मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथले अपडेट वाचुन मी पण नाही बघितलं. बर्‍याच आणखी जास्त विंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या संपल्या की बघेन.

शिवानीचा माज उतरवायला पाहिजे.
तिने मी कसं घरच्यांना त्रास नको म्हणून जेलमध्ये जात्येय याचं भाषण दिलं तेव्हा बाप्पा & कं टाळ्या वाजवतात की काय आता असं वाटलं.
शिव नेहाला पण योग्य बोलला.

वीणा फार बोअर करतीय. शिवानी भडकु असली तरी कंटेट देतीय. ती नसती तर काय केले असते पराग आणी वीणाने ? रुपाली आणी परागचे जे काहि चालले आहे ते फारच हास्यस्प्द होत चालले आहे. काहि केमिस्ट्री नाहि, काहि नाहि, उगाचच ओढ्न ताणुन डायलोग मारायचे प्रेमाचे !
बुचकुलेला जज्ज केले Proud . हा माणुस भारी आहे . Proud

कालच्या भागावरून एक गोष्ट कळली की शिवानीच वागण हे तिच्या टीममधल्यांनाही पटत नाही आहे.पण सगळे हतबल झाले आहेत आणि त्याच कारण म्हणजे एक शिव सोडला तर कुणीही त्यांच्यापैकी स्टँड घेत नाही.
मेघा धाडेनेही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे,की शिवानीची पूर्णपणे चूक होती,पण ती अशी नाही आहे,खूप चांगली आहे,पण तिला त्या घरातच मुळात स्वत:ला अँडजेस्ट करता येत नाही आहे.
सध्या संपूर्ण सोशल मिडिया शिवानीविरोधात गेला आहे,तसच कधी नव्हे ते प्रथमच बिचुकलेऔनाही,शिवानीमागे फिरतात म्हणून टार्गेट केल जात आहे.
इथे मात्र मराठी आणि हिंदी मध्ये नक्कीच फरक पडतो,हिंदीत हे चालवून घेतल जात असेल,कारण हिंदी प्रेक्षक हा दूरवर पसरलेला आहे,त्यामानाने मराठीच तस नाही,महाराष्ट्रपर्यंतच त्याची मर्यादा आहे,.
जर जनमत असच शिवानीविरोधात जात राहिल,तर मराठी प्रेक्षक चँनेलला हवा असलेला टीआरपी कधीच देणार नाही.याच उत्तम उदाहरण म्हणजे झीचाच नुकताच आपटलेले सारेगमप आणि चला हवा येऊ द्या परदेश दौरा.
त्यामुळे चँनेलला शिवानीला बाहेरचा रस्ता दाखवावाच लागेल
फक्त तिला कमी वोटिंगमुळे काढणार नाहीत तर काल तिनेच स्वत:च एक हिंट दिली आहे की तिला हेल्थ इशूज आहेत,त्या कारणावरून तिला बाहेर काढू शकतात,जस सुशांतला बाहेर काढल होत,अँसिडिटी वाढली म्हणून,त्यासाठी नॉमिनेशनची गरज नाही.

पराग आणि रुपालीच काहीही चालल नाहीये . एकवेळ पराग शो पुरत काहीतरी करत असेलही पण रुपाली अजिबात त्याला भाव देत नाहीये . शिवानीने आधी सगळ्यांना सांगितलं त्या दोघांचं बघा काय चाललंय आणि काल - परवा कधी तरी तीच बोलत होती . परागची प्रेमाचं नाटक करण्याची स्ट्रॅटेजी असावी एकदा शो संपला कि तू कोण आणि मी कोण ? अशा शब्दात आता बोलतेय . रुपालीने पण बिचुकले ना जवळ बोलावून सांगितलं " एखादा पुरुष आणि एखादी बाई सेपरेट एका ठिकाणी गप्पा मारताना दिसले कि त्यांच्या मध्ये काही अफेयरच असत का ? मित्र असू शकत नाहीत ? " आणि शिवानीच ऐकून बिचुकले त्या दोघांची भानगड आहे असं समजून स्वतः मात्र शिवानीच्या पाठी एकटे एकटे लाळ घोटताहेत . काल - परवाच इंस्टग्राम वर बघितलं शिवानी करता बिचुकले प्रेमाच गाणं म्हणताहेत Lol

आजचा एपिसोड काय फालतु , कशाला तो कोर्टरुम ड्रामा जर शिवानीचा पालतु कुत्ता बिचुकले जज म्हणून बसलाय?
शिवानीला व्हिलन ऐवाजी हिरॉइनच करून टाकलं, अख्खा एपिसोड तिच्यावर डेडीकेटेड, थोडक्यात तिची हैदोस स्ट्रॅटजी १०० टक्के कामी आली.
घरातले सगळे तिचे फ्रेंड्स काय तिची मर्जी सांभाळतात, मस्का मारतात तिला, अ‍ॅज इफ सगळ्यांनी अ‍ॅक्सेप्टच केलय कि ती गृपची मुखिया आहे, बिचुकले , केळ्या, माधव सगळे गुलाम तिचे !
जाम बोअर केलं सगळ्यांनी आणि बिग बॉसनी.

