विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबीर.. धन्यवाद! पण अजुन आपले नाव नाही बांगला विरुद्ध? आपला पहिला नंबर निश्चित आहे... तरीसुद्धा आपल नाव नाही अजुन?

जर आपली मॅच मेलबोर्नला असेल तर वत्सला..परत एकदा तुला संधी आहे,,खरच भाग्यवान्..पण या वेळेला सामना वि़क डे ला आहे.

आपल्या शेवटच्या अर्थहिन सामन्यात आपण आपली बेंच स्ट्रेंग्थ वापरुन बघायची की आहे त्याच संघाला वापरायचे? अक्षर पटेल्,बिन्नी,रायडु यांना खेळवुन मुख्य प्लेयर्सना आराम द्यायचा का? का त्याने त्यांचा मोमेंटम कमी होइल? मला वाटत यादवला बसवावे व शमि..भुवनेश्वर जोडी कशी बोलिंग करते हे अजमावे. यादवला बघुन मला त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. कदाचित कालचा सामना न्युझिलंड मधे होता म्हणुन केदार म्हणतो तसेही झाले असेल. परत ऑस्ट्रेलियात गेल्यावर तो उपयोगी येइल.

तुम्हाला काय वाटते?

<<
ह्यावर काहीतरी विचार करायला हवा. शेवटी आपल्याला वल्डकप जिंकायचा आहे. स्मित>>

.... आवडले. खरे राखायचा आहे म्हणायला हवे, पण ती इन्टेन्सिटी येत नाही.

काय झक्की कुठे पोचलात,
मी इथेच आहे. डोके मात्र रिकामे असल्याने कुठेहि भरकटते, सावरीच्या कापसासारखे. मनावर घेऊ नका. (घेतलत तरी मी काय करणार म्हणा! तुम्हालाच त्रास नको म्हणून म्हंटले.)

जर आपली मॅच मेलबोर्नला असेल तर >>. तिथेच आहे आपली QF

माझ्यामते अक्षर पटेलला संधी द्यावी आणि जडेजाला रामराम करावा. अक्षरची बॅटिंग ही जडेजापेक्षा किती तरी चांगली आहे. तसे यादवला काढून भुवीला एका मॅच पुरते घेता येईल पण मला ते नको वाटते कारण यादव ऑस्ट्रेलियात कमाल करणार आहे, त्यामुळे तो असू द्यावा. म्हणून तो एक बदलच पुरेसा आहे

आज लंका जिंकावी तरच आपण बांग्लाशी खेळू अन्यथा लंका. Happy

मॅच बघतानाही ते फुटबॉलकी तरह खडा है हे ऐकल्यावर जाम हसू आले होते. मुख्यतः रैनासाठी तो जास्त बोलत होता.

एकदा मार्क वॉ (बहुतेक) म्हणाला होता की, "NZ हा चिवचिवणार्‍या पक्षांचा थवा आहे" त्याची आठवण झाली होती. NZ मध्ये गेल्यावर वाण नाही तर गुण लागला. Lol फनी होते ते.

स्कॉटलँडचा ड्रेस बघुन शिशुवर्गातल्या ड्रेसची आठवण आली. आमच्या शाळेचा ड्रेस देखील असाच निळ्या चौकटीचा होता. काही शाळांचा लाल चौकटींचा असतो. छान आहे ड्रेस
वर त्या जर्सीवर सगळ्या क्रिकेट क्लबचे नाव देखील आहे.

असामी... अरे ते आपल्यासाठी .. मजा म्हणुन्...आपले विचार मांडायला रे. शेवटी करणार ते धोनी व आपल्या टींमचा थिंकटँकच.. हे मलाही माहीत आहे..:)

हो हो अन्यथा धोनी ने मायबोलीवर कोतबो मधे धागा काढला असता Rofl या चालु घडामोडींमधे टीम सिलेक्शन साठी धागा काढला असता.
मिसबाह तर "माझे काय चुकले" या धाग्यावर तर अक्षरशः पोस्टींचा ढिगच पाडेल. आणि विराट कोहली गर्लफ्रेंडवर शांत कसे रहावे म्हणुन ऋन्मेषला विपुत प्रश्न विचारेल. Wink

बरच आहे या लोकांना मायबोली माहीत नाही

Sri Lanka RR 7.14
Last 5 ovs 41/4 RR 8.20

श्रीलंकाने आनंदाच्या मारामारीच्या नादात विकेट फेकुन दिल्या

श्रीलंकेचा आज भारत झाला आहे. पहिले तिघे ( वजा रोहित ) २५०+ धावा करतात, मग बाकीचे येऊन हजेरी लावून जातात.

संगा द ग्रेट ! ऑस्सम इनिंग.

>> अक्षरची बॅटिंग ही जडेजापेक्षा किती तरी चांगली आहे.
हे मला माहिती नव्हतं. अक्षरची बोलिंग आयपीएल मधे मी पाहिली आहे. चांगली टाकतो.

संगानं किती केल्या?

