भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*अविश्वसनीय वास्तव*

आज एक वेगळी विलक्षण कथा. ही दुसर्‍या कुणी सांगितली असती तर अवैज्ञानिक भाकडकथा म्हणून मी उडवून लावली असती पण साक्षात् वनमहर्षी मारुती चितमपल्ली ही सांगतात तेंव्हा दखल घेणं भाग आहे. चितमपल्ली सांगतात - "जेंव्हा जंगलात कडाक्याची थंडी पडते तेंव्हा वानरं लाकडं गोळा करुन शेकोटीसारखा ढीग रचून (अर्थात न पेटवता) त्याभोवती बसून जणू शेक घेतात. वानरं निघून गेल्यावर जर ही लाकडं पेटवायचा प्रयत्न केला तर पेट घेत नाहीत." चितमपल्ली म्हणतात की त्यांनी अगदी रॉकेल टाकून ही पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ही लाकडं पेटली नाहीत. या प्रकाराबाबत त्यांनी आदिवासींना विचारलं तेंव्हा आदिवासी म्हणाले " अहो शेकताना ही वानरं त्या लाकडातलं अग्नितत्व काढून घेतात म्हणून ही पेटत नाहीत"
एका कार्यक्रमात त्यांनी ही गोष्ट सांगीतली तेंव्हा श्रोत्यांच्या चेहेऱ्यावर अविश्वासाचे भाव होते. मात्र एक खेडूत वृद्धा त्यांचेकडे येऊन म्हणाली, "बाबा तू सांगतो ते बरोबर आहे. जुनी म्हण आहे...
*"वानराची लाकडं अन् चुलीला साकडं "*

के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर no मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

माहीती सर्वाना कळवा फायदा होईल FORWARDED AS RECEIVED.

(हे भोंदू फोरवर्ड आहे हे इथे कळले: https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/whatsapp-rumour-o...)
---

पुणे सोलापूर हायवे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे..
[ कुरकुंभ येथील दोन केमीकल कंपनीमध्ये भिषन स्फोट.
शेजारील गावे लगेच रिक्त करण्यात येत आहेत.20 की.मी पर्यंत सतर्कतेचा ईशारा दिला आहे.....
पाटस टोलनाका बंद आहे.
कृपया हा मेसेज लवकरात लवकर पोहोचवा.

(हे भोंदू फोरवर्ड आहे हे इथे कळले: https://www.esakal.com/pune/fire-and-explosion-have-occurred-kurkumbh-mi...)

कृपया हा मेसेज लवकरात लवकर पोहोचवा.
हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
असे आव्हान करणारे बहु-बहुतांशी मेसेजेस भोंदू किंवा मुद्दाम चुकीचा संदेश देणारे असतात

लाकूड-अग्नीतत्व
तसा पाण्यापासून वीज बनवून त्यातले सत्व काढून घेतील आणि तुम्हाला नि:सत्व पाणी मिळेल असा प्रचार कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वेळी झालेला असे ऐकिवात आहे.

आजही दिवेकर बाई, उन्हात वाळवलेल्या पापडातून D जीवनसत्व मिळते म्हणून सांगते

एक फेसबुकवर चेहरा सुजलेल्या मुलाचे फोटो आहेत त्याचे व्हॉट्सअप फॉरवर्ड येते.की डॉ ने निष्कर्ष काढला की किंडर जॉय मुळे असे झाले.(किंडर जॉय सदगुणाचा पुतळा नाही.पण मुलाला आलेली ऍलर्जी नट किंवा लॅक्टोज ऍलर्जी असेल तर फक्त किंडर जॉय बंद करून काय होईल?)
डॉ मंडळींना असे एका स्पेसिफिक ब्रँड च्या वस्तूमुळे असे झाले असं कंकल्युड करता येतं का?
कधीकधी चॉकलेट वाईट म्हणून मुलांना फलेरो आणि जेली स्वीट देणाऱ्या लोकांचीही गंमत वाटते.

आजही दिवेकर बाई, उन्हात वाळवलेल्या पापडातून D जीवनसत्व मिळते म्हणून सांगते>>
जर कपडे सकाळच्या उन्हात ठेवुन घातले तर मिळेल का ड जीवनसत्व ? (सध्या दुपारच्या उन्हात वाळवलेले असतात)

कृपया हा मेसेज लवकरात लवकर पोहोचवा.
हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
असे आव्हान करणारे बहु-बहुतांशी मेसेजेस भोंदू किंवा मुद्दाम चुकीचा संदेश देणारे असतात
>>>

तसेच ज्या संदेशात 'हार्वर्डमधल्या एका स्टडीनुसार', 'युनोने जाहीर केल्यानुसार' वगैरे असते ते सुद्धा 100% बोगस असतात

स्त्रीयांनी अलंकार का घालावे
*आपली संस्कृती*....
बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकाराचा धक्का ,
म्हणून मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का !
मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब,
तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !!
सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा ,
म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा !
कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल,
उष्णतेचा दाह कमी करते पैंजण घातलेले पाऊल !
बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या सौंदर्याची शान ,
त्याच बांगड्यांमुळे होते गर्भाशय सुरक्षित असल्याची जाण !
शारीरिक व मानसीक बदल हा आहे एक भाग,
म्हणून जोडवी बीरोदी घालुन बाई तू वाग !!
शरीरातील रक्तप्रवाहासाठी टोचतात लहानपणीच कान ,
भारतीय संस्कृतीने दिला आहे, स्त्रियांना " कानातले
" घालायचा मान

बांगडी, पैजण आणी जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसुन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते.

