भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

हा लेख जून २०१४ साली प्रकाशित केला असता तर ते जास्त समर्पक ठरले असते. एक तर भाजप २८२ जागा निवडून मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. त्याशिवाय मित्र पक्षांच्या पाठबळाने ३३०+ मतांसह त्यांनी सरकार स्थापन केले होते आणि त्यापुढची पाच वर्षे शासन चालविणे हे केवळ भाजप आणि मित्रपक्षांच्याच हातात होते. दुसर्‍या पक्षांना तिथे काही स्कोपच नव्हता. अशा परिस्थितीत भाजपमध्ये गुणवंत किती? कोणते? त्यांच्या अभावामुळे कोणती महत्त्वाची कामे खोळंबू शकतात याची चर्चा अस्थानी वाटली नसती.

आता मार्च २०१९ मध्ये भाजपच्या जागा २८२ वरुन २७२ वर आल्यात. अनेक मित्रपक्ष दुरावलेत. लोकसभेच्या निवडणूकांचा हा कालखंड आहे. जुने खासदार बदलून नवे येणार आहेत. त्यांच्या मताधिक्यानुसार नवे सरकार, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे.

भाजपचा पाच वर्षांचा सत्ता राबविण्याचा कालखंड संपत आला असून काही दिवसांतच नव्याने कोण याचा निर्णय होणार आहे.

काँग्रेससह इतर सर्वच पक्षांना याबाबत इव्कल ऑपॉर्च्युनिटी असतानाही याक्षणी

फक्त

भाजपामध्येच असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

यावर चर्चा करणे म्हणजे पुन्हा

भाजपच बहुमताने निवडून येणार याची प्रचंड खात्री आणि देशाचे सरकार चालविणे व देशाचे भवितव्य ठरविणे हे केवळ आणि केवळ भाजप नेत्यांच्या हातात असल्याचा विश्वास असल्याचे द्योतक आहे.

धागाकर्ते श्री. भरत. यांच्या रुपात भारतीय जनता पक्षाला असा खंदा व अत्यंत विश्वासू समर्थक मिळाल्याबद्दल भाजपचे हार्दिक अभिनंदन.

<< लंकेतला हसन कसा आहे ? >>
------- पुढच्याच आठवड्यात पाकचे पर्यटक लंकेला भेट देण्यासाठी आले... सगळी स्टोरी तशीच.... मोदी यांच्या ठिकाणी इम्रानखान यांचे नाव आले.... अर्थात पाक पर्यटकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. Happy

<< भाजपचा पाच वर्षांचा सत्ता राबविण्याचा कालखंड संपत आला असून काही दिवसांतच नव्याने कोण याचा निर्णय होणार आहे. >>
------- पाच वर्षांचा काळ अगदी भारावलेला होता...
किती पटकन गेलीत पाच वर्षे.... Sad

<<काँग्रेससह इतर सर्वच पक्षांना याबाबत इव्कल ऑपॉर्च्युनिटी असतानाही याक्षणी
फक्त भाजपामध्येच असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव यावर चर्चा करणे म्हणजे पुन्हा>>
------ केंद्रात भाजपा सत्तेवर आहे.... काँग्रेस असती तरी लोखा -जोखा ला सामोरे लाव जावे लागलेच असते.

<< भाजपच बहुमताने निवडून येणार याची प्रचंड खात्री आणि देशाचे सरकार चालविणे व देशाचे भवितव्य ठरविणे हे केवळ आणि केवळ भाजप नेत्यांच्या हातात असल्याचा विश्वास असल्याचे द्योतक आहे. >>
------ अस आपल्याला वाटल्याने काय फरक पडणार आहे.

<< भाजपच बहुमताने निवडून येणार याची प्रचंड खात्री आणि देशाचे सरकार चालविणे व देशाचे भवितव्य ठरविणे हे केवळ आणि केवळ भाजप नेत्यांच्या हातात असल्याचा विश्वास असल्याचे द्योतक आहे. >>

ज्या कुणाला मोदीशिवाय भारत चालणे अशक्य वाटते त्यांनी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवावी की गेल्या ४५ वर्षांपासुन जशोदाबेन मोदीशिवाय अगदी आनंदात रहात आहेत. Proud

bjp तर आता सत्तेवर आली आहे म्हणून देशाच्या सरकारी व्यवस्थेत जो सावळा गोंधळ आहे त्यला 45 वर्ष राज्य करणारे च जबाबदार आहेत .
सरकारी यंत्रणेचा असलेला अत्यंत सुमार दर्जा हा सर्वाधिक वर्ष राज्यकारभार करणाऱ्यांची भारताला देण आहे

सरकारी यंत्रणेचा असलेला अत्यंत सुमार दर्जा>>. असहमत. सरकारी म्हणजे वाईत हे कोनी साम्गितले.
ज्या शक्ती मिशन्चे कालपासुन ढोल वाजवले जात आहेत त्त्या अंतराळ कर्य्क्रमाची सुरवात कित्येक दशके आधीच सुरु झाली आहे.
बाके हजारो गोष्टी IITs,IIMs,medical colleges,engineering colleges,dams,airports,railway,electronic communication, he कित्येक दशके आधी लोक्शाही मार्गाने निवडुन आलेल्या सरकारांनी सुरु केलय.

