पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विना चिलखत 3 पोलीस मेले तर जबाबदारी काँग्रेसवर,
मग परवा , 40 मेले , त्यातल्या किती लोकांना भाजपानी चिलखत दिले होते ? >>>>

वरीलप्रमाणे निर्लज्ज व्हॉटअबाउटगिरी एखादा काँग्रेसी समर्थकच करू शकतो.

ते तिघे कुठल्या मोहिमेवर होते? नि ते 49 कुठल्या मोहिमेवर होते?

हेमंत करकरे सोबत सालसकर, कामटे आणि अनेका विरांनी धाडस दाखवले आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात शहीद झाले.

२०१४ पासुन जे कणखर, देशप्रेमी सरकार आलेले आहे त्यांच्या काळात पण अनेक हल्ले झालेले आहेत. आता तर सरळ लष्करावर, हवाई बेस कॅम्प वर पण नित्याने हल्ले होत आहेत. पठाणकोटचा हल्ला आटोक्यात आणायला केव्हढा विलंब... कारण काय होते? सर्व सुत्रे डोबाळ नावाच्या अकार्यक्षम अधिकार्‍याच्या हातात होती ? प्रतिसादात सर्वत्र ढिलाई - बेशिस्तता होती....

या हल्ल्यात NSG चे विर ले. कर्नल निरंजन हे हकनाक मारल्या गेले. त्यांचे मरण अगदी सहजपणे टाळता येण्यासारखे होते. अतिरेकी जिवंत असतांना धोकादायक आहेतच, पण मारल्या गेलेला अतिरेकी पण आपल्या कसलेल्या NSG जवानाला मेल्यानंतरही मारु शकतो हा विचारच आपल्या नेतृत्वाला (NSA डोबाळ) करता आला नाही ? किती भोंगळपणा ?

NSG चे विर ले. कर्नल निरंजन मारल्या जाण्याचे कारण.... (अ) मृतदेह हाताळतांना या कामासाठी अत्यावश्यक असणारी साधी संरक्षण कवचे (वैयक्तिक सुरक्षा उपकरणे) पुरवली गेली नाही किंवा वापरले नाहीत. (ब) रिमोट यंत्रणे द्वारे मारल्या गेलेल्या अतिरेक्याचे प्रेत हाताळायचे असते हे डोबाळ यांना माहित नव्हते. डोबाळांची नेतृत्वाची हौस होते पण देश एक मौल्यवान हीरा कायमचा गमावतो. :अरेरे;

https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20160118-pathankot-...

https://www.dailypioneer.com/2016/page1/nsg-to-revisit-sops-to--avert-re...

करकरे, साळसकर, कामटे... यांचे मृत्यु खुप चटका लावुन गेले. तसेच पठाणकोट येथे ले. क. निरंजन यांचे आणि पुलवामा येथे धारातिर्थी पडलेले ४९ जवान यांचे मृत्यु अगदी सहज टाळता येण्यासारखे होते.

karkare1.jpg
हा २६/११ च्या रात्रीचा फोटो. हे दृश्य टीव्हीवर अनेकांनी पाहिलंय. अजूनही दाखवलं जातंय.
आपले गलिच्छ विचार लपवण्यासाठी किती खोटं बोलू शकतात लोक?

<< चिलखत म्हणजे नुसते शब्दश चिलखत नव्हे , चिलखत म्हणजे संरक्षण. >>
-------- सहमत...
आणि जेव्हा २५०० ताफा असतो तेव्हा लेयर्स मधे सुरक्षा असायला हवी. सरकारला कसलाही अंदाज आला नव्हता, आणि गाढ झोपेत होते. हल्ल्यानंतर नंतर कुठेतरी चकमक घडवायची आणि २-३ लोकांना मारुन "मास्टर माईंड" मारल्या गेल्याचा जल्लोश करायचा... पुढे कसली डोंबल्याची चौकशी... सराईत पणे खोटे बोलणार्‍यांकडुन मारले गेलेले मास्टर माईंड होते असे वाचल्यावर मारले गेलेले खरोखरच मास्टर होते का याबद्दल शंकाच येते.

हा २६/११ च्या रात्रीचा फोटो. हे दृश्य टीव्हीवर अनेकांनी पाहिलंय. अजूनही दाखवलं जातंय.
आपले गलिच्छ विचार लपवण्यासाठी किती खोटं बोलू शकतात लोक? >>>

अच्छा हा तेव्हाचा फोटो आहे काय? फक्त करकरेंना जाकीट, हेल्मेट चढवून पाठवले असे तुमचे म्हणणे आहे काय? मग एव्हढा संरक्षक पोशाख असताना करकरेंना गोळ्या काँग्रेसच्या दबावाखाली पोलिसांनी घातल्या का? असेच फोटो साळसकर व कामटेंचे आहेत काय?

इतर ठिकाणी विषयाला धरून बोला असे लिहिणारे तुम्ही, इथे पुलवामाच्या धाग्यावर कसेकाय घसरलात?