शिवानी एंटरटेनिंग नाहीये आणि खिलाडूवृत्ती अजिबात नाही, टास्क तिने चांगलाही केला नाही. दुसरी टीम जिंकतेय बघितल्यावर, गेम रद्द करुया. टीममधल्यांनी, सरळ नकार दिला आणि तिचा पचका झाला. सोशल मिडीयावर खूप टीका चाललीय, तिला काढा.

सॉरी टू से पण शिवानीला चॅनेल, बिग बॉस सर्वांचा वरदहस्त आहे हे नक्की म्हणून तिचं इतकं निगेटीव्ह वागायचं डेरींग चाललंय.

मेघा धाडेने पण खूप टीका केलीय तिच्या वागण्यावर.

केळ्या,माधव जरा तरी तिच्या विरोधात बोलतात . वैशाली, बिचुकले खरंच पाळीव कॅटेगरी आहेत. काल माधव ला शिवानी काहीतरी म्हटली पण की सध्या असू देत पाळीव लोक असे काहीतरी. जेल चा ड्रामा अगदीच स्क्रिप्टेड वाटला. लगेच बाहेर पण काढले आणि त्यांना. बिचुकले आता काहीतरी करून शिवानीला सोडवणार. किंवा बोटचेपेपणाने दोघींना एक चान्स द्या म्हणून व्हर्डिक्ट देणार.
नव्या कॅप्टन चे काय आणि? आता शिवानीच कॅप्टन झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही Lol

शिवानी आणि माधव जुने मित्र असणार , देवयानी सिरियलमध्ये तो तिचा होणारा नवरा होता.

बाकी यावेळी सगळंच स्क्रिप्टनुसार चालू आहे. त्यामुळे नियमित बघायला मजाच येत नाहीये. वीकेंडला मांजरेकरने काही योग्य स्टँड घेतला नाही तर मला नाही वाटत next week कोणी बघेल शो.

ममा येताहेत ना आज मग कोर्टरुम टास्क च नाटक कशाला? उगाच काहीही दाखवायच?

शेवटी बिचकुलेला निकालाचा लिफाफा वाचायला सान्गतील जो नव्या कॅप्टनसन्दर्भात असेल.

रुपाली काल काळा फेशियल मास्क लावून परागसमोर उभी होती, वाटल शिवानी आली की काय काळा फेसपॅक लावून परागला घाबरवायला. Lol

मॅडी शिवानीला सांगत होता कि वैशाली काहीतरी वेगळा गेम खेळतेय सिक्रेटली , जे त्याला लक्षात आलय.
तेंव्हा शिवानी म्हणाली कि आत्ता इग्नोअर कर, मिळतील तेवढे लोक पाहिजेत आत्ता आपल्याला आपल्या बाजुने , अभी कुत्ते बनके झुंडमे चलते है, बदमे शेर बनेंगे.
बिचुकलेने बनवलेली इमेज घालवली आहे , शिव कुठल्याच गृपची हांजीहांजी करत नाही हे आवडतय.
परागनेही मार्ग चुकवतोय लव्ह ट्रॅक अ‍ॅड करून, या सिझनचा मास्टरमाइंड पराग नक्कीच आहे पण त्या मठ्ठ रुपालीमुळे इमेज घालवेल.’थोडक्यात बिचुकले शिवानीमुळे , पराग रुपालीमुळे मागे पडलेत.. सर्सी आणि सान्सा स्टार्कही म्हंटलीच आहे ‘मेन डु स्टुपिड थिंग्ज इन लव्ह ‘ Wink

ह्या मह्याचीच कुणी शाळा घ्या रे...
काहीही उमजत नाहीये त्याला. कुणाला काय बोलतोय. शिवानीला म्हणतो राग कमी कर शिव्या कमी कर, पण तू चुकलीस हे सांगायची हिंमत नाही.
पराग ला टार्गेट करतोय मुद्दाम.

@सुषमा ताई - ती जाणारच होती. पण एक मनापासून वाटतंय, ऑडियन्सचे वोट मॅटर करणे नाही, अटलिस्ट फायनलपर्यन्त तरी. चॅनेलला जे वाटतील तेच काढतील...

अ बि ला जज केलं ते शिवानीसाठीच. परागला नीट केस पुट ऑन करता आली नाही आणि रुपालीची साक्ष ग्राह्य धरली नाही.