देशातील 1 सुध्दा गाव , तालुका , जिल्हा , राज्यातील लोकाना विचारल तर कोण्हीच मान्य करणार नाही की सरकारी यंत्रणा कार्यशील , निष्पक्ष , , आणी ऊच्य दर्जाची आहे ते .

देशातील 1 सुध्दा गाव , तालुका , जिल्हा , राज्यातील लोकाना विचारल तर कोण्हीच मान्य करणार नाही की सरकारी यंत्रणा कार्यशील , निष्पक्ष , , आणी ऊच्य दर्जाची आहे ते .>>> नकी कुठल्या देशात तुम्ही राहता?
सरकारी रुग्नालायांधे अत्यंत अवघड शस्त्रक्रिया मोफत करुन मिळतात.गावाकडे तर खसगी शाळेच अनुभव वाइइट आला म्हनुन लोक मुलांना पुन्हा सरकारी शाळेत टाकत आहेत.
CET मधे ranker मुलांना मरमरुन सरकारी विद्यालयात का जायचे असते? पुण्या मुम्बैइत तर नगरापालिकेचे पाणी न गाळता/उकळताता प्यायले तरी चालेल इतके शुध्द असते.
खासगी सेवा उप्ल्ब्ध असुनही railway,ST overfull असते.
बर्‍यच उच्चभ्रु लोकांनी सरकारी सेवा कधी वापरल्याच नसल्यामुळे त्यांवर त्यांना घाउक टीका करताना पाहिले की सखेद आशचर्य वातते.

<<ज्या कुणाला मोदीशिवाय भारत चालणे अशक्य वाटते त्यांनी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवावी की गेल्या ४५ वर्षांपासुन जशोदाबेन मोदीशिवाय अगदी आनंदात रहात आहेत>> तिकडे राहुल हि बायको शिवाय ४८ व्य वर्षी पण राह्तोयच कि ..तो नाही आला तरी कुठे काही फरक पडणार आहे मग ..ह्या DJ ला भाजप च्या लोकांच्या घरात डुंकवल्या शिवाय राहवत नाही वाटत ..

बाप रे.. किति चिडता हो..

बादवे राहुलचे अजुन लग्न कुठे झालेय बायको सोडुन पळ काढायला Proud
त्यास एखादी चांगली मुलगी दाखवा म्हणुन सांगावे तर इकडे सगळे अविवाहित तरी नाहितर लग्नाच्या बयकोला सोडुन पळालेले तरी Biggrin

राहुलचा धर्म कोणता, गोत्र कोणतं यावर प्रतिसादांवर प्रतिसाद लिहिणारे कोण ते?

डीजे , मी आधीही लिहिलंय. नेत्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा करायची गरज नाही. हे असले चटपटीत फॉर्वर्ड्स वाचून सोडून देण्यासाठी असतात..
गंभीरपणे चर्चा करायची असेल, तर असले मुद्दे आणू नयेत.
बाकी तुमची मर्जी.

<<बादवे राहुलचे अजुन लग्न कुठे झालेय बायको सोडुन पळ काढायला >>
आधी होऊ द्या तर खर, ह्याच्या वयात काही लोक आजोबा होतात ..तुम्हाला कोणी गुणवंतीन भेटली नाही का अजून राहुल साठी ..
अरे हो एक भेटली होती पण नाही म्हणाली नाही का काही दिवसांपूर्वी ..
त.प. :- आमही पण असल्या फालतू गप्पा मारू शकतो पण ते हे स्थळ नव्हे ..

