भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ह्यांच्या सर्वोच्च नेत्याला पाकी पंप्र एंडोर्स करतो हे विचित्र वाटत नाही का? ५६ इंचाला घाबरायचे सोडून हा कसला याराना? गडबड क्या है दया
>>>>>>

तो इम्रान पाकि पंतप्रधान व्हायच्या आधीपासून मोदींची स्तुती करतोय. भारतात निर्णय घेण्याची क्षमता फक्त एका माणसात आहे हे त्याने त्याच्या वक्तव्यातून सांगितलंय. अर्थातच काही वेडे लोक त्या गोष्टीला इम्रान आणि मोदींची मैत्री असा रंग देऊन पेडगावला जात आहेत.

सनव, मला लोकसत्ताकार असं संबोधून त्यांचं बारसं करायची मुभा त्यांनीच मला दिलीय. मंदबुद्धी . भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, इं विशेषणांनी संपृक्त भाषा वापरणार्‍या प्युअर ट्रोलला ट्रोल करण्यापलीकडे दुसरा मार्ग असेल तर दाखवा.

दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिये
मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू
हम लढेंगे और मरेंगे ए वतन तेरे लिये लालालाsss लालालाssss लालालाssss लालालाsss

>> मंदबुद्धी . भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, इं विशेषणांनी संपृक्त भाषा वापरणार्‍या प्युअर ट्रोलला ट्रोल करण्यापलीकडे दुसरा मार्ग असेल तर दाखवा. >> +1 जोरदार अनुमोदन.

बोकलत Angry Proud

मी पण गाणं म्हणणार .Cat Headphones

१ ) हे ! चाय बेचते चलो, चाय बेचतो चलो
क्या भाजप, क्या काँग्रेस अरे सब है पीनेवाले
चाय बेचतो चलो, चाय बेचते चलो

२ ) आया है व्होटर लोगों रे लोगों
व्होटर के संग तुम झुमो रे झुमो

व्होटर का रंग पानी जैसा ना यारों
व्होटर तो है दिलदार देखो यारों
आया है व्होटर.....

३ ) आ ss आ भी जा, दिन ये ढलने चला
व्होट क्यूं ना दिया, आ ss आ भी जा...

४ ) ओ निगाहें व्होटर प्यारा, तेरे व्होट का मैं हू दिवाना

४ ) आजा मेरे गाडी में बैठ जा, आजा मेरी गाडी में बैठ जा
बुथ तुझे पहुचां दूं मै, आईस्क्रीम तुझे खिला दूं मै
आजा मेरी गाडी में बैठ जा

जॉइंट फार्मिंग सोसायटीच्या ६८० एकर मैदानाच्या एका भागात मोदींची सभा होत आहे. जागा विस्तीर्ण असल्याने सुरक्षा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गेल्या तीन- चार वर्षांपासून कांदे दर सातत्याने घसरत असल्याने या भागात शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे कांदा-टोमॅटोचे क्षेत्र असलेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या शेजारील या सभेत कांदा किंवा टोमॅटो फेकीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपच्या सांगण्यावरून प्रशासनास विशेष दक्षता घेत आहे. त्यासाठी सभास्थळावर चारही बाजुंनी मोठा खंदक खोदून बॅरिकेडिंग केले जात आहे. या कामासाठी येणाऱ्या मजुरांचीही लेखी नोंद घेतली जात आहे.

~ अबकी बार फट्टुमल की सरकार...

सर्पमित्र ही कामाला लागली आहेत, म्हणे साप सोडणार ह्यांच्या सभेला. मोदींच्या सभेला आता पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याने हे पिल्लू बिजेपीने सोडले आहे.

सर्पमित्रच का म्हणुन..? मधमशी मित्र पण नेमा म्हणावे. मधमाशा-गांधिलमाशा यांचा नियंत्रीत हल्ला होऊ शकतो असे काल कोणीतरी बसमधे म्हणत होते..! Proud

काँग्रेसने भारत साप गारुड्यांचा देश अशी चुकीची प्रतिमा बाळगलेल्या देशांना प्रगती करून गप्प बसवले होते, केवळ पाच वर्षात मोदींनी भारताची अधोगती करून देश साप गारूड्यांचा करून टाकला .