रुपाली मैत्रीण म्हणून साक्ष ग्राह्य न धरणे असेल तर त्यांच्या टीममधल्यांच्या पण ग्राह्य धरणे चूक होतं. एनीवे वीणाने पण फटका मारला ते चूक होतं. तिने तसं न करता bb कडे तक्रार करायला हवी होती.

मैथिली संचालक म्हणून फेल गेलीच पण समोरच्या टीमने पण bb कडे तक्रार केली नाही की ह्यांनी इतक्या लवकर कसे चोरले इतके कपडे, दाल मे कुछ काला है असं वाटतंय.

शिवानीने शिवची कॉलर धरली ती तक्रार शिवने केलेली बहुतेक पण bb ने काही केलं नाही. परागने पाय अडकवणे आणि पाणी उडवणे ही तक्रार केली नाही sportingly घेतलं ही त्याची चूक होती.

@सुषमा ताई - ती जाणारच होती. पण एक मनापासून वाटतंय, ऑडियन्सचे वोट मॅटर करणे नाही, अटलिस्ट फायनलपर्यन्त तरी. चॅनेलला जे वाटतील तेच काढतील...>>>> हो हो अगदी अगदी!!!
या शो चा फॉरमॅट असाच असेल... bb घरात जे काही राडा टाइप / राडा घडतोय तो निवांत घडू द्यायचा... इकडे प्रेक्षकांना एकमेकांवर प्रतिक्रिया टोमणे शिव्या भांडणे करायला सोडून द्यायचे... आपोआप ट्यार्पी वाढतोच
टास्कचेही तेच धड पणे कोणतेही नियम सांगायचे नाहीत... मग काय कोणीही कोणालाही मन मानेल तसच खेळेल ना!!...
... खेळताना लबाडी म्हणजे, स्वतः केली तर शातिर दिमाग गेम.... विरोधी टीम ने केली तर अफेयर गेम ...हे म्हणजे कसं झालं...
प्रेमात आणि युद्धात सर्व माफ + आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कारटे = bb चे खेळ

प्रेमात आणि युद्धात सर्व माफ + आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच ते कारटे = bb चे खेळ >>> मस्त मस्त Lol

आता वीणाने चीटिंग केली, कपडे आधीच गोळा केले आणि त्या लोकांनी चढवले. त्यांच्या दृष्टीने ती हुशारी पण संचालक आणि विरुद्ध टीमच्या लक्षात नाही आलं हा त्यांचा मूर्खपणा पण आता चीटिंग केली असं म्हणणार पण bb ने ते माहिती असून करू दिली, objection घेतलं नाही असं नाही म्हणणार विरोधी टीम.

महेश मांजरेकर प्रचंड बायस वाटला मला. शिवानी आणि कंपूला किती फेवर करत होता ते दिसतच होत. केळकर प्रचंड इरिटेटिंग वाटत होता. त्याचा चेहराच मला आवडत नाही. किंबहुना ती व्यक्ती दिसली तरी ईई असं फिलिंग येत.
वैशाली न्यूट्रल आणि गुड टास्क परफॉर्मर? मांजरेकर कुठल्या जगातलं बिग बॉस बघताय तुम्ही. वैशाली म्हणजे एक टिपिकल व्हॅम्प वाटते मला. मुद्दाम कुत्सित हसत राहणं, कुणाच भांडण चालू असताना सगळं झाल्यावर मानभावीपणे स्वतःचा मोठेपणा दाखवण, मागे कायम वाईट आणि तोंडावर गोड गोड बोलत राहणं... विचित्र.
मांजरेकर ओरडला की पराग तू तिथे उभा का राहिलास? मग या या शिवानी सरकार असं म्हणून वाट करून द्यायला हवी होती का?
केळकर म्हणतो, काही स्वयंपाक करत नाही, पसारा करतो. अरे माकडा, तो खायला घालतो तर तुमची घाणही त्यानेच आवरावी का. हद्द झाली.
काल शेवटी संतापाने टीव्ही बंद केला मी..

Bappa is totally clueless about the game.. He feels that he can survive fot 3 4 weeks only.

Checkout Shivani motivates Bappa! on Voot https://voot.app.link/HoxQzZplnX

शिवानी त्याला म्हणतेय की थांब 10 आठवडे..मोठा चेक घेउन जा.. हे सगळं इतकं प्लोटींग करतात..आणि आपण वेड्या सारखे रक्त आटवतो स्वताच..

मैथिली नंतर नम्बर दिगम्बर चा इविक्शन मध्ये.
सुरेखा ताई खूप गोड बोलतात,” हा टकल्या हाय ना वेगळी चूल कराया निघालाय”.