तुम्हांला अचानक खूप प्रश्न पडू लागलेत
फिर एक बार मोदी सरकार आलं की त्यांना सांगून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून घ्या.
तसंही त्या बाईने शाप दिल्यावर करकरे कसे वाचले असते? नाही का?

तुम्हांला अचानक खूप प्रश्न पडू लागलेत
फिर एक बार मोदी सरकार आलं की त्यांना सांगून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून घ्या.
तसंही त्या बाईने शाप दिल्यावर करकरे कसे वाचले असते? नाही का? >>>

भरत, मला 23 तारखेला खूप प्रश्न पडणार आहेत कारण दोन महत्वाच्या सुनावण्या सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर 22 ला आहेत.

बाकी तुम्हाला परत मोदी सरकार येणार किंवा साध्वी मानाने लोकसभेत प्रवेश करणार याची खात्री वाटते याचे मला आश्चर्य वाटतेय.

साध्वी चुकीची असेल तर तिला लोकसभेत हिंदू पाठवणार नाहीत .
खूप परिपक्व धर्म आहे हिंदू
पण शेकडो बॉम्ब स्फोट
करून साधं निषेध सुधा न नोंदवणा रे लोकांनां विषयी तुमचं मत मांडा

साध्वी चुकीची असेल तर तिला लोकसभेत हिंदू पाठवणार नाहीत .
खूप परिपक्व धर्म आहे हिंदू। >>>

सहमत

मग कशाला पाहिजे कोर्ट आणि कायदे? गुन्हे लागले कि मतदान घ्यायचे सरळ... लोकप्रिय असेल त्याला सर्व प्रकारचे गुन्हे करायचा परवानाच मिळतो ना निवडून आला कि?

बॉम्बस्फोट करणाऱ्या कोणत्या मुसलमानाला कुणी तिकीट दिले ?
नवीन Submitted by BLACKCAT on 22 April, 2019 -07:36
<<

काळ्या मांजरा तूजे सामान्य ज्ञान फारच कच्चे आहे.

<< ते तीनशे मोबाईल मारले ते विसरलात काय? Wink >>

------- ३०० मोबाईल बंद झाले.... त्याने काय सिद्ध होते ?
त्यापेक्षा भारतातच कार्यरत असणार्‍या अतिरेक्याचा मोबाईलवर कडक नजर ठेवली असती, थोडी सतर्कता ठेवली असती तर ४९ जवानांचे अनमोल प्राण वाचले असते.

पुलवामा हल्ल्यात ३०० किलो स्फोटके वापरण्यात आली होती.
https://timesofindia.indiatimes.com/india/37-crpf-jawans-martyred-in-ied...

या बातमीतच चौकीदार नरेंद्र मोदी यांचे पण ट्विट वाचायला मिळते.

३०० अतिरेकी ठार
३०० मोबाईल कार्य करायचे थांबले

सर्वत्र ३०० आकडा हा निव्वळ योगायोग समजावा.

भारतीय वैमानिकाला सोडा नाहीतर भारताची बारा क्षेपणास्त्र तयार आहेत,असा दम अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानला दिला म्हणून घाबरून पाकिस्तानने आपल्या वैमानिकाला सोडले,असे आपले प. प्र. गुजरात प्रचार सभेत गर्वाने सांगत आहेत. ५६ इंची छातीत दम नाही पाकिस्तानला हे सांगायला? मुख्य म्हणजे क्षेपणास्त्रांची बातमी अमेरिकेला कळतेच कशी?

देशाच्या संरक्षणविषयक माहिती अमेरिकेला कळतेच कशी? चौकीदार करतोय काय?
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 22 April, 2019 - 12:15
<<

ओला 'फोक' आहे ना तुमच्याकडे ? तो घेऊन जा व विचारा ! Lol

अडचणीचे प्रश्न विचारले की गुरुजींचे धोतर ओले होते, हे आता नित्याचे झाले. डायपर वापरत जा गुरुजी यापुढे.

अ‍ॅडल्ट डायपर पण मिळते सध्या..! (अवांतर : माझ्या शेजारचा गुजराथी मनुष्य सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंट कंप्युटर स्क्रीनसमोरुन उठावे लागु नये (इंट्रा डे ट्रेडिंग करतो ना तो) म्हणुन हे अ‍ॅडल्ट डायपर लावुन बसतो स्क्रीन समोर) Biggrin

म्हणजे विकास खुरटलाय की काय..??
साथ मिळाली तर विकास होणार ना? ह्या अविकसितांना कोण साथ देणार?

इंट्रा डे ट्रेडिंग करतो ना तो) म्हणुन हे अ‍ॅडल्ट डायपर लावुन बसतो स्क्रीन समोर)

Sad

ब्रोकरेंज , एस टी टी , नेट चार्जेस आणि वर परत डायपर टेक्स
कसे परवडते ?

Pages