Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाहिला फोटो सुमीत माधुरी,
पाहिला फोटो सुमीत माधुरी, यल्लो साडी आणि यल्लो मफलर
ती अश्विनी भावे वाटली.
निहिरा ने एकाच ह्या जन्मी जणू
निहिरा ने एकाच ह्या जन्मी जणू आणि शरयुने सहेला रे म्हंटले आहे ह्या आठवड्यात. ही दोन्ही गाणी भारी झाली असतील असं वाटतय.
त्या बकेट लिस्टचं पुण्याला सोलॅरिसमध्ये शुटींग होतं. आमच्या एका फॅमिली फ्रेंड्सपैकी एक तिकडे मॅनेजर आहे. तो त्या सगळ्या फॅमिलीला माधुरी दिक्षितला भेटवायला घेऊन गेला होता. तर ती काकू असं रिकाम्या हाताने कसं जायचं म्हणून माधुरीसाठी घरी केलेले बेसनाचे लाडू घेऊन गेली होती.

म्हणजे तसं ह्यात फनी काही नाही पण मला हसायला आलं.
तर ती काकू असं रिकाम्या
तर ती काकू असं रिकाम्या हाताने कसं जायचं म्हणून माधुरीसाठी घरी केलेले बेसनाचे लाडू घेऊन गेली होती. >> लोक अस वागतात आणि उगा माधुरीला नेक्ष्ट डोअर ला म्हटल जात..
माझे टॉप 5 :
माझे टॉप 5 :
निहिरा,
अनिरुद्ध,
प्रसेनजीत,
मधुरा,
वैशाली
नानाला वाटतंय आपल्याला बॅटिंग
नानाला वाटतंय आपल्याला बॅटिंग करायला आणलंय तेही दोन्ही बाजूंनी. हा गाण्यांचा कार्यक्रम आहे हे लक्षात न घेता पाहिलं, तर मजा येतेय. आपल्या आसनाकडे जाताना नानाने काय म्हणावे? `मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे'.
भरत., 'मखमली' तारुण्य म्हटले
भरत., 'मखमली' तारुण्य म्हटले त्यांनी , महेशच्या मखमलच्या झब्ब्याकडे बघून.
मला विश्वजीत अज्जिबात आवडत नाहीये. बळंच आणलंय त्याला. ओव्हरपऱ्फॉर्म करतो तो. आणि जुईली तर डोक्यात जाते.
विश्वजीत पकावू आहे.. पण जुईली
विश्वजीत पकावू आहे.. पण जुईली बेस्ट आहे.. चुलबुली.. एक नंबर आहे..
मखमली होतं का?
मखमली होतं का?
विश्वजीतला मी फाफॉ करतो.
आज जुईली आणि विश्वजितला इतकं
आज जुईली आणि विश्वजितला इतकं मोठं लेक्चर देण्याइतके ते खरच वाईट गायले होते का ? विश्वजित सुरेश वाडकरांसारखं अजिबातच न गाता बर्यापैकी अतिफ अस्लम सारखा गायचा प्रयत्न करत होता. पण दोघांनाही फारच पिळ मारला असं वाटलं . जुईली काल बरी वाटली होती खरतर !
उषःकाल होता होता मध्ये जोष मिसिंग वाटला तरी त्याचं कौतूक केलं !!
नाना पाटेकर बाळासाहेबांची कसर भरून काढतो आहे बहुतेक.
कालचा इपिसोड नाहि पाहिला. पण
कालचा इपिसोड नाहि पाहिला. पण काहि मिस केले असे वाटत नाहि.
@पराग : हे नेने बाईंच्या पुणे
@पराग : हे नेने बाईंच्या पुणे टाईम्समधल्या कालच्या मुलाखतीतले उत्तर...
...Also, since I have started shooting here, my team members are spoiling me with some of the best home-cooked food. Besan laddoos, modaks, puran-poli; I am having almost everything!
विश्वजीत तर टोटल फ्लॉप वाटतोय
विश्वजीत तर टोटल फ्लॉप वाटतोय मला. आल्यापासून त्याने गायलेलं एकही गाणं आवडलं नाही. त्याच्यापेक्षा सुमीत राघवनने गाणं चांगलं गायलं आहे असं झलक बघितल्यावर वाटतंय.
विश्वजीत आल्यावर आता बाकीच्या राहिलेल्या पुरुष मंडळींची गाणी बरी वाटायला लागली.
मला निहिराचं कालचंही गाणं बेस्ट वाटलं.
म्हाताऱ्या माधुरी ला मराठीचा
म्हाताऱ्या माधुरी ला मराठीचा पुळका आला आता. कोण बघायला जाणार आहे तिला. फ्लॉप ऍक्टरेस.