बाप्पा क्लुलेस नाहि, तो मोके पे चौका मारतो. काल शिवानी/किशोरी "फेक" वागण्याच्या मुद्द्यावरुन त्याने मांडलेलं त्याचं मत वाखाणण्याजोगं होतं. मांजरेकरांनी सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे तो धुर्त कोल्हा आहे. शिवानीने त्याला मोटिवेट करणं म्हणजे नातवाने आज्याला शिकवण्या सारखं आहे. शिवानी आव आणते तिला गेम समजला आहे वगैरे पण तिचं वागणं आणि त्यानंतर बिबॉ (कॅमेरा) समोर केलेलं स्पष्टिकरण याचा ताळमेळ बसत नाहि. काल मांजरेकर तिची शाळा घेत असताना ती डियर इन हेडलाइट्स झाली होती...

दुसरी एक गोष्ट खटकली, ती हि कि शिवानीच्या "महान" बनण्याच्या प्रयत्नाला (सगळ्यांना शिक्षा नको म्हणुन मी जेल मधे जाते) फक्त मैथिलीने विरोध केला. अ‍ॅट लिस्ट शिवानीच्या विरोधकांनी तरी मैथिलीचा पॉइंट उचलुन धरायला हवा होता. शिवानीचा फुगा फोडण्याची एक सुवर्णसंधी वाया गेली...

बाप्पा क्लुलेस नाहि, तो मोके पे चौका मारतो >> हे मी विडियो बघुन बोलले..जेव्हा तो म्हणाला की आधीचा एकही एपिसोड बघीतला नाही..sudden entry होती म्हणे..ख खो दे जा.. त्याच शब्द भांडार चांगल आहे त्याचा उपयोग तो नक्कीच करतो..पण टास्क कितपत करु शकेल पुढे ते नाही माहीत..

सध्या पराग, शिव, नेहा हेच आवडत आहेत.. बाकी किशोरी चा ड्रामा खूप होता..रडुबाई वाटली..माझं नुकसान झाल न ऑल

परत एकदा शिवानीला सौम्य शब्दात समज !
बिचुकलेला जज केले म्हणून शिवानी जिंकलीच असती पण त्याही पेक्षा पराग एक बंडल वकिल होता, अजिबात डावपेच, वाक्चातुर्य जमलं नाही त्याला, शिवाय वीणाला स्वतःला तरी कुठे तिची बाजु मांडता आली ? हरणारच होती ती कारण ती, तिचे साक्षीदार, वकिल सगळे अगदीच डंब !
आधी वाटलेलं कि पराग समोर वैशालीचा निभाव लागणार नाही पण वैशालीने खरच चांगली बाजु मांडली शिवानीची आणि केळकर, माधव, बप्पा सगळ्यांचे बोलणे एकदम पॉवरफुल आहे , त्यामुळे जिंकणारच होती शिवानी.

वैशाली नंतर मांजरेकरही आले शिवानीचं वकिलपत्रं घेऊन , शक्यं तितके तिला सांभाळून घेतले , कदाचित चॅनललाच तिला अजुन राडा करु द्यायचाय!
जाउद्या मांजरेकरच्या शिवानीप्रेमाचं काही वाटेनासं झालय, कारण माला वीणा अज्जिबातच आवडत नाही पण शिवला मात्रं विनाकारण अपमनाअस्पद बोलतात मांजरेकर, खेकसतात म्हणून राग आला.
वीणा -शिवानीच्या मारामारीत तू मधे आलास म्हणजे ?? नसतं कोणी आलं तर तिथूनही म्हंटले असती मागच्या वर्षीसारखे कि एका बाईला फरफटत नेत असताना एकही पुरुष समोर आला नाही, बांगड्या भरल्यायेत का वगैरे !
एकट्या शिव मधे शिवानी-नेहा ची दादाच्या दादागिरीला उत्तर द्यायची हिंमत आहे, टास्क उत्तम खेळला पण बेस्ट परफॉर्मर अर्धाच गेम खेळलेला पराग ? शिवने चोर पोलिस टास्कशिवाय नॉमिनेशन टास्कचे संचालनही छान केले होते पण शिवचा उल्लेखही नाही , वर खेकसत होते त्याच्यावर ? सिरीयस्स्ली ? Uhoh
वैशालीने डिसलॉयल राहून चोरांना मदत केली त्याबद्दल उल्लेखही नाही , अस्तादला कित्ती लेक्चर मिळालं होतं.
आस्तादने स्वतः त्याचा फेसबुकवर रिअ‍ॅक्ट केलय याबद्दल , ऑनेस्ट्ली इन्सेनचा व्हिडीओ शेअर केलाय त्याने ज्यात त्यांनीही आस्तादची आठवण काढली, इन शॉर्ट अस्ताद काही मांजरेकरच्या दादागिरीची पर्वा करत नाही.

Pages