पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यज्ञ करणे काय आणि मेण्बत्या लावुन मोर्चे कढणे काय दोनीही गोष्टी सारख्याच आहेत.

<<

दोन्हीत थोडा फरक आहे.

काही लोकांच्या मते यज्ञ करणे म्हणजे बुरसटलेल्या विचारांचा, प्रतिगामी असल्याचे लक्षण आहे. मात्र मेणबत्त्या लावुन मोर्चे काढणे म्हणजे फार मोठे पुरोगामी, विचारवंत, सेक्युलर व उच्चशिक्षित असल्याचे लक्षण असते.

Proud

Lol

प्रवीण स्वामींनी तो लेख लिहिला नसता तरी चालले असते. किंबहुना मला वाटते आता हा विषय भारताने व विशेषतः भारतीय मिडियाने समाप्त करावा. कुणी सीमेपलिकडील लोकांशी व्हॅट्सॅप वर संपर्क करून लेख लिहितोय, कुणी तिथल्या एसेसपींना मी डी आय जी आहे असे सांगून फोन करतोय, काहीही !

काही असो हिंदी सिनेमाला लाँच पॅड नावाची नवी संकल्पना मिळाली. तिरंगा -२ चा क्लायमॅक्स असा असेल :

तीन ट्रँपोलीन सारखे लाँच पॅड्स ठेवले आहेत. त्यावर अतिरेकी बसले आहेत.हरीशची आई, वर्षा व इतर दुर्बल लोक बांधलेले आहेत. दीपक शिर्के चा माणूस ठीक बारा वाजता एक बटन दाबणार व ते अतिरेकी टुण्ण्कन उडून ईस्ट, वेस्ट व नॉर्थ भारतात पडणार अशी योजना आहे.

शिर्केचा माणून ठीक बारा वाजता बटन् दाबतो पण काहीही होत नाही. सगळे कावरेबावरे होतात. इतक्यात आपल्या अजरामर स्टाईल मध्ये राजकुमार येतो. "जानी! तुम्हारा लाँचपॅड कैसे उडेगा?. जब डायनामाईट का धुआं हुआ था तो हमने उसमेसे स्प्रिंग काँप्रेसर निकाल दिया था !"

इथे हेमाशेपो. पाकिस्तान चा मिडिया थोडासा पोक्त आहे असे लिहिले तर लोक रुसले. पाकडे आपले शत्रु आहेत पण त्यांच्या काही गोष्टी चांगल्या आहेत हे मान्य करायला काय हरकत आहे ? त्यांचे सिनेमे फडतूस असतात पण सिरियल्स चांगल्या असतात हे मानतोच की आपण!. ताहेर शहा सरखा गायक आहे का आपल्याकडे?

यज्ञ्य , मुहूर्त वगैरे करून ते पुण्याचे उच्चवर्णे पेशवे हरले होते ना ?

शिवाजी महाराजांच्या मृत्यु नंतर संभाजी महाराजांना आठ वर्षे सतत झगडावे लागले पण पुन्हा स्थिरता आली नाही. राजाराम महाराजांच्या काळात तर त्यांना रायगड सोडावा लागला पण स्थिरता आली नाही. त्यापुढचे छत्रपती तर आणखी कठीण काळाला सामोरे गेले.

पेशव्यांनी कायमच छत्रपतींना राजा मानले आणि त्यांच्या काळात ५० पेक्षा जास्त वर्षे स्थिर शासन दिले. छत्रपतींचे राज्य पुढे वाढविले. ( अर्थातच मराठा सरदार यांचे श्रेय कोणीही नाकारणार नाहीच ) अटकेपार झेंडे लागले.

( यावर ५० वर्षे नाही ४९ वर्षे ६ महिने फक्त स्थिरता आली असले मायबोली स्टाईल फालतु प्रतिसाद अपेक्षीत नाहीत. )

पानिपतासारख्या युध्दात स्र्ट्रॅटेजीक फेल्युअर हे यज्ञाने सुधारण्यासारखे नसते. हे सर्व परिस्थीती आटोक्यात असताना मनोबल वाढवण्यासाठी असते असे मला वाटते.

राज्याने युध्दाला तयार असावे, सर्व तयारी असावी या करता वेळ द्यावा. केवळ यज्ञावर विसंबुन असु नये हेच मला पण वाटते. कोणी मुख्यमंत्री यात काही वेळ घालवत असतील तर युध्दाच्या तयारीत त्यांना फारसा रोल नसतोच. जर जनता हे करणे आवश्यक मानत असेल तर लोक प्रतिनीधी म्हणुन त्याला वेळ देणे आवश्यक आहे असे वाटते.