शरयूचं 'सहेला रे' आणि
शरयूचं 'सहेला रे' आणि प्रसेनजीतचं 'पत्रास कारण की' सॉलीड झालं ! त्या मानाने वैशालीचं गाणं एवढं आवडलं नाही.
जे एरवी 'पाक गाळतंय' ते अजून ठीक नाही, त्यामुळे गुण कमी मिळाले. पर्यायाने आज ती एलिमिनेट होण्याची दाट शक्यता वाटत आहे.
जयदीपचा परफॉरमन्सचा आलेख दिवसेंदिवस वर चाललाय. पूर्वी एलिमिनेट का होत नाही असं वाटायचं, आता होऊ नये असं वाटतंय एवढी प्रगती झाली आहे त्याची. मधुरा कुंभार चं 'नरडं'
नाना जास्तच फुटेज खातो, बोलतो असं वाटंत असलं तरी, तो जे काही बोलतोय ते आवडतंय !
निहिरा, शरयू, प्रसेनजीत,
निहिरा, शरयू, प्रसेनजीत, वैशाली यांची गाणी आवडली.
मधुरा अजून बाहेर कशी नाही गेली याचंच आश्चर्य वाटतंय.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाना
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाना कुकरी शोजमध्येही येतोय
मधुराचं गाणं सुरू झाल्याबरोबर मी टीव्ही म्यूट केला, इतका भयंकर आवाज होता. मग कळलं की नरडं बिघडलंय. पण तसंही माझं अत्यंत आवडतं गाणं दुसर्या कोणत्याही आवाजात ऐकणं अशक्यच होतं.
जयदीपचे उच्चार काहीतरीच वाटतात.
च्रप्स, तुमच्याशी माधुरी कमेंटवर नंतर कधीतरी दुसर्या धाग्यावर 'चर्चा' करेन.
शरयु मस्त गायली.प्रसेन पण
शरयु मस्त गायली.प्रसेन पण
शाल्मलीने शरयुला उगीच ओढुनताणुन रडवायची काहीही गरज नव्हती...गाणं ईतकं सुंदर होतं की बाकी मेलोड्रामा करायची गरजच नव्हती. असो. टीआर्पी का सब खेल है.
मधुरा काय गायली काल ? मी नाही पाहिला पूर्ण कार्यक्रम.
नाना ने पण तबला वाजवला म्हणे.
मला उषःकाल होता होता आवडलं.
मला उषःकाल होता होता आवडलं. छान रीटचिंग झालं गाण्याचं. निहिराचं गाणंसुद्धा क्लास झालं. ती वरच्या नोट्स छान खुलून लावते. जुईलीचं गंडल्यासारखं वाटलं. तिचा कणसूर असतोच दरवेळी. शरयूचा एपिसोड अजून बघायचा आहे.
भरत, तुम्हाला माधुरीऐवजी मधुरा म्हणायचं आहे का?
शरयुच सहेला रे फारच मस्त झाल
शरयुच सहेला रे फारच मस्त झाल. मधुराचा आवाज बसलाय हे काल स्पष्ट कळत होत
भास्कराचार्य, हो. केलं एडिट.
भास्कराचार्य, हो. केलं एडिट.
निहिरा, शरयू, प्रसेनजीत,
निहिरा, शरयू, प्रसेनजीत, वैशाली यांची गाणी आवडली.
, अर्थात तिला टच झालं असेल गाणं यात वाद नाही.
मधुरा अजून बाहेर कशी नाही गेली याचंच आश्चर्य वाटतंय.
<<
आडो +१
मधुरा अतिशय वाइट गायली, जे दिले ते मार्क्सही जास्तं वाटले , कचरा केला इतक्या अप्रतिम गाण्याचा.
आय होप ती किंवा विश्वजीत एलिमिनेट होतील.
मला जुईलीचं गाणं अॅक्चुअली आवडलं, जास्तं क्रिटीसाइझ केलं असं वाटलं.
बाकी तुलनेने हा आठवडा आणि आजचा एपिसोड मस्तं झाला.
ओव्हरऑल नानाच्याआवडीची गाणी असल्यामुळे बरेच दिवसांनी झकास गाणी ऐकायला मिळाली.
शरयु गायलीच छान पण वैशाली आणि प्रसन्नजीतची गाणी मला जास्त भावली, soul touching songs म्हणतात तसे
वैशालीनी बरेच दिवसांनी छान गाणं निवडलं आणि प्रसन्नजीत गेले काही आठवडे एकदम हुषारीनी निवडतोय गाणी .
जयदीपही चांगला गायला.
उषःकाल होता होता मधे फक्त कोरस आवडला, ती नवीन चॅलेंजर गायिका नाही आवडली.
Btw, पत्रास कारण कि अवधूत बीएमेम ला आला होता त्या कॉन्सर्ट मधे फार मस्तं गायला होता.
गाण्याचे शब्दंही आहेतच अतिशय भिडणारे !
