पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंजी सर,हा धागा पूर्णपणे एकतर्फी वाटतोय .तुम्हीच लिहिलंय यावर विश्वास बसत नाही असो,
तुमच्या म्हणण्यानुसार पुण्याचं जे काही नाव झाले किंवा ज्या काही सुधारणा झाल्यात त्या सर्व पुण्याबाहेरून आलेल्या लोकांनी केल्या (शिक्षण क्षेत्र असो कि मग आय टी),पण सिंजी सर तुम्ही हे विसरलात कि हे सर्व करण्यासाठी त्यांना पुण्यातच यावं लागलं ,साताऱ्याला का नाही आले ते सांगू शकाल????
आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ज्यांचा अभिमान वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज पुण्याचेच होते बरं................

>>>> इथे अवांतर होईल पण- सवाई मधे कोणा कोणाचे गाणे आवडले? किती राग कळले? म्हणजे तुम्हाला त्या गाण्याची/रागांची गोडी लागेल असे काहि ते 'लोक' गायले का?
एखादी सुरावट/वादन ऐकुन मन डोलायला लागले असे काही झाले का? Lol
खुपच अवांतर आहेय पण जावुदे. <<<<<
अहो (धागाकर्त्याच्या मते) मन डोलणे वगैरे देखिल पुणेरी स्तोम आहे हो.... Wink सवाई सवाई काय घेऊन बसलात? हामच्या सातार्‍यात बघा येवुन..... Biggrin

छत्रपती शिवाजी महाराज पुण्याचेच होते बरं................ +११११११११११११
......... श्रीमंत बाजीराव बाळाजी भट सुधा .....................

मला स्वतःला पुण फार आवडत. माझे आजी- आजोबा ( वडिलांचे आई -वडील ) पुण्यात राहत होते. मी अगणित वेळा पुण्याला आलेली आहे . अक्षरशः असंख्य वेळा . पण बारा ते चार मात्र दुकान बंद असतात अजूनही . अगदी उद्याच मी पुण्यात येणार आहे. आताच एकांना मी फोन करून सांगितलं उद्या दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास तुमच्या दुकानावर येते . माझं काम हि सांगितलं . तर त्यांच्या कडून उत्तर मिळालं म्याडम नाही जमणार . बारा ते चार बंद असत आमचं दुकान . आता बोला .( पुण्याचा एक दुर्गुण ) हि आजचीच गोष्ट . आशु अनुमोदन Happy

अरे वा? धाग्याचा आणि काही दुर्मीळ सदस्यांचा त्यांची प्रगाढ विद्वत्ता सादर करण्याचा, असे दोन्ही उद्देश सफल झाले की? छान छान!

सिंजी- प्रत्येक जण आपलं वैशिष्ट्य घेऊनच जन्माला येतो. तिथे पुणे, मुंबई चे ते काय.
महाराष्ट्र जिथे बोलले जाते तिथे नक्कीच पहिला डोळ्या समोर मुबंई आणि पुणे येते.
तुज कस आणि माझं असं करत बसण्या पेक्षा तुम्ही तुमचा तज्ञ बदला त्याने नक्की फरक पडेल.
get well soon

>>>>तुज कस आणि माझं असं करत बसण्या पेक्षा तुम्ही तुमचा तज्ञ बदला त्याने नक्की फरक पडेल.<<<<

त्यांच्या तज्ञांनी वर प्रतिसाद दिलेले आहेत बरं? डूखबिख धरून काहीतरी लिहितील तुमच्याबद्दल चार आठ वर्षांनी किंवा सेकंदांनी! Proud

आगाऊ | 13 December, 2016 - 16:28
पुण्यात आदीवासीपाडा असेल तर सिंजी "अभ्यास" करायला जाऊन या. तर तुमच्या अभ्यासावर शिक्का बसेल.>>> तेवढ्याने काय होतेय, बेफाम जनरलाईज्ड विधाने करायला आणि संशोधनाचा आव आणायला जमणार आहे का त्यान्ना?

'आगाऊ' हे एकदम वाईट होतं.

पुण्याचा तिरस्कार वाटणार्‍यांना पुण्यात पाय न ठेवण्याचा चॉईस आहे. पुणे शहर 'आमच्याकडे याच' असे विव्हळत नाही.

१. असे ऐकले आहे की पुण्यात मूळ पुणेकर आता ३५% आहेत.