कुणीही राज्यकर्त्याने यज्ञ व पुजा यात संपुर्ण वेळ ह्यात घालावा असे कोणीही म्ह्णणार नाही.

{सर्व परिस्थीती आटोक्यात असताना मनोबल वाढवण्यासाठी असते असे मला वाटते.}
परिस्थिती हाताबाहेर जात असेल तेव्हाच मनोधैर्य वाढवायची अधिक गरज असेल ना? तेव्हा काय करायचं असतं?

परिस्थिती हाताबाहेर जात असेल तेव्हाच मनोधैर्य वाढवायची अधिक गरज असेल ना? तेव्हा काय करायचं असतं? परिस्थीती आटोक्यात आणायची.

कृष्ण आपल्या बाजुला असताना अर्जुनाला युध्द हरण्याची भिती नव्हती. मी स्वकियांविरुध्द लढाव की न लढाव हा प्रश्न पडलेला होता. अस होऊ नये या साठी मनोभुमिका बनवणे आणि एकदा का बनली की ती परिस्थीती हाताळण्याचे मनोधैर्य वाढवायची गरज असते.

भारतात सुध्दा नागरिकांचे दोन तट पडतात. दंगल करणारे बंदुक वापरु नका म्हणुन संसदेत दबाव आणतात. पाकिस्थानचे एजंट बनुन पुरावे मागतात. आपलेच भारतीय असतात. मनात संघर्ष होतोच.

भरतजी, इतक एक वाक्य सोडल तर बाकीच पटल असाव. बाकी जस ईश्वर न मानण्याच किंवा कर्म कांड न मानण्याच स्वातंत्र्य तुम्हाला आहे तितकच कर्मकांड मानणार्‍यांना आहे. यात राज्यकर्ते सुध्दा आलेच.

<<<< परिस्थिती हाताबाहेर जात असेल तेव्हाच मनोधैर्य वाढवायची अधिक गरज असेल ना ?
तेव्हा काय करायचं असतं?
>>>>>>

मग " खुन की दलाली " वैगेरे सारखे गौरवोद्गार काढायचे !!

२०११ मध्ये ऑपरेशन जिंजर झाले होते. त्यावेळी पीओकेमध्ये जाऊन सैन्याने पाक अतिरेक्यांचा खातमा केला होता.

पण काँग्रेस सरकारने कधी गवगवा केला नव्हता .. कारण आजवरची सगळी महत्वाची युद्धे काँग्रेसच्या काळातच झाल्याने अशा छोट्या मोठ्या चकमकींचं ना काँग्रेसला कौतुक असायचं ना जनतेला .. त्यामुळं काँग्रेस व जनतेने अशा स्ट्राइक आणि चकमकीम्चा कधी जाहिरात म्हणून वापर केला नव्हता. . लष्कराला अशा चकमकी करायचे स्वातंत्र्य होते.

पण आता म्हणे अशा चकमकी मोदींजींच्या नेतृत्वाखालीच कराव्या लागतात ! चकमक झाली की लगेच त्याची बातमी होते! आणि स्वातंत्र्यलढा व त्यानंतरची युध्हे यांच्यात काडीमात्र सहभाग नसलेले भाजपे ढोल बडवत नाचू लागतात.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/operation-ginger-2011-tit-...

अरेरे !!! भाजपाच्या तालावर नाचणार्‍या सैन्याचे काय हे हाल....
------------------------------------------------------------------------
अवांतर : कारगिल युद्धात आपल्या सैन्याला "लाईन ऑफ कंट्रोल" चे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये असा सरकारच आदेश होता. त्यामुळे...

(अ) भारतिय स्थलसेनेला खडतर मार्ग चोखाळायला लागून त्यांचे काम कठीण झाले होते आणि
(आ) भारतिय वायूसेनेच्या कारवायांवर बंधने येऊन त्यांचेही काम कठीण झाले होते.

याचाच अर्थ असा की, "लाईन ऑफ कंट्रोलचे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये" ही अट त्यावेळेस नसती तर भारतिय सैनिकांची जीवितहानी, इजा व इतर सामरिक खर्च लक्षणीय प्रमाणात कमी झाला असता.
____________________________________________________________________________
संदर्भ : http://www.misalpav.com/comment/887849#comment-887849

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन.