साध्वी प्रज्ञानी भाजपत प्रवेश केलाय. भोपाळमधून दिग्विजयसिंग विरोधात उभ्या राहू शकतील.
Submitted by भरत. on 17 April, 2019 - 17:55
<<

तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ? तसाही डॉग्गीराजा भोपाळ मधून आपटणार आहे.

This thread (or for that matter any other thread on Politics) resembles a parallel Game of Thrones being played by WIGHTS. Biggrin>>> Biggrin

सैनिक सीमेवर असूनही त्यांच्या बायकांना मुले होतात , हे बोलणारे परिचारक आज मोदीजीसोबत एका स्टेजवर होते म्हणे

मोदी समर्थाकांचा तोल सुटला की (हल्ली मोदी हरणारच्या बातम्या येत असल्याने नेहेमीच) मला जाम मजा येते. Rofl

चापलुसी मंडळी ना तर राहुल गांधी पंतप्रधान झाल्याचे स्वप्न पडत असणार आहे , झोपी गेलेल्याना जाग करता येत , झोपेचं सोंग घेतलेल्यां नाही , चालू ठेवा स्वप्न रंजन...

कितीही आपटा येणार मोदीच..

<< चापलुसी मंडळी ना तर राहुल गांधी पंतप्रधान झाल्याचे स्वप्न पडत असणार आहे , झोपी गेलेल्याना जाग करता येत , झोपेचं सोंग घेतलेल्यां नाही , चालू ठेवा स्वप्न रंजन...

कितीही आपटा येणार मोदीच.. >>
------- सहमत... मोदीच येणार आहेत.... लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी Happy
पंतप्रधान म्हणुन मोदी यांना काम करण्याच्या मोठ्या मर्यादा आहेत (देशाचे पहिले पंतप्रधान नेहरु हे एकमेव कारण आहे). मोदी यांची कामगिरी यथातथा आणि बनवाबनवीने ग्रासलेली आहे. पण विरोधी पक्ष म्हणुन भाजपाने बजावलेली कामगिरी नेत्रदिपकच आहे.

मोदीच येणार आहेत.... लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी >>>>
मग सध्याच्या विरोधि पक्षासाठी व तेव्हाच्या सत्ताधार्यान्साठी ती आताच्यापेक्षाही वाइट परिस्थीती असेल.

नेहरू तसे कनवाळू . रडक्या मोदींना पाच वर्ष देशाचा कारभार करायला दिला, पण बिचाऱ्यांना पाच वर्ष ह्यांचे ' डायपर ' बदलण्याचे काम करावे लागले . जुन्या योजना राबवताना ह्यांना भुळकंड लागायचे, संडास बांधण्याची कल्पना ह्यामुळेच सुचली त्यांना . आता तर म्हणे सभेच्या ठीकाणी तीन तीन फुटांचे चर खणले असे ऐकलय . जाताना माती टाकून खड्डा बुजवायचा , पुरावा नष्ट . ( आचार संहीतेमुळे नेहरूंचे भूत डायपर बदलायला येऊ शकत नाही .)
प्रेरणा: भौ बोरसेकर

तसेही आता (गेली पाच वर्षं) मोदी विरोधी पक्ष नेतेच वाटताहेत. नेहरू - इंदिरा- सोनिया आणि सत्तेत नसलेल्या राहुलला विरोध करण्यात आणि त्यांच्या डोक्यावर खापरं फोडण्यात पाच वर्षं भुर्र्कन उडून गेली.

विरोधीपक्षनेते म्हणून मोदींनी सत्ताधार्‍यांचे जिणे हराम करण्यासाठी आधी संसदेत हजर राहावे लागेल. आणि लॉजिकली बोलावेही लागेल, खरे सुद्धा बोलावे लागेल. खोटे बोलले तर हक्कभंगाची कारवाई होइल. कोणी जेटली फेटली चिंतारमण कोणपण मदतीला येऊ शकणर नाही. आपली पापं आ ल्यालाच फेडावी लागतील. एवढी हिंमत तर फेकुमल मध्ये अजिबात नाही.

Pages