मूळ मुद्दा हा गुणवंताचा होता , तो सुरु राहूद्या , काही गुणवंत भाजप मधून पाठवलेत शत्रुघ्न सिन्हा सारखे काँग्रेस मध्ये , आधी एक पाठवले होते नवज्योत सिंह सिद्धू त्यांचा काँग्रेस पुरेपूर वापर करून घेत आहेतच ..ह्यांची पण काळजी घ्या ,,

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 27 March, 2019 - 10:26 <<<<<

मी सहमत आहे. गेल्या तीन, साडे तीन वर्षांपासून हा संशय येत आहे की काही ट्रोल्स हे भाजपानेच पेरलेले आहेत. अत्यंत टोकाची टीका करण्याने जे जनमत उगीचच तयार होते ते मतदानात प्रतिबिंबित होते. संयत लिहिले तर चर्चा होईल ना? आणि संयत चर्चा झाली तर काय होईल कोण जाणे! उगीच राहुलजी गांधीही लायक उमेदवार वाटू लागतील काहींना पंतप्रधानपदाचे! त्यापेक्षा तीव्र विखारी टीका करणारे काहीजण ठेवून असा टोळीत! ही पॉलिसी असावी. Wink

ते कोण ते, नरेंद्र मोदी की कोण, परवा म्हणाले होते बघा! मै गालीको गहना समझता हूं! त्यातलाच प्रकार असावा हा!

अन्यथा साडे चार वर्षे भाजपच्या प्रत्येक कृती / उक्ती / घोषणा यावर टीका केल्यानंतर अचानक त्यांच्यात गुणवंत किती हा प्रश्न आज का पडावा बुवा!

बरं! जे काँग्रेस / राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले ते निवडून येणारे होते म्हणून भाजपने त्यांना घेतले असे मान्य करावे तर त्यांच्या स्वपक्षावरील निष्ठा आणि गुणवंत म्हणून स्वपक्षात वावरणे हे सगळे कुठे गेले? याची उत्तरे देणे अडचणीचे आहे. एकवेळ बटाट्याची फॅक्टरी टाकून सोने निर्माण करता येईल, पण हे कसे झाले ते नाही सांगता येणार

Wink

मला ते न्याय स्कीम सुरुवातीला रागा चा अजून एक कॉमेडी शो असं वाटलं होतं पण आता थोडं डिटेल वाचलं तर इंटरेस्टिंग वाटत आहे. हे काँग्रेससाठी गेम चेन्जर असू शकेल. किंवा बीजेपी सिमिलर स्कीम आणण्याचा विचार करू शकेल.
अंबानीने फ्री जियो डेटा दिला (almost free, right?). अंबानी काही सोशालिस्ट किंवा लेफ्टीस्ट नाही.

<<ते कोण ते, नरेंद्र मोदी की कोण, परवा म्हणाले होते बघा! मै गालीको गहना समझता हूं! त्यातलाच प्रकार असावा हा!>>
तुम्ही बघितलं आणि ऐकलं असेलच, नरेंद्र मोदी अगदी २००२ ला गुजरात चा मुख्यमंत्री असल्यापासून काँग्रेस चे लोक शिव्या देत आहेत पण हा त्यांच्या नाकावर टिच्चून नुसता ३ वेळा मुख्य मंत्रीच नव्हे तर देशाचा पंतप्रधान पण झाला आणि हे पार २०६ वरुन ४४ वर आले. मोदीना लोकांनी दोन ठिकाणी निवडून दिले आणि ह्यांनी तर असा प्रधानमंत्री बनवला होता जे निवडणुकीचं लढले नाही .

इंग्रजी भाषा ही जशी मोदींची STREANH आहे, तशीच हिंदी सुद्धा. त्यांच्या शब्दकोशात समाजवादी हा शब्द शराब मधल्या श पासून सुरू होतो.

<देशातील 1 सुध्दा गाव , तालुका , जिल्हा , राज्यातील लोकाना विचारल तर कोण्हीच मान्य करणार नाही की सरकारी यंत्रणा कार्यशील , निष्पक्ष , , आणी ऊच्य दर्जाची आहे ते .> यांनीच कुठेतरी त्यांच्या गावाचा कारभार किती छान चालतोय ते सांगितलेलं ना?

यांनीच कुठेतरी त्यांच्या गावाचा कारभार किती छान चालतोय ते सांगितलेलं ना?

हो ना, घटागाडी येते म्हणे, सरकार भाजपा की राष्ट्रवादी , ह्याचे उत्तर मात्र देत नाहीत

आज घरातला गॅस संपला तर बायकोने चक्क लॅपटॉप घेतला आणि मायबोली साईट ओपन करून स्क्रीनवर पोळ्या भाजल्या. आता दुपार झाले पण डब्यातल्या पोळ्या अजूनही तशाच गरमा गरम आहेत. मी लाभार्थी ही माझी मायबोली.

सरदार पटेलांच्या स्मारकात काम करणाऱ्या नोकरदारांचा पगारच केला नाही म्हणे कित्येक महिने झाले... संपावर गेलेत ते चक्क.
गुणवंत प्रज्ञावंत प्रजादक्ष राजाच्या काळात हे प्रकार?

Pages