मी नुकतेच व्हॊटस ऍप वापरावयास सुरुवात केली. सुरवातीला फक्त individual मेसेज यायचे तेव्हा बरे वाटायचे नंतर बर्याच ग्रुप मधे इच्छा नसतानाही ऐड् झालो. पण या ग्रुप मधे गेल्यावर लक्षात येऊ लागल. की मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची
याला काऱण एक मेसेज जो गुढीपाडव्यानिमित्त् फिरतोय. या मेसेजनुसार एका ठरावीक जातीने हा सण संभाजी महाराजांच्या निधनांनंतर चालु केला.
अजुन बरेच काही आहे पण येथे नमुद करत नाही. पण या मेसेज मधे याचे स्पष्टीकरण नाही. याला उत्तर म्हणुन अजुन एक मेसेज फिरतोय त्यात गुढिपाडव्याचे अनेक पुरावे सांगितलेत. याबद्दल बरेच सर्च केले पण कोठेही माहिति मिळत नाही. म्हणजे खरच त्यावेळी हत्तीवरुन साखर वाटली की आत्ताचे काही रिकामटेकडे हत्तीवरुन अफवा पसरवतायेत.
काय खरे आणि काय खोटे?
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अगदी एकदम
अगदी एकदम
अगदी एकदम
डबल पोस्ट
अरे बास रे बाबानो
अरे बास रे बाबानो
विषय काय नि चर्चा क़सल्या चाल्ल्यात
प्रतिसाद देण्यासाठी लेख वाचणे
प्रतिसाद देण्यासाठी लेख वाचणे हा प्रकार इथे नसतो.
वाद वाचायलाही मजा येते
वाद वाचायलाही मजा येते
पण तो मजेशीर शब्दांचा खेळ असावा..
आता मजा गेली.. थांबा ईथेच !
काय म्हणता! मज्जा गेली? अशी
काय म्हणता! मज्जा गेली? अशी कशी न सांगता गेली? असो, येईल पुन्हा सवडीने.
बरं मी काय म्हणतो, लोकं ऋन्मेष च्या नावाने जे खडे फोडतात, शिव्याशाप देतात ते खऱ्या ऋ ला लागत असतील का? जेव्हा खरा ऋन्मेष अस्तित्वात नव्हता तेव्हा हे शिव्याशाप अड्रेस नॉट फाउंड म्हणून परत जायचे. पण आता काळजी घ्यावी लागेल ना....
रच्याकने कोणी "मजा गेली आता थांबा" म्हटलं की खरंच थांबायचं असतं हे तुम्हाला पटतं का? अजून पीळ मारण्यात तर मज्जा वाढते, हो की नाही ऋ दादा?
थांबायचे नाय गड्या थांबायचे
थांबायचे नाय गड्या थांबायचे नाय
आश्चर्य... ऋन्मेष यांचे
आश्चर्य... ऋन्मेष यांचे प्रतिसाद आणि ते ही गर्लफ्रेंड च्या उल्लेखाविना...
पण माझ्या वाचनात आला की मी
पण माझ्या वाचनात आला की मी आणखी दहा ग्रूपवर टाकतो. सालं डोक्याचे भजे होणार असेल तर ते माझ्या एकट्याच्याच का? एवढाच त्यामागे दुष्ट विचार असतो. >>>>>>>>>>>>> हा हा हा हा.......... किति दुश्ट विचार.
हॅपी गुरीपढवा ऑल !
हॅपी गुरीपढवा ऑल !
इट्स परवा
इट्स परवा
पण माझ्या वाचनात आला की मी
पण माझ्या वाचनात आला की मी आणखी दहा ग्रूपवर टाकतो. सालं डोक्याचे भजे होणार असेल तर ते माझ्या एकट्याच्याच का? एवढाच त्यामागे दुष्ट विचार असतो. >>>>>>>>>>>>> हा हा हा हा.......... किति दुश्ट विचार.
>>>>
चला, कोणाला तरी भावना पोहोचल्या
इट्स परवा
इट्स परवा
>>>>
तो तिथीनुसार आहे की तारखेनुसार?
तो सरकारी आहे की हिंदू संघटनेचा?
कॅलेंडरमध्ये रविवारी दिलाय.
कॅलेंडरमध्ये रविवारी दिलाय.
कॅलेंडरमध्ये रविवारी दिलाय.
कॅलेंडरमध्ये रविवारी दिलाय.