२. 'पेठ' हा काय प्रकार असतो हे मूळ पुणेकरांना जितके समजेल तितके इतर लोकांना समजणे अवघड आहे.

.

हर्पेन | 13 December, 2016 - 21:42
आगाऊ | 13 December, 2016 - 16:28
पुण्यात आदीवासीपाडा असेल तर सिंजी "अभ्यास" करायला जाऊन या. तर तुमच्या अभ्यासावर शिक्का बसेल.>>> तेवढ्याने काय होतेय, बेफाम जनरलाईज्ड विधाने करायला आणि संशोधनाचा आव आणायला जमणार आहे का त्यान्ना?

'आगाऊ' हे एकदम वाईट होतं.>>>>>>>>हर्पेन, अनुमोदन तुम्हाला.

ज्या कुठ्ल्या स्वर्गात हे रहातात, तो सोडून हे बहुतेक पुण्य नगरी बघायला आले, काहितरी गोंधळ घातले आणि
सडकून आपमान पावले.
असं वाट्टय खरं लेख वाचून

ह्या धाग्यावर धागाकर्त्याला पुणेकरांचे आलेले अनुभव पाहून त्याची पुण्याविषयीची भावना अधिकच दृढ होईल, की काय. Uhoh

धागाकर्त्याला पुण्याचे काहीच नाही आवडले , असे कसे ?
येरवड्याला गेले असते तर काही न काही उपयोगाचे दिसले असते.. कदाचित पायच निघाला नसता तिथून, खरे तर यांना सोडलेच नसते, आग्रहाने ठेवून घेतले असते हा लेख वाचून !!

धागाकर्त्याला पुणेकरांचे आलेले अनुभव पाहून त्याची पुण्याविषयीची भावना अधिकच दृढ होईल, की काय >>>

व्हायलाच हवी! म्हणजे ते आणि त्यांच्याच विचारांचे अनेकजण पुण्यात पाय ठेवणार नाहीत.

>>>>पेठांवर मूळ हक्क धागाकर्त्याचा आहे. पुण्यानं पेठांची कल्पना उचललेली आहे.<<<< ओह ओके. Happy

धन्स चिनूक्स!

>>>>येरवड्याला गेले असते तर काही न काही उपयोगाचे दिसले असते.. कदाचित पायच निघाला नसता तिथून, खरे तर यांना सोडलेच नसते, आग्रहाने ठेवून घेतले असते हा लेख वाचून !!<<<< Proud

>>>>व्हायलाच हवी! म्हणजे ते आणि त्यांच्याच विचारांचे अनेकजण पुण्यात पाय ठेवणार नाहीत.<<< Happy

पण चिनूक्स,

पेठेची मजा खर्‍या पुणेकरालाच माहीत, भले ती संकल्पना उचललेली का असेनात Proud

'कुठूनही हवे तिथे आणि नको तिथे जाणे शक्य होणे' ही पेठांनी पुरवलेल्या अनेक क्षमतांपैकी एक आहे Wink

जाज्वल्य अभिमान हे शब्द लेखात न आल्याने पुणे शहराबद्दलचा हा लेख ऑफ् स्पेक (आउट ऑफ स्पेसिफिकेशन ) क्याटेगरीत मोडतो. या लेखाची खरी जागा मायबोलीवर नाही. सकाळ मधील मुक्तपीठवर हा लेख टाकला तर या लेखाचे खरे मूल्यमापन होईल. Lol

पुण्याबद्दलचा एक प्रश्न आहे. ईथेच विचारू का..

चितळेची बाकरवडी जी पुण्याला चितळेंच्या दुकानात मिळते ती आणि ईथे जी मुंबईत पाकिटात मिळते ती.. या दोघांच्या क्वालिटीत फरक असतो का?

मुंबईत जी बाकरवडी मिळते, ती जास्त चांगली असते. ती रांगेत उभं न राहता मिळते, आणि संपत नाही. >>> दुपारी १ ते ४ या वेळेत पण मिळत असणार. उगाच आळशी पुणेकरांसारखे नसणार. Lol

भास्कराचार्य, संपत नाही म्हणजे दुकानातली संपत नाही की घरची खाऊन संपत नाही ..

बाकी माझ्या काही मद्यप्राशन करणारया मित्रांमध्ये ती चकणा आयटम म्हणून जाम फेमस झाली आहे. सोबत हिरवी चटणी नसली तरी चालते.

Pages