्हते. विरोधकांनी लक्षात आणून दिले म्हणून नंतरच्या भाषणात त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताचा हिस्सा आहे असे म्हटले. विरोधक म्हणजे शत्रू राष्ट्र अशा समजावर पोसलेल्या आणि लोकशाही म्हटले कि ज्यांचे पित्त खवळते अशांना सांगून फायदा नाही.

यापूर्वी जम्मू काश्मीरच्या विधानसभेत पाकव्याप्त काश्मीरच्या प्रतिनिधींच्या जागा रिक्त ठेवल्या जात. अशा पद्धतीने भारताचा हक्क अधोरेखित केला जात होता.

आता काश्मीर खोरे वेगळे, लडाख वेगळे आणि जम्मू वेगळे केले गेले आहे. केंद्रशासित प्रदेश असल्याने त्याच्या सीमारेषा निश्चित कराव्या लागतात. त्या पाकव्याप्त काश्मीर मधे दाखवता येणार नाहीत. आता विधानसभाही अस्तित्वात नाही. हा पेचप्रसंग आहे. याकडे लक्ष दिले गेले पाहीजे.

मात्र याचा फायदा पाकिस्तान उठवू शकण्याच्या स्थितीत नाही असे वाटते. तिथे आत्ता लष्करी राजवट नाही. शिवाय अमेरिकेचा पाठिंबा नाही. चीन सध्या भारताला दुखावू इच्छित नाही. पण अक्साई चीन बद्दल अमित शहा यांनी संसदेत जे निवेदन केले आहे त्याआधी चीनला फोनाफोनी केली असावी ही अपेक्षा.

नाहीतर इशान्येची सात राज्ये जी अशाच नियमांनी जोडली आहेत, ती अस्वस्थ होऊ शकतात.

आज रशियाने देखील भारताच्या निर्णयाचे समर्थन केले. अमेरिका, युनो, फ्रान्स, युके, इस्राईल अशा महत्वाच्या देशांनी एकतर या निर्णयाला पाठिंबा दिला आहे अथवा हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून मौन साधले आहे (पण काँग्रेसी संसद मात्र हा भारताचा अंतर्गत प्रश्न नाही म्हणून संसदेत बरळत आहेत...त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा). परंतु आंतरराष्ट्रीय समाजात विरोध कोणीही केला नाही. अगदी चीनदेखील वचकून आहे. पाकिस्तानने सगळ्यांकडे भीक मागून झाली तरीही कोणीही त्यांच्या बाजूने नाही. आज जगामध्ये भारताचे स्थान अगदी मजबूत आहे. हा मोदी सरकारच्या परराष्ट्रीय धोरणांचा विजयच आहे. मोदींनी सुरुवातीला केलेल्या परदेश दौऱ्यात याचे बीज रोवले गेले होते. आता याचेच मोठे झाड होऊन त्याचीच फळे सध्या मिळत आहेत.

समजा मुंबई केंद्रशासीत करायचे ( व तिचा दिल्ली सारखाच विकास करायचे) वचन एखाद्या पक्षाने दिले व तो प्रचंड बहुमताने सत्तेवर आला, नंतर अचानक एके दिवशी उद्धव ,राज, शरद पवार वगैरे लोकांना नजरकैदेत ठेवले, मुंबईत प्रचंड सैन्य व पोलीस बोलवले. मुंबईतील इंटरनेट व मोबाईल सेवा बंद केल्या. १४४ लागू केले. व मग मुंबई महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासीत करायचा निर्णय मुंबईकरांना कोणताही से न देता घेतला तर ?
नवीन Submitted by vijaykulkarni on 10 August, 2019 - 16:39
<<

"आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते"
टाईपचा प्रतिसाद आहे हा .

हा मोदी सरकारच्या परराष्ट्रीय धोरणांचा विजयच आहे. मोदींनी सुरुवातीला केलेल्या परदेश दौऱ्यात याचे बीज रोवले गेले होते. आता याचेच मोठे झाड होऊन त्याचीच फळे सध्या मिळत आहेत.
नवीन Submitted by कोहंसोहं१० on 10 August, 2019 - 16:53
<<

सहमत !

विजय कुलकर्णी
काही पण पोस्ट करायला लागलेत

विजय कुलकर्णी
तुमची मनस्थिती आम्ही समजु शकतो !! आम्रिकेतुन लिहीताहात म्हणजे सर्व काही चालुन जाईल अश्या भ्रमात आहात ?
मोदीजींच्या विरोधात पार आंधळे झालेला आहात !! विषयाची माहिती नसेल तर प्रतिक्रिया देण गरजेच नाही, अभ्यास वाढवा, परिस्थिती समजावुन घ्या, लागलेच तर शिक्षिता कडुन मदत घ्या !! बाकी तुम्हाला मनापासुन शुभेच्छा !!
Get Well Soon !!!

गुंतवणूक / रोजगार / शिक्षण हे मुद्दे फोल आहेत. ३७० ची ही नौटंकी न करताही या बाबी सहज शक्य होत्या. >>

मग करायचं होतं की आधीच्या सरकारांनी ! कसली वाट बघत बसले? कॉन्ग्रेसकडे २००४ - २०१४ अशी सत्ता होती, तेव्हा का नाही केले? आता ते आधीच पातळ होते (म्हणजे काय ते संजय पगारेंनाच ठावुक) , तर गुलाम नबी आझाद, अब्दुल्ला, मुफ्ती आणि पाकिस्तान छाती का बडवत आहेत?

३७० कलम रद्द झाल्याने मोठा कोणताही सकारात्मक बदल घडून येणार नाही हे सिद्ध झाले आहे. >>>
काय टाईम मशीन वगैरे मिळालिय का? आम्हालापण घडवा भविष्याची सफर

नवीन Submitted by vijaykulkarni on 10 August, 2019 - 16:39

विजय भाउ तुम्ही टाकलेल्या व्यन्गचित्रातील काश्मीरी नक्की कोण ते तुम्ही अजुन सांगीतले नाही... मी ९ पर्याय लिहिलेले त्यापैकी कोण ते नक्की सांगा..

बाकी आता जे काही लिहिलय त्याला "आत्याबाईच्या मिशा" ही अतिशय समर्पक उपमा सुमित यांनी दिलीय.

विजय कुलकर्णींचा एकच प्रतिसाद आहे. Lol
त्यावर आदळ आपट करणारे प्रतिसाद किती आलेत Lol
मनोरंजन आहे.

जे लोक बिनबुडाचे लिहीतात त्यांनी दहा काय शंभर मुद्दे लिहीले तरी त्याला महत्व काय असणार आहे ? Rofl
विजय कुलकर्णीसारखे सेन्सीबल लोक भंपक आयड्यांना उत्तरे देतील असा भ्रम बाळगणे यापेक्षा दुसरे मनोरंजन नाही.

मज्जा येतेय.

Pages