स्कॉटलंड चिवटपणे खेळतय . त्यांची बॅटींग बरी आहे , बिचारे बोलिंगमधे मार खातात ,
खर तर अफगाण वगळता सगळ्या असोसिएट्सची (आयरिश सह) तीच रड आहे .
सगळे १२० ने टाकणारे एकसुरी मिडियम पेसर्स . त्यामुळे शेवटच्या १० ओव्हर मलिदा असतो समोरच्या टीमला Happy

2003 साली दुबळ्या केनियाला सेमीत मारून फायनलला बलाढ्य ऑस्ट्रेलिया.

यंदा तसेच बांग्लादेशनंतर बलाढ्य ऑस्ट्रेलिया भेटणार.

तेव्हा हरलो होतो, आता.....

भारत-पाक अंतिम सामना बघायचा आहे मला.. मारले पाहिजे ऑस्ट्रेलियाला सुद्धा..

जी टीम QF आणि SF ला जाते त्या टीमला दुबळे म्हणणे म्हणजे लईच झाले.

WI तेंव्हा जबरी होती, आता नाही, म्हणजे पूर्व पुण्याईवर अजूनही भारीच का?
इंग्लंड तेंव्हा जबरी होती, आता नाही, म्हणजे पूर्व पुण्याईवर अजूनही भारीच का?

वी नीड टू रिस्पेक्ट द टीम्स. त्या त्या वल्डकप मध्ये ती ती टीम भारी खेळली म्हणूनच ती QF आणि SF ला गेली आहे. त्यांनी इतरांना हरवले नाही का?

कंटाळा आला आता ह्या आर्ग्युमेंटचा. नेव्हर अंडर एस्टिमेट एनीबडी !

--

हो चिमण, अक्षर बर्‍यापैकी चांगला बॅटसमन पण आहे. (अ‍ॅज नं ७ / ८ ) त्याच्या शॉटस जबरी असतात. बसल्या की जबरी असे जडेजाला बद्दल म्हणता येईल, पण अक्षर मध्ये पोटँशियल आहे शिवाय तो बॉल स्विंग करतो. जडेजाला ते जमत नाही. जडेजा फक्त ३ ३०० च्या जोरावर व भारतीय पाटा विकेटवर ऑस्ट्रेलियाला नमविल्याच्या जोरावर टीम मध्ये आहे.

वी नीड टू रिस्पेक्ट द टीम्स. त्या त्या वल्डकप मध्ये ती ती टीम भारी खेळली म्हणूनच ती QF आणि SF ला गेली आहे. त्यांनी इतरांना हरवले नाही का?

कंटाळा आला आता ह्या आर्ग्युमेंटचा. नेव्हर अंडर एस्टिमेट एनीबडी !

>> करेक्ट केदार . बांग्ला इंग्लंड पेक्षा चांगली टीम आहेच आत्ता . कदाचित विंडीज पेक्षाही .

भारत-पाक अंतिम सामना बघायचा आहे मला.. > आता सिरीज डिसेंबर मधे होणार आहे पोटभरुन बघत बस हवे तर स्टेडीअम मधे जाउन बघ.

>> तेव्हा हरलो होतो,
तेव्हा आपल्या बॉलर्सनी जरा जास्तच चेकाळून बॉलिंग केली. नंतर पाँन्ट्याचं नशीब जोरावर असल्यामुळे त्यानं उडवलेले झेल कुणालाही मिळाले नाहीत. आणि ३५० च्या वरच्या धावसंख्येचा पाठलाग करायचा अनुभव नव्हता.
आता एखादेवेळेस नशीब आपल्याबाजुने फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा, नशीबाने त्यांचे महत्वाचे ३/४ गडी गडगडले तर? Wink

हो पण त्याच्यानंतर जगात सर्वात जास्त ३०० आणि ३५०+ स्कोर चा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर आहे. त्यामुळे आता प्रतिस्पर्धी ३५० मारुन सुध्दा धास्तावलेले असतात Happy

मला असे वाटते की आपण एकदा तरी चारशे धावा करायला हव्यात. किंवा एकदा तरी फार प्रचंड मोठा विजय मिळवायला हवा. ते आत्मविश्वास अधिक उंचावण्यासाठी नितांत आवश्यक आहे.

>> मला असे वाटते की आपण एकदा तरी चारशे धावा करायला हव्यात.
केल्या आहेत की. मोठ्या टीमच्या विरुद्ध नाही म्हणा.

अक्षर स्पिनर आहे. तो बॉल स्विंग नाही करत. तुम्हाला त्याला ड्रिफ्ट मिळते असं म्हणायचं असेल कदाचित. पण मला तरी तो जडेजा सारखा (हे राम!) टी-२० बॉलरच वाटला (फास्ट, फ्लॅट, डार्टिंग ईन डिलिव्हरीज). धोनी शक्यतो संघ-बदल करत नाही. तसही त्याने सांगितलं होतं की 'लेट द बेंच स्ट्रेंथ वॉर्म द बेंच'.

भारत पाकिस्तान फायनल नाही होणार. सेमी-फायनल ला भेटू शकतात दोघं, जर आपण बांगला-देश ला आणी पाकिस्तान ने ऑस्ट्रेलिया ला हरवलं QF मधे तर.

Pages