असा खोटा इतिहास रचला जाऊ नये म्हणून आता काँग्रेसच्या काळाबद्दल लिहावे लागले.

सैन्य कालही कारवाई करत होते, आणि आजही तशाच प्रकारे कारवाई करण्यात आली. या व अशा कारवाईचा गव-गवा व्हावा असे काल पर्यन्त (२०१४ च्या आधी) सरकारला वाटले नव्हते. आज आपले धोरणे बदलत आहेत, असो. ऑप जिन्जर मुळे हे सुस्पष्ट झालेले आहे.

इतिहासात अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली अशी खोटी हाकाटी पिटणे आता तरी थाम्बवा. त्याने अगोदरच कमजोर झालेली विश्वासार्हता पुर्णत: नष्ट होईल.

<<भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन.>>
----- धादान्त खोटा प्रचार करणे थाम्बवायला हवे....

http://www.business-standard.com/article/economy-policy/government-slash...

दोन बातम्यांचा संबंध म्हटला तर आहे, म्हटला तर नाही.

सर्जिकल स्ट्राइकच्या उन्मादात हवाई दलाच्या २९ लोकांसह गायब झालेल्या विमानाचा , उरीत बळी पडलेल्या १८ सैनिकांचा (हा हल्ला कसा होऊ शकला या प्रश्नाचा) आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या सैनिकाचा विसर पडलाय का?

भरत - आठ दिवसात ३ वेळा सुरक्षा दलावर हल्ले झालेत... भारतासारख्या एका भल्या मोठ्या देशाच्या सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करण्याची मारकता त्यान्च्याकडे आहे.

पाक साठी हा लो कॉस्ट वॉर आहे. सरकारातल्या लोकान्ना, आणि मोदी यान्च्या चहात्यान्ना घटनान्चे गान्भिर्य अजिबात नाही आहे असे दुर्दैवाने म्हणावे असे वाटते नाहीतर ढोल, ताशे, गुलाल उधळत नाचत बसले नसते...

अतिरेकी हवा तेव्हा, हवा तिथे वार करु शकतात आणि आपण येथे काविळीने त्रस्त होत एकमेकान्ना पाण्यात पहातो. द्वेषाने अन्धपणा आलेला आहे, खरे-खोटे याचे भान नाही. एखादे स्टेटमेन्ट आपणच म्हणायचे, आणि चार दिवसान्नी कुणी असे म्हटले हे विचारायचे.

POK आणि पाक यात मोठा फरक आहे, खुप मोठा... पण तो आहे हेच समजत नाही, समजले तरी तो तसा आहे हे मान्य करायचे धाडस होत नाही. असे मान्य केल्याने काय हल्ल्याची तिव्रता कमी होते?

प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचे हक्क आहेत. निव्व्ळ प्रश्न विचारला, शन्का उपस्थित केली तर तो राष्ट्रद्रोह कसा होतो ?

सुरक्षा दले त्यान्ची नेमुन दिलेली कामे करत असतो. त्याबद्दल नेहेमीच प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, आदर आहे. आधी वॉर्निग मिळालेली असताना, पठाणकोटात शिरलेल्या अतिरेक्यान्ना नाकाम करायला एव्हढा वेळ का लागला? किती मनुष्य बळ, शक्ती वापरावी लागली? दिल्ली वरुन आदेश यायला एव्हढा वेळ का लागला ?

मोदी सरकारने सैनिकांच्या पेन्शनची सर्जरी केली.

युद्ध अथवा एखाद्या मोहिमेत जखमी झालेल्या सैनिकांना निवृत्तीनंतर महिन्याला ४५, २०० रुपये पेन्शन दिली जाते. त्यात १८ हजारांची कपात करण्यात आली असून आता २७ हजार २०० दिली जाणार आहे. सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या अथवा लष्करात १० हून अधिक वर्षे सेवा बजावलेल्या जखमी अधिकाऱ्याला आणि २६ वर्षे सेवेत असणाऱ्या नायब सुभेदारांना देण्यात येणारी पेन्शन ७० हजारांवरून ३० हजार करण्यात आली आहे. त्यांच्या पेन्शनमध्ये तब्बल ४० हजारांची कपात करण्यात आली आहे.