>>>>
ज्या सणाच्या तारखेबाबत गोंधळ असतो तो कॅलेंडरवाले मुद्दाम रविवारी देतात. दोन दोन तारखा लाल करायचा खर्च वाचतो
दोन तारखा लाल करायचा खर्च
दोन तारखा लाल करायचा खर्च वाचतो>>>
अस काही असत हे आजच कळल मला.
दक्षिणेतलं ते ' युगादि' आहे
दक्षिणेतलं ते ' युगादि' आहे म्हणजे युगाचा प्रारंभ. कदाचित वर्षाला युग म्हणत असतील. त्याचा अपभ्रंश उगादि , उगाडी असा होत गेला. एका पाडव्याला मी बंग्ळुरात होतो. फिरत. लोक उगाडि उगाडि काय म्हनताहेत तेच कळायचं नाही...
पाडवा पूर्वीपासून महराष्ट्रात होता.फक्त गुढी नव्हती. गुढी संभाजी महाराजांच्या खुनानन्तर एका विशिष्ट समाजाने आनन्द उत्सव म्हणून सुरू केली असा एका संघटनेचा आरोप आहे. गुढीत सगळ्या उलट्या व अशुभ गोष्टी आहेत. म्हनजे उलटा तांब्या नवी साडी.वगैत्रे म्हणून ती उभारू नका. देशात कुठेही गुढीची पद्धत नाही. ते संभाजीच्या खुनाचे सेलिब्रेशन आहे अशी ती मांडणी आहे. खरे खोटे तो समाज आणि ती संघटना जाणे....
उगादीचा अपभ्रंश गुढी झाला
उगादीचा अपभ्रंश गुढी झाला नसेल काय?
बाकी भारतात अशा अनेक प्रथा आहेत ज्या दुसर्या कोणत्याच भागात नसतात. एकदम युनिक असतात. मनाला वाटेल त्या कारणाला जोडायचे म्हणजे देशात कहर माजेल.
गुढीत काहीही अशुभ नाही. साडी,
गुढीत काहीही अशुभ नाही. साडी, लिंबाची पाने, साखरेच्या गाठ्या, कलश, बांबू यात नेमकं अशुभ काय आहे?
आजकाल तलवारीने वाढदिवसाचा केक कापायची फॅशन आलीये ती अशुभ आणि विभत्स आहे.
गुढीपाडव्याला नववारी नेसून नथ घालून फटफट करीत बुलेटवर फिरायची फॅशन आलीये ती उपटसुंभ बावळट आहे.
उगाच शंभर ढोल घेऊन कान किटाळ्या करत जनतेला त्रास देणे हे अशुभ, हिंस्र व पशुवत आहे.
आजकाल तलवारीने वाढदिवसाचा केक
आजकाल तलवारीने वाढदिवसाचा केक कापायची फॅशन आलीये ती अशुभ आणि विभत्स आहे.
>>>
हा हा, सही आहे. कुठे आहे ही फॅशन. बाकी तलवार प्रत्येकाच्या घरात नसते. फक्त खंग्री लोकांनाच ही फॅशन झेपू शकते.
त्यात काय अशुभ?? लहान सुरीचं
त्यात काय अशुभ?? लहान सुरीचं मोठं वर्शन तलवार.
मग सुरीनं केक कापला तर चालतो तर तल्वारीनं कापला तर अशुभ काये त्यात?
अरे विषय काय बोलताय काय
अरे विषय काय बोलताय काय
गुढीपाडव्याला नववारी नेसून नथ
गुढीपाडव्याला नववारी नेसून नथ घालून फटफट करीत बुलेटवर फिरायची फॅशन आलीये ती उपटसुंभ बावळट आहे.>>> +१
अहो इतकच नाही, त्या नववारीवर गॉगल आणि फेटा पण घातला जातो!!! अत्यंत विचित्र combination!!!
(मला तर लग्नात blazer वर फेटा बांधतात तो सुद्धा विचित्र वाटतो!)
मला तर ऋतू न बघता लग्नात
मला तर ऋतू न बघता लग्नात ब्लेझर घालणे विचित्र वाटते
वंदन आणि वि. मु. यांच्याशी
वंदन आणि वि. मु. यांच्याशी अगदी सहमत. आजकाल सगळ्याच मुली/ बायका रणरागिण्या झाल्यात. सगळे जण वीरश्रीने नुसते फुरफुरत असतात. भारतमातासुद्धा यातून सुटलेली नाही. कधीकाळी ही बिचारी हिंदमाता शालीनपणे कोपऱ्यात उभी असे. सध्या मात्र सदैव तलवार उपसूनच उभी असते. इतकेच नव्हे तर एका मराठी वाहिनीच्या संगीत कार्यक्रमात विशेष प्रावीण्य दाखवल्यावर स्पर्धकाला एक कट्यार बक्षीस मिळते. काय हाणामारीचे दिवस आलेत! मांगल्य, पावित्र्य, शांतता वगैरे सगळे कुठे लोप पावले कोण जाणे.