वैशाली रडत होती त्या गाण्याच्या वेळी तर कॅमेरा लगेच तिकडे
अमरावती जवळच्या , पाण्यासारख्या बेसिक सुविधा नसलेल्या दुष्काळी खेड्यातून , अतिशय हलाखीच्या परिस्थीतून पुढे आली आहे ती.
शरयू चं सहेला रे सुंदर झालं..
शरयू चं सहेला रे सुंदर झालं.. that is her 'zone'..
प्रसेन चं पत्रास कारण की सादरीकरण ऊत्कृष्ट होते.. again that is his 'zone'
मधुरा चा आवाज बसला आहे.. पण म्हणून एका परफॉरमंस साठी तीने बाहेर जाऊ नये.. खुद्द नाना ने तीच्या गायकीला मोठी दाद दिली आहे. खरे तर वैशाली, निहीरा या आधीच जायला हव्या होत्या... सर्वच स्त्री गायिका वैशाली पेक्षा अधिक ऊत्कृष्ट गात आहेत.
काल नाना सुटला होता खरा... पण असो त्यामुळे छान रंगत येत आहे.
शरयू ला कट्यार ठरलेली आहे.
विश्वजीत व श्रीनिधी दोघांनाही ऊद्या एकत्रीत एलिमीनेट करावे.
कट्यारीसाठी शरयू आणि अनिरुध्द
कट्यारीसाठी शरयू आणि अनिरुध्द गातील ते ऐकायला मजा येईल.
श्रीनिधी किंवा विश्वजित ला
श्रीनिधी किंवा विश्वजित ला निवडताना कोणता निकष लावला ?किती वाईट गातात दोघेही.शरयू बाजी मारणार हे नक्की.
विश्वजीत व श्रीनिधी दोघांनाही
विश्वजीत व श्रीनिधी दोघांनाही ऊद्या एकत्रीत एलिमीनेट करावे. Happy
स्पर्धकांचे नाही, प्रेक्षकांचे....
Submitted by योग on 7 February, 2018 - 15:46 >>> ते चॅलेंजर आहेत ना?
कुठल्या कुठल्या स्पर्धा जिंकून, जगभर कार्यक्रम करून आलेले गायकसुद्धा किती गाण्यांची किती तर्हेने वाट लावू शकतात बघा प्रेक्षकहो.... त्यामानाने आमचे स्पर्धक छान आहेत की नाही..... असे चॅलेंज असावे ते.
कारवी
कारवी
कारवी - lol.
कारवी - lol.
मधुरा ने माझ्या उसाला लागल कोल्हा जबरा गायले होते म्हणून मला ती टॉप 5 मध्ये वाटली होती.
ही स्पर्धा तोच जिंकेल ज्याचा आवाज बसणार किंवा खराब होणार नहो, कारण सगळेच सुरात गातात. Luck वरती आले आहे एलिमीनेशन.
माझ्या उसाला लागल कोल्हा जबरा
माझ्या उसाला लागल कोल्हा जबरा >>>> च्रप्स, माझ्या नव्हे, तुझ्या उसाला लागला कोल्हा.
मधुरा काय गायली काल ? >>> मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है.
मला वैशालीचं सांज ये गोकुळी
मला वैशालीचं सांज ये गोकुळी नाही आवडलं अजिबात. टेक्निक्लली नोटस नसतील चुकल्या पण आशाने त्या गाण्याला एक गूढ, गहिरा टच दिलाय, असं तिन्ही सांजेचं फीलिंग येतं ऐकताना तो फील तिच्या गाण्यात आला नाही. त्यामुळे फ्लॅट वाटलं एक्दम.
श्रीनिधीचं उषःकाल होता होता पण अगदी म्हणजे अगदीच सुमार.
मधुराला आवाजाने साथ दिली नाही त्यामुळे गाणे खराब.
विश्वजीत आल्यापासून जे बेकार ऑर्केस्ट्रा गायन करतोय, लवकर गेला तर बरं.
बाकी सगळे छान. जुइली मला आवडू लागली आहे. डिस्टिन्क्ट आवाज आहे इतरांपेक्षा. काल मी रात टाकली सूट झाले तिला. निहिरा आवडली. प्रसेनजीत ने पण योग्य गाणं निवडले आवाजानुरूप. मस्त झाले. शरयूने सहेला रे काय गायले!! सुपर्र्र्ब!! कुणाच्या खांद्यावर पण मस्त झाले. पुन्हा एकदा योग्य निवड.
नाना आणि सुमित राघवन ने पण मजा आणली. शाल्मली बोर करते मला.
खरे तर वैशाली, निहीरा या आधीच
खरे तर वैशाली, निहीरा या आधीच जायला हव्या होत्या...>>>> निहिरा????
आत्तापर्यंतची सगळी गाणी छान म्हटली आहेत निहिराने. ती का जाईल बाहेर?
Pages