वरिष्ठ शिपाई पदावर असणाऱ्या निवृत्त सैनिकाचे महिन्याला २,०४० रुपये, सुभेदाराचे ३, ४७२ रुपये आणि लेफ्टनंट कर्नल पदावरच्या अधिकाऱ्याचे ६,८५५ रुपयांचे नुकसान होणार आहे.

http://m.maharashtratimes.com/nation/ministry-of-defence-issued-a-letter...

मरायला वर्दी आणि चरायला मोदी !

लेफ्टनंट जनरल हुडा हे सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी उ विभागचे (nothern command) प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली, नुकतेच ते सेवा निवृत्त झाले. त्यांच्या मते, सर्जिकल स्ट्राईकचा आपण विनाकारण खुप प्रचार केला आणि राजकारण केले.

https://timesofindia.indiatimes.com/india/i-respect-former-lt-general-ho...

एका अत्यंत जबाबदार अधिकार्‍याचे, ज्याचे या कारवाईतले योगदान खुप मोलाचे आहे, हे मत आहे.

त्यांच्या मते, सर्जिकल स्ट्राईकचा आपण विनाकारण खुप प्रचार केला आणि राजकारण केले.
<<

एक वेळ प्रचार करणे समजू शकतो मात्र सर्जिकल स्ट्राईकवर राजकारण सुरु केले ते कॉंग्रेस व कजरिवालच्या पार्टीने. अत्यंत बेजाबदारपणे सैन्याकडे पुरावे मागण्यापासून ते पाकिस्तानचे गोडवे गाण्यापर्यंत, ह्या दोन पार्ट्यांच्या नेत्यांची मजल गेली होती.

ही बिघडलेली टेप दिसतेय. उगाच वाजत असते जिथेतिथे. वाजायची म्हणून. ना ताल ना सूर ना अर्थ. नुसताच आवाज.

<< एक वेळ प्रचार करणे समजू शकतो मात्र सर्जिकल स्ट्राईकवर राजकारण सुरु केले ते कॉंग्रेस व कजरिवालच्या पार्टीने. अत्यंत बेजाबदारपणे सैन्याकडे पुरावे मागण्यापासून ते पाकिस्तानचे गोडवे गाण्यापर्यंत, ह्या दोन पार्ट्यांच्या नेत्यांची मजल गेली होती. >>
------- त्यांनी सैन्याकडे पुरावे मागितले नव्हते, पुरावे मागितले असतीलच तर ते सरकार कडे मागणार. पुरावे सरकारने द्यायलाच हवे होते असे कुठे आहे ? पण आपला उताविळपणा आणि राजकीय संधीसाधू वृत्ती नडली...

त्यांनी सरकारला पुरावे मागायचे आणि तुम्ही "बघा ह्यांचा सैन्यावर आणि त्यांनी केलेल्या कारवाईवर पण विश्वास नाही", अशी खोटी दिशा त्या प्रश्नाला द्यायची. विरोधकांची शंका सरकारच्या हेतू बद्दल होती, सैन्याबद्दल तर नव्हतीच नव्हती.

अभ्यासू लोकांनी लेफ्टनंट जनरल साहेबांचे (ज्यांनी कारवाई आखण्यात आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यामधे अत्यंत महत्वाची भुमिका निभावली होती) प्रसिद्ध झाले वक्तव्य वाचावे.

<त्यांनी सरकारला पुरावे मागायचे आणि तुम्ही "बघा ह्यांचा सैन्यावर आणि त्यांनी केलेल्या कारवाईवर पण विश्वास नाही अशी खोटी दिशा त्या प्रश्नाला द्यायची. विरोधकांची शंका सरकारच्या हेतू बद्दल होती, सैन्याबद्दल तर नव्हतीच नव्हती. >+१.
हेच काल टाइप करूनही सेव्ह केलं नव्हतं.

पाकिस्तानचे गोडवे गायले, हफीज सईद लाडका झाला आणि काय काय तारे तोडणारे उत्तर द्यायच्या लायकीचे नाहीत म्हणावं, तर पंतप्रधान, पक्षाध्यक्षापासून पक्षाची ती ऑफिशियल लाइन आहे. या लोकांनी देशभक्तीची सर्टफुकटं वाटायला घेतलीत (आता धर्माचीही).

एकीकडे म्हणायचं आधीच्या सरकारांनी ६० वर्षांत केलं नाही तेवढं आम्ही एका वर्षात केलं आणि टेप वाजवायची नेहरूंमुळे असंच झालं आणि तसंच झालं. पटेल असते, तर झालं नसतं. स्वतःला काही करणं शक्य नसेल, तर पटेलांना जिवंत करा किंवा प्लान्चेट करून बोलवा आणि त्यांच्या सल्ल्याने कारभार करा म्हणावं.