गुढीत काहीही अशुभ नाही. साडी,
गुढीत काहीही अशुभ नाही. साडी, लिंबाची पाने, साखरेच्या गाठ्या, कलश, बांबू यात नेमकं अशुभ काय आहे?
>>> वंदन +1
मला तर ऋतू न बघता लग्नात
मला तर ऋतू न बघता लग्नात ब्लेझर घालणे विचित्र वाटते
>>>
मला तर आपल्या सोयीचा वार आणि त्यानुसार हॉल न बघता मुहुर्ताची तारीख वार बघून लग्न करणारयांचीही गंमत वाटते.
आपल्या आपल्या आवडी असतात हो.
आता कोणाला लुंगी धोतरापेक्षा ब्लेझरमध्येच मजा येत असेल तर त्यासाठी त्याने ठराविक ऋतूपर्यंत लग्न पुढे ढकलावे का?
बाकी ऋतूचा आणि ब्लेझरचा संबंध काही समजला नाही. ठराविक ऋतूत ब्लेझरला पालवी फुटते असे काही आहे का?
इतकेच नव्हे तर एका मराठी
इतकेच नव्हे तर एका मराठी वाहिनीच्या संगीत कार्यक्रमात विशेष प्रावीण्य दाखवल्यावर स्पर्धकाला एक कट्यार बक्षीस मिळते. काय हाणामारीचे दिवस आलेत!
>>
हा हा
जोक्स द अपार्ट, हे कट्यार कलेज्यात घुसली चित्रपटामुळे आलेले फॅड असावे.
नववारीवर गॉगल आणि ब्लेझरवर
नववारीवर गॉगल आणि ब्लेझरवर फेटा या स्टाईल आहेत. आणि एखादी स्टाईल ही काही काळापुरता येते आणि जाते. ती सर्वांनाच सूट होईल असे नाही पण तरीही बरेच जण त्याचा विचार न करता ती फॉलो करतात.
पण यात शोभने न शोभणे यापेक्षा जास्त महत्वाचे असते की ते तुम्हाला कॅरी करता येते का..
म्ह्टले तर लो वेस्ट किंवा फाडलेली व ठिगळं लावलेली जीन्स किती दळिद्री आणि दळभद्री स्टाईल वाटेल. पण ते तसे वाटत नाही जर तुम्हाला ती जीन्स कॅरी करता आली..
ईथे लो वेस्ट जीन्सचे उदाहरण मुद्दाम दिले कारण एकेकाळी मला बघायला तो गचाळ प्रकार वाटायचा. पण सध्या आमच्या एमेनसीमध्ये फ्रायडे ड्रेसिंगला लो वेस्ट जीन्स घालणारा अक्ख्या ऑफिसमध्ये मी एकटाच आहे. आजवर ना कोणाला त्यात वावगे वाटले, ना कोणाची तक्रार आली, ना कोणी स्वत: ते घालायचे धाडस केले.
अर्थात फॉरेनर येतात ते बिनधास्त घालतात काहीही.. ती गोष्ट वेगळी..
कपड्यांचे पहिले काम असते ते
कपड्यांचे पहिले काम असते ते लज्जानिवारण आणि ऊनपाऊस थंडीवारयापासून संरक्षण..
त्यानंतर ते स्टायलिश आणि तुमचे व्यक्तीमत्व खुलवणारे असावेत.
वेशभूषेला संस्कृती आणि प्रथांशी जोडायचेच असेल तर ते त्यानंतर .. मला तर ते पटतही नाही.
जर मला जीन्स टीशर्टवर बटन्स न लावता चौकट्यांचा शर्ट खुलून दिसत असेल तर मी तो घालून सुद्धा रिसेप्शनला उभे राहायला तयार आहे. फक्त गर्लफ्रेण्डने (तेव्हाच्या होणारया बायकोने) परवानगी दिली पाहिजे. लोकांना काय आवडते आणि समाजात कश्याला मान्यता आहे याचा विचार करत बसायला ईथे वेळ कोणाला आहे..
Pages