● बांगडी घालण्याचे फायदे ●

1) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो.
2) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
3) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रद्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
4) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.
5) तुटलेली बांगडी घालुन नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.

● जोडवी घालण्याचे फायदे ●

1) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तु नाही.
2) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील " *Hormonal System* " योग्यरित्या कार्य करत.
3) जोडवी घालण्याने " *Thyroid* " चा धोका कमी होतो.
4) जोडवी " *Acupressure* " उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणी स्नायु मजबूत होतात.
5) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.

● पैजण घालण्याचे फायदे ●

1) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
2) पैजण स्त्रीयांचे पोट आणी त्यांच्या शरीरातील खालील भागातील " *Fat's* " कमी करण्यात मदत होते.
3) वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.
4) चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.
5) पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.6) पायात सोन्याचे पैजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.

धन्यवाद

पुरुषांनी अजून अश्या किती रिकामटेकड्या पोस्ट लिहिता येतील याचा विचार करावा, म्हणजे नऊवारी वापरल्याने कमरेचा फॅट लॉस कसा नियंत्रित होतो, डोक्यावर पदर कायम घेतल्याने पदराचे घर्षण आणि रक्ताभिसरण होऊन केसांच्या समस्या दूर होऊन मऊ लांब केस मिळतात वगैरे वगैरे ☺️☺️

>>5) पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.

हे फारच सही आहे. ऑफिसमधेपण ड्रेसकोड मधे हे कंपल्सरी करावं, म्हणजे स्त्रिया तिथेही भरपूर कामं करतील दिवसभर.

नातेवाईकांच्या ग्रुपवर हे फॉरवर्ड चालत असतात भरपूर ...

अगदी बरोबर

साठी सत्तरीचे ज्येष्ठ नातेवाईक असे अनेक भंपक फॉरवर्ड करत असतात. त्यातून डॉक्टर असल्याने त्यातील फोलपणा लगेच जाणवतो पण त्यांना समजावणे किंवा हे चुकीचे आहे हे सांगायला गेले तर ते त्यांना दुखवण्यासारखे होते त्यामुळे सरळ असे फॉरवर्ड डिलीट करणे हाच उपाय आहे.

मध्यंतरी मला एक व्हाट्सप फॉरवर्ड आला होता की लहान मुलं तोंडात बोटं घालत असतील तर ती काढू नका, त्याने स्मरणशक्ती वाढते. खरं आहे का हे?

हे फारच सही आहे. ऑफिसमधेपण ड्रेसकोड मधे हे कंपल्सरी करावं, म्हणजे स्त्रिया तिथेही भरपूर कामं करतील दिवसभर. >>
इच्छाशक्ती मजबूत होते. म्हणजे ज्या स्त्रियांना काम करायचे नाही त्यांची कामे न करण्याची इच्छाशक्ती मजबूत होईल, तेव्हा उगीच रिस्क घेऊ नये असे मला वाटते.

याने पुरुषांचीही इच्छाशक्ती मजबूत होते का याच्या क्लिनिकल ट्रायल्सही घ्यायला हव्यात.

स्त्री आरोग्याची काळजी करणारी आपली संस्कृती बघून डोळे भरून आले.

मला उगीच वाटायचे की बांगडया, पैंजण, जोडवी वगैरे दागिने स्त्रियांच्या हातापायात अडकवून त्यांच्या आवाजावरून बया कामचोरी करतेय की काय हे घरातील थोरांनी बसल्या जागेवरून ओळखायची सोय आपल्या संस्कृतीत केली होती.

मला उगीच वाटायचे की बांगडया, पैंजण, जोडवी वगैरे दागिने स्त्रियांच्या हातापायात अडकवून त्यांच्या आवाजावरून बया कामचोरी करतेय की काय हे घरातील थोरांनी बसल्या जागेवरून ओळखायची सोय आपल्या संस्कृतीत केली होती
>>>

वाह वाह, काय हूच फेमिनिष्ठ विचार!! आपल्या थोरांनी येवढं विचार जरा भल्यात केला असता तर आपला भोंदू देश कुठच्या कुठं गेला असता अन आम्ही क्लायंट बनव हमरीकन लोकांना झाडात असतो!

पण आमचे रेमेडोके पूर्वज
अन बावळट संस्कृतीवाले!!

फेमिनिस्ट विचार नक्की कुठला?

बायांनी अंगभर वेगवेगळे आवाज करणारे दागिने घालणे व त्या दागिन्यांनी बायांच्या आरोग्याला किती मदत होतेय हे लिहिणे की त्या दागिन्यांचा असाही एक उपयोग होऊ शकतो याबद्दल बोलणे ? की बाबड्या पुरुषांसाठी असे दागिने का बनले नाहीत याबद्दल सहवेदना व्यक्त न करणे?

फेमिनिष्ठ, फेमिनिस्ट नव्हे. फेमिनिस्ट बरेच चांगले असतेत. फेमिनिष्ठ म्हणजे साध्या भोळ्या, सज्जन बायकांना लब्बाड दुष्ट संस्कृती रक्षक पुरुषांनी कस बुद्दु बनवलं वगैरे वगैरे वाले!!!

Pages