आणी पुरावे का मागितले याचे कारण पण पहा ना,

त्या आधी म्यानमार मध्ये घुसून अशीच कारवाई केली म्हणून ढोल वाजवले, म्यानमार सरकारने त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला, शेवटी ती कारवाई दोन देशातील नो mans land मध्ये झाल्याचे उघड झाले.

कुड
वुड
शुड

बुड बुड घागरी

आमच्या शास्त्रीनचा लाहोर मध्ये रणगाड्यावर फोटू आहे
इंद्रा गांधींनी 90000 पूर्व पाकचे सैनिक पकडले होते

इंद्रा गांधींनी 90000 पूर्व पाकचे सैनिक पकडले होते
नवीन Submitted by BLACKCAT on 29 October, 2020 - 18:31
--

नुसते पकडून काय उपटले ??
शेवटी नाक घासत परत पाकड्यांना असेच दिले. निदान पाकव्याप्त काश्मिरमधील जमीन तरी परत घ्यायची, त्या पकडलेल्या पाकड्यांच्या बदल्यात.

तुम्ही पकडा आणि घ्या जमीन
राफेल आणले ना ?

की वाजपेयींने कारगिलला बोफोर्स वापरले तुम्हीही अजून तेच का ?

पाकिस्तान कापतच असेल थरथर तर ते 1947 ते आज तागायत भारताने घेतलेल्या 5000 अस्त्राना , चहाच्या किटलीला नाही.
बैलगाडीखालून चाललेल्या कुत्र्याची कथा का बरे आठवली ?

की वाजपेयींने कारगिलला बोफोर्स वापरले तुम्हीही अजून तेच का ?
नवीन Submitted by BLACKCAT on 29 October, 2020 - 19:00
---

वापरायलाच घेतले होते ना राजीव गांधीने, कि त्याची पुजा करायला ?
आणि प्रश्न बोफर्स तोफेच्या गुणवत्तेचा कधीच नव्हता. प्रश्न होता, तो या डील मधे राजीव गांधीने खाल्लेल्या कमिशनचा.

राजीव गांधींने कमिशन खाल्ले
प्रिंकाचे लंडनला घर आहे
राहुल इटलीचा नागरूक आहे

निवडणूक आली की असे फुगे उडतात अन मग दोन दिवसात फुटतात

लालबहादूर आणि इंदिरा गांधींचे कर्तृत्व महान होते ते पाक बरोबरील युद्धात वेळोवेळी दिसून आलेच आहे !
त्याच प्रमाणे त्यावेळी विरोधी पक्ष सुध्दा सरकार च्या पाठीमागे खंबीर उभा होता !
तसेच त्या वेळच्या विरोधी पक्षनेत्यांना प्रसंगाचे गांभीर्य समजत होते आणि हा कॉमन सेन्स आहे .
पण बलाकोट strike हल्ल्यानंतर पाकिस्तान च्या राजदूत ची भूमिका राहुल गांधी पार पाडत होता , आपल्याच देशातील सरकार ला पाकिस्तानच्या वतीने प्रश्न विचारून भंडावून सोडत होता , ' तो ' कॉमन सेन्स या येड्या गाबळ्यात तर नव्हताच तर किमान त्याच्या चेल्या चापट्यानी तरी त्याला शहाणे करावे ना ! तर ते ही त्या येड्या च्या सुरात सूर मिसळून ओरडत होते .

आणि भरीस भर अभिंदन ला सोडले त्या निमित्ताने मोदी पेक्षा वरचढ इम्रान ला प्रोजेक्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न तमाम काँग्री आणि कम्युनिस्ट लोकांनी चालवला होता !
त्यात सर्वात संताप दायक म्हणजे बरखा , रवीश ,शेखर गुप्ता या आणि इतर लिब्री गैग मध्ये इम्रान ला शांततेचे नोबेल देण्यात यावे यासाठी ट्विट करण्याची फुल्ल स्पर्धा लागली होती .
या सगळ्यांची थोबाड अभिनंदन वेळी पाकि परिस्थिती चे वर्णन करून त्या पाकी खासदार ने मस्त फोडली
आहेत .
वैचारिक स्वातंत्र्याचा गैर उपयोग कसा करू नये हे या सगळ्या लिब्रिनी वारंवार दाखवले .

Pages